tag:blogger.com,1999:blog-74983935330566696982024-02-08T02:56:25.595-08:00malatinandanarun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-40890818975418943372011-01-27T02:37:00.000-08:002011-01-27T02:43:12.401-08:00बटाटा हाईट्सबोरिबंदर यायला तीनच स्टेशनच राहिली, तसा, लिमयेचा आवाज कानावर येऊन आदळला, " लिखित्या ऊठ रे. डाऊनच्या लोंढ्यात मरायचंय का? च्यायला! लिखित्या, लेका झोप कशी रे लागते एवढ्या गर्दीत."<br /> खरंच आज झोप अगदी अनावर झालेली होती. मुंबईतील महानगरपालिकेतील चांगली नौकरी आणि भरभक्कम पगार केवळ या दोनच दोन जमेच्या बाबी वगळता सध्याचे बाकी सारे जीवन जीवघेण्या धकाधकीचे होते. चांगल्या नौकरीचा प्रश्न मुंबईने सोडवला होता तरी निवासाचा प्रश्न खर्डी सारख्या दूरवरच्या गांवात येऊन सुटला होता. प्रवासातच रोज जाऊन येऊन किमान तीन तास जात होते. विश्रांतीही जेमतेमच होत होती. त्यातून वाचनाचे व्यसन लागलेले. काल संध्याकाळी सिड्नी शेल्डन या लेखकाचे ' टेल मी युअर ड्रीम्स ' हे पुस्तक हाताशी लागले आणि त्यात इतका गढून गेलो की रात्र किती उलटून गेली ते समजलंच नाही. पण घड्याळाच्या लावून ठेवलेल्या गजराने त्याचे काम चोख बजावले. डोळ्यावरची झोप अगदी आनावर होत होती तरी पुढच्या कामावर जाण्याच्या तयारीच्या सगळ्या क्रिया प्रतिक्षिप्तपणे झाल्याच.<br /> या क्षणी, आत्ताही स्टेशनात गाडी थांबली कधी, गाडीतून उतरणार्या माणसांच्या लोंढ्याने मला स्टेशनाबाहेर फेकले कधी, मी टॅक्सीत बसलो कधी आणि मुंबई महापालिकेतील या अतिक्रमण विभागातील माझ्या टेबलाशी येऊन बसलो कधी; कांही म्हणता कांही मेळ लागत नव्हता. नाही म्हणायला, लिफ्टमधून येतांना, एस्टॅब्लिशमेन्ट मधली एक पोरगी माझ्या झोपाळलेल्या चर्येकडे सहेतुकपणे पाहात, " हंऽऽ तिकडे बघा !" असं कांही तरी शेजारच्या इसमाच्या कानापाशी कुजबुजली आणि तोही महाभाग आवाजाच्या त्याच पट्टीत तिला," एन्क्रोचमेन्टला आहे तोऽऽ. तिथे काऽऽय .......! (इथे तो उजव्या हाताचा अंगठा तर्जनीवर घासून दाखवीत होता) गेला असेल रात्री कुठे साईट इन्स्पेकशनला". अशी, तोंडाकडे तोच अंगठा नेत, भिवया उंचावत, मौलिक माहिती देत होता. त्यावर ती फिस्कारून हसलेली आणि... " वॉऽऽव् लक्की गाय् !"असं म्हणाल्याचं मला चांगलंच आठवत होतं.<br />" साहब, हमरी फाईलका क्या हुआ?" या आवाजासरशी मी धाडकन् जागा झालो.<br /> या गर्जनेचा उगम मझ्या टेबलासमोर, डोळ्यावर काळा चष्मा आणि काळ्याच पण भरभक्कम देहयष्टीच्या विरोधाभासात हस्तिदंती रंगाच्या सफारी सूटमधला नरपुंगव उभा ठाकलेला होता. बटाटा हाईट्स या नावाच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचा तो बांधकाम कंत्राटदार होता. इमारतीचा आणखी कांही भाग तो बांधू पाहात होता आणि ते बांधकाम अनधिकृत असणार आहे अशी हरकत घेणारी याचिका त्या इमारतीत राहाण्यार्या एका पावशे नांवाच्या इसमाने दाखल केली होती. कंत्राटदाराला तो दावा अमान्य होता आणि त्या प्रकरणाची शहानिशा करण्याचे काम माझ्याकडे होते. हे सगळे मला तात्काळ आठवले.<br />" हां, वो सब देखना पडेगा. साईट व्हिजिट करनी पडेगी. मेझरमेन्ट लेने पडेंगे. तुम्हारा बांधकाम प्लॅनके मुताबिक है के नही वो सब देखना पडेगा. " मी वेळकाढूपणाचा प्रस्ताव मांडला.<br />" चलिये ना साहब. हम गाडी लाया हूँ. चलके देख लेते है. बाकी सब वहीं जमा लेंगे "<br /> शेवटच्या वाक्यावर त्याने त्याचा एक डोळा बारीक केला होता. ते मात्र मला आवडले नाही. त्याचे ते वाक्य पलिकडच्या टेबलावरील पोंक्षाच्या कानावर तर गेले नाही ना? मी चापापून पोंक्षाकडे पाहिले. तर तो गालातल्या गालात हंसत होता. इतकेच नव्हे तर तो मला ' जा, जा! ' अशा अर्थाच्या खुणाही करत होता. मला कसेसेच झाले. मला हे सारे नवीन होते. मी या खात्यात नुकताच बदलून आलो होतो. उमेदीची दोन वर्षं एस्टॅब्लिशमेन्टला काढून झाल्यावर माझी बदली इथे झाली होती. माझ्या आधी हे काम पाहाणारे सद्गृहस्थ अशाच एका भानगडीत निलंबित झालेले होते आणि 'क्लीन शर्ट' म्हणून माझी इथे नेमणूक झाली होती.<br /> " गाडीकी कोई ज़रूरत नही. आप चलिये. मै पहुँच जाऊँगा वहाँ. थोडी देरसे." असं म्हणून मी त्याची बोळवण केली. मात्र ती इमारत मला पाहावीच लागणार होती. शिवाय बटाटा हाईट्स या कांहीशा विचित्र नावाने मनात कुतुहल जागे झाले होते. कांही तांतडीने पाहाण्याजोगे कागद पाहून मी बटाटा हाईट्सची फाईल काढली आणि साईट व्हिजिटची परवानगी घेऊन जाण्यासाठी जीप मागवली.<br /> जीपमधे मी रात्री वाचायला घेतलेल्या कादंबरीचा आणि बटाटा हाईट्स या दोन्ही परस्परभिन्न गोष्टींचा विचार करीत होतो. कादंबरीचे कथानक एका मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर अशा विचित्र विकाराने ग्रासून लागोपाठ पाच खून करणार्या मुलीवर बेतलेले होते. प्रत्येक खुनाच्या वेळी तिचे तात्कालिक व्यक्तिमत्व तिच्या नैसर्गिक व्यक्तिमत्वापेक्षा अगदी निराळे असायचे. जणू एक दुभंग व्यक्तिमत्व! मी विचार करीत होतो, खरंच असं असूं शकेल? एखादा माणूस असे निराळे व्यक्तिमत्व घेऊन जगू शकतो? निदान, कांही काळापुरता कां होईना, असा वावरू शकतो? डोक्यातली कादंबरी मी महत्प्रयासाने बाजूला सारली आणि बटाटा हाईट्सचा विचार करू लागलो. मला तो बटबटीत सफारीवाला आठवला. पण मला त्याच्याशी कांही घेणे देणे नव्हते. ते तसे असायलाही नको होते. कारण कुणा पावशे नावाच्या गृहस्थाने, आमच्या भाषेत भोगवटाधारक, अनधिकृत बांधकामाबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. मला त्याची आणि त्याचीच भेट घ्यायला पाहिजे असे मी मनाला ठासून बजावले. एवढ्यात ती बटाटा हाईट्स आलीदेखील.<br /> एका सहा मजली सीमेंट कॉन्क्रीटने बांधलेल्या उत्तुंग इमारतीसमोर मी उभा होतो. प्रत्येक मजल्यावर आठ बिर्हाडे असावीत. खालचा मजला आतल्या बाजूने वाहनतळासाठी मोकळी जागा आणि बाहेरच्या बाजूने सलग ओळीने दुकानाचे गाळे. इमारत काटकोनात बांधलेली. म्हणजे चार बिर्हाडांच्या काटकोनात लगतची चार बिर्हाडे. इमारतीची रचना एकूणच थोडी चमत्कारिक वाटणारी. इमारतीच्या खालील उरलेली जागा विरुध्द बाजूला बांधलेल्या तटबंदीवजा भिंतीने बंदिस्त केलेली. कोपर्यात बांधलेले एक गणपतीचे मंदीर. त्याच्यासमोर, बहुदा, सार्वजनिक कार्यक्रमासाठी पन्नासेक माणसे बसू शकतील असा चबुतरा. मी मुबईत गेली दोन वर्षे होतो. अनेक नाविन्यपूर्ण आणि नव्या काळाशी सुसंगत इमारती मी पाहिल्या होत्या. पण नाविन्याचा फारसा लवलेश नसलेली ही इमारत पाहून मी जरा अचंभ्यात पडलो. आणि शिवाय ही इमारत किंवा हा परिसर मी या आधी केंव्हातरी पाहिलेला आहे असं वाटायला लागलं. कांही निराळीच कंपनं मला जाणवायला लागली.<br /> मला पाहाताच मघाचा तो कंत्राटदार सामोरा आला. "आव, आव, साहब" म्हणत तो मला त्याच्या कार्यालयाकडे नेऊ लागला. पण मी साफ नकार दिला आणि त्या पावशेची चौकशी केली. तो आणखी कांही बोलण्याच्या आतच त्या पटांगणात क्रिकेट खेळणार्या मुलांपैकी एकाला पावशे कुठे राहातात म्हणून विचारलं.<br />" टॉक्क्! कोन्ते पावशे पायजेलेत तुम्हाला? आय मिन्, थर्टीन नंबर की थर्टीफोर?"" पावशेऽऽऽ! म्हणजे तेऽऽऽआपलंऽऽऽ ...!" मी गडबडलो. पण कां कुणास ठाऊक, आणि" थर्टीन! तेरा, तेरा... अण्णा....अण्णा पावशे" असा, जवळ जवळ, ओरडलोच <br /> काय झालं होतं मला? कोण अण्णा पावशे? मी तेरा नंबरच कां सांगितला? एव्हाना ती सगळी क्रिकेटची टीम जमा झाली होती आणि खूक्क् करून हंसायला लागला होती.<br />" कूऽऽल मॅन! तुमचं कॉय कुंडली दॉखवायचं आहे कॉ ? " पहिले दोन शब्द त्या टीमला उद्देशून पण पुढील सारे मला.<br />" नाही. अंऽऽ..कुंडली.... तसलं कांही नाही. माझं काम ... आय मिन्, खरं म्हणजे पावश्यांचं काम... सॉरी, मी कॉर्पोरेशन मधून एन्क्रोचमेन्ट्च्या चेकींगसाठी आलो आहे. "<br />"ओह्! म्हंजे मक्याचे पॉप्स्.. " <br />मला मक्याची कणसं माहिती होती. मक्याच्या लाह्या, पॉपकॉर्न्स माहिती होते. पण मक्याचे पॉप्स् ??<br />पण मला फार विचार करू न देता इतकावेळ शांतपणे बाजूला उभा असलेला एक गोरटेला मुलगा पुढे आला नि म्हणाला," चला." मी त्याच्या मागोमाग जाऊ लागलो. मध्येच मी त्याला विचारलं," कां रे, मक्याचे पॉप्स्.....?" " माझे वडील! मकरंद माझं नांव. मकरंद पावशे. तुम्हाला माझ्या बाबांना भेटायचं ना? चला "<br /> तेरा क्रमांकाच्या घराचा दरवाजा उघडला जाताच चिरंजीव मकरंद ऊर्फ मक्याने सदरा पायजमा परिधान केलेल्या एका 'फॉर्टी प्लस' पुरुष व्यक्तीला केवळ " बाबा " अशी हांक मारली आणि अंगठयाने माझ्याकडे निर्देश करीत आतल्या खोलीकडे धूम ठोकली. मी, " अण्णा...," असे म्हणून बोलायला सुरुवात करणार इतक्यात श्रीयुत पावशे उद्गारले.<br />" गेले ते. सहा वर्षं झाली त्याला. पण आपण....? आण्णांना....ओळखता..? माझे वडील ते..!"" अरेरे, वाईट झालं. सॉरी हं. मला वाटतं खूप चांगले ज्योतिषी होते ते!"<br /> माझ्या आतून कोणी तरी बोललं. तुला माहिती होतं ते? बापरे, काय होत होतं मला? मी तर इथे आयुष्यात पहिल्यांदाच येत होतो. त्या हस्तिदंती रंगाचा सफारीसूट घातलेल्या कंत्राटदाराचे लालबुंद डोळे मला दिसायला लागले. त्याच्या काळ्या चष्म्यातूनही ते मला स्पष्ट दिसत होते. आणि तेरा नंबर? काय आहे हे? घशाला कोरड पडत चालली होती.<br />" पा..णी! जरा पाणी देता का मला..." मी कसा बसा म्हणालो." हो नक्कीच. अहो, जरा पाणी आणता कां बाहेर" हॉल आणि स्वयंपाकघर यामधील पडद्याच्या रोखाने पावशे म्हणाले. पडद्याच्या मागे एक कुतुहल उभं होतं हे मला मघाशीच जाणवलं होतं. तशी बांगड्यांची किणकिण ऐकायला आली होती.<br />" पण आपण आपली ओळख सांगितली नाही अजून"" मी लिखिते. कॉर्पोरेशनमधून आलोय. एन्क्रोचमेन्ट डिपार्टमेन्ट.." मी भानावार येत म्हणालो." ओह्! बरं झालं तुम्ही आलात. नाईस टु मीट यू मिस्टर लिखिते. त्याचं काय आहे, इथे पूर्वी एक चाळ होती. फार जुनी. पुढे ती पडायला झाली तेंव्हा तुमच्या कॉर्पोरेशनने ती पाडून टाकली. याच जागेवर ही बिल्डिंग बांधली गेली. बांधकाम होईपर्यंत कांही काळ आम्ही रिहॅब कॅंपात राहिलो. पण जागेवरचा क्लेम ठेऊन होतो. आता हा बिल्डर..." " रामदुलारे तिवारी..." मला हे नाव कां घ्यावसं वाटलं? माझ्या कपाळाची शीर कां ठणकते आहे. असं वाटायला लागलं.<br />" नाही. तो मेला कधीचाच. त्याचा खापर पणतू. कालीप्रसाद.... कालीप्रसाद तिवारी. तो तुम्हाला खाली भेटलाही असेलच."<br />हस्तिदंती सफारीसूट. काळा चष्मा. लाल डोळे... मी पाण्याचा सगळाच्या सगळा तांब्या घशाखाली रिकामा केला. पण सांवरण्याचा प्रयत्न केला.<br />" बरं मग?"" त्याने सगळा घोळ केला. एक तर, तुम्ही पाहिलेच असेल, खाली दुकानाचे गाळे काढले आहेत. ते ओरिजिनल प्लॅनधे नव्हते. पण आम्ही कोणी विशेष अशी हरकत घेतली नाही. कारण तसा कांही त्याचा आम्हाला त्रास झाला नाही. उलट आमच्या एका मेंबरला थोडा फायदा झाला. त्याच्या मुलाला तिथे मेडिकल स्टोअर्स काढता आले..... "समेळकाका?" मुकुंद गणेश समेळ... न्यू गजकर्ण औषधालय.....अरे देवा! मला कां हे माहिती होतं?" वंडरफुल्! यू नो इट. पण अ करेक्शन. समेळकाका नव्हे, त्यांचा मुलगा, जनार्दन. मुकुंद फार्मसी. तुम्ही खाली पाहिली असेलच. " मी पुढे कांही बोलणार इतक्यात शेजारून कुठूनतरी कानाचे पडदे फाटून जातील इतक्या कर्कश्श आवाजात कांही तरी संगीतमय गोंगाट कानावर आला. मी चमकून पावश्यांकडे पाहिले तर त्यांचाही चेहरा त्रासिक झालेला. "काय शिंची कटकट आहे.." म्हणत पावशे झटकन् खिडकी लावायला धावले. दाराचा पडदाही हलल्यासारखा वाटला.<br />" कां...हो. काय झालं?" हे मी विचारायचं कांही कारण आहे कां असा विचार मनांत येण्यापूर्वीच मीबोलून बसलो.<br />" कांही नाही हो. हा दिन्या कय ते डीजे कि फीजे होणाराय म्हणे. त्याची कसलीशी प्रॅक्टीस घरातच करीत बसतो. सहा हजाराची म्यूझिक सिस्टीम आणून घरात बसवलीय. सूर्यापोटी शनैश्वर म्हणतात ना तसली गत आहे. सगळ्या बिल्डिंगला त्रास. ते जाऊ देत." पावशे ट्रान्स्मधे गेल्यागत बोलले." हा दिन्या कोण? आय मीन् शेजारी कां?"" दिनेश हट्टंगडी..! ते जाऊ देत. आपण कामाचं बोलू."<br />दिनेश हट्टंगडी? म्हणजे मंगेश हट्टंगडींचा...... ते अजून तबला वाजवतात? आणि वरदाबाई.....?त्याही अजून गातात....?कपाळाचा ठणका वाढला.<br />"हां...तर मी म्हणत होतो की जन्याला मेडिकल स्टोअर्स साठी फायदा झाला.म्हणून आम्ही कांही ऑब्जेक्शन रेज केलं नाही पण आता कहरच झालाय. तुम्ही खाली गणपतीचं मंदीर पाहिलं असेलच. ती जागा आमच्या सोसायटीची आहे. प्लॅन आणि एफेसाय प्रमाणे तो एरिया पार्किंग आणि सोशल परपजसाठी ओपन ठेवला आहे. तसं कन्व्हेयनस् डीडदेखील झालं आहे. पण या कालीप्रसादने कांहीतरी मखलाशी करून, तुमच्याच लोकांना पैसे चारून, सो सॉरी टु से, पण तसं झालंय खरं... तिथे त्याच्या मालकीचं बांधकाम करायचा घाट घातला आहे. तिथे तो दारुचा गुत्ता, आय मीन्, बार काढणार आहे असंही समजतंय. म्हणून मी, आय मीन्, आम्ही सगळ्यांनी हरकत घेतली आहे. इथे ही कामं आणि काळजी करणारा मी एकटाच आहे. सांगायला लाज वाटतेय मला, पण, आमच्यात एकी नाही हो."<br />" पण मग बाबा कांहीच म्हणत नाहीत?"<br />" कोण बाबा?"<br />" बर्वे! ते तर गांधीवादी विचारसरणीचे......." कपाळाची शीर! ठणका!!<br />" भले! तुम्हाला ते कसे माहित? अहो ते तर कधीच गेले. मी कॉलेजमधे होतो तेंव्हाच. कसला गांधीवादी! भंपक माणूस. त्यांची मुलेही जवळ राहिली नाही त्यांच्या."<br />हो, एक तर गेला मेक्सिकोला. कायमचाच. आणि दुसरा अलास्काला..... आई गं! पुन्हा ठणका!!<br />" बरं मग, आता काय करायचं?"<br />" ते तुम्हीच तर सांगायचं आहे. आपण असं करू, तुम्ही आलाच आहात तर, खाली गणपतीच्या कट्ट्यावर एक मीटिंग घेऊ. मी सगळ्यांना बोलावतो. तसे सगळेच घरी असतीलच असे नाहीच. आणि असूनही येतीलच अशी शाश्वतीही नाही. पण जे येतील ते येतील. निदान तुमच्या साक्षीने याला कांही तरी चालना तर मिळेल."<br />मला काय म्हणावे आणि काय करावे तेच समजेना. त्यांच्या 'अहो' ने कांदा पोह्याच्या बशा आणून समोरच्या टी-पॉयवर ठेवल्या. " घ्या. आलोच मी." म्हणून पावशे कपडे बदलायला आंत गेले.<br />मीटिंगला कोण कोण येणार होते? ग्रहगौरव श्री.अण्णा पावशे? महापंडित श्री. बाबूकाका खरे? कुशाभाऊ अक्षीकर? मंगेश हट्टंगडी? सौ. वरदाबाई हट्टंगडी? सोकाजी दादाजी नानाजी त्रिलोकेकर? बाबलीबाय त्रिलोकेकर? प्रा. नागूतात्या आढ्ये? प्रा. कल्पलता फुलझेले? रघूनाना सोमण? आचार्य बाबा बर्वे? ? ? मी ओळखतो कां या सार्यांना?... आणि कां ओळखतो? ....ही नावे मला कशी माहिती झाली? ....ही सगळी मंडळी आज हयात असतील?<br />कसं शक्य आहे? ती तर कधीचीच गेली असतील!. मीटिंगला कदाचित् आता त्यांचे वारस येतील. कोण असतील ते? त्यांची नांवे काय असतील? डोक्यावर कोणी तरी मणा मणाचे घण घालीत होते. मेंदूच्या चिंधड्या होऊन तो बाहेत पडेल की काय, असं वाटायला लागलं.<br />पुन्हा सिड्नी शेल्डन डोक्यात थैमान घालू लागला. ती पाच खून करणारी मुलगी. मनोरुग्ण होती ती. त्या मनोविकार तज्ज्ञाने तिच्या विकाराचे केलेले विश्लेषण!<br />'हा एक मनोविकार आहे. याला दुभंग व्यक्तिमत्वाच्या पुढची पायरी म्हणता येईल. बहुविध वक्तिमत्व दुष्प्रभाव (मल्टिपल पर्सनॅलिटी डिस्ऑर्डर) किंवा विलग्न प्रतिमा दुष्प्रभाव (डिसोशिएटीव्ह आयडेंटी डिस्ऑर्डर). या विकाराचे मूळ सर्वसाधारणपणे लहानपणी मनावर झालेल्या एखाद्या आघातात किंवा पौगंडावस्थेत झालेला असाच एखादा मानसिक आघात किंवा तारुण्यातील अत्यंत गूढ अशा स्वप्नरंजनातील संपृक्तता, यात असते. अशा अवस्थेतील माणूस किंवा असा विकार झालेला माणूस कधी कधी वास्तवाच्या अगदी विपरीत व्यक्तिमत्व धारण करून वावरतो. तर कधी, कधीही न पाहिलेल्या व्यक्तींचा आभासी वावर त्याच्या भोवताली असतो. दीर्घकाळ चालणारी संमोहन उपचार पद्धति यावर मात करू शकते. त्वरित परिणामासाठी मात्र विजेचे झटके हाच एक पर्याय ठरू शकतो.'<br />मीही असाच मनोरुग्ण..?<br />कांदे पोह्याच्या दोन बशांमधील दोन चमचे हवेत तरंगू लागले. माझ्या दोन्ही कानशिलाला ते चिकटले आणि हजारो वोल्टस् विजेचा प्रवाह माझ्या मेंदूच्या ठिकर्या ठिकर्या उडवू लागला. मी उठून उभा राहिलो आणि पळत सुटलो. जिन्याच्या किती पायर्या उतरलो मी? चाळीस? चारशे? चार हजार? पळता पळता कशाला तरी धडकलो. नव्हे कुणाला तरी धडकलो.<br />" साला लिखित्या तू ? वंडर फुल्! साला तू हल्ली बॅंकेमंदी ब्रॅन्चला दिसत नाय. काय बदली जाला की काय?"<br />सोकाजी त्रिलोकेकर...?<br />" नाही म..म..मी.. कॉर्पोरेशन....""करेक्ट. ते हरिराव लिखित्या, सांडगे बिल्डिंग.....यम्माय् राईट्ट. ते तर कवाच ऑफ झाला. बट् अ नाईस सोल हां. आय स्टिल रिमेम्बर..."<br />मी सोकाजीला ढकलून तसाच पुढे पळत सुटलो, ते दमछाक होऊन छातीत कळ येई पर्यंत. पाय पुढे चालेनात तेंव्हा श्वास एकवटून उभा राहिलो. वर स्वच्छ आकाश दिसत होतं.मागे बटाटा हाईटस्. वाचलो! तो मनोविकाराचा आघात नव्हता तर. मग काय असेल? मागे वळून बघण्याची हिंमत होत नव्हती. कांही तरी होतं तिथे.<br />पावशे, खरे, अक्षीकर, समेळ, हट्टंगडी, सोकाजी, नागूतात्या, कल्पलता... सगळे मीटिंगला येणार होते? कसे येणार. ते तर जिवंत नव्हते. कदाचित् असतीलही. की त्यांचे........? <br />आता इथून धावायला पाहिजे. पण कसे धावणार. समोर एक काळा कुत्रा वाट अडवून उभा होता. लाल जीभ बाहेर काढून लहाकत, लाल लाल डोळे माझ्यावर रोखून! त्याने हस्तिदंती रंगाचा सफारीसूटही अंगावर चढवला होता. पण त्याच्यावरून उडी मारून पळून जाणे मला जमणार होते. शाळेत असतांना मला लांब उडीत नेहमी बक्षीसे मिळायची. लांब उडी? की उंच उडी?... मी उडी मारलीच. तोही झेपावला. त्याचा जबडा वासला, माझ्या विजारीचे टोक त्याने दातात धरले आणि खस्सकन् ओढून तो आता भुंकूही लागला.<br />" उठा आता. बस्स् झालं ते पसरणं. माणसाने मेलं झोपावं तरी किती !. दहा वाजायला आलेत. कामावर जायचंय की नाही? हज्जार वेळा सांगितलं त्या इंग्रजी कादंबर्या वाचत जाग्रण करत जाऊ नका म्हणून. इतकं रात्र रात्र जागून वाचण्यासारखं असतं तरी काय मेलं त्यात कोण जाणे. आणि हे काय? बटाटाट्याची चाळ? पु.ल. देशपांडे? म्हणजे तो शेल्डन संपवून तुम्ही हे घेतलंत रात्री वाचायला? <br />कम्माल आहे गंऽऽ बाई तुमची!<br />कुत्रा बायकोच्या............ बायको कुत्र्याच्या..............अयाऽऽऽऽऽई..... ....... बायको बायकोच्याच आवाजात ओरडत होती.arun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-22704553737652070832011-01-27T01:44:00.000-08:002011-01-27T01:57:09.028-08:00कसं सांगू .....!कसं सांगू .....!<br />तुला पटणारही नाही।<br />साक्ष तुझ्या-माझ्या गुपिताची,<br />तो निशिगंध....<br />अबोल झालाय !<br />तुला आठवतं.........?<br />त्या अनुरागी क्षणांवरती,<br />त्याच्याही गंधाची,<br />पखरण होतीच।<br />त्या कैफाचा स्पर्षवारा,<br />त्यालाही हवासा वाटला.<br />ताटातुटीच्या क्षणी........!<br />'पुन्हा येते' म्हणालीस,<br />आली नाहीस।<br />तुझ्या प्रतीक्षेत तो मात्र,<br />कोमेजून गेलाय......!<br />माझं कांही नाही.....!<br />पण निदान त्याच्यासाठीं तरी,<br />तुला पुन्हा यायलाच हवं......!!arun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-45937208447139044482011-01-24T02:49:00.000-08:002011-01-24T02:54:04.786-08:00झुजू मुंजूझुंजू मुंजू <br />"आई....! ए, आऽई!!लेकीची दबकी हांक कानावर आली तसा मंगलाबाईंचा डोळा उघडला पण पुरती जाग आली नव्हती. "सकाळ झाली की काय!" म्हणत नजर खिडकीवरल्या झरोक्याकडे गेली तो अजून काळोख गडदच होता. सरत्या ग्रीष्मातली रात्र तशी फार मोठी नसली तरी उजाडायला एखादी अजून घटका तरी जायला हवी होती. हे असं काहीसं भान जाणवतं न जाणवतं तोच पुन्हा एक दबकी हाक! पण या वेळी कणभर कण्हल्यासारखी. पुढ्यातच झोपलेल्या लेकीच्या पाठीवर त्यांचा हात गेला आणि तसाच तो आभावितपणे तिच्या कपाळावरही गेला."काय गं? काय होतंय?""आईऽऽ, पोऽऽऽट....""दुखतंय?""हंऽ!!""बरं. थांब!"मंगलाबाईंनी उठून बसत उशालगतच्या कंदिलाची वात थोर केली आणि मनूकडे पाहिलं. तर मनूचा चेहरा कसनुसा झालेला. कंदिल हातात घेऊन त्या स्वैपाक घराकडे गेल्या आणि पाचच मिनिटात चिमुटभर ओवा आणि पाण्याचं भांडं घेऊन परतल्या."हं, हे घे. बरं वाटेल जरा वेळात."मनूने हातावर ठेवलेला ओवा तोंडात टाकला आणि पाणी पिऊन पाय पोटाशी घेऊन एका अंगावर कलंडली.<br />फटफटायला लागलं तशा मंगलाबाई उठल्या. तशीही झोप अशी लागलेली नव्हतीच. मनू झोपलेली होती. निदान तशी दिसत तरी होती. पण तिच्या कडे पहायला वेळ कुठे होता. आत्ता तिच्या शाळेची वेळ होईल, तिची तयारी होणं आधी महत्वाचं होतं. मंगलाबाईंनी न्हाणीत जाऊन तोंड धुतलं, स्वैपाक घरातल्या चुलीत लाकडं सारली आणि त्यांना पेटतं घालून अंघोळीच्या पाण्याचा गुंडा त्यावर चढवून त्या मनूकडे वळाल्या.<br />"मनू, ...मन्या बेटा... उठतेस ना? चल शाळेची वेळ आत्ता होईल बाळा, चल ऊठ."<br />मनू जरा वेळाने उठलीही. पण तिच्यात रोजची तरतरी नव्हती. तिच्या पोटात अजूनही तसं दुखत होतंच. पण तसं दाखवलं तर आईची किती तारांबळ होईल या विचाराने ती तसं दाखवत नव्हती. तिची अंघोळ, आवरून झालं. आईनं दिलेलं दूध बशीत ओतता ओतता तिनं ऊंचावलेलया भुवया वडिलांचा खोलीकडे वळवत डाव्या हाताचा पंजा 'त्यांचं काय?' अशा अर्थी वळवला.<br />"काऽय की! रात्री खूप वेळ कांही वाचन चाललं होतं बाई त्यांचं! केंव्हा झोपले कोणजाणे.कांही सभा-बिबा असेल. लगेच अंघोळ करून घे तू, आवर आणि पळ."<br />केस विंचरून झाले आणि मंगलाबाई वेणीचे पेड गुंफत होत्या. तोच,"आई...." मनूनं पुन्हा कण्हल्यासारख्या तशाच दबक्या सुरात साद घातली."हंऽऽ! बोल.""आज मी शाळेत नाही गेले तर...चालेल?""कां? काय झालंय?""कांही नाही! जरा कसंसच वाटतंय.""जरा पोटच तर दुखतंय ना? मी हिंगाचं चाटण करून देते. ते घे. बरं वाटेल.परीक्षा जवळ आलीय ना? शाळा बुडवून चालेल कां?""पण मी घरी आभ्यास करेन ना!""तू करशीलच गं. पण ह्यांचं काय? शाळा बुडवलेली आवडणारे का त्यांना? मलाच बोलणी बसतील.""बऽऽरं. जाते मी.""शहाणी बाई माझी ती!" आई मायेनें पाटीवर एक हलकासा धपका घालत म्हणाली.अंघोळ करून तयार झालेली मनू देवाला नमस्कार करून दप्तराला हात घालणार तोच बाहेरून तिच्या मैत्रिणीची, कर्व्यांच्या शकूची हांक आलीच. तशी, "आई निघाले गंऽऽ!" म्हणत ती घरा बाहेर पडली.<br />शाळेत जाणार्या पाठमोर्या मनूकडे मंगलाबाईंनी जरा काळजीनंच नजर टाकली. शाळेत जातांनाचा रोजचा उत्साह दिसत नव्हता तिच्यात. बळेच ओढत नेल्यासारखी चालली होती. सकाळच्या कामांना हात घालतांना मंगलाबाई विचार करीत होत्या. मनूने शाळेत न जाण्याबाबत पहिल्यांदाच विचारलं होतं. त्यालाही त्यांना नाही म्हणावं लागलं. नसती गेली एक दिवस शाळेत तर त्यांना कांही फरक पडत नव्हता. पण, तिच्या बाबांना, दिनकररावांना ते मुळीच चाललं नसतं. तशी ती त्यांची लाडकी होतीच. पण त्या मागचं खरं कारण मनू कमालीची हुशार होती. शाळेत पहिला नंबर कधी सोडला नव्हता तिनं आजवर. आणि म्हणूनच तिच्या बाबतीत दिनकररावांच्या अपेक्षा कमालीच्या उंचावलेल्या होत्या. मनूनं झाशीच्या राणीसारखी एक दैदिप्यमान स्त्री म्हणून नांव करावं ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी काय लागेल ते करायला ते मागे पुढे पाहात नसत. ती तीन वर्षाची झाली तेंव्हा पासून तिला ते तिला क्रांतिकारकांच्या गोष्टी सांगायचे. पण मनूवरच्या त्यांच्या प्रेमाला कडक शिस्तीचा आणि धाकाचा एक गडद मुलामाही होता.<br />दिनकरराव शहरातील एका दिवाणी वकीलाकडे कारकून म्हणून होते. पण १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध आणि क्रांतिकारकांचा इतिहास हे त्यांचं मर्मबंध होतं. जशी संधी मिळेल तसे सार्वजनिक सभांमधून ते क्रांतिसंग्रामावर व्याख्याने देत असत. त्यांच्या अभ्यासिकेत क्रांतिकारकांच्या जीवनावरील अनेक पुस्तके होती आणि भिंतीवरही मंगल पांडे पासून ते स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत झाडून सार्या क्रांतिकारकांच्या तसबिरी लावलेल्या होत्या. रणरागिणी झाशीची राणी हे तर त्यांचं दैवतच होतं. तो सारा इतिहास त्यांना मुखोद्गत होता. इतर कुणाचेही जन्मदिवस त्यांच्या फारसे खिजगणतीत नसायचे पण ११ नोव्हेंबर १८३५ हा कु.मनकर्णिका मोरोपंत तांबे या तेजशलाकेचा जन्मदिवस मात्र ते विजयादशमीच्या हिरीरीने साजरा करायचे.आणि म्हणूनच की काय आपल्या एकुलत्या एका मुलीचं नांवही त्यांनी ’मनकर्णिका’ ठेवण्याचा अट्टाहास केला होता. दिनकररावांचे वडील बेचाळिसच्या चवळवळीतले एक अग्रणी होते. तसे ते गेलेही. पण दिनकररावांच्या स्वरूपी भाबडी श्रद्धा आणि एक प्रकारचा कर्मठपणा मागे ठेऊन.<br />मंगलाबाईंनी केरवारे करायला हाती केरसुणी घेतली तोच "पेऽपऽऽर" अशी हांक कानावर आली म्हणून त्या पुढल्या दाराकडे वळाल्या. पेपरवाल्या पोर्याने टाकलेले वर्तमानपत्र घेऊन त्या दिनकरपंतांच्या खोलीकडे वळाल्या तोच "बघूऽ!"म्हणत तेच दार उघडत पुढे झाले. मंगलाबाईंचे केरवारे झाले तरी मधल्या खोलीच्या दाराच्या चौकटीला ओठंगून उभे असलेले दिनकरपंत तसेच ताजे वर्तमानपत्र वाचत होते.<br />"अहो, तोंड धुताय ना? मी चहाचं बघते.""अहो, काय हे? यात आजही काही नाही.""कशा बद्धल म्हणताय? कांही खास आहे की काय?""खास म्हणून काय म्हणताय? अहो शंभर वर्षं झाली..... आणि यांना त्याचं कांहीच नाही! अगदीच तुरळक उल्लेख! काय म्हणायचं काय, याला? किती कृतघ्नता ही!"अगं बाई! कांही विपरीत का घडलंय का कांही?""छे, छे, तसं विपरीत नाही कांही. पण विपरीतच की!""तुम्ही काय म्हणताय ते कांही समजत नाही बाई. पण असेल तसंच काही तरी. ते जाऊ देत..तुम्ही चहाला येताय ना?""चहा? तुम्हाला चहाचं पडलंय पण इथे बघा काय चाललं आहे ते. अहो, त्या संग्रामाला या वर्षी पुरती शंभर वर्षं होताहेत आणि हे, हे, यांना त्याचं सोयरसुतकही नाही. आम्ही त्या वीरांचं नीटसं स्मरणही करू शकणार नाही आहोत कां? बसाऽऽ, बसा लेको टोप्या फिरवत आणि दोंद वाढवत!" दिनकररावांचं स्वगत चालूच होते. दिनकररावांच्या या अशा चिडखोर स्वभावाची मंगलाबाईंना नेहेमीच काळजी वाटायची.<br />मंगलाताईची नजर अभावितपणे भिंतीवरच्या कॅलेंडरकडे गेली. त्यातला १९५७ या आंकड्याने त्यांना ठळकपणे खुणावलं आणि छंदिष्ठ दिनकररावांच्या त्या असंबद्ध उद्गारांचा त्यांना अर्थ लागला. पण त्याकडे लक्ष द्यायला त्यांना सवड नव्हती आणि दिनकररावांना टीका करायला आज एक आवडता विषय मिळाला त्यात कांही नवल नव्हतं म्हणून त्यांच्याकडेही फारसं लक्ष द्यायची गरज नव्हती. कारण ते नेहेमीचंच होतं.नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे दिनकररावांची स्नान, देवपूजा, ध्यान ही सारी आन्हिके पार पडेतो भिंतीवरच्या घड्याळाने नवाचे टोले आणि ते त्यांच्या कचेरीकडे रवाना झाले. ते आता दीड-दोन वाजता जेवायला येतील तो पर्यंत घरातली नित्याची कामे आवरावी म्हणून मंगलाबाई पदर खोचून सरसावल्या. दिव्यांची आवस दोन दिवसावर आली होती. गौरी-गणपतीही अगदी टप्प्यावर आले होते. शाळेत जातांनाचा मनूचा चेहरा डोळ्यापुढून हलत नव्हता. तिला रवा-बेसनाचे लाडू फार आवडत. थोडे करून ठेवावेत म्हणून मनात आलं होतं. त्यासाठी थोडा रवा काढायला हवा होता. सकाळच्या मधल्या वेळेत गहू ओलावून ठेवले होते. ती पाटी घेऊन मंगलाबाई जात्यावर बसल्या.<br />जात्याने चार दोन गरके घेतले असतील नसतील तोच,."काकूऽऽऽ!" अशी हांक कानी आली आणि तिच्यातल्या आर्ततेने मंगलाबाईंच्या काळजात धस्स् झालं.आवाज कर्व्यांच्या शकूचाच होता.."आले गऽऽ!" म्हणत मंगलाबाई ताडकन उठल्या आणि पुढच्या दाराकडे धावल्या. दार उघडून पाहातात तो, शकूच्या खांद्यावर हात टाकून मनू अवघडल्यागत उभी.<br />" अगं बाई! काय झालं गं? पडली बिडली की काय ही? आणि दप्तर गं तिचं....."" काकू, आधी आंत तर येऊ देत. सांगते सगळं..."<br />शकू आंत आली तशी, मनू मटकन् खाली बसली आणि दोन्ही गुडघ्यांत चेहरा लपवून हमसाहमशी स्फुंदू लागली. मंगलाबाईंना कांही कळेना. शकूने त्यांना डोळे मोठे करत कांहीसं खुणेनेच कांहीतरी सांगितलं आणि,<br />"अगऽऽऽ बाई. हे असंऽऽ.....माझ्या लक्षांत यायला हवं होतं गंऽ..... सकाळी ती तशी कुरकुरत होतीच बाई..... अरे देवा.....बरं झालं बाई जवळ तू होतीस म्हणून....केवढे उपकार....."" काकू, ते उपकाराचं र्हाऊ द्यात. तुम्ही शांत व्हा. तिला बघा. मला शाळेत परत जायला हवं. मी निघू?"" हो! जा बाई जपून. पण एक मिनिट, याचा.....शाळेत,....... वर्गात कांहीऽऽ .....?"" नाही. तसं कुणालाच कांही कळालेलं नाही. मधल्या सुटीत आम्ही एकीला गेलो तेंव्हा हे असं झालं. मी हेडबाईंना सांगूनतिला इकडे घेऊन आले. तिचं दप्तर शाळेतच आहे. संध्याकाळी घेऊन येते."" बऽरं. जा. जपून जा होऽ."<br />मंगलाबाई मनूच्या शेजारी येऊन बसल्या आणि मायेने तिच्या मस्तकावरून हात फिरवू लावल्या." उगी बाळा. हे असं होतंच असतं. मोठी झालीस ना! बाईला हे सोसावंच लागतं बाळा. तू न्हाणीकडे जा. मी आलेच."<br />मनू न्हाणीघराकडे जायला निघाली तशी मंगलाबाईनी बाजूच्या कोठीघरातल्या फळीवरून ट्रंक खाली काढली आणि त्यातल्या एका मऊसूत लुगड्याचे मोठाले धडपे फाडले. ते घेऊन त्या न्हाणीघराकडे गेल्या. न्हाणीघराकडून सगळं आवरून पुन्हा माजघरात आली तेंव्हा मनू बरीच सांवरली होती तरी रडणं पुरतं थांबलेलं नव्हतं. हुंदके चालूच होते. काय झालं आहे याची पुसटशी कल्पना एव्हाना तिला आली होती. पण मनाची अवस्था भोवंडल्यागत झाली होती.<br />'लाल काळ्या पंखांचा एक भला मोठा कावळा कुठूनसा झेपावतो आहे, तो त्याच्या भल्या मोठ्या पंखात गुरफटवून अलगद उचलून आपल्याला घेऊन जातो आहे आणि भुताच्या टेकडीमागील अंधार्या दरीत ढकलून देणार, तिथून रांगत रांगत आपण पुन्हा घरी येणार,...कधी?.....किती दिवस?.....एक?...दोन?.....कदाचित चारही !...’<br />मनातल्या वावटळीसारख्या घोंघाव्यानं घशात आवंढा अडकला होता; स्वत:वरच चिडली होती. माजघराच्या बाजूच्या सोप्यालगतच्या चिंचोळ्या खोलीकडे ती आपसुक गेली आणि अवघडून बसून राहिली. एरवी फारशी वापरात नसलेली ती खोली कधी वापरली जायची हे तिला ठाऊक होतं. मंगलाबाई पुन्हा तिच्या समोर आल्या आणि कोठीघरातून आणलेली घोंगडी आणि एक धुवट परकर-पोलके मनूकडे भिरकावले, तेंव्हा त्यांचेही डोळे झरत होतेच. ते पाहून तर मनूला पुन्हा उमाळा आला. एक मोठी किंकाळी पोटातून बाहेर येते आहे की काय असं वाटायला लागलं. पुन्हा तोच आवंढा घशात अडकून राहिला.<br />" पुरे. तू जरा पड आता. दमली असशील. स्वैपाकाचं बघायला हवं मला. हे जेवायला येतीलच तासाभरात. त्याआधी व्हायला हवं सारं. नाही तर पुन्हा शंखनाद होईलच..... तो कांही चुकणार नाही..." आईचे तुटक तुटक शब्द तिला ऐकू आलेही आणि नाहीही.<br />मंगलाबाई पुन्हा अंघोळ करून स्वयंपाकाच्या ओट्याकडे वळाल्या तशी मनूने फारसा आवाज होणार नाही अशा बेताने तिची खेळाची ट्रंक पुढे ओढली आणि उघडून बसली. काय नव्हतं त्यात! कचकड्याचे वाघ सिंह, जपून ठेवलेले गेल्या पोळ्याचे मातीचे बैल, पसा भर कवड्या, ओंजळभर सागरगोटे, जवळपास तितक्याच कांचेच्या बिल्लोरी गोट्या, एक काचेचं भिंग, एक तुटकी हस्तिदंदी फणी, भातुकलीची भांडी, भावलीच्या लग्नाचा पसारा, त्यातले इवलाले कपडे, दागीने, सजावटीच्या झिरमोळ्या, कलाबतू, मोरावर बसलेली पण आता रंग उडालेली मातीची शारदा, आणि बरंच बरंच कांही. या सार्यावरून पुन्हा पुन्हा हात फिरवतांना मनू जराशी गुंगली. अचानक कांहीतरी आठवल्य़ागत मनू एकदम दचकली. भितीवरल्या फळीकडे नजर गेली. 'ती' तिथेच होती. ताडकन् उठत मनूने कोपर्यातली घडवंची पुढे ओढली, तिच्यावर उभे राहात तिने फळी वर ठेवलेली दीड-दोन वितीची एक लाकडी ठकी खाली काढली. तिच्यावरली धूळ परकराच्याच शेवाने झटकली आणि तिला उराशी कवटाळत तिथेच घडवंचीवर बसून राहिली. शांत, चुपचाप डोळ्यातले पाणी न खळवता. जणू ती भावली आता दूर गांवी जणार होती, कदाचित पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. तशी मनू ठकीला बिलगली होती.<br />" काय करतेयेस गं ताईऽ? जेऊन घेतेस बाळा..?" मंगलाबाईंचा स्वयंपाक होत आला होता.आईचा आवाज मनूला आज नेहेमीपेक्षा अधिकच मधाळ वाटला." कांही नाहीऽऽऽऽ! अशीच बसलेऽऽय" मनूचा स्वर अजून कातरच." जेऊन घेतेस? भूक लागली असेल ना गं?"" नाही. नको. बाबा येतीलच ना एवढ्यात. त्यांच्या बरोबरच......."<br />मनूचा स्वर चढा आणि कडवट झालेला आणि क्षणभर एक भयावह स्तब्धता त्या घराच्या पोकळीत भरून राहिली. मनू एकटक हातातल्या ठकीकडे पाहात होती पण तिच्या डोळ्यात नेहेमी असायची तशी ममता, मार्दव नव्हतं. उलट एक प्रकारची कृद्धता, चीड त्यातून बाहेर पडू पाहात होती.<br />मंगलाबाईंनी मनूचं सगळ्या जेवणाचं ताट वाढलं. एका हातात ताट, दुसर्या हातात पाण्याचं लोटी-भांडं घेतलं आणि त्या मनूच्या खोलीच्या दारापाशी आल्या.<br />"चल. ऊन ऊन जेऊन घे.""नकोय मला." मनूच्या आवाजात हा असा उद्धटपणा पूर्वी कधी दिसला नव्हता."अगं असं काय करतेस. भूक लागली नाही? हेही येतीलच एवढ्यात. त्यांचा आणि काय तमाशा होतोय देवजाणे हे पाहून. तू जेऊन घे आणि ताट-वाटी मागल्या दारी घेऊन जा. मी पाणी घालते......." मंगलाबाईंचं वाक्य अजून पुरं झालंही नाही तोच,<br />"नक्कोय म्हणून सांगतेय नाऽऽऽऽ! नक्कोय मला ते जेवण बिवण" म्हणत मनूनं पुढे होत त्यांच्या हातातले ताट हाताच्या फटकार्याने उधळून लावले.<br />"काऽऽर्टेऽऽऽ!" असं किंचाळत मंगलाबाई मनूच्या अंगावर धावल्या आणि उगारलेला हात तिच्यावर टाकण्यापूर्वी शिळा झाल्यागत थबकल्या, एक हंबरडा फोडत मटकन् खाली बसल्या. दोघींच्याही मनावरच्या ताणाचा कडेलोट झालेला होता.<br />"अरे, काय चाललं आहे हे? काय प्रकार आहे हा?"<br />मधल्या दारातून आत येणार्या दिनकररावांच्या, दिवाळीतला सुतळी फटाका फुटावा अशा गर्जनेने दोघींचाही श्वास आतल्या आतच अडकला. भयचकित झालेल्या हरिणी-पाडसागत दोघींचे डोळे दिनकरावावर खिळून राहिले.<br />पलिकडल्या भिंतीपाशी ते रिकामे ताट पालथे पडलेले, त्यात कांहीवेळापूर्वी वाढलेले अन्न जमिनीवर इतस्तत: विखुरलेले, घरंगळत गेलेल्या लोटीतील पाण्याचा थारोळा मधल्या खांबापर्यंत गेलेला, मनू उभी असलेली ती खोली, रडून रडून लाल झालेले डोळे पलथ्या मनगटाने पुसू पहात असलेली मनू, खोलीच्या दारात अजूनही मटका मारून बसलेल्या आणि गुडघ्यात मान घालून स्फुंदणार्या मंगलाबाई या सार्या चित्राचा अर्थ उमगायला दिनकरावांना पांच एक मिनिटे लागली. आणि जसा मनात तो उलगडा झाला तसे तरा तरा मनूजवळ गेले. छातीशी गट्ट कवटाळत तिला घेऊन ते बाहेर आले आणि त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.<br />"तुमचा हा बावळटपणा पुरे झाला आता. घ्या ते आवरून घ्या आणि जेवणाची पाने घ्या. हे असे डोळे फाडून माझ्याकडे बघत राहू नका. मी पाने म्हणालो. पान नाही. आमची दोघांचीही पाने घ्या. तुम्ही नंतर बसा हवं तर. आणि होऽऽ जिकडे तिकडे डंका वाजवत फिरू नका याचा. निव्वळ निसर्ग आहे हा. जेवणं झाल्यानंतर दुपारी तुम्ही त्या प्रीतिपाखर मध्ये घेऊन जा मनूला आणि येता येता त्या पारापसल्या कापडाच्या दुकानात जा. ओळखतो तुम्हाला तो. मनूसाठी चार दोन चांगल्या वॉयलच्या साड्या आणि काय पोलक्याची छिटं बिटं घेऊन या."<br />"अहो,....पण......त प्रीतिपाखर......म्हणजे......."<br />"म्हाईताय मला. तुम्ही ज्याला मिशनरी मडमांची शाळा म्हणता तीच. तिथे डागदर कावस नावाच्या बाई आहेत. त्या तिथे प्राथमिक सेवा केंद्र चालवतात. मनूला घेऊन जा. त्या तिला नीट समजाऊन सांगतील काय सांगायचे ते. गोरे असले तरी चांगली माणसे आहेत ती. आमचा लढा होता तो राज्यकर्त्यांशी. जे चांगलं आहे ते आहेच. मनूलाही मी अशीच डागदर करणार आहे. होशील ना गं मनू!!......आणि हो. ते शिवाशिव, बाजूला बसणं ते तसलं कांही करू नका. मला आजिबात चालणार नाही ते. निसर्गनियम असतो. फार कांही जगबुडी होणार नाही ती तसली भाकडं पाळली नाहीत तर."<br />अजूनही बाबांच्या मिठीच्या दुपट्यात उबावलेल्या मनूच्या अंगावरून मोरपिसं फिरत होती.ती मोरपिसं, सकाळी शाळेत पहिल्या तासाला बाई शिकवीत असलेल्या कवितेतल्या झुंजु-मुंजू या शब्दाचा आणखी एक अर्थ समजाऊन सांगत होती.arun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-64865906538780424942009-05-28T03:55:00.000-07:002009-05-28T03:58:15.554-07:00फॅमिली"हे मिस्टर मदन.... मदन शृंगारपुरे. आज पासून आपल्याला जॉईन होताहेत, बिपिनच्या जागेवर......"<br /> समोर बसलेल्या पण त्या क्षणी उठून उभे रहात असलेल्या त्या तरुणाची घाणेकर साहेब ओळख करून देत होते.<br />"....... आणि मिस्टर शृंगारपुरे, लेट मी इन्ट्रोड्यूस, हे मिस्टर कारखानीस.. आमच्या... आय मिन् आपल्या ड्रॉईंग सेक्शनचे सिनीयर ड्राफ्ट्समन"<br />" ओह्, वेलकम!" मी हस्तांदोलनासाठीं हात पुढे केला.<br />" मिस्टर कारखानीस, प्लीज, यांना सेक्शनला घेऊन जा. सर्वांना इन्ट्रोड्यूस करा आणि कॅरी ऑन. वुईल यू प्लीज...." <br />" येस् शुअर, सर"<br />" मिस्टर शृंगारपुरे, मिस्टर कारखानीस वुईल बी युअर इमिजिएट सुपिरिअर. होप,यु वुईल एन्जॉय हिज कंपनी. सो, गुड लक"<br /><br /> पुण्याच्या एका नांवाजलेल्या लिमिटेड इंजिनियरिंग कंपनीच्या संशोधन आणि विकास विभागाच्या आरेखन कार्यालयाचा मी वरिष्ठ आरेखक होतो. नुकताच एक बिपिन दास नांवाचा आरेखक नौकरी सोडून गेला होता. त्याची जागा रिकामीच होती. त्या जागेवर या तरुणाची योजना झाली होती. एवढे आणि एवढेच माझ्या लक्षांत आलेले होते. कारण ही नेमणूक तशी अचानक झालेली होती आणि ती कुणाच्या तरी शिफारशीने झालेली असावी असा मनांत एक कयास निर्माण झाला होता. अर्थात् त्यामुळे कांही प्रशनचिन्हंही! <br /><br /> मी त्या तरुणाला माझ्या टेबलापाशी घेऊन येई पर्यंत सेक्शनमध्ये कुतुहलाची अस्पष्टशी कुजबुज सुरू झालेली होती. सर्वांशी त्याची ओळख करून द्यायची होतीच. पण त्या आधी मला त्याची माहिती करून घेणे गरजेचे होते. शृंगापुरेला समोरच्या खुर्चीत बसण्याचा निर्देश करून मी सुरुवात केली.<br /><br />" हां मिस्टर शृंगारपुरे, बसा."<br />" सर, प्लीज मला अहोजाहो करूं नका. लहान आहे मी तुमच्या पेक्षा. मला तुम्ही नुसतं मदन म्हटलं तरी चालेल"<br /><br /> मला त्याच्या या बोलण्याचं थोडं हसूं आलं. कारण कपाळावर येऊ पहाणारे केस मागे सारण्याचा प्रयत्न करीत हे जे कांही तो बोलला त्यांत एक लाडिकपणाची छटा होती. मी त्याच्या कडे जरा निरखून पाहिलं. गौर वर्ण, बर्यापैकी उंची आणि शरीर यष्टी, अतिशय नीट नेटका पेहेराव, या सार्याशी हे त्याचे लाडिकपणे बोलणे कांहीसे विसंगत होते. त्याच्याशी हस्तांदोलन केले तेंव्हाही त्याच्या हाताचा स्पर्श कांही निराळाच वाटला होता. पण त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी विचार करण्याची सध्या तरी गरज नव्हती. त्याला कार्यालयाची आणि कार्यालयाला त्याची ओळख करून देणे अधिक महत्वाचे होते. <br /><br /> मी त्याची प्राथमिक ओळख करून घेतली. इंजिनियरींगची पदविका प्राप्त केल्या नंतर त्याने मुंबईच्या एका प्रख्यात इंजिनिरिंग कंपनीत कांही वर्षे नौकरी केलेली होती. तिथे उमेदवारी संपताच त्याने लग्न केले. त्यानंतरही तो सहा वर्षे मुंबईतच राहिला होता पण मुंबईची हवा त्याला मानवेनाशी झाली म्हणून त्याने पुणे गांठले होते आणि एका व्यवसाय विनिमय दलाला मार्फत ही नौकरी मिळवली होती. ही सगळी माहिती सांगतांना त्याचं अतिशय मृदू आणि लाडिक बोलणं मात्र जरा विचित्र वाटत होतं. विशेषत: " इथे घरी कोण कोण असतं?" या माझ्या प्रश्नावर त्याने, " मी आणि आमची फॅमिली एवढेंच" हे जे कांही उत्तर दिले ते इतके लाजून की, मला मोठी मौज वाटली. आणि " आमची फॅमिली" म्हणतांना त्याच्या चेहर्यावर आणि डोळ्यांत जे भाव होते ते विलक्षण रोमांचकारी होते. जणू त्या क्षणीही पत्नी त्याच्या समोर होती. मला हंसू दाबून ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागला. <br /><br /> मी मदन शृंगारपुरेला त्याची कामाची जागा दाखवली, कामाचं स्वरूप समजावून दिलं आणि सर्वांशी रीतसर ओळख करून दिली. औपचारिक ओळखी नंतर थट्टामस्करीसह होणारी खरी ओळख दुपारच्या जेवणाच्या वेळेला सुरू झाली. मी वयाने आणि अनुभवाने थोडा मोठा होतो म्हणून वरिष्ठ खरा पण तसे सर्वच सहकारी जवळपास सारख्याच वयाचे होते, आणि शिवाय अस्सल पुणेकर होते. कार्यालयीन वेळेनंतर मीही शिंग मोडून मी त्या कळपातलाच एक बनून रहात असें. त्या मुळे अशा अनौपचारिक वे़ळेला त्या उतांतही मी सामिल होत असें. आम्हाला असें एखादे गिर्हाईक हवेंच असायचे आणि आता तर ते आयतेंच मिळालेले. मग त्या दिवसा नतंर रोजचेच एक उधाण येऊ लागले. त्याच्या मदन या नांवाची जशी यथेच्च टिंगल झाली आणि लाडिक बोलण्याचीही. बापट तर एकदा म्हणालाही की आपण जर तरुण तुर्क - म्हातारे अर्क हे नाटक जर बसवले तर त्यातल्या ’ कुंदा’ चे पात्र शोधायला नको. मात्र शृंगारपुरे कधी चिडला नाही. सगळी टवाळी तो हंसत हंसत झेलायचा. खरी गंमत वाटायची ती, तो पत्नीचा उल्लेख फॅमिली असा करायचा त्याची. <br /><br /> एकदां तो त्याची फॅमिली इडली सांबर खूप छान करते असें म्हणाला तर कोणीतरी सप्रयोग सिद्ध कर म्हणालं आणि पुढच्याच रविवारी सगळे इडली सांबर खायला त्याच्या घरी जातील आणि अनायसे वहिनींची ओळखही होईल असा बूट निघाला. तेंव्हा मात्र तो थोडा भांबावलेला दिसला. पुढच्या रविवारी त्याची फॅमिली माहेरी जाणार आहे हे सांगतांना त्याचा चेहरा ओशाळवाणा झाला होता. मात्र कां कोणास ठाऊक, ती त्याची केवळ सबब असावी आणि आम्हाला तो त्याच्या घरी नेण्याचे टाळतो आहे अशी त्याच्याच शेजारी बसणार्या बापटला शंका आली. ती त्याने खाजगीत बोलूनही दाखवली. पण असतांत अशी कांही माणसे, ज्यांना मर्मबंधातले कोश जपायला अधिक आवडतं. त्यातला हाही एक असेल म्हणून मी बापटची समजूत काढली. <br /><br /> पण दुसर्याच दिवशी हा बहाद्दर कामावार येतांना दोन मोठ्या डब्यात इडली सांबर आणि एका छोट्या डब्यात ओल्या खोबर्याची उडपी उपाहारगृहांत असतें तशी चटणी, शिवाय स्टीलच्या ताटल्या, चमचे एवढा सगळा जामानिमा घेऊन आला तेंव्हा आम्ही चाटच पडलो. त्याच्या फॅमिलीने इडली सांबर मात्र अप्रतिम चवीचे केले होते. सगळ्यांनी वानवानून त्याचा फडशा पाडला. शृंगारपुरेचा चेहरा कृतकृत्यतेने उजळला होता. त्याच्या फॅमिलीने इतका मोठा उठारेटा केला याचे मला कौतुक वाटले. बापटला मात्र ती चव विश्व या उपाहारगृहातल्या इडलीसांबार सारखीच कशी हा प्रश्न पडला होता.<br /><br /> त्यानंतर शृंगारपुरे मधून अधून कांही ना कांही खाण्याचे पदार्थ आमच्या साठीं घेऊन येत असें. कधी शंकरपाळे तर कधी चकल्या. कधी बेसनाचे लाडू तर कधी खोबर्याची बर्फी. साक्षात अन्नपुर्णेने केलेले असावे अशी त्या पदार्थाची चव असायची. तसेंही त्याच्या जिभेवर सतत फॅमिलीचेच गुणगान असायचे. दुसर्या कुठल्या विषयावर बोलतांना आम्ही कधी त्याला ऐकला नव्हता. बायकोवर इतके प्रेम करणारा तरुण आम्ही प्रथमच पहात होतो. एकदा त्याने आणलेली बाखरवडी तर ती चितळे मिठाईवाले यांच्याकडून मागवलेली असावी इतकी खुसखुशीत होती. त्याची बायको खरोखरच इतकी सुगरण असेल कां ही शंका आम्हां सर्वांनाही आलीच होती. तरी, खाल्ल्या बाखरवडीला जागायचे म्हणून कोणी तशी कांही टिप्पणी केली नाही. पण बापट तसा गप्प रहाणार्यातला नव्हता. त्याने हल्लाबोल केलाच. <br /><br />" ए खरं सांग मदन्या, ही बाखरवडी चितळेची आही की नाहीं. च्यायला तुझ्या बंडला खूप झाल्या हं"<br />" नाही हो. देवा शपथ सांगतो. आमच्या फॅमिलीनेच बनवलेली आहे ती" शृंगारपुरेचे डोळे पाण्याने डबडबले.<br />" चल मग तुझ्या घरी घेऊन चल एकदा आम्हाला सगळ्यांना. वहिनींना आम्ही समक्षच कॉम्प्लीमेन्ट देऊ"<br />" घरी? घरी कशाला? हो...हो...घरी....घरी.... या ना....जरूर या....फॅमिलीला......." शृंगारपुरे गदगदून रडायच्या बेतात.<br /><br /> ऑफिसमधले वातावरण चमत्कारिक कुंद झाले. तसें मी सगळ्यांना आपापल्या जागेवर पिटाळले आणि शृंगारपुरेच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करू लागलो. पण माझ्याही मनांत एक शंका, एक संभ्रम निर्माण झाला होताच. वास्तविक त्याच्याच काय पण कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावू नये एवढे समजण्या इतके आम्ही सगळेच सभ्य होतो. परिपक्वही असूं कदाचित. पण शृंगारपुरेचे हे असले वागणे कोड्यात टाकणारे होते. विशेशत: त्याच्या फॅमिलीचा विषय निघाला की तो कमालीचा खुले पण लगेचच आपले पंख मिटून घेत असे. सतत तो कांही तरी लपवतो आहे असा भास होत असे. तशा त्याच्या आणखीही कांही गोष्टी कोड्यात टाकणार्याच होत्या. कार्यालयीन माहितीत त्याने सिंहगड रोड वरील हिंगणे गांवाचा पत्ता दिलेला होता. मुंबईहून पुण्याच्या हडपसर सारख्या ठिकाणी नौकरी करायला आलेला हा माणूस हिंगण्यासारख्या सोळा सतरा किलोमीटर दूरच्या ठिकाणी कां राहतो? खरं म्हणजे त्या काळात त्याला हडपसरच्या जवळपासही एखादी चांगली निवासी जागा अगदी सहज मिळाली असती. ज्या काळात आम्हाला एक चांगली सायकल विकत घ्यायची म्हणजे दिवाळीच्या बोनसची वाट पहावी लागे त्या काळात हा स्कूटरवर कामाला येत असें. त्याच्या कामांत तो तसा साधारणच पण बरा होता. पण कमालीचा नीटनेटकेपणाच्या संवयीचा. लहानसा कागद लिहायला घेतला त्याला तरी समास पाडल्याशिवाय तो लिहायला सुरुवात करीत नसे. त्याच्या या सगळ्या गोष्टी बाजूला सरून त्याच्या बायको विषयी कुतुहल मात्र आता प्रकर्षाने पुढे आलेले होते. याचा छडा लावायचाच असें माझ्या मनांत आले.<br /><br /> पुढच्याच रविवारच्या सुट्टीत मी ते आमलात आणले. हिंगण्याच्या अलिकडेच विठ्ठलवाडीला माझा एक नातेवाईक रहात असे त्याच्या कडे जायच्या निमित्ताने मी शृंगारपुरेच्या घरी जाऊन धडकलो. मला पहाताच शृंगारपुरे चकितच झाला. नुसताच चकित नव्हे तर पुरता भांबावला. या या म्हणत त्याने मला घरांत घेतले आणि "बसा. मी पाणी आणतो तुमच्यासाठीं" म्हणत स्वयंपाक खोलीत गेला. मी सभोवताली नजर टाकू लागलो. शृंगारपुरेच्या एरवीच्या नीटनेटकेपणाचा मागमूसही तिथे कुठे दिसत नव्हता. दोनच पण जरा मोठ्या खोल्यांची ती जागा होती. दरवाज्या लगतच एक खिडकी आणि खिडकी खाली एक पलंग. पलंगावरची चादर सुरकुतलेली, पांघरुणाची चादर अस्ताव्यस्त पसरलेली. पलंगाच्या उशालगतच्या दांडीवर एक लेडीज नाईट गाऊन लटललेला. पलंगाच्या काटकोनातील भिंतीलगत एक आरशाचे कपाट. कपाटाशेजारी एक टीपॉय, त्यावर विस्कटून पडलेली कांही पुस्तके. छताला लटकणारा पंखाही बराचसा धुळकटलेला. दरवाज्यालगतच्या कोपर्यात कांही पादत्राणाचे जोड. एकूणातच एखाद्या कुटुंबवत्सल घराला विसंगत ठरावे असें चित्र. मी कांहीसा विस्मयचकित आणि कांहीसा गोंधळलेला. <br /><br />" घ्या सर. पाणी घ्या." शृंगारपुरेच्या आवाजाने मी भानावर आलो. गणिताच्या पेपरला निघालेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता.<br />" शृंगारपुरे... वहिनी..?" मी चेहरा शक्य तितका कोरडा ठेवण्याच्या प्रयत्नात.<br />" हां! त्याचं काय झालं. फॅमिली जरा गावाला गेलीय."<br />" कधी? काल ऑफीसमध्ये कांही बोलला नाहीत."<br />" नाही. बोललो नाही..पण तसं कांही बोलण्या सारखं नव्हतं म्हणून....."<br />" अच्छा, अच्छा! कांही विशेष?"<br />" कांही नाही हो. फॅमिली तिच्या एका मैत्रिणीच्या मंगळागौरीला गेली आहे"<br />" मंगळागौरीला? आत्ता? मार्गशीर्षांत..?<br />" ओह् ! आय एम सॉरी.एक्स्ट्रीमली सॉरी. डोहाळजेवणाला."<br />" म्हणजे?"<br />" अहो, माझं हे असं होतं बघा. फॅमिली नसली ना की मी अगदी गोंधळून जातो. सो मच आय मिस् हर."<br />"............."<br />" ती गेलीय नाशिकला. तिच्या एका जीवश्च कंठश्च मैत्रिणीकडे. डोहाळजेवणाला. सर, तुम्ही बसा कोपर्यावरून दूध घेऊन येतो. आपण चहा घेऊ"<br />" छे, छे. चहाचं राहू द्या हो. परत कधी येईन चहाला. मलाही थोडी घाईच आहे. मी निघतो.."<br />" सर, प्लीज. माझाही चहा व्हायचाच आहे. आत्ता येतो. पटकन् दोन मिनिटात. तोवर हे बघा जरा."<br /><br /> असं म्हणत त्याने कपाटातून एक फोटोचा अल्बम काढला आणि माझ्या हातांत देऊन तो पसार झाला. तो अल्बम त्याच्या लग्नात काढलेल्या फोटोंचा होता. म्हणजे या इसमाला बायको होती तर, या विचाराने मला जरा बरं वाटलं. मी एक एक पान उलटीत फोटो पाहू लागलो. कोणत्याही लग्नातला ठराविक स्वरूपाचा असतो तसा तो अल्बम होता. पहिल्याच पानावर त्याचा आणि त्याच्या बायकोचा जोडीने काढलेला फोटो होता. शृंगारपुरेची बायको मात्र हिन्दी सिनेमातल्या मधुबालानेही हेवा करावी इतकी सुंदर होती. गौर वर्ण, भव्य कपाळ, टपोरे डोळे, चाफेकळी नाक आणि या सगळ्या सौंदर्यावर कडी करणारा डाव्या गालावरचा तीळ. नशीबवान आहे बेटा, मी मनांतल्या मनांत पुटपुटलो. पुढे नित्यनेमाचे फोटो झाल्यावर खास पोझ देउन काढलेले दोघांचे फोटो तर अप्रतिम होते. जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी अत्यंत भावस्पर्शी डोळ्यांनी त्याची बायको त्याच्याकडे प्रेमार्द्र नजरेने पहात होती. कांही वेळापूर्वी त्याच्या बायकोबद्दल एक अनाकलनीय शंका माझ्या मनांत उद्भवली होती तिची मला लाज वाटली आणि त्याच्या फॅमिलीला भेटण्याची उत्सुकता वाढली. <br /><br /> दुसरे दिवशी मी ऑफीसला गेलो तेंव्हा खाजगीत बापटला ती हकीकत सांगितली. तो तर चाटच पडला. त्याने त्याच्या स्वभावाला अनुसरून ती बातमी हळू हळू सगळ्यांपर्यंत पोहोचवली देखील. त्या दिवसापासून बहुतेक सार्यांचीच शृंगारपुरेकडे पहाण्याची नजर जरा बदलली. जो तो त्याच्याशी मैत्री करण्याची अहमहमिका करूं लागला. पालेकर तर त्याचा खास मित्र बनला. कारण पालेकरचे अजून लग्न झालेले पण तो बोहोल्यावार उभा रहायच्या तयारीत होता. शृंगारपुरेला जणू त्याने गाईड बनवले आहे असे वाटावे असे त्यांचे आपसात कुजबुजणे चाललेले असायचे. शृंगारपुरेने त्याला एकदा आपल्या बटाव्यातला बायकोचा फोटो दाखवला तसा तो, ते लावण्य पाहून, अगदी वेडावलाच. आपल्यालाही अशीच बायको मिळावी असे स्वप्न पाहू लागला. मध्येच एकदा पालेकर चार दिवस रजा टाकून मुलगी पहायला गेला तेंव्हा त्याने शृंगारपुरेलाही बरोबर चलण्याची विनंती केली पण ती त्याने, फॅमिली घरी एकटी कशी राहील या सबबीवर, नाकारली.<br /><br /> चार दिवसांची रजा संपवून पालेकर कामावर पुन्हा रुजू झाला त्या वेळी शृंगारपुरे त्याच्या फॅमिलीने आदल्या दिवशी केलेल्या चिरोट्याचा डबा सर्वांना वाटण्यासाठीं उघडत होता. पालेकरला पहाताच त्याने " या पालेकर. अगदी वेळेवर आलांत. आमच्या फॅमिलीने..." शृंगारपुरेने एवढे शब्द उच्चारले असतील नसतील एवढ्यात पालेकर तिरासारखा त्याच्या अंगावर धावला. त्याने तो डबा उधळून दिला आणि शृंगारपुरेची कॉलर पकडून मारण्यासाठीं मूठ उगारली. काय होते आहे ते कुणाच्याच लक्षात येइना. पण एका अनाकलनीय सावधतेने मी वेगांत पुढे धावलो. पालेकरच्या कमरेला हातांचा विळखा घालीत त्याला मागे खेचला आणि ओढत ओढत ऑफिसच्या बाहेर घेऊन गेलो. <br /><br /> बाहेर जिन्याच्या पायरीवर पालेकर ओंजळीत चेहरा झाकून धरीत मटकन बसला. कसल्या तरी संतापाचा उद्रेक त्याला आवरता येत नव्हता. " पालेकर काय झालंय ?" मी त्याच्या खांद्यावर थोपटत विचारले. चेहर्यावरचा हात काढीत लालबुंद डोळ्यांनी पालेकर उसळला,<br /><br />" फ्रॉड आहे साला हा हलकट. कसली फॅमिली अन् कसलं काय. च्यूत्या बनवतो साला आपल्याला. याच्या तर........." <br /><br /> पालेकरने हळूं हळूं शांत होत जे कांही मला सांगितलं ते असं होतं. पालेकर नाशिकला जी मुलगी पहायला गेला होता तिथे पहाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी मुलीकडच्या बायकांत एक तरूण स्त्री हुबेहूब शृंगारपुरेच्या बायकोसारखी दिसली होती. शृंगारपुरेच्या बायकोचा फोटो पालेकरनेही पाहिला होता. तिच्या गालावरचा तीळही त्याच्या लक्षांत राहिलेला होता. आधी असेल कुणीतरी, असतात कांही माणसे एका सारखी एक दिसणारी, म्हणून पालेकरने जरा तिकडे दुर्लक्ष केले. पण ती इकडून तिकडे वावरतांना पालेकरने तिच्या गालावरही तसाच तीळ पाहिला आणि तो चक्रावला. मग त्याने सरळच चौकशी केली तेंव्हा..... ती पूर्वाश्रमीची शृंगारपुरेचीच बायको होती. सध्या घटस्फोटित होती. लग्नानंतर तिला एका विदारक सत्त्याला सामोरे जावे लागले होते. लग्नापूर्वी भावी पतीचे गोरेगोमटे रूप पाहून ती हरखली होती. पण तिची भयानक फसगत झालेली होती. तिच्या स्वप्नांचा ढग अभ्रकाचा आहे हे तिला पहिल्या रात्री समजले तेंव्हाच ती उध्वस्त झाली होती. पण कांही औषधोपचाराने सुधारणा होईल या आशेवर दीडदोन वर्षे गेली. पण ती होणारच नव्हती. कारण तो दोष जन्मजात होता आणि हे शृंगारपुरेलाच काय पण त्याच्या मातापित्यांनाही माहिती होता. पण लग्नानंतर कदाचित कांही चमत्कार होईल या आशेवर त्यांनी त्याचे लग्न करून दिले होते. शृंगारपुरेने सुरुवातीस दादापुता करीत दत्तक मूल घेण्याबाबत बायकोअचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिने घटस्फोटाची मागणी करतांच तिचा छळ चालू केला होता. शृगारपुरेच्या आईवडिलांनीही त्याला त्यातच साथ दिली. पण दुसर्याच वर्षी त्यांना कोर्टात आरोपीच्या पिंजर्यात उभे रहावे लागले होते. शृंगारपुरेच्या वकिलांनी अटोकाट प्रयत्न करून त्याची फसवणुकीच्या आरोपाखालील सक्तमजुरीची शिक्षा टाळली होती पण घटस्फोट अगदी सहजगत्या मंजूर झाला होता.<br /><br /> सुन्न झालेले डोके जरासे हलके झाले तसे आम्ही दोघेही आपापल्या जागेवर परत आलो तेंव्हा सेक्शनमध्ये सगळे आपापल्या कामांत गर्क होते. निदान तसें दाखवीत होते. एक विचित्र शांतता आसमंतात पसरलेली होती. मी शृंगारपुरेच्या टेबलाकडे पाहिलं. तो तिथे नव्हता. म्हणून टेबलकडे गेलो. टेबलवर चिरोट्याचा डबा होता आणि डब्याखाली त्याचा चार ओळीचा राजिनामा.arun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-60514916210796799812009-05-17T02:32:00.000-07:002009-05-17T02:48:12.118-07:00वरीस पाडवादुपारचे बाराचे टळटळीत उन डोक्यावर घेत दिना त्या दहा मजली इमारतीच्या गच्चीवर उभा होता. डोळ्यावर हाताचा पालथा पंजा धरून दूरवर चिंचोळ्या होत गेलेल्या कच्च्या सडकेच्या टोकापर्यंत त्याने बुबुळांना कळ लागेपर्यंत नीट न्याहाळले. कंत्राटदार किंवा त्याचा मुकादम येण्याचा मागमूसही नजरेला पडत नव्हता. वीस जिने चढून पिंढरीला आलेला पेटका जरासा अलवार झाला तसा दिना पुन्हा पायर्या खाली उतरू लागला.<br /><br /> एका पसरटशा टेकाडावार ती जवळजवळ पूर्णावस्थेला आलेली उघडी बोडकी इमारत उभी होती. गावाच्या बरीचशी बाहेर स्वस्तात मिळालेली जागा पटकावून एका बिल्डरने ही इमारत उभी केली होती. पण भोवतालचा परिसर व्यावहारिक दृष्ट्या पुरेसा गजबजलेला होण्याची वाट पहात इमारतीचे अखेरचे बांधकाम स्थगित केले गेलेले होते. सध्या, त्या बिल्डरने नेमेलेला रखवालदार, दिना थिटे, त्याची घरवाली आणि एक चार वर्षाचा मुलगा कृष्णा एवढेच तीघे इमारतीवर वसतीला होते. बांधकाम स्थगित झाल्यापासून गेले सहा महिने कंत्राटदार कधी तिकडे फिरकला नव्हता. सुरुवातीचे चार महिने दर बुधवारी मुकादम एक चक्कर टाकून जाई. जागेवरच्या उरलेल्या वस्तूंवर एक नजर टाकी. थोडी पहा़णी करी आणि हप्त्याचा पगार दिनाच्या हातावर टेकवून आल्या पावली परत जाई. पण गेले दोन महिने तोही पुन्हा फिरकला नव्हता. दिनाची घरवाली, कौशी जवळपासच्या चार सहा घरात धुण्या-भांड्याची कामे करी. तिच्या कमाईवरच कशीबशी गुजराण चालली होती.<br /><br /> टिनाच्या खोपट्यात दिना परतला तेंव्हा कौशी चुलीवरच्या तव्यावरच्या शेवटच्या भाकरीवर पाणी फिरवीत होती. डेर्यातून लोटाभर पाणी घेऊन दिना घटाघटा प्यायला लागला तशी कौशी त्याच्याकडे पहात म्हणाली,<br /><br />" सैपाक झालाया. खाउन घिवा. अन् मंग पानी पिवा"<br />" व्हय की. वाढ."<br /><br /> उरलेले पाणी घेऊन दिना पुन्हा बाहेर गेला. तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि आत येऊन भुकेल्या मांजरीगत चुलीसमोरच्या जागेवर बसला. कुठूनसा कृष्णा धावत आला आणि बापाशेजारी उकिडवा बसला. पुढ्यातल्या भाकरीचा तुकडा वाटीतल्या लालजर्द कालवणात बुचकळीत म्हणाला,<br /><br />" बा, तू गावात कंदी जानार?"<br />" कां रं? "<br />" नै, म्हंजी कनै.....तू कडं कवा......"<br />" ए, गप कि रे. जेव की गुमान." कौशी कां तडकली ते दिनाला समजे ना.<br />" कां चिरडायलीस? बोलू दे की त्याला."<br />" काय बोलायचंय! हे कवा आननार अन् ते कवा आननार हेच की."<br />" आत्ता! पोरानं आनि काय करावं म्हन्तीस?"<br />" तेच की पोरानं तेच करावं आनि तुमी बी तेच करावं."<br />" म्हंजी?"<br />" घरात न्हाई दाना आन् म्हनं हवालदार म्हना."<br />" कोडं कां बोलायलीस. शिध्धी बोल की."<br />" काय बोलू? वरीस पाडवा परवाला आलाय. कार्टं, हार कडं कवा आननार म्हून बेजारतंय."<br />" बरं मग?"<br />" कर्म माजं! घरातल्या दुरड्या कवाधरनं पालथ्या पडल्यात. सनाला काय करनार? तुमी बसा हितच त्या मुकाडदमाची वाट बगत." <br />" मंग काय करावं म्हन्तीस?"<br />" पवरा हिरीत पड्ला तर काय वाट पहात बसान कां तो कवा वर येईल म्हून?"<br /><br /> भाकरीचा शेवटचा कुटका दिना चघळीत होता आणि कौशीकडे कौतुकाने बघत होता. कौशीचं हे असं कोड्यातलं आणि म्हणी उखाण्यांनी सजलेलं बोलणं त्याला फार आवडायचं. तशी ती दहावी पर्यंत शिकलेली होती. दिनाची मजल मात्र चौथीपुढे गेली नव्हती. कौशीचं माहेर तसं बर्यापैकी शिक्षित होतं. तिचा बा परभणी जवळच्या एका खेड्यात परंपरेने येसकर आणि चार बुकं शिकला म्हणून ग्रामसेवक होता. दिनाचा तो चुलत मामा लागत होता. दिनाचं गांव हिंगोली जवळचं मंठा आणि बाप गावच्या सावकाराच्या जमिनीचा सरकती होता. दिना बापाचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासून तालमीचा शौकीन. आणि त्यामुळेच की काय डोक्याने जरा जडच. किल्लारीच्या भूकंपानंतर भोवतालच्या परिसराची एकूणच झालेली वाताहत, लागोपाठ पडत गेलेला दुष्काळ आणि राजकीय मागासलेपण या दुष्टचक्रात जी कांही सार्वत्रिक अवदशा झाली त्यामुळे हजारो माणसे देशोधडीला लागली. गांव सोडून पोटापाण्य़ासाठी शहराकडे धांवली. त्या सुमारास नाशिक पुणे परिसरात शहरविस्तारासाठी नव नवीन बांधकामे सुरु झाली. त्यात मग कारागिरीसाठी ही माणसे सामावत गेली. या सार्यांना कारागिरी येत होतीच असें नव्हे. पण पोटातल्या आगीने हातांनाही अक्कल दिली. कुणी गवंडी, कुणी सुतार, कुणी कॉन्क्रीट कामाचे सेन्टरिंग करणारे, कुणी अन्य कांही कामे शोधून पोट भरू लागले. ज्यांना हेही साधले नाही ती माणसे दिनासारखी रखवालदाराचे काम करू लागली. कौशीला दिनाच्या नांवाचं कुंकू ती पाळण्यात असतांनाच लागलं होतं. ती शहाणी सुरती झाली तशी या येड्या बागड्याचा संसार टुकीनं सांभाळू लागली. आत्ताही हा येडाबागडा ओठातून फुटू पहाणारं हसूं दाबून धरण्याचा प्रयत्न करीत मिष्किलपणे कौशीकडे पहात होता. काळीसांवळी असली तरी कौशी ठसठशीत होती. दिनाच्या जिवाची अस्तुरी होती.<br /><br />" दात काडाया काय झालं?"<br />" काय न्हाई. ते पवर्याचं काय म्हनालीस?" दिनाचा बतावणी पाहून कौशीही हंसायच्या बेतात होती.<br />" उटा. चहाटाळपणा बास् झाला. तो मुकाडदम कुटं घावतोय का बगा. न्हाईतर त्या बिल्ड्याचा बंगला गावांतच हाय म्हनं. बगा जाऊन एकदा."<br /><br /> कौशीनं बिल्डरचा बिल्ड्या केलेला पाहून दिनाला पुन्हा हसूं फुटलं. पण आता तिच्या समोर अधिक वेळ काढणं शहाणपणाचं नव्हतं. मळालेले कपडे बदलून स्वच्छ कपड्यात खोपटा बाहेर पडणार तेवढ्यात सुशीनं खाटेखालची पत्र्याची ट्रंक पुढे ओढली आणि खालच्या एका पातळाच्या घडीत दडवलेली एक दहा रुपयाची बारीक घडी घातलेली नोट काढून दिनाच्या हातावर ठेवली. दिनाच्या डोळ्यात पाणी तरारलं. गेले दहा बारा दिवस घरात कसे काढले गेले ते त्याला माहिती होतं. कृष्णानं परवा बिस्किटाच्या पुड्यासाठीं हट्ट करून शेवटी कौशीच्या हाताचा फटका खाल्ला होता. आणि आता गावांत जातांना जवळ असावे म्हणून कौशीने बाजूला टाकलेले दहा रुपये दिनाच्या हाती ठेवले होते. त्या क्षणी कौशीला कवेत घ्यावं असं दिनाला वाटलं पण डोळ्यातलं पाणी लपवीत खालमानेने तो तडक बाहेर पडला. <br /><br /> कच्ची वाट सरून वस्ती सुरू झाली तशी दिनाची नजर दिसलेल्या पहिल्या पानटपरीवर गेली. अजून चार फर्लांग चालायचं आहे, गुटक्याची एक पुडी चघळायला घ्यावी म्हणजे जरा तरतरी येईल म्हणून पाय तिकडे वळाले खरे. पण टपरीवर एका बाजूच्या काचेच्या कपाटांत बिस्किटाचे पुडे लावलेले पाहून दिनाची मान आपसूक खाली गेली आणि तसाच तो तरातरा चालायला लागला ते थेट मुकादमचे घर येईपर्य़ंत. मुकादम त्याची फटफटी फडक्याने पुसत होता. अंगावर ठेवणीतले कपडे होते. दिनाची नजर जरा पुढे गेली तर मुकादमाची बायकोही हातातल्या गोठ पाटल्या सांवरत इरकलीत उभी.जोडी कुठे बाहेर जायच्या तयारीत दिसत होती.<br /><br />" कोण? दिना! कां रं हितं कशापायी येणं केलंस? आन साईट कुनाला इच्यारून सोडलीस?" मुकादमानं एकदम सरबत्तीच लावली.<br />" न्हाई जी. साईट कशी सोडंन. पाच सा हप्ते झाले. कुनी काई आल्यालं न्हाई साईटवर. म्हून आलो."<br />" कुनी काई आलं न्हाई म्हन्जे? साईट सध्या बंद ठेवलीया. बुकिंग न्हाई. साहेब बी वैष्णोदेवीला गेलेत. सध्या स्ल्याकच हाय." <br />" पर आमी काय करावं?"<br />" म्हंजी?"<br />" म्हंजी, सा हप्ते झालेत. हाजरी न्हाई मिळाली. लै तारांबळ व्हाय लागलीया. काय पैशे मिळतीन म्हणतांना आलो." <br />" कां कौशी कामाला जातीया ना?" मुकादम डोळा बारीक करीत म्हणाला. दिनाच्या कपाळाची शीर तडतडायला लागली. तरीही सांवरून म्हणाला,<br />" तिचं काय पुरतं पडायलं? त्यांत जरा वल्ली सुक्की खायाला मिळतिया यवडंच."<br />" आन लेका, साईट बंद पडलीया तर साइटरवचा माल हाय की."<br />" ............."<br />" काय डोळे वासून पहायलास रे ए शहाजोगा. साइटवरचं परचुटन भंगार, ढप्पे ढुप्पे वोपून किती मिळाले ते कां नाही सांगत?"<br />" काय बोलताय काय साहेब. कां गरीबाला बालंट लावतांय्?"<br />" तुज्या मायचा गरीब तुज्या! काय पहिलाच साईट वाचमन पहालोयं कां मी."<br />" मुकादम, मी त्यातला न्हाई. काय गैरसमजूत करून घिऊ नका. आज लैच नड लागलीया. काय उचेल तरी द्या बापा."<br />" आज तर काई जमायचं न्हाई. साहेब बाहेर गेल्यात. माजं बी पेमेन्ट झाल्यालं न्हाई. म्होरल्या बुधवारी साईटवर येतो. तवा काय तरी बगू"<br /><br />एवढं बोलून मुकादम फटफटीला किक मारून चालता झाला. <br /><br /> दिना फटफटीने सोडलेल्या धुराच्या पुंजक्याकडे पहातच राहिला. दिना पाय ओढीत घराकडे चालायला लागला तेंव्हा रानात गेलेली गुरं परतायला लागली होती. मुकादम असा तिर्हाईतासारखा वागेल असं त्याला कधी वाटलं नव्हतं. पाय पुढे चालत होते आणि मन मागे भरकटायला लागलं होतं. आठ वर्षांपूर्वी दिनाच्या गावांतून कामधंद्याच्या शोधात शहराची वाट धरलेल्या गरजू तरुणापैकी एक तरूण म्हणजे जालिंदर कुमावत. तसा जरा हिकमती स्वभावाचा. बाकी तरूण जो मिळेल तो कामधंदा, जमेल ते कसब यांत गर्क झाले. स्थानिक मजूरांपेक्षा कमी पैशात काम करूं लागले म्हणून स्थिरावले. पण तरीही शहरातला असलेला मजुरांचा तुटवडा जालिंदरने बरोबर हेरला आणि अवकळा झालेल्या विदर्भातल्या गांवा गांवाकडे चकरा मारून मजूर पुरविण्याचा धंदा करू लागला. शहरी भाषेत लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि साध्या भाषेत मुकादम झाला. गरज संपली की आपणच आणलेल्या माणसांना वार्यावर सोडायचे आणि पुन्हा गांवाकडून गरजू कामगारांची फौज आणायची हे कत्रांटदारीतले कसबही त्याला आपसुकच साधले. मुकादम दिनाचा तसा दुसताच गांवकरी नव्हता तर कौशीच्या दूरचा नातेवाईक लागत होता. त्या नात्याने सुरुवातीला दिनाला भाऊजीही म्हणत असें. आणि त्यामुळेंच बहुदा दिनाला त्याने रखवालदाराची नौकरी दिली होती. साईटवर रहाण्याची मोफत सोय होते आहे आणि कौशीही सतत डोळ्यासमोर राहू शकते या दोन लोभापायी दिनाने रखवालदारी पत्करली होती. पण रखवालदारी पेक्षा गवंडी, सुतार, सेन्टारिंग फिटर असे कांही झालो असतो तर फार बरे झाले असते असे दिनाला वाटायला लागले. या कारागिरांना रोजीही चांगली मिळते, हप्त्याच्या शेवटी रोख मिळते आणि शिवाय बुधवारची सुटीही मिळते. रखवालदारासारखं चोवीस तास बांधून रहायला नको. कारागिरी काय, सहा वर्षं झाली कामाला लागून, बिगारी काम करता करता शिकतांही आले असतें. दिनाचं डोकं विचार करून करून थकलं आणि पाय चालून चालून. दिनाला त्याचंही फारसं कांही वाटलं नाही. कारण मुकादम इतरांच्या बाबतीत असाच वागलेला त्याच्या कानावर आलेलं होतं. पण सगळ्यात जीवघेणी जखम झाली होती ती मुकादमानं घेतलेल्या संशयानं. दिनाला तो वार फार खोलवर लागला. इतके दिवस इमानदारीने काम करूनही ही अशी संभावना व्हावी या विचाराने तो उबगला होता. आणि मग आपण चोर नसतांही चोर ठरवले जाणार असूं तर मग इमानदारी तरी कां करायची, या विचारापाशी दिना पुन्हा पुन्हा येत राहिला.<br /><br /> नुसता ओढून घेतलेला दरवाजा ढकलून दिना घरांत शिरला तर कौशी उभ्या गुडघ्यावर हनुवटी टेकवून त्याची वाट बसलेली. कृष्णा बाजूच्या खाटेवर शांत झोपलेला. कौशी जेवणाची ताटं वाढत होती तोवर हातपाय धुऊन दिना तिच्या समोर येऊन बसला. कांही न बोलता मुकाट जेवला. त्याचा रागरंग पाहून कौशीही गप्पच राहिली. कौशी आवरासावर करीत होती तेंव्हाही तो शून्यात नजर लावूनच बसला होता.<br /><br />" हं, काय झालं? मुकाडदम भेटला?" अखेर कौशीने त्या शांततेला तडा दिलाच.<br />" हूं. भेटला."<br />" काय म्हनाला?"<br />" काय न्हाई"<br />" म्हंजी......"<br />" उंद्याला बंदुबस्त व्हईन"<br />" म्हंजी......"<br />" म्हंजी, म्हंजी काय लावलया? उंद्याला बंदुबस्त व्हईन म्हनलं ना!" आपण कां इतके करवादलो हे दिनालाही समजेना.<br />" अवो पर म्हंजी.......कसा? आन् यवडं चिरडायला काय झालं?"<br />" आता काय बी इचारू नगंस. लै दमायला झालंय बग. उंद्याला तुला पैसं भेटतीन. डाळ,गूळ, हार, कडं सम्दं काय ते घेऊन यी."<br /><br /> कौशीनं फणकार्यानं नाक मुरडलं आणि कृष्णाशेजारी जाऊन पडली. दिना लगेच झोपणार नव्हता. बांधकामाच्या जागेवर एक गस्त घालून येणार होता.<br />आणि आज तर गस्तीला थोडा जास्तच वेळ लागणार होता. दिना कंदील आणि काठी घेऊन निघाला. आज त्याने चाव्यांचा जुडगाही बरोबर घेतला होता. एक नावापुरती गस्त घालून झाली तसा दिनानं हळूच आवाज न करतां बांधकाम साहित्याच्या गुदामाचं कुलुप उघडलं. एक रिकामी गोणी घेतली आणि शिल्लक राहिलेल्या दरवाज्याच्या बिजागर्या, कडी-कोयंडे, नळकामाचे सुटे भाग, आणखीही कांही लोखंडी सामान इत्यादि गोळा करून गोणीत भरायचा सपाटा सुरूं केला. अशा दोन गोण्या भरल्या. त्या त्याने उरापोटावर उचलून दाराच्या बाहेर नेउन ठेवल्या. दाराला पुन्हा कुलुप लावून बाहेर येऊन बसला. हाताच्या बाहीला कपाळावर आलेला घाम पुशीत तो पुढची योजना मनाशी ठरवूं लागला. उद्या पहांटे, अंधारातच तो या दोन गोण्या डोक्यावर घेऊन पुन्हा वस्तीकडे जाणार होता. याकूब भंगारवाला फार कांही लांब रहात नव्हता. पहांटच्या वेळेला याकूबकडे अशा मालाचा राबता असतोच हे दिनाला माहिती होते. दिनाच्या अंदाजाने या मालाचे वजन किमान चाळीस किलो तरी भरणार होते. याकूबने कांटा मारला तरी सात रुपयाच्या भावाने दोन अडीचशे रुपये नक्कीच मिळणार होते. कौशीला काय सांगायचं ते उद्याचं उद्या पाहू. सांगू मुकादमाकडून उचल आणली म्हणून. इतकं सारं मनाशी पक्कं करीत दिना घरापाशी पोहोचला आणि बाहेर अंगणात कौशीनं टाकलेल्या अंथरुणावर झोपी गेला. <br /><br /> दुसरे दिवशी दिनाला जाग आली ती कौशीच्या आवाजाने. दचकून दिनाने नजरेच्या टाप्प्यातल्या इमारतीकडे पाहिलं. त्या दोन गोण्या सकाळच्या कोवळी उन्हं घेत होत्या. दिना दचकून उभाच राहिला.<br /><br />"काय झालं? कुनाशी बोलत होतीस?" <br />" अवो ते कुरकळणी काका"<br />"कोऽऽन?"<br />" मी कामाला जाती ना त्या बंगल्यात. थितलं मालक"<br />" बरं मग?"<br />" इक्तं डोळ फाड फाडून कां बगायलाय म्हन्ते मी. कोन रावन आला न्हाई तुमच्या शितेला पळवायला" कौशी डोळे चमकवीत हंसत होती.<br />" मस्करी सोड. कोन ते कायले आले व्हते ते बोल."<br />" सांगते! जरा दमानं घ्या की."<br />" हां बोल."<br />" ते काका हैत ना. त्यांच्या घराच्या मांग पान्याच्या मीटराचं चेम्बर हुगडच हाय"<br />" बरं.मग!"<br />" त्यांच्यात उंद्या तेंची ल्येक येनार हाय. माघारपनाला."<br />" बरं. मग!"<br />" तिची कच्ची बच्ची हैत. उगं खेळता खेळता येखांद पडन बिडन चेंबरात. म्हनतांना ते झाकाय पाहिजे."<br />" बरं मग!"<br />" डोच्कं तुमचं! त्याला ढापा लावून देशान कां म्हून इचाराय आले हुते, काका."<br />" अगं पर ते गवंड्याचं काम हाय."<br />" घ्याऽऽऽ! कुबेरानं धाडला घोडा आन् रावसाहेबांचा फाटका जोडा"<br />" ये माजे आये! काय समजंन असं बोल की."<br />" काय कीर्तन समजायचंय त्यांत. रखवालदारानं गवंड्याची थापी हातात घेतली तर काय पाप लागंन कां?"<br />" पर मला जमंन कां त्ये?"<br />" अवो निस्तं ढापं तर बसवायचंय. शिमिट बिमिट सम्दं सामान हाय थितं. तुमी करनार नसान तर मी करीन."<br />" हॉ! मी करीन म्हनं. ते चूल लिपाय यवढं सोप्पं हाय काय?"<br />" तुमी चूल लिपा सोप्पी. मी ढापं लिपिते."<br /><br /> कृष्णाचा आवाज आला तशी कौशी घरांत गेली. संभाषण अर्धवट राहिलं. पण दिना मनाशी विचार करू लागला. काय अवघड आहे गवंडी काम. कधी बिगारी म्हणून गवंड्याच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली असती तर ते कामही शिकायला मिळाले असतेच. आज अनायसे काम करून पहायची वेळ आली आहे तर काय हरकत आहे करून बघायला. दिना तसाच गुदामाकडे. गेला इकडे तिकडे बघत गोण्या गुदामात टाकून दिल्या. तिथेच एका गवंड्याची राहिलेली हत्याराची पिशवी उचलली आणि खोपटाकडे परतला. अंघोळ उरकली आणि कुलकर्ण्यांच्या बंगल्याकडे गेला.<br /><br /> ढाप्याचं काम दिनाला फार कांही अवघड गेलं नाही. आणि मग ते काम चटक्यासरशी झाल्यानं कुलकर्णी काकांच्या शेजारच्या बंगल्याच्या अंगणात चार फरशा बसवायचंही काम दिनाला मिळालं. मध्ये एकदा घरी येऊन भाकरी खाऊन गेला तेवढाच काय तो खंड पडला. पण सायंकाळी दिना घरी परतला तेंव्हा दिडशे रुपयाच्या नोटा दिनाने कौशीच्या हातावर ठेवल्या. कौशीच्या डोळ्यात पाणी तरारलं. काल रात्रीही दिनाच्या नकळत जाऊन दिनाला गोण्या भरतांना गुपचुप पाहूनही कौशीचे डोळे डबडबले होतेच. पण आताच्या पाण्यानं डोळ्याला गारवा लागत होता.<br /><br /> भल्या सकाळी चुलीवर शिजलेल्या डाळीत कौशी गूळ हाटीत होती. त्याचा सुवास दरवळत होता. दिना गुढीची आणि गुढीच्या खाली पाटावर मांडलेल्या गवंडी कामाच्या नवीन अवजारांची पूजा करीत होता. मनांत एक संकल्प जागा झाला होता. जीवनाला एक नवी दिशा मिळाली होती.arun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-45471344042203872542009-05-14T02:22:00.000-07:002009-05-14T02:25:16.476-07:00मौनअगदी ‘कृतान्तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो नसलो तरी, पोस्ट रिटायरमेन्ट उपक्रमांचे संकल्प सोडून आणि मोडूनही वयाची साठी उलटून गेली तसा मी त्या वयाला साजेसे कांही उपप्रकार (किंवा थेरं) करू लागलो. म्हणजे ज्येष्ठ नागरीक संघाचा सदस्य होणे, हास्यक्लबाचा सदस्य होणे, योगासनाच्या वर्गाला जाणे, गुरुवारी संध्याकाळी दोन पेढे घेऊन दत्त मंदिरात आरतीला जाणे, सार्वजनिक वाचनालयात जाऊन वर्तमानपत्रे नामक चुरगाळलेली रद्दी वाचणे, इत्यादि इत्यादि. या सर्वांत सातत्य असलेच पाहिजे असा कांही दंडक नसल्याने नव्याचे नऊ दिवस हा माझा मूळ पिंड मी कसोशीने जपला. योगासन वर्गाला मी तिसर्याच दिवशी रामराम ठोकला. ती कपालभाती केली की मिसळी बरोबर चार चार पाव हाणावे लागायचे. तरीही प्रभात फेरी, ज्याला जनरली मॉर्निंग वॉक असे म्हणतात, त्याला मात्र मी इमाने इतबारे जाऊ लागलो. याला कारणे दोन. एक तर तिथेही चार मित्र मिळवून एका कट्ट्यावर बसून वयाला साजेशा किंवा न साजेशा टवाळक्या करायाला मिळतात आणि दुसरे म्हणजे मग शेवटी घरी परतण्या आधी टपरीवरचा गरमागरम चहा. (चहाला गरमागरम भजी, वडा किंवा तत्सम कांही पदार्थाचे अनुपान दिले नाही तर मला चहा बाधतो).<br /><br /> परवा सकाळी हा असा मी प्रभात फेरीला निघालो पण मूड कांही जमून आलेला नव्हता कारण दाढ दुखीने आधीची रात्र जागवली होती. तसे शोरूमचे दात सोडले तर मागच्या गोडाऊनमधल्या बहुतेक दाढा जायबंदी झाल्या आहेत. संक्रांतीचा सुमारास नातवंडाना ऊस दाताने फोडून कसा खावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा शूरपणा अंगाशी, खरं म्हणजे दाढेशी बेतला होता. तेंव्हा पासून ती दाढ हलायाला लागली होती. ती काढून टाकावी असा सल्ला समस्त सुहृदांनी आणि हितचिन्तकांनी दिला होता. पण दंतवैद्य नामक दैत्याची माझ्या मनात प्रचंड भीति बसलेली होती. त्याला कारणही तसेंच होती. पस्तीस चाळीस वर्षांपुर्वी केवळ अपघाताने तुटलेला दात काढतांना एका दंतवैद्याने मला दिलेल्या मरण यातनांची मनांत दहशत बसलेली होती. पण आता नाईलाज झाला होता. म्हणून मी नित्याच्या प्रभात फेरीनंतर, आमच्या चांडाळ चौकडीपैकी कोणी तरी एखादा चांगला,<br />कमीत कमी वेदना देणारा दंतवैद्य सुचवावा असा प्रस्ताव मांडला.<br /><br />" टूथ ट्रबल? ओह् जीझस् क्राईस्ट! " रम्या बागल्या (मूळ नांव रमेश बागूल) फुस्सकला. हा अमेरिकेतल्या जांवयाकडे जाऊन आल्यापासून असाच बोलतो. साधं ‘अरे देवा’ म्हणाला असता तर याचे फोरफादर्स काय नरकात पडले असते कां? रम्या एकदाच अमेरिकेला जाऊन आला तर अंतर्बाह्य इतका कां बदलला याचं मला पडलेलं कोडं आहे. रम्या आता आमच्या बरोबर वडा भजी खात नाही, आणि चहाही घेत नाही. चहा ऐवजी तो काळी कॉफी घेतो. तरी बरं, हाच प्राणी एकेकाळी भजनी मंडळात "हर्रीऽ मुके म्हनाऽ, हर्री मुकेऽऽ म्हनाऽऽ, पुन्न्याची गनऽना कोऽऽन करीऽऽऽऽ!" म्हणत टाळ बडवीत असे. हा याचा इतिहास आहे. काळाच्या ओघात माणूस बदलतो हा निसर्गक्रम असेलही. तो बदल इतका असावा?<br /><br />"आय् टेल यू वडुल्या (माझ्या आडनावाच्या अनेक अपभ्रंशापैकी हे एक) यु नो, स्टेट मध्ये डेंटिस्ट म्हणजे, ओह् गॉश, दे लिक यू अ फॉर्च्यून."<br />मला या वाक्याचा कांही अर्थही लागला नाही आणि संदर्भही नाही. इथं मी दाढदुखीने बेजार झालो आहे आणि हा अमेरिका पुराण लावून बसतो आहे. मी विमनस्कपणे इतर दोघांकडे पाहिले तर, त्या दोघांनीही मिसळीच्या रश्श्यात पावाचे तुकडे बुडवून गिळण्याच्या कार्यक्रमात यत्किंचितही खंड न पाडता मी रमेश बागूल साहेब काय सांगतील ते मुकाट ऐकावे अशा अर्थाच्या खुणा केल्या. <br /><br />" बट् डोन्ट वरी. आय् कॅन गेच्च्यू अ नाईस डेन्टो. माझी एक नीस इथल्या डेंटल कॉलेज मध्ये बीडीएस् करतेय. शी कुड बी अ गुड हेल्प टु यू. "<br /><br />तर इत्यर्थ असा होता की रमेश बागूल साहेबांची कुणी कुमारी प्रीतिबाला बागूल नामे पुतणी शहराबाहेरील दंत महाविद्यालयात दंत वैद्यकशास्त्रातील शल्यचिकित्सा- स्नातक होऊ घातली होती. दंत महाविद्यालयात प्रत्यक्षिकासाठीं कांही दंतरुग्णही लागतात. त्यासाठीं एक शुश्रुषा कक्षही असतो आणि विशेष म्हणजे त्याच दिवशी त्या कन्येची प्रात्यक्षिकासाठी बहिस्थ-रुग्ण-कक्षावर नेमणूक (ओपीडी) होती. तिच्या वशिल्याने म्हणे, माझे दंतोत्पाटन चकटफू होऊ शकले असते. अशी मौलिक भर माझ्या ज्ञानांत पडली. आणि चक्क चकटफू दंतोत्पाटन! या एवढ्या मोठ्या लोभाला बळी मी बळी न पडता तरच नवल झाले असते. शिवाय एका होतकरू दंतचिकित्सकाला किंवा दंतचिकित्सिकेला ज्ञानार्जनात मदत करण्याचे पुण्यही मला मिळणार होते. मी तडक घरी जाऊन स्नानादि आन्हिके उरकून दंतमहाविद्यालयाकडे कोणतीही काचकूच न करता कूच करण्याचा निर्णय घेतला.<br /><br />मी इप्सित स्थळी पोहोचलो तो तिथे एक गौरवर्णीय कृशांगी मला सन्मुख झाली. " आपण वडुलेकर काका ना?" त्या युवतीचे लावण्य पाहून अंतर्बाह्य दाटून आलेले माझे भांबावलेपण शक्य तितके लपवण्याचा प्रयत्न करीत, मी उद्गारलो "हो". तेवढ्या श्रमानेदेखील माझा घसा कोरडा पडतो आहे असे मला वाटून गेले. <br /><br />" मी प्रीतिबाला बागूल. काकांचा फोन आला होता. तुम्ही येणार आहात म्हणून." मी रम्याच्या तत्परतेला मनोमन सलाम केला. खरोखरच रम्या अमेरिकेत राहून बदलला होता. <br /><br />"या!" या तिच्या पुढच्या उद्गारासरशी मी मंत्रचळ्यागत तिच्या मगोमाग जाऊ लागलो. ती मला ज्या कक्षात घेऊन गेली तिथे तो मोहकसा दिसणारा दंतशल्यचिकित्सामंच, वरती दिव्याचा चंबू, चकचकीत फवारके लावलेल्या नळ्या इत्यादि सरंजाम होताच. पण त्या सौंदर्यात भरच पडावी अशा शुभ्र गणवेशातल्या तरतरीत अशा आणखी चार युवती जणू माझीच वाट पहात असाव्या अशा आविर्भावात उपस्थित होत्या. त्या चार ज्यूनिअर्स आहेत आणि कुमारी प्रीतिबाला बागले या सिनियर आहेत आणि त्या दांत काढण्याचे प्रात्यक्षिक माझ्यावर करून दाखवणार आहेत अशी मौलिक माहिती मिळाली. <br /><br />माझ्या मनातले दंतवैद्याचे चित्र अगदी निराळे होते. दंतवैद्यक हे केवळ पुरुषांचेच क्षेत्र असून दंतवैद्य हा हातात चिमटे, पक्कडी घेऊन दंतरुग्णाच्या दाताचा खातमा करणारा कुणी दैत्यच असतो अशी कांहीशी माझी कल्पना होती. शिवाय तोपर्यंत मी दंतोत्पाटानाच्या इतक्या सुरस आणि चमत्कारिक हकीकती ऐकल्या होत्या की दंतवैद्य नामक राक्षसाने इथे हे मायावी स्त्री रूप धारण केलेले आहे, असे वाटून मी थोडासा घाबरलोही. पण काही लोक मुमुक्षु भिषग् वर्गाला ज्ञानोपासनेसाठी मदत व्हावी या उदात्त हेतूने मरणोपरांत देहदान करतात, तसे आपणही दंतदान करून थोडेसे पुण्य़ कमवयाला काय हरकत आहे असा एके उदात्त हेतू मनात आल्याने मी त्या दंतशल्यचिकित्सिकेने निर्देशित केल्या प्रमाणे दंतशल्यचिकित्सा मंचकावर स्थानापन्न झालो. माझा रक्तदाब तपासणे, मला मधुमेह आहे किंवा नाही याचा कबुलीजबाब घेणे, इत्यादि प्राथमिक सोपस्कार पूर्ण झाल्यावर माझ्या जबड्यामध्ये जबडा बधीर करण्यासाठीं देतात ती टोचणी करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्या प्रयत्नात केवल माझा डावा जबडाच नव्हे तर डावा गालही आतून बधीर करण्यात आला. त्या शिकाऊ दंतवैद्यिणींच्या सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर माझी आधीच हल्लख झालेली दाढ काढली गेली. झाऽऽलं एकदाचं! असा सुस्कारा सोडून मी त्या मंचकावरून पायउतार होणार इतक्यात, " काका, एक मिनिट हं! जरा तसेच बसून राहता कां प्लीज. आमचे सर तुम्हाला पहायला येताहेत." या कु. प्रीतिबालाच्या विनवणीला नकार देण्यासारखे कांहीच नव्हते म्हणून तसाच त्या मंचकावर पहुडलो. <br /><br />ते तिचे सर येईपर्यंत डोळ्यावर येणारी पेंग मी कशीबशी थोपवून ठेवली. सुमारे अर्ध्या तासाने ते तिचे सर आले ते थेट माझा जबड्यात घुसले. म्हणजे येताक्षणीच माझा जबडा उघडून ते निरीक्षण करू लागले आणि निरिक्षणादरम्यान ते मला अगम्य अशा भाषेत कु. प्रीतिबालाला कांही सूचना करीत होते. त्यांचे निरीक्षण आणि सूचना संपल्या आणि ते तात्काळ निघून गेले. मी प्रीतिबालाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिने दोन गोष्टी स्पष्ट केल्या. पहिली म्हणजे मी माझ्या दातांची जराही काळजी न घेणारा अत्यंत अव्यवस्थित माणूस आहे असे त्यांचे मत आहे. आणि दुसरी म्हणजे, माझ्या तोंडातील उजव्या बाजूच्या खालच्या दंतपंक्तीतील आणखी एक दाढ ताबडतोब काढली पाहिजे. मी जरा घाबरलो. कारण नाही म्हटले तरी डावी बाजू आता जराशी दुखायला लागली होती. <br /><br />पण मग विचार केला चकटफूच आहे तर घ्या काढून आणखी एक दाढ. म्हणून मी संमती दिली. आणखी एक सलग प्रॅक्टिकल करायला मिळणार म्हणून त्या चार ज्यूनिअर्स आणि एक सिनियर प्रीतिबाला अशा पंचकन्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहायला लागला. या प्रॅक्टिकलला वेळ मात्र बराच लागला. सुमारे दीड तास. आधीच तुटून छिन्नविछिन्न झालेल्या त्या दाढेचे गिरमिटाने अक्षरश: तुकडे तुकडे करून तिचा नायनाट करावा लागला.<br /><br />मी कापसाचा बोळा दाबून धरलेले बधीर झालेले दोन जबडे आणि बधीर झालेले दोन्हीही गाल घेऊन तिथून सहीसलामत (?) दंत महाविद्यालयाच्या बाहेर पडलो तेंव्हा, मला कोणत्याही कारणासाठीं तोंड उघडणे शक्य नाही हे मला घरी जाण्यासाठी रस्त्यावरची रिक्षा थांबवली तेंव्हा समजले. तो मला माझे गंतव्य स्थान विचारीत होता आणि मी माझे तोंड तसूभरही उघडू शकत नव्हतो. अखेर मी खिशातून एक कागदाचे चिटोरे काढून त्यावर गंतव्य स्थानाचे नांव खरडले आणि त्याला दाखवले. त्यावर रिक्षावाल्याने माझ्याकडे करुणार्द्र नजरेने कां बघितले हे मला नंतर समजले. <br /><br />रिक्षा निघाली आणि कांही अंतर कापल्यानंतर एका चौकाच्या अलिकडे थांबली. रिक्षाचालकाने मागे वळून मला कांही खाणाखुणा करायला सुरुवात केली. मला कांही समजेना. पुढे रहदारी ठप्प झाल्याचे दिसत होते. पण रिक्षाचालक खाणाखुणा करून काय सांगायचा प्रयत्न करतो आहे त्याचा कांही बोध होत नव्हता. अखेर माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी ज्या पद्धतीने त्याला कुठे जायचे ते सांगितले होते त्यावरून मी मुका आहे हे त्याला वाटले होतेच, शिवाय मुकी माणसे बहिरी असतात हेही त्याला माहिती असावे. त्यामुळे तो जमेल तशी करपल्लवी करून कांहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर त्याला मीही खुणेने मला ऐकू येतंय् तू बोल, असे सुचवले तेंव्हा त्याने, पुढल्या चौकातून कसलीशी रॅली चाललेली आहे, अर्थातच् रहदारी ठप्प झाली आहे आणि आपल्याला पुन्हा मागे वळून दुसर्या मार्गाने जावे लागेल असा वाचिक बोध दिला. त्याप्रमाणे त्याने मला माझ्या घरापाशी सोडले. हे सगळे ठीकच झाले पण रिक्षा प्रवासात मी सध्या बोलू शकत नाही या जाणिवेने मी कमालीचा अस्वस्थ झालो. <br /><br />सकाळी गडबडीत मी दात काढायला जातो आहे हेही घरात कुणाला सांगितले नव्हते. गडबडीत असं आपलं म्हणायचं पण, दात तर काढायला जातो आहे त्यात काय सांगायचंय असा वयाला साजेसा अहंकारही त्यात होताच. पण आता निदान कांही काळ तरी हे असे, मौनव्रत धारण करावे लागणार <br />आणि त्यातून काय काय प्रसंग उद्भवणार या शंकेने मनात काहूर माजले. पहिला सामना झाला तो नातवाबरोबर. <br /><br />" तू उशील का केला.चल बाप्पाला ज्याऊ" माझी प्रभातफेरी झाली की आम्ही दोघे देवाला जाणे हा दिनक्रमाचा एक भाग होता.<br />" ए शहाण्या, किती वाजलेत पाहिलंय कां. बाप्पाला काय जातोस, आबांची जेवायची वेळ झालीय." सूनबाई आतून कडाडल्या. खरंच की. मी घड्याळाकडे पाहिलं. दीड वाजायला आला होता. सूनबाईनी पाण्याचा पेला आणून पुढे ठेवला आणि.... <br />" आज बराच उशीर झाला तुम्हाला. कुठे कांही महत्वाच्या.....अगबाई, आणि चेहरा किती उतरलाय तुमचा. बरं नाही की काय" तिचा स्वर कापरा झाला. डोळ्यातली भीति पाणावायला लागली. पण क्षणभरच. असं मला वाटायला लागलं. कारण, पुढच्याच क्षणी,<br />" हेही सकाळपासून चारदां म्हणाले, बाबा कां आले नाहीत अजून म्हणून. ते इन्शुरन्सचं काम करायचं होतं ना तुम्हाला. तुमची बरीच वाट पाहिली त्यांनी. शेवटी तेच गेले ते पेपर्स घेऊन " कातर स्वर आता करडा व्हायला लागला होता. <br /><br /> मी मनातल्या मनात जीभ चावली. गृहपाठ करायचा विसरलेल्या विद्यार्थ्यासारखी मी मान खाली घातली. निवृत्तीच्या कालातही मी स्वत:ला थोडसं व्यग्र ठेवलेलं होतं. वीज, टेलेफोन, पाणी वगैरे नैमित्तिक बिले भरणे, इन्शुरन्सची नूतनीकरणे करणे इत्यादि पेन्शनर्स जॉब मी माझ्याकडे घेतले होते. आज आणि आजच कांही इन्शुरन्स संबंधी कांही महत्वाची कागदपत्रे इन्शुरन्स कंपनीत सादर करणे आवश्यक होते. माझ्या दाताच्या भानगडीत मी ते साफ विसरलो होतो. माणसाचे वय वाढलं म्हणजे अंगी सगळा शहाणपणा येतोच असं नाही. किंबहुना कर्तुमकर्तुम असा एक वृथा अहंकार आणि त्यातून निर्माण होणारा फाजील आत्मविश्वास कधी कधी रुपेरी केसांना लाज आणतो. तशीच कांहीशी वेळ मी माझ्यावर आणून ठेवलेली होती. <br /><br />तूर्तास मौन हे माझं वास्तव होतं. त्याचं खरं कारण सांगायला कांही हरकत नव्हती. पण प्रत्येक माणसाच्या मनांत एक वात्रट मुलगा नेहेमी दडलेला असतो आणि अशावेळी तो हमखास कांहीतरी वात्रटपणा करायला लावतो. तोच वात्रट मुलगा माझ्या डोक्यात कधी घुसला ते कळलंच नाही. सूनबाईने जेवणाचे पान घेतले आहे असे सांगितल्यावर, पोटात कावळे कोकलत असूनही, मी मोठ्या नम्रपणाने (!) जेवायला नकार दिला. सूनबाई संभ्रमात. मग मी एक कोरा कागद घेतला आणि आज सकाळी मी एका साधुपुरुषाच्या सत्संगाला गेलो होतो आणि दोन दिवसांसाठी उपोषण आणि मौन व्रत धारण केले आहे असा फतवा जाहीर केला. मात्र राजगिर्याचा लाडू आणि दुध चालेल कां या सूनबाईंच्या पृच्छेला मी तात्काळ होकारार्थी मान हालवली. यावर, एखाद्या तर्हेवाईक, भंपक माणसाला पाहून शहाण्या माणसाचा होतो तसा सूनबाईंचा चेहरा झाला. अजून तोंडाची उघडझाप फारशी नीट होत नव्हती त्यामुळे दोन राजगिर्याचे लाडू मी दुधात भिजवले आणि चमच्याने खाल्ले. त्यावेळी नातू माझ्याकडे ज्या नजरेने पहात होता ती मला अस्वस्थ करीत होती. अखेर "यंटम्" असा मार्मिक शब्द उचारून (मी एव्हाना यंटम् दिसत असणारच) तो आतल्या खोलीत पसार झाला आणि..<br /><br />इतका वेळ माझ्याबरोबरच मौन पाळलेल्या भ्रमणध्वनीने शंख वाजवला. मी जितक्या उत्सुकतेने तो हातात घेतला तितक्याच हताशपणे त्याच्या कडे बघत राहिलो. आता असे बघत राहणे क्रमप्राप्त होते. कारण मी बोलू शकत नव्हतो. माझ्याशी संपर्क साधू इच्छिणार्याचे भ्रमणध्वनीच्या पटलावर आलेले नांव आमच्या एका दाभाडे नांवाच्या परम मित्राचे होते आणि हे दाभाडे खरं म्हणजे वाभाडे काढण्यात पटाईत असें एक वाह्यात प्रकरण होतं. आमच्या अशाच एका ज्येष्ठ नागरीकांच्या संध्याकाळच्या अड्ड्याचे ते आद्य संस्थापक होते. अड्ड्यावरची सगळीच मंडळी तशी ‘पिकल्या पानाचा देठ कां हो हिरवा’ म्हणावी अशी कांहीशी टवाळच होती. पण हे ह.भ.प. दाभाडे बुवा त्यातले शिरोमणी होते. अड्ड्यावर डच् किंवा सोल्जर्स बेसीस वर भजी मागवली तर इतरांची नजर चुकवून चार दोन भजी हळूच पळविण्याच्या कर्तृत्वामुळे त्यांना ही ह.भ.प. पदवी बहाल करण्यात आली होती. मी भ्रमणध्वनीकडे किंकर्तव्यमूढ असा पाहात असतांना पुन्हा सूनबाई माझ्या सहाय्यतेला धावल्या आणि मग आम्ही तूर्तास केलेल्या पराक्रमाची ब्रेकिंग न्यूज त्या आमच्या या परममित्राला देत्या झाल्या. दूरदर्शनच्या ‘आज तक’ किंवा तत्सम गुर्हाळ-वाहिन्यांच्या कानी या दाभाड्याचे नांव पडले असते तर त्यांनी लक्ष लक्ष रुपये मानधन देऊन या प्राण्याला नक्कीच साईन केले असते. माझ्या मौनव्रताची बातमी षट्कर्णी आणि कर्णोपकर्णी होण्याला आता कांही मिनिटे पुरेशी होती. पुन्हा भ्रमणध्वनी वाजायला लागणार या भयाने मी त्यालाही मूक (सायलेन्ट) केला. <br /> <br />आता मी दिवाणखान्यात भिंतीवरच्या घड्याळाच्या सेकंद काट्याकडे एकटक पहात आरामखुर्चीत एकाकी पहुडलो होतो. विचार करत होतो. कारण त्यापेक्षा अधिक मी कांही करूच शकत नव्हतो. ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ असं कुणीसं म्हटलं आहे हे आठवलं. तो ‘कुणीसा’ जो कोणी असेल त्याने ती उक्ती लिहिण्या किंवा वदण्यापूर्वी स्वत: कधी मौन पाळले असेल कां? मी कोणता ‘सर्वार्थ’ साधणार होतो. एरवी मी ‘वट्टार वट्टार’ करणारा माणूस. मला ही मौनाची कल्पना कां सुचली? माणसाच्या मनांत नेहेमी दोन प्रवाह वहात असतात. एक प्रवाह ताच्यावरील संस्कारित प्रवृत्तींप्रमाणे दृष्य स्वरुपात वागायला लावतो आणि दुसरा प्रवाह अगदी विरुद्ध स्वरूपाने वागण्याची उर्मी निर्माण करीत राहतो. ती उर्मी तो आतल्या आंत साठवीत जातो. मात्र त्याचे ते अदृष्य स्वरूप कधी कधी अभावितपणे प्रकट होते. त्यात त्याच्या स्वाभाविक व्यक्तिमत्वाला छेद जाण्याचाही धोका असतो. माणसाला वेड लागण्याची ती पहिली पायरी असते. हे असलं कांही तरी मी केंव्हातरी वाचलं होतं. मला ते सारं पुन्हा पुन्हा आठवायला लागलं. शब्द हा माझा दुसरा प्राण आहे असं वाटायला लागलं. आणि तो प्राण मी गमावला तर हा प्राणही कदाचित् गमावेन की कांय या भयाने मघाशीच रिकामा झालेला पाण्याचा ग्लास मी पुन्हा पुन्हा ओठांना लावीत होतो. निदान एवढं तरी बरं की, हे मौन दोन दिवसांसाठी आहे असं जाहीर करण्याचा शहाणपणा अभावितपणे मला सुचला होता. पण हे दोन दिवस मी काय करणार होतो. संवाद हे जीवनाचे अविभाज्य अंग आहे. इथे मी बुद्ध्याच शब्दकळा बाजूला सारली होती. ‘शब्देविण संवादु’ कसा साधावा. या विचारांच्या गर्तेतून कसल्याशा आवाजाने बाहेर आलो. इतका वेळ मी घड्याळाकडेच पहात होतो. पण एव्हाना संध्याकाळचे सहा वाजले आहेत हे त्या आवाजाने मला दाखवले. तशीही माझी अड्ड्यावर जाण्याची वेळ झालीच होती <br /><br />अड्ड्यावरचा कोरम मी तिथे गेल्यावर पूर्णच झाला. आश्चर्य वाटावे अशी लक्षणीय उपस्थिती तर होतीच पण त्याहूनही अश्चर्यकारक अशी नि:शब्दता तिथे पसरलेली होती. एरवी ‘ काय कुणी गचकला बिचकला की काय रे? की दांतखीळ बसावी असं कांही घडलंय?’ असं एन्ट्रीचं वाक्य मी फेकलं असतं. पण आता मौनाचं बेअरिंग सांभाळणं भाग होतं. <br /><br />" बरं. सांग आता. काय झालं?" शेवटी रवी सराफ शक्य तितका खर्जात सुरु झाला.निर्देश माझाकडेच होता. याचं मला आश्चर्य वाटालं.<br />" काय, कुठे काय? " मी. मात्र केवळ हाताच्या खुणांनी.<br />" फार बोलला का तो तुला? च्यायला ही हल्लीची कार्टी समजतात काय स्वत्:ला! " पहिलं वाक्य मला आणि दुसरं बाकी मॉबसाठी, जनरल.<br />" अर्ण्या, पण तूही साला एक झक्कूच आहेस. होता है यार. ऐसा टकाटकी होताईच है. पण म्हणून हे असलं बोलायचं नाही म्हणजे काय बाबा?"<br /> इति सुभाष कीर्तिकर. मला कांही उलगडा होई ना. पण संभ्रमात मी एकटाच नव्हतो. नाना जोशीने खूणेने माझ्याकडे बघत अगदी मख्ख चेह्र्याने काय चाललं आहे असा अर्थाचे अविर्भाव केले. आणि,<br />" अरे या बाबाचं (म्हणजे मी) आणि चिरंजीवांचं कांही तरी वाजलंन्. तर हा डिप्रेशनमध्ये बोलायचाच बंद झाला" हे, गजा कर्वे, त्या दोन्ही कानाने बहिर्या नाना जोशीला ऐकू जावं म्हणून एवढ्या मोठ्याने बोंबलला की पलिकडच्या कल्व्हर्टवर बसलेल्या आणखी कांही पेन्शनरांचे कान टावकारले.<br /><br />मी मुका झालो होतो पण बहिरा झालो नव्ह्तो. हा काय प्रकार आहे हे मला समजेना. माझ्या मौनाची यथेच्च टिंगल होणार याची मला कल्पना होती.<br />त्याला माझी मानसिक तयारीही होती. पण इथे हे काय चाललं आहे याचा उलगडा होईना. माझं आणि माझ्या मुलाचं कडाक्याचं भांडण झालं आणि म्हणून मी बोलायचा बंद झालो आहे असा कांहीसा जांवईशोध लागलेला दिसतो आहे इतपत उलगडा एव्हाना व्हायला लागला होता.<br /><br />पण कां? मी विस्मय, संताप, अगतिकता इत्यादि सर्व जाळ डोळ्यात आणायचा प्रयत्न करीत दाभाड्याकडे पाहिलं. कारण दुपारी त्याचाच फोन आला होता. दाभाडे कानांत काडी खुपसून कान खाजवीत बसला होता. दाभाडेनी शांतपणे काडी कानातून काढून डोळ्यासमोर धरली, काडीला मळ लागलेला नाही याची खात्री करून घेतली, माझ्या कडे स्थिर नजरेने पाहिलं आणि म्हणाला,<br /><br />" हां बोल. " दाभाडे<br />" बोल काय बोल? काय चाललाय हा तमाशा" मी. शब्द नाही.फक्त खुणा. "शब्देविण संवादु" हा असा होतो आहे हे पाहून मी जरासा उत्तेजित झालो.<br />" मी काय केलं? तू मौन पाळतो आहेस एवढंच मी गजाला कळवलं. त्यानं ते काय इंटरप्रीट ते त्यालाच ठाऊक" मी कपाळावर हात मारतो.<br />" ए! साला तूच म्हणालास ना यानं कांहीतरी इन्शुरन्सच्या पेपर्सचं लफडं केलं. म्हणून पोराने बापाला वाजवला म्हणून" गजा तडकला.<br />" मी असं कुठं म्हणालो. अर्ण्या बोलायचा बंद झाला आहे आणि इन्शुरन्सच्या कामाचा कांही तरी घोळ झाला आहे एवढंच मला समजलं. एवढेच मी बोललो " दाभाडेच्या बोलण्याला साळसूद पणाचा वास येत होता. <br /> " पण तुला इन्शुरन्सच्या पेपराचं काय माहित?" मी.. पुन्हा खाणाखुणा!<br /> " मला मीनल म्हणाली तसं." मी पुन्हा कपाळावर हात मारून घेतला. <br /><br />सूनबाई दाभाडे काकांशी जरा जास्तच सलगीने बोलल्या होत्या हे खरं होतं. मी ते संभाषण पुसटसे ऐकले होते. पण त्या दोन निरनिराळ्या गोष्टींचा असा अर्थ दाभाडेने स्वत:च आणि बहुदा त्याच्या खवचट वृत्तीला साजेसा असा लावला होता. आणि विशेष म्हणजे तो काल्पनिक साधू, त्याचा मौनव्रताचा सल्ला याचा कुठे उल्लेख दिसत नव्हता. अखेर ती कथा साभिनय करून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा पयत्न केला. पण कुणालाही त्यातले एक अक्षरही समजलेले नाही असे दिसायला लागले.<br /><br />" पण मी म्हणतो अर्ण्याच्या पोराने त्याला काम सांगायला नको होतं, पण याला एवढीशी मदत करता येऊ नये?" <br />" च्यायला, घोळ करून ठेवला तो ठेवला आणि वर मिजास पहा याची. राजश्री आपल्याशीही बोलायला तयार नाहीत." कीर्तिकर<br />" अहो तो बोलणार तरी काय? केल्या कर्माची लाज वाटत असेल आणि बसला वर आपणच फुरगटून" गजा कर्वे.<br />" पण मी म्हणतो. पोराने तरी बापाला कामे कां सांगावीत. त्याची त्याला करता येऊ नयेत?" रवी सराफ<br />"कां सांगू नयेत? नाही तरी घरीच बसणार ना हा इथे तिथे तोंड खुपशीत. थोडं काम केलं तर काय बिघडलं?" पुन्हा दाभाडे.<br />" पण एक मात्र आहे हां! आता विसरला असेल हा ते इन्शुरन्सचं पण म्हणून पोरांनी बापाला काय एवढं भोसडायचं?" रवी सराफ<br />" ते कांही नाही वडुशेठ. मी म्हणतो जागे व्हा आणि एकदाचा काय तो निर्णय घेऊन टाका" रवी सराफ<br />" काय बोलतोयेस काय तू रव्या. आणि निर्णय? कसला निर्णय घ्यायला सांगतो आहेस तू अर्ण्याला" दाभाडे<br />" मी कांही सांगत नाहीये. तोच मागे म्हणाला होता गावाकडे जाऊन मस्त स्वतंत्र रहायचं म्हणून" रवी सराफ<br />" हा एक (म्हणजे मी) शहाणा आणि त्याच्या बोलण्यावर हुरळून जाणारा तू दीड शाहाणा " दाभाडे<br />" आयला, तू माझावर काय घसरतो आहेस. त्यालाच विचार ना. गावाकडे जाऊन मस्त मजेत राहायची आयडिया कोणाची?" रवी सराफ<br />" हो ना! माझाही आयडियाच आहे. आयडियाची सर्व्हिस चांगली नाही हो. त्या पेक्षा एअरटेल चांगला आहे म्हणतात." नाना जोशी<br />" घ्या! आता हे ऐका.आहो जोशीबुवा ते कानाचं मशीन घरी काय पुजायला ठेवलंय कां" गजा नानावर घसरला<br />" काय रे अर्ण्या, हा काय प्रकार आहे? तू वडुल्याला जाऊन राहाणार आहेस?" दाभाडे<br />" ए, कुठाय् रे हे वडुलं?" गजा कर्वे<br />" कुठं कां असेना. तुला काय करायचंय त्याच्याशी." दाभाडे<br />" च्यायला असं काय म्हणतोस. हा अर्ण्या जाणार असेल तर बरंय ना" गजा<br />" काय बरंय?"<br />"म्हणजे असं बघ. हा गावाकडे स्वतंत्र रहाणार. मग आपल्यालाही कधी जाता येईल याच्याकडे चार दिवस मजा करायला" रवी सराफ<br />" तिथं जाऊन काय मजा करणार?" दाभाडे<br />" ते तो सांगेल ना. आपण काय, तेंव्हा पाहुणे असणार. तो आपली सग्गळी सोय करेलच ना?" कीर्तिकर डोळे मिचकावीत.<br /> <br /> ही चर्चा कुठल्या कुठे चालली होती. मी हे असं कांही बोललो नव्हतो. गप्पाच्या ओघात आमच्या वडुल्याच्या वडिलोपार्जित इस्टेटी विषयी मी बोललो असेनही. पण हे तर्कट कुठून निघालं कुणास ठाऊक. वडुल्याला आमचं असं होतं काय आता. जे होतं ते माझ्याही जन्माच्याची आधी कूळकायद्यात गेलेलं होतं. मला खरं म्हणजे माझ्या मौना बाबत कांही तरी सांगायचं होतं. मी मनातल्या मनात त्याची तयारी करीत होतो. मौनाबाबत गीतेत कांही श्लोक आहेत कां, ते आठवत होतो. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे अशा महान प्रभृती मौन पाळीत असत. मी त्यांचाशी माझी स्वत:ची मनोमन<br /> तूलना करीत होतो. आणि इथे कांही भलतेच चावळणे चालू होते. मी या चिंतनातून जरासा बाहेर येऊन मित्रमंडळींच्या चर्चेकडे वळालो तर दाभाडेचं वाक्य कानी आलं,<br /><br />" ते माझ्यावर सोपवा. जायचंय ना याला गावाकडे. याच्या पोराशी मी बोलतो. याची त्याला सांगायची हिंमत होणारच नाही. आईल् डू दॅट. च्यायला, दोस्तासाठी एवढं करायलाच हवं ना!"<br /><br /> माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा दाभाड्या कांही करू शकतो याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि अशा आगी लावण्यात तर प्रत्यक्ष नारदमुनींनी याच्यासमोर हार पत्करली असती. हे सारं "लळीत" माझ्या घरापर्यंत येऊन ठेपलं तर घरात काय महाभारत होईल या कल्पनेने मी उडालोच.<br /> आणि मोठ्ठ्याने ओरडलो,<br /><br />" बास करा रे हा तमाशा. कां जिवावर उठलात माझ्या?"<br /><br /> दाभाडे खो खो करून हंसायला लागला तशी बाकी मंडळीही त्यात सामील झाली. कोपर्यावरून रमेश बागूल आपल्या लांब लांब ढांगा टाकीत,गालातल्या गालात हंसत आमच्याच रोखाने येत होता. गजा जोशी, यातले कांहीही समजलेले नसूनही सगळे हसताहेत म्हणून तोही हसत होता. पण तरीही सावधपणे ओरडला " अरे, पण चहा कोण पाजतोय्?"<br /><br /> "मौनी बाबा !!" एकसुरात जल्लोष झाला.arun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-75188690753328734072007-12-16T02:03:00.000-08:002007-12-16T02:15:05.898-08:00स्वप्ना" अवी ऽ !"<br /> आईची हाक आली. ती मी ऐकलीही पण उत्तर द्यावंसं वाटलं नाही. कारण तिला काय म्हणायचं होतं ते मला चांगलंच माहिती होतं आणि तो विषय मला नको होता. तरीही मला ते ऐकावं लागणारच होतं. तिला फार काळ असं टांगणीला ठेवणं आता या पुढे जमणारं नव्हतं. आता मी तिला टाळण्याचा जराही प्रयत्न केला तर दुखावली जाणार होती. बाबा गेल्यापासून ती फारच हळवी झाली होती. <br /><br />"अरे! ऐकतोयस ना." आई पदराला हात पुसत समोरच येऊन उभी ठाकली.<br />" हं, बोल "<br />" मी काय म्हणते.. करंबेळकरांचा काल पुन्हा फोन आला होता."<br />" बरं ! "<br />" अरे, बरं काय? मी काय म्हणते... एकदा मुलगी बघायला काय हरकत आहे?" <br />" हं !"<br />" कम्माऽल झाली बाई तुझी! तू लग्न करणारेस की नाही? ...ते काही नाही. येत्या रविवारी ते मुलगी आणताहेत, दाखवायला. <br /> मी हो म्हणालेय त्यांना. मुलगी चांगली शिकलेली आहे. इंटीरीयर का कसलासा कोर्सही केलाय आणि खूप देखणी आहे म्हणे." <br /><br />" देखणी! ....तशी असेल का गं!" मी तंद्रीतच बोललो. आईच्या बोलण्याकडे माझं लक्ष होतंही आणि नव्हतंही.<br /><br />" तशी म्हणजे कशी? तू काय लावलं आहेस हे? तू काय दुसरी एखादी मुलगी बिलगी पाहिलीएस की काय? आणि मग सांगत का नाहीस तसं? "<br />" तसं काही नाही गं. ठीक आहे. बघू."<br />" बघू बिघू काही नाही. रविवारी घरीच राहा आपण. आणखी एक मेहेरबानी करा. कशात हरवू बिरवू नका."<br /><br /> आई मला हरवू नका म्हणाली पण मी आताही हरवलेलाच होतो. तिला पाहिल्या पासून या हरवलेलेपणाच्या धुक्यात मी गुरफटून गेलो होतो. या क्षणीही ती जणू माझ्या समोर उभी होती. मी आताही माझा उरलो नव्हतो. एखाद्या कळसूत्राने जणू माझा ताबा घेतल्यागत मी कपाटातून माझी रोजनिशी काढली आणि मागच्या कप्प्यातले तिचे छायाचित्र काढून त्यात हरवलो.<br /><br /> एक जुनाट वाडा. वाडा कसला जणू गढीच. वाड्याच्या मागे एक भलं मोठं परस. परसात एक भली मोठी बारव. परसात झाडझाडोराच माजलेला. वाड्याची तशी बारवेचीही पडझडच झालेली. पण बारव अजून बर्यापैकी तग धरून राहिलेली. वरल्या तोंडाला अष्टकोनी चिरेबंदी घेर. बारवेला एका बाजूने पाण्याच्या डोहापर्यंत उतरत जाणार्या पायर्या. पायर्या जिथे सुरू होतात त्याच्या जरा पुढे वरती ताशीव दगडांची डौलदार कमान. कमानीच्या आतील भितीवरून लटकणार्या हिरव्याकंच रानवेली. कमानी खाली भिंतीला अलगद टेकून, काहीशी ओठंगून पण अगदी ऐटीत उभी ती आणि सुंदर हा शब्दही अगदी क्षुद्र ठरावा अशी तिची लोभसवाणी छबी. आणि ते सारं काव्य शेवटच्या पायरीवरून कॅमेर्यात उतरवताना माझी झालेली तारांबळ.<br /><br />" काय झालंऽ? निघतोय की नाही माझा फोटो?" जणू एक वीणाच झंकारली.<br />" हं झालं. रेडी?" मी कॅमेर्याची कळ दाबली फक्ककन् फ्लॅश उडाला, आणि दुसर्याच क्षणी,<br />" आई गं! " एक किंकाळी उठली आणि तिचा तोल गेला. प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसा मी तिला सावरायला झेपावलो. पण त्या आधीच ती सावरली होती.<br />" काय झालं? केवढ्याने किंचाळलीस. काय झालं इतकं घाबरायला."<br />" किंचाळू नको तर काय करू! केवढा मोठा प्रकाश! डोळे दिपून गेले अगदी. आम्हाला तर बाई भीती वाटली अगदी. वाटलं एखादा ताराच कोसळतोय की काय अंगावर." <br />तिचे ते निरागस विभ्रम पाहून मला हसायला आलं.<br />" आमचा इकडे जीव जातोय आणि तुम्हाला मात्र हसायला येतंय. जातोच आम्ही कशा ते. बसा तुम्ही हसत."<br />माझं हसू आवरून होऊन मी तिला काही म्हणेतो ती वार्याच्या झुळकीसारखी पसार झाली.<br /><br /> ती गेली त्या दिशेकडे काळ्यामिट्ट अंधारात पाहत राहिलो ते कसल्याशा आवाजाने. कदाचित एखादी पाकोळी डोक्यावरून फडफडत गेली असावी.भानावर आलो तसा आपसूक काळे वकिलांच्या घराकडे चालू लागलो. काळे वकील. माझ्या बाबांचे जुने मित्र. त्यांनीच मला या गावाकडे बोलावून घेतले होते. गाव कसला! एकही इमारत सरळ आणि धड उभी नाही. भले मोठे मातीच्या भिंतींनी बांधलेली घरं, वाडे. बहुदा सगळेच्या सगळे पडझड झालेले. जे जरा सुस्थितीत असावे असे दिसत होते, ते जुनेच डागडुजी केलेले नाही तर नव्यानेच बांधलेले. कधी काळी या गावात सुबत्ता नांदत होती या वदंतेवर जराही विश्वास बसणार नाही इतकी गावाची रया गेलेली. इंग्रज मायदेशी रवाना झाले त्याच्या नऊ दहा वर्षं आधी गावात जीवघेणा दुष्काळ शिरला आणि पुढेही वीस बावीस वर्षं मधून अधून थैमान घालीतच राहिला. त्याने कर्ती सवर्ती माणसं पोटापाण्यासाठी परागंदा झाली ती झालीच. जे जिथे गेले, तिथेच वसले. पुन्हा गावाकडे अभावानेच फिरकले. मी देखील अशातल्याच एकाचा वारस होतो. इतकाच काय तो माझा या गावाशी संबंध.<br /> पण या संबंधालाही एक नाव होते. पेशकारांचा वाडा. पेशकार माझे आडनाव. पूर्ण नाव अविनाश जनार्दन पेशकार. जनार्दन विश्वास पेशकारांचा आणि पेशकार कुटुंबाचा एकुलता एक विद्यमान वारस. या गावात आमच्या वारसा हक्काचा एक जुनाट, बराचसा भग्नावशेष उरलेला वाडा. माझ्या वडिलांनाही त्यांच्या लहानपणी पाहिलेला. इतका जुना. वाड्याच्या एका बाजूला बर्यापैकी डागडुजी करून नानासाहेब काळे वकील राहत होते. माझ्या वडिलांचे ते मित्र आणि विश्वस्तही. वाड्यात दोन तीन भाडेकरू होते. पण त्यांच्या सगळ्याच्या वर्षाच्या भाड्याएवढ्या रकमेत या गावाकडे येण्याचे प्रवास भाडेही सुटत नसे. त्यामुळे भाडेवसूली, नगरपालिकेचे नैमित्तिक कर भरणे, आणि अशी बाकी सारी व्यवस्था वकील साहेबच बघत. तेही आता गाव सोडून त्यांच्या मुलाकडे जाऊ इच्छित होते. तेव्हा हा वाडा येईल त्या किमतीला विकून टाकावा हा त्यांचा प्रस्ताव होता. वाडा घ्यायला तालुक्यातील एक वखारवाला तयार झाला होता. आणि त्या साठी आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी मी या गावात आलेलो होतो. एखाद दोन दिवसात हे काम आटोपेल असे वाटले होते पण येऊन आठ दिवस उलटून गेले तरी फारशी प्रगती झालेली नव्हती. <br /><br /> सुरुवातीला गाव बघण्यात, गावाबाहेरील महादेवाचे पडके हेमाडपंथी मंदिर, चार दोन शेते बघण्यात वेळ गेला. पण पुढे वेळ जाई ना. वाड्याबद्दलचे कुतूहल मात्र स्वस्थ बसू देत नव्हते. मी त्या भल्या मोठ्या वाड्यातील अवशेषातून डोकावू लागलो. असाच एकदा वाड्यामागील भागाकडे गेलो तर एक बर्यापैकी सुस्थितीतील एक विहिरी दिसली. तिला बारव म्हणतात हेही असेच कोणीतरी सांगितलेले. बारवेच्या पायर्या उतरून पाण्यात पाय सोडून शेवटच्या पायरीवर बसलो. बरेचसे अंधारून आलेले होते. पण त्या थंड पाण्याचा स्पर्श इतका सुखावणारा होता की वेळेचे भान न गळाले असते तरच नवल. या गूढ रम्य वातावरणात तिची माझी पहिली भेट होईल असं स्वप्नंही मला कधी पडलं नसतं. पण पुढे जे घडत गेलं ते स्वप्नाहूनही अद्भुत होतं. <br /> <br />" काय हो! जीव द्यायचा विचार चाललाय की काय." <br /> <br /> कुठुनश्या आलेल्या आवाजाने आणि पाठोपाठ भिरभिरत आलेल्या हास्याच्या खळखळाटाने मी दचकलोच. आवाजाच्या रोखाने मी वर पाहिले तर एक तरुण मुलगी दिसली. मी अभावितपणे उठून पायर्या चढू लागणार इतक्यात पुन्हा आवाज आला,<br /><br />" थांबा तिथेच. मीच खाली येतेय."<br /><br /> तिथे त्या ओसाड स्थळी आणि त्या क्षणी कुणी येईल अशी जराही शक्यता नव्हती आणि त्यामुळे नाही म्हटले तरी मी काहीसा भांबावलो होतो. ती मुलगी कधी समोर येऊन उभी राहिली हे समजलंच नाही. पुन्हा एक लोभसवाणा हास्याचा खळखळाट आणि,<br /><br />" बाई गं! किती घाबरलाहात हो तुम्ही. कोण आहात तुम्ही? आणि इथं काय करताय आता, यावेळी."<br />" मी ... मी.. काही नाही. इथं आलो होतो... सहजच... काही काम होतं... काळे वकिलांकडे आलोय."<br />" अच्छाऽऽ! तरीऽच!!"<br />" तरीच...? तरीच काय ?"<br />" तरीच म्हणजे, बाहेर गावचे दिसताहात. एरवी गावातला कुणी जीव गेला तरी इकडे या ठिकाणी फिरकायचं धाडस करणार नाही."<br />" का? हे अगदी ओसाड आहे म्हणून? पण मला तर ही जागा फार आवडली. किती शांत आणि छान वाटतंय नाही इथं "<br />" खरंच तुम्हाला आवडली ही जागा? द्या टाळी! माझीही ही खास जागा आहे."<br />" म्हणजे तू...आय् मीन...तुम्ही नेहमी येता."<br />" काही हरकत नाही.. तुम्ही मला तू म्हणालात तरी चालेल. आणि माझं म्हणाल तर ही जागा माझा अगदी स्वर्गच आहे म्हणाना."<br />" छान! म्हणजे, तू इथे रोज येत असशीलच. आणि नसलीस तरी रोज येत जा, प्लीज! काही कामासाठी आलोय मी या गावात. <br /> पण दोनच दिवसात जीव नकोसा व्हावा इतका कंटाळलोय.तू निदान चार शब्द बोलशील तरी." <br />" खरंय तुमचं. अगदी वेगळा आहे हा गाव. पण तुम्ही इथे कशासाठी आलाय?"<br />" सांगतो. पण मला आधी सांग, हे मी कोणाला सांगणार आहे?" मी किंचित गमतीने म्हणालो.<br />" इश्श्य! कोणाला म्हणजे काय? मला....आणखी कोणाला!" <br />"............." मी काहीच न बोलता मिस्किलपणे तसाच पाहत राहिलो.<br />" अच्छाऽ ऽ! म्हणजे फिरकी घेताय आमची. आलं लक्षात! सरळ नाव विचारा ना!" तिचे गोबरे गाल फुगवीत आणि टप्पोरे डोळे वटारीत ती म्हणाली.<br />" आलंय ना लक्षात! मग सांग ना!"<br />" आम्ही नाई जा! तुम्हीच ओळखा पाहू! काय नाव आहे आमचं!" ही अशी बाजू माझ्यावरच उलटवेल असं वाट नव्हतं. पण मलाही गंमत सुचली.<br />" ओळखू? अंऽ ऽ ऽ स्वप्ना! स्वप्ना नाव असणार तुझं."<br />" अय्या, ...काय जादुगार आहात की काय? कसं ओळखलंत नाव तुम्ही माझं? सांगा ना!" हर्षातिरेकाने ती नखशिखान्त थरथरत होती. थक्कच झालो मी. पण तरीही काही तरी सुचलंच.<br />" त्यात कसलीये जादू. ही जागा, ही बारव, ही मागची कमान, त्या वेली, हे पाणी हे सारं एक स्वप्नच आणि त्यात तू ! ही अशी अचानक अवतरलेली स्वप्नपरी! मग तुझं नाव स्वप्ना!! यापेक्षा आणखी काही वेगळं असू तरी शकेल का."<br /><br /> काहीच न बोलता तिने टाळी देण्यासाठी हात पुढे केला. ती तिची नि:शब्द प्रशंसा मला फार भावली. मग आम्ही दोघे काही वेळ तिथेच पाण्यात पाय सोडून बोलत बसलो. खरं तर बहुतेक सारं मीच बोललो. ती लक्ष देऊन ऐकत होती. मी त्या गावात का आलो हे मी तिला सांगितलं. पण तसाही तेव्हा बराच वेळ झाला होता. अशा लहानशा, शांत गावात सायंकाळची नीरवता लवकरच पसरते. नानासाहेब आणि वहिनी माझी वाट पाहत असतील याची जाणीव झाली. रंगलेल्या गप्पा संपूच नयेत असंच वाटत होतं. पण नाइलाज होता. तो तिलाही समजला आणि म्हणूनच तिने मला निरोप दिला. अर्थात पुन्हा भेटण्याचा शब्द देऊनच.<br /><br /> त्या नंतर ती भेटतच राहिली. न चुकता अगदी रोजच. संध्याकाळी अंधारून यायला लागलं की ती तिथे यायची. अन् मग रात्रीचा पहिला प्रहर सुरू होईतो माझ्याशी बोलत बसायची. मीही भारावल्यासारखा तिची वाट पाहत बसायचो. तिच्या सौंदर्याने मी वेडावलो होतो. तिच्या मधाळ स्वभावाला लोभावलो होतो. मी तिच्या प्रेमात पडलो होतो हे माझं मला जाणवत होतं. तिला तसं ते जाणवून द्यावं असं खूपदा मनांत आलं. पण धीर होत नव्हता. तिच्या मनाचा ठाव लागत नव्हता. तसंही ती स्वत:बद्दल काही बोलत नसे. त्यामुळे तिला तसं काही विचारण्याचा धीर होत नव्हता. ती कायमची माझी व्हावी असं मनोमनी वाटत होतं पण तिच्या बाजूने त्यासाठी हवा असलेला प्रतिसाद दिसत नव्हता.<br /><br /> अशात काही दिवस गेले आणि ज्या कामासाठी मी त्या गावात आलो होतो ते काम संपायला आलं.नानासाहेबांनी ते तडीला लावलं. कागदपत्रांची पूर्तता झाली. तालुक्याला जाऊन महसूल उप-निबंधकासमोर सही-शिक्कामोर्तब करणे इतकेच काय ते उरले. माझ्या जिवाची तगमग सुरू झाली. मी येताना बरोबर कॅमेरा आणला होता. एक आठवण म्हणून वाड्याची, गावातल्या काही ठिकाणाची छायाचित्रे घेतली होती. आज तिचेही एकादे छायाचित्र घ्यावे आणि मनातले काय ते बोलावे असे मनाने घेतले. नेहमीप्रमाणे ती संध्याकाळी आली तेव्हा तर ती खूपच छान दिसत होती. आधी छायाचित्र घ्यावे आणि मगच मनातले सांगावे असे ठरवले. कारण माझा प्रस्ताव, माझे बोलणे तिला आवडेलच, पटेलच याची खात्री वाटत नव्हती. पण माझा विचार तिला पसंत न पडता तर तिने मला छायाचित्र काढू दिले नसते हे मात्र नक्की. तिचा नकार घेऊन जावे लागले तरी तिचे एखादे छायाचित्र तिची आठवण म्हणून मला बरोबर नेता येणार होते. म्हणून मी तसा प्रयत्न केला. तो साधलाही. पण कॅमेर्याच्या फ्लॅशच्या झोताने घाबरून ती जी गेली ते गेलीच. पुढच्या दोन सायंकाळी मी तिची वाट पाहिली. पण त्या दोन्ही रात्री मी विरह आणि वैफल्याच्या गर्तेत जागून काढल्या. अखेर परत जाण्याचा दिवस उजाडला. तालुक्याच्या गावापर्यंत नानासाहेब माझ्याबरोबर येणार होते. महसूल कचेरीतील कार्यवाही पूर्ण झाली की ते माघारी गावाकडे परतणार होते आणि मी पुढे पुन्हा माझ्या घराकडे. घरातून निघताना एकदा बारवेकडे जाऊन आलो. काही मधुर क्षणांच्या त्या साक्षीदाराचा जड अंत:करणाने निरोप घेतला. वाड्यातून बाहेर पाडताना नजर सगळीकडे भिरत भिरत होती. कुणाला काय विचारावे ते समजत नव्हते. इतक्या दिवसात मी तिचा ठावठिकाणा का माहिती करून घेतला नाही म्हणून मी स्वत:वरच चिडलो होतो. निघताना काळे काकूंना नमस्कार करावा म्हणून घरात गेलो. त्यांना नमस्कार केल्याशिवाय माझा तिथून पाय निघणार नव्हता. गेले दहा दिवस त्याच माझ्या जेवणा-खाण्याचे पाहत होत्या. मी वाकून नमस्कार केला. काकूंनी दही साखरेचा चमचा पुढे केला. दहीसाखर हाताच्या तळव्यावर घेताना एक विचार मनात आला, काकूंना स्वप्नाबद्दल विचारून पाहावं. त्यांना कदाचित स्वप्नाचा काही ठावठिकाणा माहिती असेलच. पण कसे आणि काय विचारावे ते सुचे ना. मी थोडा घुटमळलो. <br /><br />" का रे? काय झालं? काही हवंय का?<br /><br />"काकू, एक विचारू? ती स्वप्ना....."<br /><br />" अगं बाई, तेही कळलं की काय तुला?" काकूंच्या चेहर्यावरचा तजेला मावळला आहे हे माझ्या लक्षात आलं.<br /><br />" काय कळलं मला? काय आहे ते..... पण मला तर ती......." पण काकूंचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. कुठे तरी तंद्रीत हरवल्या सारख्या त्या बोलत होत्या.<br /><br /> " फार गुणाची नि लाघवी होती रे ती पोर. खोचे मास्तरांची मुलगी ती. मास्तर बदली होऊन इथं आले तेव्हा जागेसाठी सरळ इथे आले. माणूस अगदी सज्जन आणि सरळ होता. वाड्याच्या मागे बारवेजवळ एक सहा खणाची जागा जरा जरा सुस्थितीत होती. नानांनी किरकोळ डागडुजी करून ती त्यांना वापरायला दिली. इतके दिवस मोकळ्याच पडलेल्या वास्तूत आता निदान सांजवात तरी लागेल म्हणून मलाही बरं वाटले. स्वप्ना मास्तरांची थोरली मुलगी. तशी आणखीही एक होती पण अजून ती परकरातही आलेली नव्हती. स्वप्नाला कुणी स्वप्ना म्हणत नसे. मास्तर आणि कावेरी वहिनी, तिची आई, तिला तायडी म्हणत. आणि मग सगळ्यांसाठी ती तायडीच झाली. तायडी नक्षत्रासारखी देखणी होती. मॅट्रिक झाली होती. तेव्हा मुलींना फार शिकवीत नसत. एखादं वर्ष जाऊ देत, छानसा नवरा पाहून तायडीचं लग्न करून देऊ, असं मास्तर म्हणत. तसा एक योग <br />आलाही. पण तो काळयोग ठरला. तेव्हा गावांत वीज खूप लांबून यायची. घरातले दिवे तर अगदी मिण मिण पेटायचे. पुडे मग गावासाठी स्वतंत्र सब्स्टेशन तयार करण्याचं काम बोर्डानं काढलं. त्यासाठी काही माणसं जिल्ह्याच्या सर्कलमधून गावात आली. त्यात तो होता. माजगांवकर त्याचं नाव. नानांनी पुढच्या चौकालगतची एक खोली त्याला भाड्याने दिली. सडाफटिंग माणूस. आला तसा गेला. पण गेला तो इस्कोट करून गेला. इथे आला तसा त्याची न् तायडीचे ओळख झाली आणि ती जवळिकीढे गेलेत कधी बदलली हे तिचे तिलाही समजले नाही. रोज तो कामावरून आला की एक तर त्याच्या खोलीत नाही तर बारवेच्या खाली पायर्यांवर तासन् तास बोलत बसत. तसा त्याने तिला एक दोनदा बाहेर फिरायला नेण्याचाही प्रयत्न केला होता. पण तायडी मास्तरांच्या धाकाने तयार झाली नाही. तायडी त्याच्यात पुरती अडकली होती. अगदी बावरी राधा झाली होती. कावेरी वहिनींनादेखील एम मन वाटायचं, मुलगा चांगला धडधाकट आहे, शिकला सवरलेला आहे, नोकरीही चांगली, बोर्डाची, म्हणजे सरकारी आहे. तायडीला पटला असेल आणि मास्तर परवानगी देतील तर... काय हरकत आहे?....! पण ती वेळ आलीच नाही. एक दिवस तो अचानक नाहीसा झाला. आम्ही सगळेच चाट पडलो. तायडीचे अवस्था तर वणव्यात हरिण सापडावा तशी झाली होती. तिची रया मला बघवे ना. मी नानांना बोर्डाच्या हपीसात चौकशी करा म्हणाले. पण तिथे तर डोंगरच कोसळला अंगावर. खरा कहर तर पुढेच झाला. खोचे मास्तरांच्या साजुक घराला कुणा काळ्याची दृष्टच लागली जणू. रोज मास्तरांची आरडा ओरड आणि स्वप्नाच्या दबक्या आवाजातले किंचाळणे. आळीतही कुजबूज सुरू झाली. घडू नये ते घडले होते. तो मेला तायडीला मास्तरांनी गांव दोडण्याचा निर्णय घेतला. आम्हालाही सामानाची बांधाबांध करून घराची चावे द्यायला इकडे आले तेव्हाच ते जाताहेत हे कळलं. बिचारे कुठे गेले पुन्हा त्यांचं काही कानी पडलं नाही.त्या हळव्या पोरीने हा आघात कसा झेलला असेल ते एक देवालाच ठाऊक. पुढे कधीतरी मास्तर गावात येऊन गेले असं उडत उडत समजलं. पण मास्तर इकडे काही आले नाहीत. खरं तर यायला हवं त्यांनी. जाऊ देत त्याचं काही वाटलं नाही. पण स्वप्नाही एकदोनदा वाड्याच्या मागे बारवेकडे दिसली होती म्हणे."<br /><br />काकूंच्या शेवटच्या वाक्याने कानात प्राण एकवटले. माझ्या हाताने नकळतच जिथे कॅमेरा ठेवला होता ती जागा चाचपली. ’मी काढीन शोधून तिला..मी काढीन शोधून माझ्या सर्वस्वाला, माझ्या स्वप्नाला’ मनात एकच कल्लोळ उसळला.<br /><br />" काकू, निघतो मी. गाडीची वेळ होत आली."<br /><br />"अरे, हो रे. खरंच की. मनात एक वाफ दबून राहिली होती. तू विषय काढलास. भानच हरपलं माझं. बरंय! ये तू आता. घरी पोहोचलास की पत्र टाक." काकूंनी मला निरोप दिला.<br /><br /> तालुक्याचे सोपस्कार आटोपून मी परतीच्या प्रवासाला निघालो. प्रवासात मनात स्वप्नाशिवाय दुसरं काही नव्हतंच. लगेचच स्वप्नाचा शोध घ्यावा, मगच घरी जावं, असं अनेकदा मानांत आलं. पण ते शक्य नव्हतं वाड्याचा विक्रीतली एक बर्यापैकी मोठी रक्कम रोखीने घेतली होती. ती बॅगेत तळाशी ठेवली होती. ती लगोलग घरी आईच्या स्वाधीन करणे गरजेचे आणि महत्त्वाचे होते.<br /><br /> गाडी स्टेशनांत पोहोचली तसा मी आधी तडक माझ्या मित्राच्या फोटो स्टुडिओत गेलो. कमेर्यातला रोल त्याच्या स्वाधीन केला आणि त्यावर लगेच प्रक्रिया करून छायाचित्रांच्या प्रतीही लगेचच काढ असे म्हणालो. तिथून घरी आलो. गावाकडे काय काय घडले ते आईला शक्य तितके सविस्तर, फक्त स्वप्ना वगळून, सांगितले आणि पुन्हा फोटो स्टुडिओ कडे निघालो. माझी उडालेली धांदल आईच्या नजरेतून सुटली नव्हती. पण त्या क्षणी ती मला काही विचारणार नव्हती. तसा तिचा स्वभावच होता. माझ्या उडालेल्या धांदलीचे कारण तिने मला नंतरच विचारायला हवे होते. पण ती छायाचित्रे पाहिल्या शिवाय मला काहीही बोलता येणार नव्हते. <br /><br /> मित्राने माझ्या हाती दिलेली छायाचित्रांची चळत मी पुन्हा पुन्हा चाळली. माझ्या चर्येवरची उत्कंठा मावळून एक संभ्रमाची छटा पसरते आहे हे माझ्या मित्राच्या नजरेतून सुटले नाही.<br /><br />" का रे? काही चुकलं आहे का?"<br />" नाही, नाही, तसं काही नाही. पण तू सगळे प्रिन्टस् काढलेस ना?"<br />" भलेऽऽ! म्हणजे काय? अरे प्रिन्टस् मोजून पाहा ना. या वन-ट्वेन्टीच्या रोलमध्ये बाराच प्रिन्टस् निघणार ना? "<br />" हो, हो, आहेत, आहेत. बरं चल येतो मी." मी तिथून काढता पाय घेतला नि घरी आलो. गठ्ठ्यातल्या शेवटाच्या दोन प्रिन्टस् माझ्या रोजनिशीच्या मागच्या कप्प्यात ठेवून दिल्या.<br /><br /> करंबेळकरांकडे फोन झाला. आईने मला तसं आतूनच ओरडून सांगितले. ते छायाचित्र माझ्या हातातच होते. आई कधी मागे येऊन उभी राहिली ते तंद्रीत समजलंच नाही.<br />" कसला रे फोटो? बघू. "<br />त्या जुनाट वाड्याच्या मागची बारव. बरवेच्या पायर्या जिथे सुरू होतात त्याच्या जरा पुढे वरती ताशीव दगडांची डौलदार कमान. कमानीच्या आतील भिंतीवरून लटकणार्या हिरव्याकंच रानवेली. कमानी खाली भिंतीला अलगद टेकून..... .<br /><br />" आपल्या वाड्याचा का रे फोटो? काय डौलदार कमान आहे नाही? पण, कमानी खाली कुणी उभं राहिलं असतं ना, तर खूप छान दिसलं असतं."<br /><br />कमानी खाली कुणीतरी होतं, ते आईला......तिलाच काय कुणालाही दिसणार नव्हतं. पण मला ती आताही दिसत होती. ती तिथेच होती.<br /><br />स्वप्ना !arun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-73938283227014399072007-04-18T03:03:00.000-07:002007-04-18T03:05:39.184-07:00वाळूचे वादळ, एक असेंही..वाळूचे वादळ, एक असेंही..<br />अरुण वडुलेकर रवि, १८/०२/२००७ - ११:०६. » कथा | अनुभव <br /> मनोगतवर जयश्री अंबासकर यांचा ' वाळूची वादळे ' हा लेख वाचला आणि मीही असांच एकदा वाळुच्या वादळांत सांपडलो होतो त्या स्मृती जाग्या झाल्या. ती चित्तरकथा देण्याचा प्रयत्न करीत आहे.<br /> त्यावेळी मी मध्यपूर्वेतील दोहा-कतार या देशांत नोकरी साठी गेलेलो होतो. आवासांमधील हवा थंड करणाऱ्या संयंत्रांची उभारणी करणे, ती कार्यान्वित करणे व तत्पश्चात त्यांची वेळोवेळी देखभाल होत राहील अशी व्यवस्था लावणे ही माझी कार्यकक्षा होती.<br /> तो १९८१ सालांतील मार्च महिना असावा. मी मुख्य शहराबाहेरील दूरच्या लहानशा गावातील एका शेखच्या निवासांतील संयंत्राची पाहाणी करून परतत होतो. त्या वास्तूल निवास म्हणायचे पण जणू कांही राजवाडाच होता तो. संयंत्रतांत कांही दोष नव्हताच पण शेख तसा चिकित्सकच होता. त्यच्या शंका कुशंकांना तोंड देता देता संध्याकाळ होत आलेली. परत निघालो तेंव्हा आकाशांत बऱ्यापैकी प्रकाश होता. मला आमच्या आस्थापनेकडून दिली गेलेली मोटार गाडी चालवत सुमारें ११० कि.मी. चा प्रवास करून माझा निवास गाठायचा होता.<br /> परतीचा रस्ता प्रधस्त, रुंद व चांगला होता. पण एकाकी आणि निर्मनुष्य होता. संध्याकाळ असल्याने वाटेने रहदारी असण्याची शक्यता नव्हतीच. मागे किंवा पुढे एकही वाहन दिसण्याची शक्यता फार विरळ होती. पण मनांत त्याची काळजी नव्हती. कारण कधीं एकदां घरी जाऊन पडतो असें झाले होते.<br /> अशांतच, साधारण तीसेक कि.मी. चा प्रवास झाला असेल नसेल तोंच वाळूच्या वादळाला सुरुवात झाली. सहसा अशा वादळाची पूर्वसूचना सकाळी तेथील स्थानिक आकाशवाणीवर दिली जते. पण मी ती ऐकली नव्हती. वाळूही अशी की धड जाढी नाहीं आणि अगदी पीठही नहीं. साधारण बारीक रव्यासारख्या वाळुचे लोट समोरून येऊन पुढील कांचेवर आदळून पसार होऊ लागले. सुरुवातीचे कांही क्षण अचंभ्यात गेले. मग कांही क्षण मौजही वाटून गेली. जणू मी वळिवाची सर अंगावर घेत होतो. पण पुढच्या क्षणी सारा आसमंत त्या धुराळ्याने भरून गेला. रस्ताच काय पण आजूबाजूचे सारे दिसेनासे झाले. धुक्यांत हरवावं तसं झालं होतं. प्रतिक्षिप्त क्रीयेने गाडी बंद केली गेली. भय केवळ मनांतच नाही तर सर्वांगावर पसरू लागलं. गाडीच्या सर्वांगावर धूळ-वाळूचा थर दाट होऊ लागला होता. खिडकेची कांच खाली करून बाहेर पाहाण्याच प्रयत्न केला. तो एक मूर्खपणाच झाला. जराशी कांच खाली होतांच वाळूचा एक जोरदार फवारा आंत घुसला आणि नाकातोंडावरुन झरपटून गेला. झटकन कांच पुन्हा बंद केली. अशा वेळी वायपर्स वापरतात की नाही ? कोणस ठाऊक ! कांही सुचण्यच्या पलिकेडे मी गेलेलो. वायपर्स चालू केले तर कांचेवर वाळू पाण्याचे सारवण होऊन राडाच झाला. वादळ थांबे पर्यंत स्वस्थ बसणे क्रमप्राप्त होते.<br /> आणि मग स्वस्थ बसण्यातली अस्वस्थता दाटूं लागली. हे वादळ कधी थांबणार ? की थांबणाराच नाही ?? नाही थांबलं तर काय होईल ? मी गाडीसकट वाळूत गाडला जाईन की काय ? गाडीचा एसी चालू असला तरी हवेचा वास बदलल्याचे जाणवत होते. प्राणवायू कमी होतोय की काय ? मी गुदमरून मरणार? मग एका एकी मायदेशातील माझी पत्नी, मुलं, घर, माझी वाट पाहात असलेली बहिण, सारं सारं आठवायला लागलं. रडू यावं, धाय मोकलून रडावं असं वाटत होतं पण रडू फुटत नव्हतं. एकदा वाटलं गाडीचा दरवाजा उघडून बाहेर पडावं.गाडीत गुदमरून मरण्यापेक्षां बाहेर मरावं. मृत्यु निदान लवकर तरी येईल.<br /> असा शून्यमनस्क किती वेळ बसून राहिलो तें कळलंच नाही. वादळाची गाज कमी झालीशी वाटली तसा दरवाजा हंळूच उघडून बाहेर आलो. वादळ शमलं होतं. तरी वारा जोराचा झोंजावत होताच. दाट अंधारून आलेलं होतं. पुढच्या कांचेवरील वाळुचा कसाबसा साफ करून गाडी सुरूं करूं गेलो तर काय ! धक्काच बासला. गाडी सुरूं झालीच नाहीं; होणारही नव्हती. कारण मी इंजीन बंद करायला विसरलो होतो, शिवाय एसी आणि हेडलाईटस चालूच राहिले होते. बॅटरी साफ उतरली होती. काय करणार ! मोठी पंचाईत झाली होती. कुणाची मदत मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. आपत्कालीन इशारा (hazzard signal) चालू करून ठेवला आणि बाहेर येऊन उभा राहिलो. <br /> अचानक दूरवर आकाशांत एक लाल पिवळा दिवा लुकलुकूतांना दिसू लागला आणि पाहतां पाहतां तो माझ्या दिशेने सरकू लागला.तें एक खूप खालून जाणारे हेलिकॉप्टर आहे हें धान्यांत येईतो तें माझ्या डोक्यावरून घोंघावत निघूनही गेले. मी वेड्यासारखा त्याच्या मागे ओरडत हातवारे करत धांवलो. पण उपयोग झाला नाही. पुन्हा तोच अंधार, भयाण पोकळी, गलितगात्र असा मी ! <br /> त्यानंतर तासभर गेला असेल नसेल, अशांतच एक विलक्षण घटना घडली. पुन्हा दूरवर लाल निळे ठिपके चमकू लागले. यावेळी ते खूपसें खाली क्षितिजालगत होते. लांबून येणारे एखादे वाहन असावें असें वाटले. कीं तो एक भास होता ? या विचारांची तंद्री मोडली ती डोळ्यांवर आदळणाऱ्या प्रकाश झोतांनी. <br /> तो प्रकाश अगदी जवळ येऊन ठेपलेल्या मोटरीच्या दिव्यांचाच होता इतकेंच नव्हे तर त्या मोटारीवरही एक दिवा होता जो लाल निळ्या प्राकाशाचे झोत फिरवत होता. हर्षातिरेकाने मी एक आरोळीच ठोकली. ती गाडी पोलीसांची (अरबी भाषेत पोलीस = शुरता) होती. ती कां आली होती तें समजलं आणि तेथील शासनव्यवस्थेला मनोमन सलाम ठोकला.<br /> मघाशीचं हेलिकॉप्टर अशा वादळानंतर आपद्ग्रस्तांचा शोध घेण्याच्या कामगिरीवर होतं आणि त्याने दिलेलेल्या माहितीनुसार हे दोन पोलीस अधिकारी माझी सोडवणूक करण्यासांठी आलेले होते. <br /> कसं कुणास ठाऊक आता मला रडूं फुटलं होतं.मी रडत रडत, मला येत असलेल्या मोडक्या तोडक्या अरबी भाषेंत " शुकरंद रफिक " (धन्यवाद मित्रा) असं एक सारखं म्हणत होतो. त्यांना माझी भाषा येत नव्हती आणि मला त्यांची येत नव्हती. पण तरी तेंव्हा जो संवाद झाला तो शब्दांच्या पलिकडचा होता. माझी गाडी तिथेंच सोडून दिली.(ती दुसऱ्या दिवशी कंपनीच्या तंत्रज्ञाने आणली)<br />मी त्यांच्यासोबतीने सुखरूप परत आलो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेंच खरे.arun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-3252528257024450942007-04-17T06:30:00.001-07:002008-01-02T01:15:38.094-08:00आखाती मुशाफिरी’वाळूचे वादळ असेही एक’ या लेखाला मिळालेला प्रतिसाद पाहून मध्यपूर्वेतील दोहा-कतार या देशातील माझे आणखी कांही अनुभव लिहिण्याला हुरुप आला.<br />-----------------------------------------------------------------------<br />राक्षसांशी मैत्री-<br />दोहा-कतार हा देश ब्रिटीशांच्या जोखडातून नुकताच स्वतंत्र झाला होता. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशांच्या जोखडाखालील हा देश खूपसा मागास होता. किंबहुना ब्रिटीशांनी तो मागासच कसा राहील याचीच काळजी घेतली होती. तेच त्यांच्या मतलबाचे होते. थोडयाफार फरकाने भारताच्या बाबतीत असेच घडले होते. भूगर्भातल्या तेलाने देशाला महामोर संपत्ती मिळवून दिली होती. आता गरज होती ती साधनांची, पायाभूत सुविधांची. यांत स्वकीयांचा (नेटीव्ह) उपयोग तसा नगण्य होता. याचे कारण मागासलेपण तर होतेच पण वेगाने सुरु झालेल्या संपत्तीच्या ओघाने आणि पैसा फेकला की जगात कांहीही विकत घेता हे समजल्या मुळे लोक आळसावले होते. चैन, ऎशोआराम यालाच चटावले होते. मग पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अन्य देशातून तंत्र, तंत्रद्न्य, मनुष्यबळ आयात करणे क्रमप्राप्तच होते. उच्च तंत्रासाठी युरोपीय देश आणि तंत्रद्न्य, कुशल कामगार, मनुष्यबळ या साठी भारत, पाकिस्तान, बांगला देश, अफगाणीस्तान वगैरे आशियाई देश हा तरणोपाय झाला. भारत त्यातले त्यात प्रगत देश म्हणून जरा अधिक महत्व मिळाले. भारतातून केवळ भारवाहू, केवळ कष्टाची कामें करणारे फार कमी गेले. गेले ते कुशल कारागीर. पण मग कष्टाची कामें करणारे मजूर लागणारच. त्या कामासाठी निवड झाली ती धिप्पाड, काटक, अफगाणी पठाणांची, ज्यांची बौद्धिक क्षमता, पातळी अप्रबुद्धच असायची. विनोदाने आपण ’मल्लभेजा’ म्हणतो तसे. या लोकांकडून कामे करून घ्यायची म्हणजे फार अवघड. वृत्तीने अत्यंत रासवट, भडक माथ्याचे, अरेबिक आणि पुश्तु शिवाय भाषा माहिती नाही. त्यातही अरेबिक पेक्षा पुश्तुचाच प्रभाव अधिक. बोलायला लागले की चार सहा अरेबिक शब्दांनंतर पुश्तु सुरू व्हायचे. आधी अरेबिक समजायचीच मारामार त्यात पुश्तु म्हणजे ’कानडीने केला मराठी भ्रतार’ याहून भयंकर. माझे अरेबिक म्हणजे ’व-हाड निघालय लंडनला’ मधल्या बबन्याच्या इंग्रजी सारखं. त्यामुळे अशा पठाणांशी संबंध कधीच येऊ नये अशी मी देवाजवळ प्रार्थना करीत असे. पण देवालाही एखादा ’मिस्ड् कॉल’ गेला असावा आणि एका सुप्रभाती ते संकट दत्त म्हणून् पुढे उभं येऊन ठाकलंच.<br /> आमची कंपनी म्हणजे वर उल्लेख केला त्याप्रमाणे पायाभूत सुविधा उभारणीच्या प्रकल्पातील बांधकामापासून ते वीज-पाणी-वातानुकूलित करणारी संयंत्रे इत्यादि बहुविध सेवा पुरविणारी म्हणजे अगदी इमारतीचा पाया खणण्यापासून ते अगदी न्हाणीघरातील शेवटचा नळ बसवून देण्यापर्यंत सेवा परविणारे अवाढव्य आस्थापन होते. त्यात अनेक निरनिराळे विभाग होते. आपत्कालीन परिस्थीतीत कर्मचा-यांची तातपुरती बदलीही होत् असे. असेंच एकदा मला माझे विहित काम सोडून<br />एका दूरच्या कार्यस्थळावर वीज-वाहिनी (केबल) जमीनेखाली टाकण्याचे काम करणा-या अफगाणी मजूरांच्या जथ्थ्यावर देखरेख करण्याची, त्यांच्याकडून् काम करून घेण्याची कामगिरी सोपवली गेली. त्या कामाचा प्राधिकारी (इनचार्ज) अचानक दुसरीकडे आणि मी त्याच्या जागी अशी योजना झाली. <br /> या नवीन कामगिरीचा भार (चार्ज) मला देणारा प्राधिकारी पाकिस्तानी होता. भरभक्कम शरीरयष्टीच्या आणि अरेबिक, पुश्तु सकट इंग्लीश, फ्रेंच इत्यादि भाषा लीलया बोलू शकणा-या या माणसाने माज्या डाळ-भात्या शरीरप्रकृतीकडे अतीव करुणार्द्र नजरेने पाहात, आस्थापनेच्या अशा बिनडोक निर्णयाबद्धल केवळ ’अफसोस’ या एकाच पण अत्यंत परिणामकार शब्दात नापसंती व्यक्त करीत मला कार्यभार दिला आणि याच्या कांही मौलिक सूचनाही दिल्या. त्याही विलक्षण होत्या. तो म्हणाला,<br /> " हरून, (इथे माझ्या अरुण या नावाचा असा अपभ्रंश झालेला होता) त्या माणसांना माणूस म्हणशील तर खुदाही कदाचित नाराज हॊईल. अगदी राक्षस आहेत ते. तुला नवल वाटेल पण जुन्या इंग्रजी सिनेमात गुलामांना जसें हंटरने मार मारून कामाला लावलेले दाखवलेले असायचे तसें करावे लागते. तू तिथे गेलास की माझ्या टेबलावर तुला एक वेताची काठी दिसेल. ती तुला हातात घेऊनच फिरावे लागेल. तुझ्या हातात ती काठी नसली तर ते कदाचित संधी साधताच तुला मारायलाही कमी करणार नाहीत. परमेश्वर तुझं रक्षण माझ्या मित्रा !" असं म्हणून तो माझा नवा मित्र (!) माझ्या उरांत धडकी भरून गेला. त्या रात्री मी माझ्या पत्नीला जे पत्र लिहिले त्यात हे सारे लिहिले पण सकाळी पत्र फाडून टाकले आणि कामाला निघालो.<br /> कार्यस्थळावर पोहोचलो तर तिथे आमच्या विभागाचा ’मुदीर’ (मॅनेजर) माझ्या आधी हजर झालेला. अदमासे चाळीसेक पठाणांचा जथ्थाही जवळच उभा होता. मुदीर मला कामाचा तपशील इंग्रजीतून् समजाऊन सांगत होता त्यावेळी हे पठाण आमचे संभाषण कुतुहलाने ऐकत होते, आपसात काहीं कुजबुजतही होते हे माझ्या ध्यानात् आले. मुदीरचा वेश, तोकडी तुमान-टीशर्ट असा कांहीसा अमेरिकन वळणाचा होता, भाषेचा लहेज़ाही तशाच वळणाचा होता. <br /> मुदीर त्याचे काम आटोपून ताड्कन् गेला आणि मी ’सीदन्ती मम गात्राणि मुखं च परिशुच्यति’ अशा अवस्थेत त्या आर्यावर्ती महाजनांना सामोरा गेलो. मी कांही शब्द उच्चारायचा क्षणाचाही अवधी न देता त्यापैकी एकान मला पुश्तु भाषेत एक भले मोठे वाक्य ऐकवले. तो माझा परिचय करून घेण्याला उत्सुक असावा, कदाचित तो माझ्या देशाबद्धल कांही विचारीत मला वाटले. कारण त्याच्या बोलण्यात एकदां ताजमहाल असा शब्द आला होता. भारताबाहेरील ताजमहालाबाबतचे कुतुहल मला माहिती होते. जरा संभ्रमित अवस्थेत मी ’ हैवा !’ (होय) असें म्हणून् गेलो मात्र, सगळे पठाण गडबडाटी हसायला लागले. कांहींना हसूं इतके आवरेनासें झाले की ते हात वर करून नाचू लागले. एक नक्की समजलं की त्यांनी माझी मस्त खिल्ली उडवली होती. भांबावून मख्ख उभे राहण्यापलिकडे मी कांही करू शकत नव्हतो. इतक्यात एका उंच माणसाने आपला उजवा हात उंच केला त्यासरशी बटण बंद केल्या नंतर विजेचा सिवा बंद व्हावा तसा तो हास्यकल्लोळ थांबला आनि तो इसम माझ्या रोखाने पुढे सरकला. माझ्या पुढ्यांत उभा ठाकून त्याने सवाल ठोकला,<br /> "अन्ता अमरीकी ?" प्रश्न मला समजला आणि<br /> "लॅ, अना हिन्दी ! " उत्तर निघून गेलं.<br />कां कोणास ठाऊक त्या म्होरक्याच्या चेह-यावर मघाशी कांहीसा तिरस्कार दिसलासा वाटल होता तो निवळल्या सारखा वाटला. किंचितसे स्मित मुद्रेवर उमलवीत त्याने<br /> "अस्सलाम-व-आलेकुम !" म्हणत हस्तालोंदनासाठी हात पुढे केला. ती तेथील सर्वसामान्य प्रथा आहे हे मला माहिती होता आणि <br /> "व-आलेकुम अस्सलाम" म्हणत मी त्याच हात हातात घेतला. त्यावेळी त्या स्पर्षाचा अर्थ मला त्या वेळी समजला नव्हता. तो नंतर कळाला<br /><br />क्रमश:<br /><br />त्यावेळी त्या स्पर्षाचा अर्थ मला समजला नव्हता. तो नंतर कळाला.<br />----------------------------------------------------------------------<br /> त्यानंतर तो माणूस चक्क मला समजेल अशा भाषेत बोलू लागला तेंव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला.<br /> " मुआफ करना रफिक. पठानको अमरीकी बिल्कूल नापसंद. हरामी हमारा मुलुक बरबाद किया. तुम हिन्दी, या हबीबी ! हमारा दोस्त! इंद्रा (इंदिरा गांधी) हमारा दोस्त! मा फिकर." (काळजी करू नको)<br /> जिवात जीव आला. पठाण मोडकं तोडकं कां होईना पण मला समजेल असं उर्दू बोलू शकत होता. त्यांचा अमेरिकेवर राग होता हेही लक्षात आलं. तो स्वाभाविक असावा. कारण आंतराष्ट्रीय राजकारण थोडेफार सामान्यपणे मला महिती होते. महासत्ता बनण्याच्या हव्यासापायी अमेरिकेने इराण. इराक, अफगाणीस्तान अशा अनेक मुस्लिमी देशांत हस्तक्षेप केला होता. त्या कारवाईमुळे तेथील जनतेला नाहक भीषण परिस्थीतीला सामोरे जावे लागले होते. कायमची युद्धसदृष परिस्थिती, अतिरेकी तालिबानींना आधी दिलेले प्रोत्साहन आणि नंतर त्यांचीच झालेली होरपळ हे मी वर्तमानपत्रातून वाचले होते. मी संभाषण वाढवायचं ठरवलं. <br /> " मेरा नाम हरून. इधरका रब्बानी साब दूसरा कामपे गया. अब हम काम देखेगा. तुम हमारी मदद करेगा." नकळत मी त्याचीच भाषा बोलू लागलो.<br /> "लाज़ीम,लाज़ीम रफिक" (अवश्य,अवश्य मित्रा) त्याने मला दिलासा दिला आणि नंतर बाकी पठाणांना संबोधून पुश्तु भाषेत कांहीतरी ओरडला. त्या सरशी तो जथ्था कामाच्या दिशेने सरकू लागला. पण तरीही बरेचसे पठाण मंद गतीने सरकत होते. मागे वळून वळून पाहात होते. आपसात कुजबुजत होते. जमीनीत चर खोदणारी चारचाकी ट्रॅक्टरसारखी यंत्रे सुरु झाली होती. भला मोठा केबलचा रीळ एका यंत्रावर ठेवलेला होता कांही पठाण ते यंत्र चालु करत होते. त्यावर स्वार होत होते. जवळच कार्यस्थळावरचे चाकावरचे कार्यालय होते.(मोबाईल पोर्टा कॅबीन) तिथे जाऊन मला रेडिओ फोनने मुख्यालयाला रिपोर्ट करावयाचा होता. मी त्या दिशेने वळणार इतक्यात असलेला प्यून माझाच दिशेने पळर्त आला आणि रेडिओ वाजत असल्याचे ओरडून सांगू लागला. मी धावतच केबीन गाठली आणि काम सुरु झाल्याची खबर देउ लागलो. ’कांही अडचण तर नाही ना?’ या पुन्हा पुन्हा विचारला गेलेल्या प्रश्नाला माझे ’नाही’ हे उत्तर मुदीरचे समाधान झालेसे वाटले नाही. पण मग ’सध्या तरी कांही समस्या नाही’ असे म्हणालो तेंव्हा रेडिओ बंद झाला. प्यूनने एव्हाना थंड पाणी आणि कॉफीचा कप समोर ठेवलेला होता.<br /> कॉफी संपवून कामाच्या आखणी-आलेखावर(प्रोग्रॅम चार्टवर) नजर टाकू लागलो. तेथील सारी कामे फार सूत्रबद्ध असतात, आलेखाप्रमाणे आमलात आणावीच लागतात. इथे तर काम चार दिवसांनी मागे पडलेले दिसत होते. तो बाजूला सारून मी कामाच्या ठिकाणावर जावे म्हणून केबीनच्या बाहेर पडलो तर मघाचा तो पठाण म्होरक्या समोर हजर आणि तिकडे मंडळी काम सोडून निवांत गप्पा छाटत बसलेली तर कांही शिवाशिवासारखा खेळ खेळण्यात गढलेली. त्या म्होरक्याला मी कांही विचारणार इतक्यात तो तीरासारखा कॅबीन मधे शिरला, टेबलवरील ती वेताची छडी घेऊन त्या कामचुकार कामगारांवर धावत गेला आणि एकेकावर छडीचे वार करू लागला. मी सर्द होऊन पाहातच राहिलो. कांही पठाणांनी आपसात झोंबाझोंबी सुरु केली. मात्र कांही मिनिटातच, तो म्होरक्या पठाण मेंढपाळाने मेंढरं वळावीत असा आरडाओरडा करीत पळापळ करीत पठाण वळित होता आणि काम सुरु झालेलं होतं. सकाळपासून जे कांही पहिलं होतं, अनुभवलं होतं त्याने डोकं गरगरायला लागलं होतं.<br /><br />क्रमश: -<br />आजवरचे संस्कार मनाला फटकारीत होते. मी उद्याही असाच वागणार होतो का?<br />------------------------------------<br /> दुसऱ्या दिवशी कामाची जुपी झाली तेंव्हा कांही पठाण आपसूक कामाला लागले.कांही मात्र अजूनही घोळका करून आपसात बोलत होते. नुरुलही त्यांच्यातच होता. मी नुरुलला हांक मारली. ती काठी माझ्या हातातच होती.आज माझा आवाज जरा करडा झलेला आहे हे माझा ध्यानात आलं. पण मला त्याचा विचार करावासा वाटला नाही. केवळ काम व्यवस्थित झालेले मला पाहायचे होते.<br /> नुरुल समोर येऊन उभा राहिला. मी गरजलो, " हो क्या हो रहा है नुरुल ? तामिली क्यूं हो नही रही ? " नुरुल अधोवदनाने म्हणाला, <br /> " पठान कलकी फसात अफसोस कर रहा है साब." मी म्हणालो, <br />" कोई ज़रूरी नही! फसातकी वज़ह काम मुश्तमाम (बिघडले) हो गया. उसका अफसोस करो. जाव, सबको बोलो कामकी फिकर करो. रेहमत-उल्लाही रहीम !" (जग दयाळू देवाची दया आहे). <br />नुरुल त्या घोळक्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच घोळका कामाच्या ठिकाणाकडे सरकू लागला होता. त्यांना समजले होते की नाही देव जाणे, पण त्यांनी माझे बोलणे बोलणे ऐकले होते. त्याचा मतलबही समजला असावा असें मला वाटले. निदान शेवटचे शब्द तरी समजले असावेत.<br /><br /> टळटळीत उन्हात मी कामाची देखरेख करू लागलो. डोक्यावर फेल्ट हॅट, कमरेला ती काठी तलवारी सारखी खोचलेली. त्या अवतारांत माझा फोटो काढला गेला असता तर करमणूकीला एक विषय झाला असता. मी, केबीन मधे न जाता कामाची पाहाणीच करीत राहण्याचे ठरविलेले होते. <br /> यंत्राच्या साहाय्याने जमीनीत चर खोदायचा, चराच्या तळाशी सीमेंटच्या विटांची ओळ मांडायची, त्यावर केबल ओढून घ्यायची, तिच्यावर आणखी एक विटांचा थर द्यायचा आणि बुलडोझरने वर माती (वाळूच) लोटायची. लोटलेल्या मातीवरून रोलर फिरला की झाले काम. ही सारे एका क्रमाने चालायचची. खोदकाम करणारे यंत्र पुढे चालायचे, त्या मागून केबलचा रीळ असलेली गाडी, तिच्यामागून तळाशी विटा मांडणारे मजूर, मांडलेल्या विटांवर गुरुत्वाकर्षणाने पडत जाणारी केबल, त्यावर दुसरा विटांची ओळ मांडणारे मजूर, त्यानंतर माती ढकलणारा बुलडोझर आणि सरते शेवटी माती दाबणारा रोलर. या क्रमात जराही खंड पडला तरी सारे काम ठप्प व्हायचे. कामचुकार पठाण ही सांखळी खंडित करण्याचा प्रयत्न करीत आणि सारे काम ठप्प झाले की आराम, मौज करीत.<br /> जेवणाच्या सुटीला एक तास रहिला होता इतक्यात केबल सोडणारी/ओढणारी गाडी बंद झाली. चालवणारा इसम मोठ्या मोठ्याने ओरडा करत खाली उतरला. मातीत गडाबडा लोळू लागला. मी त्याच्या पर्यंत पोहोचेपर्यंत गदारोळ झालेला. जो तो पुश्तु भाषेत आरडत होता. गडाबडा लोळणारा मजूर पोटदुखीने विव्हळत होता असे समजले. मी त्याला माझ्या केबीनमधें नेण्याचा हुकूम सोडला. इतक्यात नुरूल माझ्या कानाजवळ " जूठा तमाशा करता है हरामी" असें कांहीसे पुटपुटला. मी साईटवरच्या ट्रक ड्रावव्हरकडे माझा गाडीची चावी फेंकत त्या पोटदुख्या पठाणाला इस्पितळांत घेऊन जायला सांगितेल. आणि ’ चला कामाला लागा परत ’ अशा अर्थाने जोरात ओरडू लागलो. अचानक चेहरा पार उन्हाने करपलेला, आडदांड असा पठाण माझ्यासमोर उभा ठाकला. हातवारे करत तावा तावाने कांहीतरी सांगू लागला. मी चमकून नुरुलकडे पाहिले. नुरुल पुढे येऊन सांगू लागला, त्या पोट दुखी झालेल्या मोईनचा हा भाऊ आहे आणि त्याला इस्पितळात पाठवल्यामुळे तो संतापला आहे. इस्पितळात गेलेल्या माणसाचे नांव मोईन आहे इतके समजले, पण याला कां राग आला ते नाही समजले. पण माझ्या दृष्टीने योग्य वाटले ते मी केले यात मला तरी शंका नव्हती. मला तो वाद नकोच होता. मला काम पूर्ववत चालू कसे होईल याची काळजी होती. पण या गोंधळात जेवणाची सुटी झाली आणि सारा जथ्था ’ हैया हो ’ अशा गर्जना देत ट्रक मधे बसून जेवणासाठी लेबरकँपवर गेला. माझी त्यांनी टर उडवली हे नक्कीच. मोईनची पोटदुखी खोटी होती, काम टाळण्याचा बहाणा होता हे समजलं होतं. मी खजील झलो होतो. मुख्यालयाला हा सारा प्रकार कळवावा आणि काम पुन्हा सुरू होई पर्यंत विसावा घ्यावा म्हणून केबीनकडे वळलो आणि या राक्षसांची कशी जिरवता येईल याचा विचार करू लागलो.<br /><br /> केबिनमध्ये पोहोचतो न पोहोचतो तोंचा रेडिओ फोन घणघणला. फोन रब्बानीचाच होता. कामाची प्रगती विचारत होता. त्याचे बरोबर होते, खरा प्राधिकारी तोच होता. माझी नेमणूक तशी तात्पुरतीच होती. मी काम व्यवस्थित चालले आहे असे सांगितले. कारण त्याच्या विचारण्यात कांही खोच असावी असें वाटून गेले. त्याला लेबरकॅंपवरून कांही खबर लागली असण्याची शक्यता होती. पण त्याचे बोलणे इतर विषयाकडे वळले तसा मी सुस्कारा सोडला. त्या राक्षसांची कशी जिरवता येईल याचा विचार आता मागे पडला. कांहीही करून काम सुरळीत चालणे महत्वाचे होते.<br /> तीन वाजतां कामगारांची गाडी येऊन दाखल झाली तसा मी त्यांना सामोरा गेलो. ते आपापसात बोलत उभेच होते. मी काम सुरू करण्याचा इशारा दिला त्यासरशी तो मोईनचा भाऊ माझ्या पुढ्यात येऊन गरजला,<br /> " क्या काम करेगा ? मकिना क्या तेरा बाप चलाएगा ?" <br /> (म्हणजे यालाही उर्दू येत होते) त्यासरशी नुरूल त्याच्यावर धांवला. बाकी पठाणांमधे हंशा पिकला होता. मी नुरूलला हातानेच शांत रहाण्याचा इशारा केला. शांतपणे त्या पठाणाच्या पुढ्यात जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो,<br /> " मकिना तेरा बाप चलाएगा! बर्रा (चालता हो)! जाव अपना काम शुरू करो" असें म्हणुन मी त्या यंत्राच्या दिशेने सरकलो. आता मी कुणाकडे पाहातही नव्हतो. सरळ त्या यंत्रावर चढलो, चालकाच्या जागेवर बसलो आणि यंत्र चालू केले. मगच वर पाहिले. भयचकित झालेले पठाण लगबगीने कामाला लागत होते. तो पर्यंत मी त्या यंत्राच्या आवश्यक त्या कळा दाबून ते मला नीट चालावता येते की नाही याची खातरजमा करून घेतली. त्या सायंकाळी अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्याने तोपर्यंत बिनबोभाट काम झालेले पाहिले.<br /> काम संपवून लेबरकँपवर जाण्यासाठी गाडीवर चढण्यापूर्वी तो उग्र पठाण पुन्हा माझ्यासमोर ठाकला आणि म्हणाला,<br /> "याद रक्खो, तुम पठानका बच्चाका चालीन किया. कल देखेगा. तुम क्या साबूत रहेगा और क्या काम करेगा. खुदा हाफीज़ !" <br />पण मी इतका थकलो होतो की तो नक्की काय म्हणाला त्याचे आकलन होण्या पलिकडे गेलो होतो.<br /> <br /> ते मला उद्या कळणार होते. ' चालीन ' म्हणजे काय तेंही समजणार होते.<br /><br />क्रमश:<br />--------------------------------------------<br />तो पठाण जे कांही काल म्हणाला होता त्यात एक ’ साबूत ’ असा शब्द होता त्याचा अर्थ मात्र सकाळी माझ्या चांगलाच लक्षात आला. साबूत म्हणजे शाबूत असें असावे. आज मी खरोखरच शाबूत नव्हतो. काल दिवसभर भर उन्हांत धावपळ केली त्याचा जबरदस्त शीण आलेला होता. अंगात थोडी कणकण तर होतीच पण माझे दोन्ही खांदे, दंड,बाहू आणि मान-पाठ कमालीची ठणकत होती. ते अवजड वाहन चालविण्याचा सराव असण्याचे कांही कारण नव्हते त्यामुळे पहिल्यांदाच जोर-बैठका काढणाऱ्याची जशी व्हावी तशी अवस्था झाली होती. चेराही उन्हाने किंचित रापला होत हे आरसा सांगत होता. मी न्याहरी बरोबर दोन वेदना शामक गोळ्या घेतल्या अन् कामावर गेलो. पांच मिनिटे उशीरच झाला होता.<br /><br />पठाणांचा जथ्था माझ्या स्वागताला उभाच होता. तो कालचा पठाण सामोरा आलाच." कैफ हालुक मुदीर ?" चेह-यावर एक प्रकारचे छ्द्मी हास्य ठेवीत त्याने विचारले." झैन ! अल हमदुल्लिलाह " मी कोणताही कडवटपणा न ठेवता म्हणालो."वल्लाह ! अस्सलाम-व-आलेकुम !" तो. त्याचा संस्कार जागा झाला असावा.<br /><br />" व-आलेकुम अस्सलाम. लेकिन तुम अपना नाम नही बोला !" या माझ्या वाक्यासरशी <br />" हम कादर खान ! " तो उत्तरला. त्याच्या चेहऱ्यावर एक दिलखुलास हास्य पसरलेले दिसले. कालच्यापेक्षा आजचा दिवस कमी कटकटीचा असावा याची ती नांदी आहे की काय असे मला वाटून गेले. मी संभाषण पुढे चालू ठेवले. <br />'' कादरखान, कल हमने पाठानका बच्चाको चालीन किया ऐसा तुम बोला. वो चालीन का मतलब ?'' <br />''चालीन का मतलब.....मतलब....'' तोही घुटमळलाच. मग मलाच सुचलं;<br />''चॅलेंज ??''<br />''वल्लाह ! दुरुस्त. एकदम दुरुस्त.'' त्याच्या या उत्तरासरशी कांही पठाण एकाएकी <br />फेर धरून नाचू लागले. मला एक शब्दही न कळणाऱ्या भाषेत गाऊ लागले.<br />एका एकी हे काय चालले आहे? मी हबकूनच गेलो. <br />हा काय प्रकार आहे, मी नुरूलला विचारले. तो हसत सांगू लागला, कादरखान मला धडा शिकवण्याचा चंग बांधून आला होता. सुरुवातच तो मारामारीने करणार होता. पण देव दयेने ती वेळ आली नव्हती. सुरुवात छान संवादाने झाली होती आणि कादरखान निवळला होता. राक्षसातील माणूस जागा झाला होता. मारामारी झाली तर ती कांही जणांना नको होती. ती झालेलीही नव्हती. त्यामुळे तो गट आता सुखावला होता. अशा वेळी आनंदाने गाण्याची, नाचण्याची त्यांची ती प्रथा होती.<br /><br />मी अनेक प्रकारच्या माणसांत वावरलो. अनेक चित्रविचित्र अनुभव घेत गेलो. त्यांत ही आणखी एक भर. या माणसांना मी गुलामा सारखे वागवावे असा मला सल्ला देण्यात आला होता. तसेंच वागावे लागते की काय अशी परिस्थितीही समोर आली. पण कुठे तरी आंत, माणसाला माणूस म्हणूनच वागवले पाहिजे अशी शिकवण होती. म्हणून मला माणसांबद्धल कणव होती. किंवा मला या पठाणांची दहशत वाटत होती. म्हणून मी सामाचा मार्ग चालू पाहात होतो. एक मात्र निश्चित होते. ते म्हणजे माझ्यावर सोपविलेले काम मला व्यवस्थित झालेले पहायचे होते. मला दिलेले काम मी नीट करू शकलो नाही असे यापूर्वी कधी झालेले नव्हते आणि आताही तसें व्हायला नको होते.<br /><br />साईटवर कामाची सुरुवात झाली होती. केबलच्या यंत्रावर स्वत: कादरखान बसला होता.<br />याचे मला आश्चर्य वाटले नाही. मी तिथे येण्याच्या आधी फार पूर्वीपासून काम चालू होते. कादरखानच काय पण आणखीही चार सहा जणांना ती सगळीच्या सगळी यंत्रे चालवता येत असणारच. <br />’अथा तो ब्रह्मजिद्न्यासा’ हे काय फक्त हिन्दुस्थानीच म्हणू शकतात काय? <br />प्रत्येक काम मला आलेच पाहिजे हा अट्टाहास करणारा मी काय एकटाच असूं शकतो काय?<br /><br />मी केबीनमधे जाऊन किती काम झाले, किती बाकी आहे याची उजळणी करून घेतली आणि सरळ कादरखान जवळ जाऊन बसलो. आजवर कोणी अधिकारी असा काम करणाऱ्याजवळ बसला नसावा. तो आधी थोडा संकोचला पण नंतर सैलावला. मग<br />'' यल्ला! यल्ला !! रफिक. यल्ला, जल्दी, जल्दी !'' असे इतर कामगारांवर ओरडून<br />कामाला चेव आणू लागला. माझ्याशी गप्पा मारू लागला. मी मोईनची कांहीच खबरबात घेतलेली नव्हती. पण त्याने घेतलेली होती. सांगू लागला तो त्याचा सावत्र भाऊ होता. त्याने काल नाटक केले होते. पण त्याला खरेंच पोटदुखीचा त्रास होता. दवाखान्यात जाण्याची परवानगी अनेकदां मागितली होती पण दिली गेलेली नव्हती. पठाण माणूस म्हणून वागवले जात नव्हते आणि म्हणून ते माणसांसारखे वागत नव्हते. हे दुष्टचक्र संपणार की नाही, हा त्याचा प्रश्न होता.<br /><br />हे असे सुखेनेव चालले काम साधारण चाललेले काम पुन्हा अचानक थांबले तेंव्हा<br />जेवण्याच्या सुटीला जेमतेम एक तासच उरला होता. कालही काम याच वेळी बंद झाले होते. हा काय प्रकार आहे. यंत्र बंद करून मी आणि कादर खाली उतरून पहातो तो,<br />दूरवर, बुलडोझरपाशी पठाणांच्या दोन गटांत तुंबळ मारामारी लागलेली. एकाने दुसऱ्याची कांही खोडी काढली होती आणि मस्करीची कुस्करी झाली होती. प्रकरण नुसतेच हातघाई वर आलेले नव्हते तर दोन चार जण चांगले रक्तबंबाळ झाले होते.<br />मला आता मात्र वैताग आला. उद्वेगाने मी केबीनकडे कूच केले आणि हे असें याच वेळेला कां होते याच विचार करू लागलो. <br /><br />कदाचित या वेळेला ऊन इतके तापते त्या मुळे माणसे प्रक्षोभक होत असावीत. कामाची वेळ थोडी बदलता येइल कां? सकाळी सहा वाजता काम सुरु केले तर कांही फायदा होईल का? मी कामाचा आंखणी-आलेख आणि झालेले काम पडताळून पाहिले. कामाच्या वेगात थोडी सुधारणा होती पण एकुणात काम मागेच होते. मी मुख्यालयाशी बोललो. पण कामाच्या वेळेत बदल करण्याची परवानगी मिळाली नाही.<br /><br />दरम्यान कामगार जेवणाची सुटी संपवून परत कामावर आलेले होते. मी नुरुलखानला, त्याच्या जागी आणि कादरखानच्या जागी दुसरी माणसे लावून, आणखी दोन शहाणी माणसे घेऊन केबीनमध्ये येण्यास सांगितले. थोड्याच वेळात खरोखर चार डोकी केबीनमध्ये हजर झाली. जणू मी एक लहानशी बैठक घेत होतो.<br /><br />सगळ्यात आधी मी त्यांचे काम छान चालले आहे, मला कांही तक्रार नाही असे <br />सांगून एकूण कामाची व्याप्ती, झालेले काम आणि राहिलेले काम याची माहिती दिली. उरलेले काम किती दिवसांत पूर्ण व्हायला पाहिजे हेही विषद केले आणि काय करता येईल या बाबत त्यांचेपाशी कांही सूचना असतील तर त्या द्याव्यात अशी विनंती केली. हा सारा प्रकार त्यांना नवीन होता. योजना प्रक्रियेत त्यांच्या सारख्या मजूरांनाही सहभागी करण्यात येत आहे याचे त्यांना नवल वाटत होते आणि कौतुकही.<br />कांही मिनिटे त्यांनी खालच्या आवाजात पुश्तुमधे कांही चर्चा केली ती मला समजली नाही. मात्र सरते शेवटी कादरखान म्हणाला,<br />"इन्शा अल्लाह, एक तरकीब हो सकती है. लेकीन हम सोचेगा. कबिलाके साथ बात करेगा. कल बताएगा. झैन ?''<br />मी म्हणालो<br /> "झैन !" चालेल.<br />नियोजन प्रक्रियेत कामगार प्रतिनीधींना सहभागी करून घेण्याचा हा माझा मार्ग मला पुरोगामी वाटला तरी त्याचे परिणाम काय होतील याचा तो पर्यंत तरी मी नीट विचार केलेला नव्हता.<br /><br />आता कादरखान उद्या काय ’तरकीब’ सुचवतो ते पहायचे होते.<br /><br />ते मला उद्या कळणार होते.<br />------------------------------------------------------------------------<br />कुणाचाही सल्ला, कुणाचीही परवानगी न घेता मी एक नवा प्रयोग करूं पहात होतो. यशस्वी झालो तर प्रशंसा होईलच याची शाश्वती नव्हती. नव्हे तशी शक्यताही क्षीणच होती. मात्र अपयशी ठरलो तर मात्र धडगत नव्ह्ती. कदाचित परत मायदेशी धाडला जाण्याचीच शक्यता अधिक. कारण प्रस्थापित कार्यप्रणाली बदलण्याचे धाडस ज्यांनी पूर्वी केले त्यांची गत काय झाली होती हे मला माहित होते. पण वांडपणा करण्याची खोड जन्मजात होती त्याला मी तरी काय करणार.<br /><br />त्यानंतरच्या सकाळी मी कामावर दाखल झालो तेंव्हा ही अशी चलबिचल, काहूर मनांत घेऊनच. कादरखान मनात काहीं तरकीब घेऊन आला होता हे मला त्याच्या उजळलेल्या चर्येवरून दिसत होते. पण मात्र चर्चेसाठींसुद्धा एक मिनिटही वाया घालवण्याची माझी तयारी नव्हती. सर्वांना मी आधी कामाला लागण्याचा आदेश दिला. कादरखान तेवढ्यातही मला कांही सांगू पहात होता. पण मी त्याला ’शुई सबर’ (जरा थांब) असा इशारा दिला. सगळ्या जथ्थ्यामधे ती चर्चा झालीही असावी. कारण उत्सुकतेची अस्फुट रेषा मला जवळ जवळ प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होती. मी पण मी कामाचाच 'यल्गार' केला आणि सारे बिनबोभाट कामाला लागलेही. आज मी या टोकापासून त्या टोकापर्यंत पळापळ करून कामावर देखरेख करणे पसंत केले. आज कुणी कालच्यासारखी गडबड करू धजावला तर त्याला वेळीच खीळ घालण्याचा माझा अंतस्थ हेतू होता. ठीक अकरा वाजतां (बरोबर जेवणाच्या एक तास आधी)मी काम बंद करण्याचा इशारा दिला. सारा जथ्था अचंभ्यात आणि मी, तोपर्यंत एकही मिनिट वाया न घालवता, जितके काम व्हायला हवे होते ते झालेले आहे या समाधानात! <br /><br />कांही कामगार इकडे तिकडे पांगले. मात्र कादरखान, नुरुलखान आणि आणखी साताठ जण घोळका करून, दबक्या आवाजात चर्चा करीत उभे. त्यांना केबीनकडे येण्याचा इशारा देऊन मीही केबीन कडे वळालो. कालचे चार आणि आज अधिक दोघेजण असे सहाजण केबीनमधे आले. सर्व प्रथम मी शीत्कपाटातून एक पाण्याची बाटली काढून त्यांच्या रोखाने भिरकावली आणि दुसरी घेऊन मी खुर्चीत बसलो. माझी आणि सगळ्यांचे पाणी पिऊन झाल्यावर,<br />'' हां, बोलो खान '' म्हणत मी सुरुवात केली.<br />'' साब, धूपका बहोत तकलीफ. एक तरकीब ये के सुबह येक घंटा जल्दी छूटेगा. जो (जैसे) आज छूटा.. और शामको येक घंटा जियादा काम कुबूल.''<br />म्हणजे उन्हाचा त्रास होतो हा माझा अंदाज बरोबर होता.<br />'' लेकिन खान, ये नामुमकीन. मुदीर नही मानेगा. मकतब (मुख्यालय) नही मनेगा.''<br />'' तो फिर येक बाकल कम करो '' बाकल म्हणजे (ब्लॉक) सीमेंटच्या विटा.<br />'' मतलब? हम समझा नही !''<br />'' साब, जमीं कुल्लुश सखत. नीचे बाकल लाज़मी नही''<br /><br />जमीन कडक असल्याने केबल खालील विटांची गरज नाही. असं त्याला म्हणायचं होतं. बरोबर आहे. ते काम कमी झालं तर वेळ वाचणार होता आणि एकूण कामाची गती वाढण्यासारखी होती. पण हा निर्णय मी कसा घेणार ? कामाची प्रमाणें (स्पेसीफिकेशन्स) बदलणे माझ्या अधिकारांत येत नव्हते. मी म्हणालो,<br />'' खान, येभी नामुमकीन. तुमको मालूम, ये सब गोरा (ब्रिटिश डिझायनर) मख्ररूर किया. हम के करेगा.''<br />'' साब ये सब पहले नही होता. रब्बानी चालु किया. ''<br />'' लेकिन ये सब यूं नही हो सकता. कागज़, फतुरा देखना होगा. हम दरख्हास्त करेगा. लेकिन तबतक तुम्हारा पहला तरकीब हो सकता.''<br />'' तो करो. हम तैयार. '' 'तो करो' म्हणण्याची त्याची लकब माजेशीर होती.<br />'' लेकिन मुदीरके साथ बात करना लाज़मीं है.''<br />'' तो करो.''<br />ते सगळे जेवणासाठी लेबरकॅंपकडे रवाना झाले. विटांचा तळाचा एक थर गाळणे हा उपाय मंजूर होण्या सारखा नव्हताच. कामाच्या वेळा बदलणे याचा विचार करणे शक्य होते. पण मुख्यालयाच्या गळी ही गोष्ट उतरवायची तर समक्ष जाणे गरजेचे होते. फोनवर बोलणे औधत्त्याचे मानले जाण्याची शक्यताच अधिक. मी मुख्यालयाला फोन करून अडचणीची त्रोटक कल्पना दिली आणि भेटीची वेळ मागितली. ते लगेच या म्हणाले. एव्हाना दोन वाजले होते. तीन वाजतां पठाण परत कामावर येणार आणि मी जागेवर नाही हे पाहून मौज मस्तीच करणार. कारण मी तीनच्या आंत परत येणे शक्यच नव्हते. <br />क्षणभर विचार केला, गाडी काढली आणि सरळ लेबरकँप गाठला. मी तिथे पोहचलो तों पठाण गाडीत (ट्रक) चढतच होते. मला पाहिल्याबरोबर जे खाली होते त्यांनी माझ्याभोवती कोंडाळे केले. हा बाबा असा इथे कसा उपटला याचे नवल प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होते. कादरखान गाडीजवळ आलाच. मी मुख्यालयाशी बोलून परत येत आहे तोपर्यंत काम चालूच राहिले पाहिजे; ती जबाबदारी त्याची. असे बजाऊन मी मुख्यालयाकडे मोहरा वळवला. मुख्यालयात सर्वप्रथम मी साईट सोडून आलो त्याबद्धल खरडपट्टी झाली.<br /><br /> माझ्या आखातातील वास्तव्यात मी एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली होती. अधिकारी सहसा ब्रिटिश असत आणि आम्हां भारतीयांना झापायची, तासायची एकही संधी ते सोडीत नसत. मग कर्तृत्वाच्या नावाने ते स्वत: शून्य कां असेनात. हे देश एकेकाळी त्यांच्या वसाहतीत, त्यांच्या अधिपत्त्याखाली होते. पुढे इतका अवाढव्य व्याप सांभाळणे अशक्य झाले आणि भारतापाठोपाठ बहुतेक वसाहतीत स्वतंत्र्याचे वारे वाहू लागले. त्यामुळे या देशांना स्वायत्तता द्यावीच लागली. तरी पराभवाचा तो सल प्रत्येक गोरा मनांत ठेऊन असे. भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात आपले प्रभुत्व दाखवले होत. सिद्ध केले होते म्हणून ते जरा वचकून होते. पण एखादा कमकुवत दुवा दिसला की ते ’ब्लडी इंडियन, ब्लडी निग्गर्स’ म्हणून हेटाळणी करण्यात भूषण मानीत.<br /><br />मुख्यालयातील चर्चा असफलच झाली. स्पेसीफिकेशनमधे तळाचा विटांचा थर पूर्वी नव्हता पण रब्बानीने, केबलला मातीत खाली झोळ (सॅग) अशी भलतीच भीती घालून ती सुधारणा आमलांत आणून शेखी मिरवलेली होती. हे तो स्टीव्ह मेकॅन्झी नावाचा गोरा मान्य करत होता पण मला पूर्ववत बदल करूं द्यायला तयार नव्हता. कामाच्या वेळेत बदल करण्याची मुभाही नाकारण्यात आली.उलट काम वेळेत पूर्ण झाले नाही तर गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली गेली. निराश मनाने मी साईटवर परतलो. वाटेत साईटवर तरी काय उजेड (!) पडला असेल या चिंतेत होतो. <br /><br />साईटवर पोहोचतो आणि पाहातो तो काय !<br /><br />क्रमशः<br /> साईटवर पोहोचलो आणि पाहातो तो काय !<br />-------------------------------------<br /> तसा काम संपायला अजून अर्धा तास बाकी होता. कामगार कामाच्या जागेवर होते. सकाळच्या मानाने काम बरेच पुढे सरकलेलेही दिसत होते. पण जेथपर्यंत काम सरकलेले होते त्या टोकापाशी कामगारांचा घोळका एकत्र जमा झालेला होता. काय असावे म्हणून मी माझी गाडी तशीच पुढे त्या ठिकाणा पाशी नेली आणि खाली उतरलो. खोदलेलेल्या चराच्या टोकाला खोदणी यंत्र स्तब्ध उभे. त्याच्या अलिकडे चराच्या दोन्ही तीरावर पठाणांचा घोळका विभागून उभा आणि त्यांची आपसांत काही तरी चर्चा चाललेली. मी पुढे झालो त्यासरशी कांही पठाण मला वाट करून देत बाजूला सरकले. खोदलेल्या चराच्या तळाकडें निर्देश करत त्यानी जें कांही दाखविले ते भयचकित करणारे होते. तिथे एक तुटलेला आणि विस्कळित अवस्थेतला मानवी हाडांचा सांपळा विखरून पडलेला होता. हाडांवरचे मांस जवळ जवळ झडून गेलेले. खोदकामाच्या यंत्राच्या फाळाला लागून ते अवशेष जरासे वर आलेले.ज्यांची संभावना एरवी राक्षस म्हणून व्हायची ते सारे पठाण म्लान मुद्रेने उभे.<br /><br /> मी आधी सगळ्यांना जरा दूर् एका जागी व्हायला सांगितले. एकजण काय़ झाले ते मला विषद करण्यासाठी जरासा पुढे सरकला. मी त्याला हाताच्या इशा़ऱ्यानेच थांबवले. सूर्य मावळतीला अजून बराच वर होता. सेनापती सैन्याच्या तुकडीला सुचना देण्यासाठी जसा संमुख होतो तसा मी त्यांच्या समोर सूचना वजा भाषण देण्यासाठी उभा राहिलो. <br /><br /> " दोस्तो, एक अज़ीबो-गरीब हकीकत सामने आयी है. कोई तूफान परश्त इन्सानकी ज़मीनमें गढी हुई लाश या लाशके हिस्से हम देख रहे है. ऐसे रेगिस्तानमें ऐसा हादसा कोई नयी बात नही है. जो हालात, इन्शाल्ला, सामने आये है, उसको वाज़िब अंजाम दें ये हमारा फर्ज़ ....." माझे बोलणे मध्येच तोडत एक पठाण ओरडला,<br /><br /> " लेकिन हम क्युं मुरदाफरोशी करे ? क्या पता कौनसी कौमका है बदनसीब. क्या अंजाम देगा इसको. और ये काम हमारा नही. तुम शुरताको (पोलीस) खबर करो. "<br /> <br /> मी भानावर आलो. देवाशपथ, त्या पठाणानाने मला एका नव्या संकटातून वाचवले होते. मी भलअत्याच् उत्साहात त्या अवशेषांचे दफन किंवा अन्य कांही वासलात लावण्याच्या विचारात होतो. कायदेशीर बाबीचा मला विसर कसा पडला याचे माझे मलाच आश्चर्य वाटू लागले. तो पर्यंत सुटीची वेळही झाली होती. पठाण आपसुक त्यांना नेणा-या गाडीकडे परतले आणि मी माझ्या केबीनकडे. मात्र कादरखान आणि नुरुलखानला मी मागे ठेऊन धेतले. पोलिसांना खबर करण्यासाठी मी रेडिओ फोन सुरु करणार इतक्यात कादरखानने भिवया उंचावत पृच्छा केली,<br /> <br /> " शुरताको फुन करेगा ?" मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.<br /> ".........."<br /> " लॅ. मकतबको (मुख्यालयाला) इतिल्ला करो "<br /> <br /> अरे, किती खरं होतं ते. कां मी इतका भांबावलो होतो ? की अशा मूलभूत चुका होताहेत हे ध्यानातच आलं नव्हतं? किती खरं होतं कादरखानचं बोलणं. मी कोण पोलिसाना खबर देणारा ? ती जबाबदारी माझी नक्कीच नव्हती. ही साईट, ही जागा कंपनीच्या अखत्यारीतली होती. या जागेच्या आवारात अशी कांही घटना झाली तर कायदेशीर बाबींची पूर्तता करणे ही कंपनीची जबाबदारी होती. माझी नव्हे. किती योग्य सल्ला दिला होता त्याने. आणि आम्ही या लोकांना अडाणी समजत होतो. सारासार विचार करण्याची पात्रता आणि सुयोग्य निर्णय घेण्याची क्षमता काय केवळ पुस्तकी शिक्षणानेच येते कां! कादरखानचा सल्ला मला मनोमन पटला. मी मुख्यालयाला फोन लावला. आज जुम्मेरात (गुरुवार), उद्या शुक्रवारची साप्ताहिक सुटी, त्यातून आता संध्याकाळ म्हणजे मुख्यालयात कुणी असेल की नाही शंकाच होती. तरीही अगदी योग्य माणूस फोनवर मिळाला. तो म्हणजे कंपनीचे सर्व विधी-व्यवहार (लीगल मॅटर्स) सांभाळणारा अधिकारी, हुसैनी! हुसैनी पूर्वी पोलिसातच होता. त्याला झालेली घटना सांगितली. तो म्हणाला निश्चिंतपणे घरी जा मी उद्या पहातो काय ते. माझा जीव भांड्यात पडला. कादरखान जर तेंव्हा तिथे नसता तर मी भलतीच बिलामत अंगावर घेतली असती हे नक्की. <br /> माझे आणि हुसैनीचे झालेले बोलणे मी कादरखानला सांगितले तेंव्हा त्याच्याही चेह-यावर समाधान दिसले. हा एक विषय मार्गी लागला तसा त्याने मुख्यालयात काय झाले याची विचारणा केलीच. मी जे झाले ते सांगताच तो म्हणाला,<br /> " मा फिकर. कुच सोचेगा. परसो बताएगा "<br /> " क्या करेगा खान? काम तो होना दूर यहाँ मुसीबतेंही खडी हो रही है"<br /> " तो क्या मायूस बैठेगा? खान कुच ना कुच करेगा. चलो बेत रो (घरी चला)"<br /><br /> एव्हाना चांगलं अंधारून आलेलं होतं. मी दोन्ही खान माझ्या गाडीत घेऊन शहराकडे निघलो. त्यांना कामगार-तळावर (लेबर कॅंप) सोडून घरी जाणार होतो. पण त्यांना सोडल्यावर खान जाऊ देई ना. थोडा पहुणचार घ्या. निदान सरबत तरी घ्या म्हणून हटून बसला. म्हणाला, <br /> <br /> "वै (अहो) पठानका मेहमान लाखिदमत (पाहुणचार न घेता) जा नहीं सकता. जाएगा तो बिरादरी हमपर थूकेगा "<br /><br /> मी थक्क झालो. आणि आम्ही यांना जंगली, राक्षस समजत होतो. त्यांनाही संस्कृती असू शकते आणि तिचा त्यांना अभिमानही असूं शकतो याचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. माणसाला माणूस म्हणूनच वागवले पाहिजे अशी शिकवण होती, म्हणून मला माणसांबद्धल कणव होती की मला या पठाणांची दहशत वाटत होती. म्हणून मी सामाचा मार्ग चालू पाहात होतो. ही माणसे अडाणी आहेत हे दिसत होतेच. अफगाणीस्तानातील युद्धांमुळे, तालीबानी चळवळीची सुरुवात असली तरी, त्यांनी केलेली नासधूस, जनतेची झालेली ससेहोलपट मी टीव्हीवर, डॉक्युमेंटरीतून पाहिली होती. मुळात हा समाज मूलतत्ववादी, कर्मठ असला तरी ही माणसे बदलत्या, पुढारलेल्या जगाबरोबर कां चालत नाहीत? त्यांनाच इच्छा नाही की सत्तेवरील राजवट अशा सुधारणा घडूच देत नाही? या माणसांना असे रासवट वागण्यातच मौज वाटते की काय? ही खरीच राक्षसें आहेत कां? या माझ्या चिंतनाला इथे छेद जात होता. मी सरबत घेण्याचे मान्य केले तेंव्हा त्यांना झालेला आनंद पाहिला तो मी कधीच विसरू शकणार नव्हतो.<br /> सरबत घेऊन झाले तर खान जेवून जा म्हणून आग्रह करू लागला. त्याला मात्र मी शक्य तितक्या नम्रपणे नकार दिला. खरी भीती निराळीच होती. मी शाकाहारी माणूस. ते मांसाहारा शिवाय दुसरं काही खात नाही असं ऐकलेलं. पण खानानं माझ्या मनांतली ती भीतीही हेरली असावी.म्हणाला,<br /> " कोई बात नहीं हुजूर. कलकी दावत कुबूल करो. साग-खबूस (भाजी-भाकरी) खिलाएगा. कल जुम्मा. शामको तुम्हारा इंतजार रहेगा."<br /><br /> तिथून सुटका झाली याचंच हायसं वाटून घेत मी गाडी सुरूं केली. खरंच मी उद्या त्यांच्याकडे जेवायला जाणार होतो कां?<br /><br />क्रमशः<br />तिथून सुटका झाली याचंच हायसं वाटून घेत मी गाडी सुरूं केली. खरंच मी उद्या त्यांच्याकडे जेवायला जाणार होतो कां?-------------------------------------------------------- <br /><br />शुक्रवार उजाडला. <br /><br />जाग आली तेंव्हा सकाळचे आठ वाजत आले होते.पण खिडकी बाहेर, माध्यान्ही असांवे तसें लख्ख ऊन पडलेले. सुटीच दिवस म्हणायचा पण दैनिक कामांप्रमाणे साप्ताहिक कामे करावी लागत ती वाट पाहात होती. आस्थापनेकडून निवासा साठीं दोघांत मिळून एक अशी सदनिका दिली गेली होती. प्रत्येकी एक स्वतंत्र स्वयंपूर्ण शयनखोली, अभ्यागत कक्ष आणि भटारखाना मात्र सामाईक. माझा सहनिवासी एक केरळी होता. माझे त्याच्याशी कधी पटलें नाही. जरा सणकीच होती वल्ली. सुटीच्या दिवशी भल्या सकाळी स्वारी त्याच्या इतर ज्ञातीबांधवांकडे निघून जायची, ती रात्री उशीराच परतायची. त्यामुळे घरी मी एकटाच. साप्ताहिक कामें म्हणजे निर्वातक-झाडूने घर साफ करणे, आठवडाभ्रर मळवलेले कपडे धुलईयंत्रातून खंगाळून काढणे मग न्याहरी आणि त्यानंतर निवांत अंघोळ. पण आज झडझडून कामाला लागावे असें वाटत नव्हते. <br /><br />पठाणांचे सेनापतित्व स्वीकरल्यापासून झालेल्या शारिरीक आणि मानसिक श्रमाने गळाठा आल्यासारखे झाले होते. पण दूरध्वनीची घंटा घणघणली तसा पांघरूण भिरकावत उठावेच लागले. कोण तडमडला आता, म्हणत फोन घेतला तर दोनच शब्द ऐकायला आलेले. " येऊ कां? " लहान पणी आजीकडून भुताच्या गोष्टी ऐकतांना त्यातले एखादे भूत असेंच विचारायचे. त्यावेळी आजी खर्जातला असा कांही आवाज काढायची की काळजाचा एक ठोका चुकलाच म्हणून समजा. हा आवाजही तसाच होता. पण टरकी बिरकी वाटण्यातला नव्हता. उलट आज तरी वैतागायला लावणारा होता. " ये " म्हणण्याखेरीज गत्यंतर नव्हते. तो आवाज वश्या डोंगर-याचा होता.<br /><br />लौकिकात या आसामीला वसंत गडकरी असें नामाभिमान होते. तो एकटाच येणार नव्हता सगळी ’परदेशस्थ सडेफटिंग युनियन’ माझ्याकडे धुडगूस घालायला येणार होती. वश्या त्या युनियनचा आद्य प्रवर्तक होता. त्याचं काय झालं की मी नवीनच जेंव्हा या देशांत आलो तेंव्हा फार हुरहुरल्यासारखं (होमसिक) झालं होतं. जागा, वातावरण, माणसे सगळंच नवीन. मुलांची, पत्नीची, घराची आठवण सतत मनांत जागती असायची. कुठून ही परदेशी येण्याचे अवदसा आठवली असं वाटत रहायचं. एकतरी मराठी माणूस बोलाचालायला मिळावा असं वाटायला लागलं. मी जरा तशी चौकशी केली तर एका केरळ्याने एका नॅशनल हॉटेल नावाच्या जागेचा पत्ता दिला.<br /><br />परदेशस्थ भारतीयांचे एकमेकांची भेंट घेण्याची ते एक मेलनस्थळ (त्या केरळ्याच्या शब्दांत ’रान्देवू’) होते. एका शुक्रवारी मी अधिरतेने तिथे गेलो तर, एका रस्त्याला दोन फांटे फुटून इंग्रजी वाय आकारात झालेल्या रस्त्यांच्या बेचकीत एक टपरीवजा हॉटेल आणि त्याच्या बाहेर अनेक माणसें घोलक्या घोळक्याने गप्पा छाटीत उभी असलेली. मी जत्रेत चुकलेल्या माणसासारखा उगीचच इकडून तिकडे भटकू लागलो. इतक्यात, " काय मुंबईकर कधी आल्ले कतारले ?’ असा एक घणाघाती वैदर्भीय आवाज कानावर आदळला. आवाजाचा उगम, सदरा-तुमानीत बळेंच कोंबून बसवलेली असावी अशी एक देहयष्टी होती. मी मुंबईकर आहे हे या सदगृहस्थाला कसे कळाले असावे हा प्रश्न मला पडला पण भांबावण्या पलिकडे माझी दुसरी कोणतीही अवस्था होणे शक्य नव्हते. आणि मग ’ या इकडे ’ म्हणत त्या इसमाने माझा हातच धरला आणि एका घोळक्याकडे घेऊन गेला. <br /><br />जवळपास माझ्याच वयाचे सहा सात तरूण गप्पा मारीत उभे होते. आम्ही जवळ जातांच एकाने विचारले, " काय गडकरी, पाहुणे कोण ?" " जांवय शोधायले आल्ले. पोट्टीये थ्यांची लग्नाची, करतोस ?" आणि त्यापाठोपाठ एक हास्यक्ल्लोळ. (इथे मला पुलंच्या रावसाहेबांसारखं ’हांग अस्सं’ असं ओरडावसं वाटलं) आपली नाडी, गण, गोत्र, प्रवर इथे बरोबर जुळणार याची खात्री झाली. पण मग विनोदाचा तास संपला आणि रितसर ओळखीचा कार्यक्रम झाला. पुढें अनेकदा नॅशनलपाशी गांठीभेटी आणि मग माझे निवासस्थान शुक्रवारी सहसा रिकामे असतें म्हणून ’अड्डा’ इथे जमायला लागला. त्यांतही त्यांनी सामग्री आणायची आणि पाकसिद्धी मी करायची असा कबुलिनामा होता. कारण त्यातले त्यांत सुगरणीचा स्वयंपाक मीच करू शकत होतो. <br /><br />त्या जमावात नागपूरचा हा वश्या-वसंत गडकरी (त्याच्या आकारमानामुळे त्याला ’डोंग-या’ ही संज्ञा लाभलेली होती) होता, सोलापूरचा किशा-किशोर करपे होता, कुडाळचा पेशवा-माधव महाबळ होता, मुंबईचा श-या-शरद गांगल आणि कोण कोण होते. आता सगळी नांवे आठवतही नाहीत. पण त्या मित्र मंडळीनी मला जें कांही दिलं त्या आधारावरच मी तो तीन वर्षांचा वनवास सुखेनेव भोगला हे मात्र नक्की. एक एक करत अड्ड्याचा कोरम पूर्ण झाला. मी किती दमलो आहे ते न सांगताही कळत होते. भटारखानाचा ताबा वश्याने घेतला. वडाभात करतो म्हणाला. किशोर कोशिंबीरीच्या पाठीमागे लागला. आणि मग सगळेजण कांही ना कांही करू लागले. शरदने तर माझे कपडेसुद्धा धुतले. या सा-या करामातींच्या पार्श्वभूमीवर माझ्या गेल्या कांही दिवसांतल्या अनुभवाचं कथाकथन. अगदी थेट पठाणांच्या दावतनाम्यापर्यंत. त्यात मधून मधून त्यांची टिप्पणी चालूच. किशा तर एकदा उसळून कडाडला, " तुलाच लेका नसती कुलंगडी गळ्यात बांधून घ्यायची हौस. ही हिरोगिरी करायची काय गरज होती ? चार पाट्या टाकायच्या आणि गप पडायचं. नाही तरी तो रब्बानी का फब्बानी, काय वेगळं करीत होता !" पेशवा म्हणाला " ते जेवायला बिवायला मुळीच जायचं नाही हां, सांगून ठेवतो."शरदने तर माझ्या त्या हाडाच्या सापळ्याला मूठ माती देण्याच्या कल्पनेची कल्पनेची यथेच्च टिंगल केली. म्हणाला. " च्यामारी, या भोटमामाला (हे माझं टोपणनांव) आपण एवढं ग्रेट मानतो पण हे येडं असा कधी कधी बावळटपणा काय करतं रे. बरं झालं त्या पठाणाने याची शेंडी उपट्लीन तें !" " पेशव्या, तू काय सांगतं बे याले जेवाले जाऊ नको म्हणून? तुला काय वाटते, हा जाणार नाही? हा भोटमामा काय सांगतो बे, थे पठाण याच्या वास्ती भाकरी गिकरी करतीन म्हणून.मी सांगतो, लिहून ठेवा बाप्पाहो, हा तिथे हड्डी गिड्डी चघळाले मिळन म्हणून चाल्लाहे, लाळ गाळीत. याचा काय भरोसा नै भौ!" इति वसंतराव गडकरी. <br /><br />तेंव्हा पठाणांच्या वसतीवर जेवायला जाण्याचा माझा विचार बहुमताने धिक्कारला गेला.मी माणुसकीची, विश्वबंधुत्वाची भलामण निकराने केली. पण एकही हरीचा लाल माझ्या बाजूने उभा राहीना. संध्याकाळचे चार वाजायला आले तसें हें चित्रविचित्र पक्षी आपापल्या कोटरी परतण्यास सिद्ध झाले. मात्र मी गनीमी काव्याने पठाणास फितुर होईन या आशंकेने, मशारनिल्हे वसंत गडकरी आमचे अंगरक्षक म्हणुन नेमले गेले. त्या भोजनाला जाण्या पूर्वी मला एक काम करावयाचे होते. त्याची वाच्यता मी अद्याप केलेली नव्हती. ती केली असती तर या माझ्या मित्रमंडळींनी मला खाटेला बांधूनच ठेवले असते. ते काम म्हणजे सरकारी रुग्णालयात जाऊन आजारी मोईनखानचा समाचार घेणे. त्यालाही वसंतरावांनी कडाडून विरोध केलाच. पण अखेर तयार झाला. <br /><br />कतारमधे त्यापूर्वी खाजगी वैद्यकांना वैद्यकी करण्याची मुभा होती. पण तिथे राजेशाही होती आणि राजेशाहीचा एवंगुण विशेष लहरीपणा याला अपवाद नव्हता. आले राजाजीच्या मना तेथें कुणाचे चालेना, असा खाक्या तिथेही होताच. कोणत्याही गोष्टीला मज्जाव करावयचा झाला, तर एक फतवा काढला की झाले! एके काळी भारतीयांना वाहन चालवण्य़ाचा परवाना, त्यांचा भारतीय वाहन चालवण्याचा परवाना ग्राह्य मानून लगोलग दिला जात असें. पण असाच एक फतवा निघाला आणि भारतीयांना तेथील शासकीय संस्थेतून एक महिना वाहन चालविण्याचे शिक्षण घेणे अनिवार्य केले गेले. खाजगी वैद्यक असेंच एका फतव्यानिशी बरखास्त केले गेले. इतकेच नव्हे तर भारतीय भिषग्वर्यांना केवळ अठ्ठेचाळीस तासांची मुद्त देऊन हद्दपार करण्यात आले. त्यामुळे शासकीय रुग्णालयाला पर्याय नव्हता. <br /><br />मोईनखान ज्या रुग्णालयात दाखल केला होता तेथील अवस्था शासकीय रुग्णालयात जशी असावी तशीच होती. ब्रिटीशांच्या प्रभावाने बाहेरील जग झकपक झाले होते. कारण ते मूळ, प्रथमश्रेणी देशवासियांच्या उपभोगासाठी होते. त्यांचे एवढेसें दुखले खुपले तर सरळ विमानांत बसून भारत गांठणे त्यांना शक्य होते. मुंबईला पंचतारांकित रुग्णालयात मोठ्या मिजाशीने उपचार घेणारे अरब आम्ही पहात होतोच. द्वितीय, तृतीय श्रेणी आणि विशेषत: अनिवासी परदेशियांसाठी अशी शासकीय रुग्णालये निर्माण केली गेली हेंच पुरेसे होते. येमेन, युगांडा, झिम्ब्वाब्वे, आर्मेनिया, अशा देशांतुन आयात केलेले सुमार अकलेचे नीम-हकीम असे वैद्य (डॉक्टर्स) आणि अत्यंत अल्प वेतनावर काम करावयास तयार झालेले केरळी, फिलिपिनी परिचारक आणि परिचारिका. तेथे बरें होऊन घरी सुखरूप गेलेल्या रुग्णांपेक्षा, एखाद्या सांसर्गिक रोगाचा शिक्का मारून हद्दपार (डी-पोर्ट) केले गेलेल्या रुग्णांचेच दाखले अधिक. काविळीचा किंवा पीतज्वराचा शिक्का बसला तर मग विचारायलाच नको. आपल्याकडे कुष्ठरोग्याच्या वाटेला येणारी निर्भत्सना कितीतरी सौम्य वाटवी अशी निर्भत्सना तशा रुग्णांच्या वाट्याला येई. पन मोईनखानला उपचार देणारा वैद्य गोव्याचा होता. डेरिक अलेमाव त्याचे नांव होते. फतव्या नंतर या गृहस्थाने नाईलाजाने सरकारी नौकरीचा पर्याय स्वीकारला होता.<br /><br />मोईनखानला घरीच घेऊन जा असा त्याने आग्रह धरला.नाही तर तोही हद्दपार केला गेला असता. नाईलाजाने मी तो मान्य केला. वसंताला आधी हें सारे अजिबात आवडले नव्हते. मी अजूनही कांही तरी अगोचरपणा करतो आहे अशीच त्याची धारणा होती. पण मोइनखानची असहाय्य अवस्था पाहून तोही द्रवला. खानाला घेउन मी वसंतासह वर्तमान पठाण वसाहतीवर दाखल झालो तेंव्हा मोईनखानला माझ्यासोबत पाहून त्यांनी जो जल्लोष केला तो पाहून वसंता सर्दच झाला. त्या आसंमंतातून शिजू घातलेल्या खाद्यपदार्थाचा दरवळ येत होता. पठाणी सहभोजनासाठी आता वसंताही मजबरोबर थांबणार होता.क्रमश:<br /><br /> <br />पठाणी सहभोजनासाठी आता वसंताही मजबरोबर थांबणार होता.<br />------------------------------------------------------------------<br /><br /> पठाणांच्या वस्तीवर पोहोचलो तेंव्हा अंधारून यायला सुरुवात झाली होती. एका <br />मोठ्या भूखंडावर चहूबाजूंनी सुमारे बारा फूट उंचीची वीटकामाची तटबंदी, मधोमध<br />एक भलामोठा दिंडी दरवाजा आणि आंत अत्यंत ओबडधोबड अशा बराकी. अशी<br />एकूण त्या वसाहतीची रचना. भारतांतील कोणत्याही शहरांतील कारावासाची आठवण व्हावी अशी. माणसांच्या जेमतेम मूलभूत गरजा पुऱ्या व्हाव्यात इतपतच केली गेलेली सोय. काल इथे आलो होतो तेंव्हा दिंडीदरवाजा खुला होता. आज मात्र बंद होता. अर्थात गाडी आज बाहेरच ठेवावी लागली. दिंडीतून वाकून मी आंत दाखल झालो तसा वश्या बाहेर घुटमळतच राहिला. त्याच्या चेहर-यावर<br />संदेह अगदी स्पष्ट दिसत होता. आत घोळक्या घोळक्याने वावरणारे पठाण तो निरखीत होता. मी त्याने आंत यावे म्हणून खुणावले तर तो मलाच बाहेर ये म्हणाला. जावेच लागले. <br /> " कांही खरं नैये बे भोट्या. तुले काय सांगाव आता. पार्टी काय्ची खातं बे, भ++ ! तुलेच फाडून खातीन ते. पैन लाव."<br /> वश्या पोटतिडकीने बोलला यात शंकाच नव्हती. कारण ’भ’काराने सुरु होणारी संबोधने आपसुकपणे त्याच्या तोंडून बाहेर पडणे आणि ’पैन लाव’हे त्याचे शब्द त्याच्या निरागस मनस्विततेचे लक्षण होते. एखाद्या विधानाला हे ’पैन लाव’ (म्हणजे पैज लाव) हे शब्द जोडले की अगदी ठामपणा येणारच अशी त्याची समजूत होती. <br /> " कांही तरी काय बोलतो आहेस. अरे असं कांही होणार नाही. मी त्यांना चांगलं ओळखतो तसं काहींही करणार नाहीत आणि कांही झालंच तर तूं आहेसच की." मी त्याला दिलासा दिला. तेंव्हा स्वारी आंत दाखल झाली.<br /> " मरहब्बा या हबीबी " म्हणत कादरखानाने पुढे होत आमचे हात हातांत घेत स्वागत केले. त्यांच्या रिवाजाप्रमाणे त्याने मला आलिंगनही दिले. एरवी मळकट दिसणारे पठाण स्वच्छ आणि स्वच्छ कपड्यात दिसत होते. सगळ्याच पठाणांना ही दावतची कल्पना पसंत पडलेली नसावी. <br />तशी वसती बरीच मोठी होती पण आमच्या साईटवर दिसणारे सगळेच तिथे दिसत नव्हते. तरी साईटवर दिअसणारे दहा अकरा चेहरे होतेच. त्यांत नुरुलखान, मोईन खान होता. बाकी खानांचीही ओळख करून देण्यात आली. सर्वांनी हस्तांदोलनाने स्वागत केले.<br /><br /> या कामगारांच्या निवासासाठी एक भली मोठी खोली, प्रत्येक खोलीत सहा दुमजली खाटा (बंकर बेड), म्हणजे बारा असामी एका खोलीत.खोलीला एक वातशीतक आणि वसाहतीच्या मागे सामाईक स्वच्छतालये. अशी सोय केलेली असें. त्यापैकी एका खोलीतील सामानाची थोडे हलवाहलव करून <br />दावतीसाठी जमीनीवर एक भली मोठी चटई अंथरलेली. सगळे कडेने बसले. कादरखान आणि नुरुलखान बाहेरून खाद्यपदार्थांची भांडी आणून मधल्या जागेत मांडू लागले. मुसलमानात साळे एकाच थाळीत जेवतात असें मी ऐकले होते आणि आपण भारतीय तर वेगळी थाळी घेऊन जेवतो. आता कसें काय होणार या विवंचनेत वश्या तर असणारच होता पण मीही तशी वेळ आली<br />तर कसें तोंड द्यायचे याचा विचार करू लागलो. पण जेंव्हा पदार्थांच्या हंड्या मधें मांडून झाल्यावर प्रत्येकासमोर एकेके थाळी मांडली आणि दोन दोन कटोरे आले तेंव्हा जीव भांड्यात पडला. केलेले सगळे पदार्थ एकाच वेळी पण भरपूर वाढले गेले आणि सगळे जेवायला बसले. जेवणाची सुरुवात जरा दाटसर सूप असावे अशा पदार्थाने झाली.त्याला शोरबा म्हणतात असें समजले. गांवी आई निरनिराळ्या डाळींच्या भरड्याचे (कळण्याचे) कढण करीत असें तसा तो प्रकार होता. पण फार चविष्ट<br />होता. दोन प्रकारच्या भाज्या, एक कोशिंबिरीसारखा प्रकार त्यात सफरचंदाचे तुकडे आणि सुक्यामेव्याचेही तुकडे होते. लुबनानी खबूस म्हणजे लांबट आकाराची मैद्याची खरपूस भाजलेली आपल्या नानसारखी जाड रोटी. ती इथे बेकरीत तयार मिळे. तिचे दोन तुकडे करून लोण्यावर (बटर) जराशी शेकलेली. आणि तुपावर परतून पाकात घोळवलेले खजुराचे काप असा एक गोड पदार्थ. असा एकूण बेत होता. भाज्या मात्र जरा तिखटच आणि तेलच तेल असलेल्या. वश्या मात्र सुरुवातीला जरा धास्तावलेला. मी खातोय की नाही हे पहातच जेवत होता. भाजीची एकेके तुकडा बोटाने दाबून पाही. जेवतांना कांही हलके फुलक्या गप्पा चाललेल्या. मात्र एक गोष्ट मला आवडलेली. गप्पा मोडक्या तोडक्या होईना उर्दूतून चाललेल्या. कांहींना बोलता येत नसले तरी दाद देत होते. त्याअर्थी त्यांना बोलणे समजत होते. तेथील चालीरीती, हुकुमतीची राजवटीचे कांही एककल्ली विनोदी मासले. अनिवासी परदेशियांना, मग तें मुस्लिमी देशंतुन आलेले असले तरी, मिळणारी दुय्य्म दर्जाची वागणूक असें कांही बाही विषय होते. इतका वेळ वश्या गप्पच होता. शेवटी कादरखान म्हणाला<br /> " शाजी, ये मेहमानको बुत क्युं बनाके रक्खाए. इस्को बोलनेकी जुबान हय के नही. के तारीफ है तुम्हारे दोस्त की " <br /> खरच एक चूक झालेली होती. खरं म्हणजे ज्याची त्याने स्वत:च ओळख करून द्यायची हा इथला प्रघात. वश्या आधीच भांबवलेला त्याला हे सुचणार नव्ह्तंच. आणि सुचलंच तो काय म्हणणार होता !<br /> " ही तरकारी कायची केल्ली हो भौ. थे आलु गिलु घातले वाट्टे. लेकिन थे अदरक गिदरकचा ज़ायका काई येऊन नही राह्यला बाप्प्पा. अन थे सांभारचाही काही ठिकाना लागला नाही. काऊन हो भौ ?"<br /> आता वश्याची ही रसवंती ऐकल्यानंतर त्या पठाणाची काय अवस्था झाली असती ते एक अल्लाच जाणे. कारण वश्याला फक्त दोनच भाषा येतात असा माझा समझ होता. एक इंग्रजी आणि ही असली मराठी. त्याचं इंग्रजीही फक्त शेक्स्पिअरलाच समजलं असतं. ’ मला माहित नाही ’<br />या वाक्याचं भाषांतरही तो ’ आय डझ्नॉट नो ’ असं करीत असे. मात्र त्या नंतर वश्या उर्दूतून असा कांही ’पेश’ आला की, तें अमीर खुश्रो, मीर, गालिब बिलिब नागपूरला धंतोलीत याच्या शेजारीच राहत होते आणि रोज पान खायला वश्याच्या घरी येत होते. <br /><br /> " बंदेको वसंत केहते है. वसंतका मतलब है बहार. आपने जो खातिरदारी पेश की वो काबिले तारीफ है. ता कयामत हम आपके शुक्रगुज़ार रहेंगे " वगैरे वगैरे.<br /> वश्याची ही रसवंती माझ्या तर पार डोकयावरून गेली. पण पुढे आश्चर्य असें की त्या बैठकीचा वश्याने ताबाच घेतला. त्याच्या भौगोलिक सामन्यज्ञानाचे अद्भुत दर्शन आम्हा सर्वांनाच घडले. त्याला कज़गिस्तान, अफगाणिस्तान,तुर्कमेनिस्तान, इराण, इराक, या देशांबद्धल बरीच माहिती होती. हे पठाण बहुतांशी पाकिस्तानच्या सरहदी लगतच्या गांवतून आलेले होते हे त्याला माहिती होते. तुर्कमेनिस्तानामधून वहात अफगणिस्तानमधें येणा-या मर्गब, अमन्दर्या सारख्या नद्यांची त्याला माहिती होती. त्याला अबेस्तादा सरोवर, हिंदुकुश पर्वताच्या रांगा, सिन्काई हिल्स जवळील ज़बुक, मध्य अफगाणिस्तान मधील गज़नी, तिच्या उत्तरेकडील काबूल,कंदाहार सारखी शहरे, ख्वाजा मोहम्मद नांवाचे धर्मस्थळ, असं आणि यापेक्षा कितीतरी अधिक माहिती होती. बापरे. मी तर थक्कच झालो. पठाणांचे तर विचारायलाच नको. या तिनशे पौंडाच्या ऐवजाला त्यांनी डोक्यावर घेउन नाचायचेच बाकी ठेवले होते. <br /> अखेर हात तसेंच खरकटे ठेऊन रंगलेल्या गप्पांना आवर घातला गेला तेंव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. इतक्या उशीरा रस्त्याने घरी जाणे सोपे नव्हते. गस्त घालणारे पोलीस किती ’प्रेमळ’पणें वागतात याची कल्पना होती. वश्याला त्याच्या ठिकाणावर सोडून आलो ते मनोमन त्याची तारीफ करतच.<br /> या मस्त रंगलेल्या मेजवानीची कुणकुण दुसऱ्या दिवशी मुख्यालयाला लागेल आणि तो गुन्हा समजला जाऊन मला चौकशीसाठी बोलवलं जाईल असं स्वप्नही त्या रात्री मला पडलं नाही. मस्त झोप लागली. वास्तवाला तोंड देण्यासाठी दुसऱ्या दिवशीच्या सकाळ पर्यंत.<br /><br />क्रमश: <br /><br />वास्तवाला तोंड देण्यासाठी दुस-या दिवशीची सकाळ उजाडे पर्यंत.<br />-------------------------------------------------------<br /><br /> दुसरे दिवशी नेहमीप्रमाणे कार्यस्थळावर पोहोचलो. माझ्या पठोपाठ कामगारांची गाडी येऊन ठेपली. आज कामगार बिनबोभाट कामाला लागलेले. काल हुस्नीने त्याचे काम चोख केलेले होते. त्याने काय केले ते समजलेले नव्हते. पण परवा ज्या ठिकाणी तो हाडांचा सापळा होता ती जागा स्वच्छ झालेली होती. पठाण त्या जागी जाऊन पाहून आले आणि फारशी चर्चा न करता कामाला लागले. मी एकदा पाहणी करावी म्हणून कामाच्या जागेवरून चक्कर मारीत होतो. तोंच प्यून, मुख्यालयाचा फोन आला आहे म्हणून सांगत आला. मी झालेल्या कामाचा धांवता आढावा घेतला आणि फोन घेण्यासाठी केबीनवर गेलो. आस्थापनेचे जनरल मॅनेजर मि. बरनार्ड मार्स्टर्न यांचा होता. त्यांनी मला ताबडतोब मुख्यालयात बोलावले होते. इतक्या वरिष्ठ दर्जाच्या अधिका़-याने मला कां बोलावले असावे याचा अंदाज लागेना. मनांत जरा धडकीच भरली. कारण ज्या असामीचे एरवी<br />दर्शनही दुर्लभ असायचे त्याने चक्क भेटीला बोलावले होते. मी पळतच साईटवर गेलो आणि कादरखानला ती हकीकत सांगितली आणि मी परतेपर्यंत काम व्यवस्थित चालू राहील असे पहा असे बजावले. कादरखान ती जबाबदारी नीट पार पाडू शकेल आणि बाकी कामगारही त्याचे ऐकतील असा विश्वास एव्हाना वाटायला लागला होता. साहेब कदाचित कामासंबंधी कांही विचारतील म्हणून<br />एका कागदावर कांही नोंदी करुन कागद बरोबर घेतला आणि निघालो.<br /><br /> मुख्यालयात मार्स्टर्न साहेबांच्या कक्षापर्यंत पोहोचलो तर त्यांच्या स्वीय सहायिकेने सांगितले की साहेब मजकूर माझी वाट पहातच आहेत. तिने ज्या चर्येने सांगितले ती पाहून मी आधीच एक ग्लास पाणी पिऊन घेतले आणि साहेबांच्या कक्षात गेलो साहेबांच्या कक्षाच्या दरवाजावर टक टक केले. साहेबाने परवानगी दिल्यावर आंत गेलो आणि त्याच्यासमोर उभा राहिलो. साहेब सुमारे अर्धातास बोलला. तो बहुदा आयरिश असावा. त्याचे इंग्रजीचे उच्चार समजणे महा कठिण. त्याने <br />उच्चारलेल्या एका शब्दाचा उच्चार समजाऊन घेऊन त्याचा अर्थ लागेपर्यंत हा पाठ्ठ्या चार वाक्ये पुढे गेलेला असायचा. <br /><br /> गोष्ट अशी होती की मी काल लेबर कॅंपवर पठाणांनी दिलेल्या मेजवानीला गेलो ही गोष्ट षट्कर्णी झालेली होती आणि ती जेंव्हा साहेबमजकूरांपर्यंत गेली तेंव्हा ते आवडलेले नव्हते. मुळातच वर्णभेदाचा अंगिकार आणि पुरस्कार करणाऱ्या या गोऱ्यांना माझें बहुजनांत मिसळणे मान्य होणारे नव्हते. समाज श्रेणींतील भेदाभेद कटाक्षाने जपणाऱ्या ही पाश्चिमात्य संस्कृतीत माणुसकीचा लवलेशही नसणे स्वाभाविक होते. हें मला ज्ञात नव्हते असें नाही. पण त्या विचारसरणीला<br />इतक्या क्षुल्लक पातळीवर आणून ठेवले जाईल असें मला कधी वाटले नाही. उलट हुकुमशाही प्रवृत्तीच्या या माणसांना माझे माणुसकीला धरून वागणे द्रोहाचे वाटणेच शक्य होते. त्यात साम्यवादाची भीती शोधू पाहणारी भीरुता नक्कीच होती. अगदी साध्या भाषेंत सांगायचे तर पायातली वहाण पायातच ठेवली पाहिजे या तत्वज्ञानाची भलामण त्यांच्या पथ्थ्यावर होती.<br /><br /> मार्स्टर्न साहेबांच्या बौद्धिकाचा सरळ अर्थ असा होता की, मी पठाणच काय पण इतर कोणाचीही वागतांना पायरी सोडून वागू नये. कामगारांना मी कामगारासारखेंच वागवले पाहिजे. त्यांना त्यांच्या लायकीपेक्षा अधिक मान आणि सवलती देउ नये. हा खटला एकतर्फी होता. त्यात मला माझी बाजू माझी बाजू मांडण्याची मुभा असण्याचा प्रश्नच नव्हता. तूर्तास तोंडी समज दिली गेली. तिचे उल्लंघन म्हणजे गंभीर परिणाम! कदाचित् निरोपाचा नारळ. मी खिन्न मनाने कार्यस्थळावर परतलो.<br /><br /> कार्यस्थळावर आल्यावर मात्र खिन्नता कुठच्या कुठे पळून गेली. पठाण अत्यंत जोमाने काम करीत होते. कामाचा मागील अनुशेष जवळ जवळ भरून निघाला होता. कालच्या मेजवानीचा हा परिणाम असावा वाटून गेले. ते एक कारण होतेच पण आणखीही एक कारण होते. ते म्हणजे जिथे <br />तो अस्थिपंजर सांपडला होता तेथपासून पुढे जमीन भुसभुशीत लागलेली होती. पण पठाणांची तर्कमिमांसा निराळीच होती. कादरखान म्हणाला,<br /><br /> " अच्छा हुवा जो उस मरहूमकी साया निकाल बाहर हो गई. वो सखत<br /> जमीन उस सायाका अंज़ाम. अब सारा काम मुकम्मल होगा. " <br /><br /> ही भुताखेताची भीती हास्यास्पद नक्कीच होती. पण ती तशीच राहू देणे हिताचे होते. त्या भीतीनें कां होईना. काम भराभर होत होते.<br /><br /> जेवणाच्या सुटीला थोडा अवधी बाकी होता. एवढ्यात कादरखान माझ्या जवळ आला. विचारू लागला,<br /> " क्या हुवा मक्तब में ? "<br /> <br />मुख्यालयात झालेला प्रकार खरा खरा सांगून टाकावा असें एकदा वाटले. पण मी एक लोणकढी ठेऊन दिली.<br /><br /> " हमारा काम इन्शाल्ला, बाअंदाज अच्छा चल रह है खान! मुदीरको बहुत खुशी है. ये काम जल्दी जल्दी तमाम करो. आगे दूसरा काम करना है. हुकूमतका ज़दीद (मोठें) कलोनी (निवासी आवास संकुल) बनानेका काम मिला है. हमारा कारवॉं उधर जाना होगा. सुकून मिलेगा." <br /> <br />खान खुश झाला. उड्या मारीतच जेवायला पळाला.<br /><br /> गोरे कांही म्हणोत पण माझ्या पद्धतीने मी कामगारांशी जवळीक साधत होतो. त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येत होते. साहेबांचा धर्म निराळा होता. त्यांचे तंत्र निराळे होते. माझ धर्म निराळा होता. विदुरा घरी उष्टें वेंचणारा श्री कृष्ण माझा आदर्श होता. <br /><br /> सहनाववतु सह नौ भुनक्तौ सहवीर्यं करवावहै ।<br /> तेजस्वीना वधितवमस्तु मा विद्विशावहै ॥<br /> <br />हा माझा मंत्र होता.<br /><br />क्र्मशः<br /> माझा धर्म निराळा होता. विदुरा घरी उष्टें वेंचणारा<br />श्री कृष्ण माझा आदर्श होता. <br />--------------------------------------------<br /> <br /> त्यानंतर लागोपाठ तीन दिवस काम सुखेनेव चालले. जमीन भुसभुशीत लागली होती ही एक जमेची बाजू होती. शिवाय कांही अपवाद सोडले तर बहुतेक पठाण सरळ वागत होते. मध्येच कधी तरी दोन पठाणांमध्ये एखादी ठिणगी उडे, मग बाचा बाची ही आलीच. पण कादरखान ती समस्या परस्पर हाताळत असें. एक कादरखानच काय पण बाकी बहुतेक पठाण समजदारीने आणि सामंजस्याने वागत होते. त्यांच्यातील जे वाद कादरखानाला हाताळता येत नाहीत असें त्याला वाटले, त्यांचा निवाडा करणे माझ्यापर्यंत पोहोचले. <br /><br /> प्रक्षोभक झालेले कामगार माझ्याकडे आले की मी त्यांना केबीनमधें पाचारण करी. कांही बोलणे सुरूं करण्याआधी त्यांना एक पेलाभर थंड पाणी दिले की प्रक्षोभाची धार जरा बोथट होते हे माझ्या लक्षांत आले होते. मग त्यानंतर त्यांचा आवेश आपसुकच जरा मंदावलेला असायचा. त्यांच्या समस्याही तशा वैयक्तिक आणि बऱ्याचदा अगदी पोरकट असायच्या. त्यांचे त्यांच्या गावाकडची किंवा कौटुंबिक भांडणे हेही एक कारण असायचे. कारण बरीचशी मंडळी एकाच गांवातून आलेली असायची. तसेंच ते एकमेकांचे नातेवाईकही असायचे. जसें आपल्या कोकणातून एखादा चाकरीसाठीं म्हमईला गेला की तो संधी मिळतांच आणखी चारदोन गांववाल्यांना म्हमईत कुठे ना कुठे तरी चिकटवून देण्याच्या प्रयत्नांत असतोच. तसाच प्रकार या पठाणांच्या बाबतीत घडलेला दिसायचा. त्यांत एक सासरा-जांवईही होते. सासऱ्याने कबूल करूनही (मेहेर) हुंडा दिलेला नाही म्हणून इथें हें असले कष्टाचे काम करायला आलो हा जांवयाचा दावा. तर या नालायक जांवयाला देण्याचा पैसा कमवण्यासाठीं घरदार सोडून वाळवंटात आलो हे सासऱ्याचे गाऱ्हाणे. हे दोघे तर नेहेमी भांडायचे. कधी कधी तर मामला मुद्यावरून गुद्यावरही यायचा. बरं या दोघांचेही समर्थक त्याच घोळक्यात असणार आणि मग त्यांचेही शक्तिप्रदर्शन. मी आपला कधी दादा पुता करून तर कधी हद्दपारीची शिफारस करण्याचा धांक दाखऊन ती भांडणे मिटवीत असें.<br /><br /> माझें हें उपद्व्याप मी एकदा आमच्या सडेफटिंग युनियनच्या सदस्यांना सांगितले तर मी ’घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजणे तात्काळ बंद करावे’ हा ठराव सर्वानुमते पास झाला. डोंगऱ्या तर ’ आ बैल मुझे मार ’ नांवाचा चित्रपट काढणार होता आणि त्या चित्रपटाचा नायक अर्थात् मीच असणार होतो. या त्याच्या विनोदामागे एक तिरकसपणही होता हे जाणवत होते. हें असें करण्यात मी एक प्रकारें आत्मप्रौढी, शेखी मिरवत आहे असा त्याचा आरोप होता. <br /> पण तसें कांही मी बुद्ध्याच करीत नव्हतो. कामगारांत मित्रत्वाच्या नात्याने मिळून मिसळून वागण्याची माझी जुनी संवय होती. मी लहानपणा पासूनच कांहीसा मवाळ होतो. जरा हळवा आणि भाबडाही असेन कदाचित. मात्र माणसे जोडूनच कांही साध्य करतां येतें या विचारावर माझा भरवसा होता. आमचा पेशवा मात्र म्हणाला, " जें कांही करायचे असेल तर कर पण सेन्स ऑफ प्रपोर्शन सोडू नकोस आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे स्वत:चा ’पोपट’ होऊ देऊ नकोस". या माधव महाबळला आम्ही दिलेली पेशवा ही उपाधी तो अशी सार्थ करीत असे.<br /><br /> असाच एकदा पठाणांचा एक वाद मिटवीत होतो इतक्यात एक मोटार आल्याची चाहूल लागली. पठाणांना कामाकडे पिटाळून मी सामोरा झालो. एक अलिशान अमेरिकन मोटार जवळ येऊन थांबली आणि संपूर्ण अरबी वेशातली काळा चष्मा लावलेली एक असामी गाडीतून बाहेर पडली. मोटारीला स्वतंत्र चालक होता हे माझ्या ध्यानात आले. म्हणजे ती व्यक्ती कोणीतरी उच्च दर्जाची अधिकारी होती हे नक्की. कारण सहसा मोठमोठे अधिकारीही इथें आपली मोटार स्वत:च चालवीत. मी पुढें होत अभिवादन केले. माझ्याशी हस्तांदोलन करीत त्या व्यक्तीने अस्खलित आङ्ग्ल भाषेत आपला परिचय दिला. आमच्या आस्थापनेचा तो ’अल् मुदीर’ म्हणजे जनरल मॅनेजर होता. क्षणभर हा महाभाग इथें कां अवतरला असेल याचे मनांत आश्चर्य वाटले आणि थोडी भीतिही. हे साहेब कामाची पाहणी करण्यासाठीं आलेले होतेच पण मी कामगारांशी फालतू जवळीक करीत आहे अशी तक्रार त्याच्या पर्यंत पोहोचली होती. मेजवानीची खबरही त्याला मिळाली होती. आणि त्याची चौकशी करण्यासाठीं दस्तुरखुद्द जातीने आले होते. त्यांनी आधी मी तिथें येण्यापूर्वीच्या आणि माझ्या अखत्यारीत झालेल्या कामाचा आढावा घेतला. त्या तूलनेत माझे काम समाधानकारक असल्याचे पाहून तो बराच निवळला. माझ्याबद्धल त्या गोऱ्या अधिकाऱ्याने जी तक्रार केली होती तिच्यातील फोलपणा त्याच्या लक्षांत आला असावा. कारण त्यानंतर तो प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणीही गेला आणि पठाणांशीही बोलला. काय बोलला हे मात्र मला समजले नाही कारण तें संभाषण अरबी भाषेंत झालें. अखेर जातांना मला शुभेच्छा देऊन गेला तेंवढे मात्र मला समजले.<br /><br /> तो गेल्यानंतर कादरखान माझ्याजवळ आला. त्याचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मी त्याला कारण विचारले तर म्हणाला,<br /><br /> " मुदीर बोला, तुमारा काम बिल्कूल मुश्तमाम. खराब काम किया तुम. तुम पठानको मारा पीटा. तुमको मुदीर इंडिया वापस भेजेगा. " <br /><br /> असं म्हणून दोन्ही हात वर करून आकाशाकडे पहात ओरडला " रहेम या खुदा, रहेम !" आणि गडगडून हंसायला लागला. <br /><br /> त्याच्या पहिल्या दोन वाक्यांनी मी चक्रावलो होतो पण त्याचा पुढचा तमाशा माझ्या लक्षांत आला. त्याच्या पोटांत एक जोरदार ठोसा लगावीत मी पण ओरडलो,<br /> <br /> " बर्रा, वै शैतान बर्रा !" (चालतो हो, राक्षसा चालता हो!)<br /><br /> सगळे पठाण हात उंचावीत मला कांहीतरी सांगू इच्छित होते. काय तें मला कांही समजत नव्हते. मात्र ते आनंदात असावेत असें दिसले. मीही आनंदात होतो पण थकवाही जाणवत होता. आता कामाचा वेगही वाढला होता. या वेगाने झाले तर काम, फार फार तर चार दिवसांत पूर्ण होणार होते. किती दिवस झालें मी हें काम सुरू करून? कांही समजत नव्हते. <br /><br /> जणू हा एक कबड्डीचा डाव चालला होता. त्यांत मी कधी हरत होतो तर कधी जिंकत होतो. मात्र हा खेळ संपू नये असं आता वाटत होतं.<br /><br />क्रमश:मात्र हा खेळ संपू नये असं आता वाटत होतं.<br />--------------------------------------<br /><br /> मुदीरचे किंवा आमच्या शेखचे दर्शन घडणे हेंच पठाणांसाठीं मोठे अप्रूप होते. आणि इथें तर मुदीर चक्क पठाणांशी गप्पा मारून गेला होता त्यामुळे तर आनंदाला पारावार नव्हता. मुदीर पठाणांशी काय बोलला तें मला मोईनखानाकडून कळले. पठाणांनी मला दावत दिली हे मुदीरला आवडले होते. तो त्यांना म्हणाला होता,<br /><br /> "मेहमाननवा़ज़ी हा प्रत्येक सच्च्या मुसलमानांचाच काय पण साऱ्या जगाचा आद्य धर्म आहे. फक्त तुमचा हेतू स्वच्छ असला पहिजे. एक माणूस म्हणून तुमचा नवा साहेब कसा आहे तें तुमचे तुम्हीच ठरवा. तो माणूस असेल तर तुम्ही माणूस बना. नाही तर तुम्ही राक्षस तर आहातच. तुम्ही केलेले कामही उत्तम आहे. हे काम लवकर संपवा. मी तुम्हा सर्वांना खास बक्षीश देणार आहे." <br /><br /> हे सारे मोईनखानने सांगितले. तें ऐकून माझ्या मनांत मुदीरबद्धल आदर निर्माण झाला. आखातातील आतापर्यंतच्या मुशाफिरीत मी पाहिलेला तो पहिला सहृदय माणूस होता. शिवाय त्याला कामगारांचे मानसशास्त्र चांगलेच अवगत असावे. कामगारांना प्रोत्साहित (motivate) करण्याची त्याची हातोटी मला फार आवडली. त्याने बक्षीश देण्याचे कबूल केले त्याचे मात्र मला नवल वाटले नाही. मुदीर किंवा शेख खुश झाला तर कांही ना कांही बक्षीस नक्की देत असें. इथें तशी पद्धत होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि आजही इथे सरंजामशाही होतीच. देशाला राजा होता आणि संस्थानिकही होते. बक्षीसे देणे हे राजेशाही औदार्याचे आणि मिजाशीचे लक्षण होते. बक्षीस सहसा रोख रकमेंतच असायचे. ते सामुदायिक असेल तर सहसा त्याचा विनियोग जल्लोषी मेजवानीसाठीं केला जाई. <br /> <br /> मोईनखान आताशा तो माझ्याशी बोलण्याचा बराच प्रयत्न करीत असे. त्याची प्रकृती आता बरी होती. जी कांही औषधयोजना त्याला सरकारी दवाखान्यातून मिळाली होती त्यामुळे त्याला बरें वाटत होते. खरें तर यांत मी कांहीच केले नव्हते पण तो उगीचच माझे आभार मानीत असे. या पठाणांना वैद्यकीय उपचार मिळण्याची सोय असूनही ती त्यांना दिली जात नव्हती. इथें कष्ट करण्यासाठी येणारा प्रत्येक माणूस तंदुरुस्त असायलाच पाहिजे हे तत्व बरोबर होते. पण वेळ कांही सांगून येत नाही. त्याला योग्य तो उपचार मिळायला पाहिजे असें मला वाटें. पण त्याचा काय उपयोग होता. इथें कामासाठीं येणाऱ्या सर्वच माणसांना कमीअधिक प्रमाणांत गुलामासारखेंच वागवले जात होते. सगळेंच कांही मुदीर सारखे नव्हते. हाती आलेल्या अधिकाराचा उपयोग इतरांना छळण्यासाठी वापरण्याची हौसच अधिक दिसून येते आणि या विकृतीला बळी न पडणारा विरळाच.<br /><br /> वीज वाहिनी जमीनीतून टाकण्याचे काम जसजसें संपत आले तसतसा कामाचा जोश वाढत गेला. कांही अडचण आली तरच मी कामाच्या ठिकाणी असावे. एरवी मी केबीनमधें निवांत वसावे, आराम करावा असा आता पठाणांचा आग्रह असें. पण माझा बहुतेक वेळ त्यांच्या वरोवरच जात असें. कारण कांही काम न करता बसून राहण्याची संवय नव्हती. तो माझा स्वभाव नव्हता. काम जसें एक दिवसावर येऊन ठेपले तसे कामगारांची गडबड वाढली आणि वातावरणच बदलले. ज्या गांवासाठी ती वीजवाहिनी टाकली जात होती तें गांवही जवळ आल्याने कांही गांवकरीही आता कुतुहलाने कामाच्या ठिकाणी घोळक्याने फिरकत. त्यांत पोरेटोरेच अधिक. आपल्याकडेंही असेंच चित्र अनेकदा दिसते. खेडेगांवात अगदी पोस्टमन जरी बटवड्यासाठी गांवात आला तर चिल्ली पिल्ली त्याच्या सायकलच्या मागे पळणारच आणि शहरांतही एखादी जरा वेगळी विदेशी असामी दिसली की भल्याभल्यांनाही आपले काम विसरून त्यांच्याकडे पाहाण्याचा मोह आवरत नाही. माणसाच्या नाविन्याच्या या नैसर्गिक कुतुहलाचे मला नेहमीच नवल वाटत आले.<br /><br /> अशाच एका संध्याकाळी. कांही कामागार राहिलेले काम उरकण्याच्या मागे आणि कांही शेवटी न लागणाऱ्या साहित्याची आवरासावर करण्यात मग्न. सगळ्यांनाच कधी एकदा हे उघड्यावरचे उन्हातान्हातले काम संपवतो असें झाले होते. कारण त्यानंतरचे काम इतके जिकिरीचे असणार नव्हते. तसें कुणालाच कांही माहिती नव्हते. पण पण यापुढील वीजवाहिन्या आरोहित्राला (transformer) जोडणे, गांवात त्या आधीच विस्तारलेल्या कमी दाबाच्या वाहिन्या आरोहित्राला जोडणे अशी कांमे सुरु होणार होती. श्रम त्या मानाने कमी होणार होते. शिवाय कामांत विविधता असणार होती. कामातील विविधताही मनोरंजक असते आणि श्रमांचा ताण जाणवत नाही. सगळेच पठाण त्यासाठी लागणार होते असें नव्हते. पण कोण कुठे जाईल याची उत्सुकता होती. अशा रितीने सारे कांहींना काहीं व्यवधानात होते. एवढ्यात कामाच्या शेवटच्या टोकाशी कांही तरी अघटित घडले असावा असा कोलाहल झाला. सगळे हातातले काम टाकून तिकडे धावले. मीही कामाच्या गस्तीसाठी मिळालेली जीप तिकडे पिटाळली.<br /><br /> शेवटच्या टप्प्यातली धांदल, बघ्यांची झालेली गर्दी. त्यातून अति उत्साही कार्टी चरावरून इकडून तिकडे उड्या मारण्याचा खेळ खेळू लागली. त्यांना हांकारताना पठाणांची दमछाक झालेली. अशातच एक कार्टं चरांत पडलं. त्याला वाचवण्यासाठी उडी मारण्याच्या भरांत एक पठाण माती ढकलणाऱ्या यंत्राच्या चाकाखाली आला. चाक कसले ते! चाक म्हणायचे पण रणगाड्याला असतो तसा तो कांटेरी चाकावर फिरणारा पोलादी पट्टाच असतो. आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने ते यंत्र तात्काळ थांबवण्याचा जो प्रयत्न केला त्यांत ते एकाबाजूने चरांत घसरले. बघे घाबरून पळाले. मात्र काम ठप्प झाले.<br /><br /> कांही क्षण कोलाहलात गेल्यावर कोलाहल थांबला आणि शांतता पसरली. जो तो एकमेकाकडे पहात होता, यदृच्छयेने झालेल्या अपघाताचा विचार करू लागला. माती-ढकल्या (बुलडोजर)चा एक भाग घसरून चरांत टाकलेल्या वीज वाहिनीवर पडला होता. वीज वाहिनीवर विटांची रांग होती म्हणून तिला सध्यातरी कांही इजा पोहोचलेली नव्हती. तो पुन्हा चालू करून बळाने वर काढता येणे शक्य होते पण विटा चक्काचूर होऊन वीज वाहिनीला चांगलीच इजा पोहोचणार होती. आता ते धूड उचलून सरळ करणे भाग होते. त्यासाठी क्रेन लागणार होती. क्रेन खूप दूरच्या एका दुसऱ्या साईटवर होती. तिला निरोप देऊन ती येई पर्यंत कदाचित् दीड-दोन दिवस लागणार होते. साऱ्यांचा हिरमोड झाला होता. क्रेन येईपर्यंत बाकी आवरासांवर करून घ्यावे म्हणून कामगार बेसकॅंपवर पिटाळले आणि मीही फोन करून अपघाताची खबर मुख्यालयाला द्यावी म्हणून केबीनकडें वळालो.<br /><br /> मी केबीनामधे जातांच आधी दोन पेले पाणी घटाघटा प्यालो आणि खुर्चीत बसलो. खरं म्हणजे मी अगदी चिडून गेलो होतो. अडचणी माझी पाठ सोडीत नव्हत्या. आता हे क्रेन मागवण्याचे प्रकरण म्हणजे वैताग होता. काय झालें, कसें झालें याचा जाब जबाब देणे, चौकशी झालीच तर तिलाही तोंड देणे. या सगळ्या तपशीलाची नोंद करणे. अहवाल तयार करणे. मला ही असली कारकुनी करण्याचा मनस्वी कंटाळा. पण ’ज्याचा कंटाळा त्याचाच वानवळा’ या म्हणीचा प्रत्यय येणार होता. मुख्यालयाला खबर देण्यासाठी फोन लावणार इतक्यात एक आडदांड पठाण केबीनमधे घुसला आणि अरबी भाषेंत तावाने कांही तरी सांगू लागला. मी आधीच इतका वैतागलेला, त्यात हा माझ्या वैतागात भर टाकायलाच जणू आलेला. मी त्याला हाकलून देण्याच्या विचारात असतांनाच पाठोपाठ कादरखान अवतरला आणि सांगू लागला,<br /> <br /> " शाबजी ये महंमदखान! कुच तर्कीब ले के आया है. "<br /><br /> हा आता आणखी काय दगडाची तरकीब सांगणार होता कुणास ठाऊक! पण म्हटले, सांग बाबा ! त्याच्या तरकीबीने क्रेनचा द्राविडी प्राणायाम वाचणार असेल तर तो मला हवाच होता. मग त्या दोघांचा अरवी भाषेत एक लडिवाळ संवाद झाला आणि कादरखान मला ती तरकीब सांगू लागला. ती अशी होती की, केबल ओढणारे यंत्र सुटे करून घ्यायचे. साईटवरच्या भांडारात एक भली मोठी पोलादी दोरी (sling) होती ती या यंत्राच्या आणि अपघातग्रस्त यंत्राच्या मधे बांधायची आणि या यंत्राने ते यंत्र (बुलडोजर) ओढून धरायचे. ते पुरेसे वरती उचलले गेले की निर्माण होणाऱ्या सांपटीत विटांचा केबलवर संरक्षक थर टाकायचा आणि नंतर ती पोलादी दोरी काढून घ्यायची. केबलवर विटांचा संरक्षक थर दिला तर बुलडोजर चालू करून बाहेर काढून घेता येणार होता. मी जरासा विचार केला, कल्पना चांगली आहे, पण जरा धाडसाची आहे. केबल ड्रम उतरवणे आणि पुन्हा वर चढवणे कष्टाचे होते. पण केबल कमी झालेली असल्याने त्याचे वजनही कमी झालेले असणार हा युक्तिवाद बरोबर होता. ते कष्टाचे काम पठाण विनातक्रार करतील असा भरवसा कादरखानाने दिला. मी त्या योजनेला मान्यता दिली. ही सारी मोहीम कादरखानाने राबवावी, मी इतका थकलो आहे की मी तिथे येणारही नाही या माझ्या म्हणण्यालाही कादरखानाने मान डोलवून मान्यता दिली.<br /><br /> त्यानुसार जमवाजमव करून कादरखानाने मोहीम फत्ते केली तेंव्हा झालेल्या जल्लोषाच्या आवजाने मी त्या जागेवर गेलो. त्या महंमदखानाने खरोखर मला एका फार मोठ्या त्रासातून वाचवले होते. त्याने अभिमानाने हस्तालोंदनासाठी हात पुढे केला तर मी त्याला मिठीच मारली. पठाण जल्लोष करीत माझ्याभोवती नाचत होते. कळत नकळत मीही त्यांच्या समवेत नाचत होतो. पठाण ’बक्शीश, बक्शीश !’ ओरडत बक्षीस मागू लागले, त्यासरशी मी खिशातून माझा बटवा काढून त्यांत होत्या नव्हत्या तितक्या नोटा काढून महंमदखानाकडे भिरकावल्या.<br /><br />राम राम हो मनोगतवाले,<br /><br />आशे काय पाहून राह्यले माह्याकडे बाप्पाहो तुमी? काय पेहचान नै लागून राह्यली माह्यी तुम्हाले? <br />नाचीज़को वसंत गडकरी......! छोडो बाश्शाहो ! थे भोट्या ऐकंन तं माह्या कानाखाली जाय काढाले धावंन. <br />एक तं याले उर्दू काई हजम होत नाही आन् कोनी बोल्लं तं याहीचा भेजा सरकते. <br /><br />पण कांही म्हना देवाहो, याहिचा भेजा म्हंजे बिलकुल मसाला पट्टी. तब्बेतीनं ज़ायका घ्यावी अशी. सुपारी गिकारी, चुना गिना एकदम् कायदेसे. हा पैदा होनेके वखत, देवाने याच्या वासते भेजा तयार केला, तं हा भिडू, देवाले भेजाचा सेप्सिकेशन (specification)विचारून राहला. आता देव काय देतो, थे गलत राह्यते कां बाप्पा ? पन भोट्या काई सीधी बात मानंन तं त्याहिचे पितर नाही उद्धरणार ? देवाले आला गुस्सा. त्याहिनं याचा भेजा फ्राय केला आन् टाकला याच्या गाडग्यात. आन् मंग काय होते? हे अस्ले ऐबी नमूने पैदा होतेत. नै तं काय होते!<br /><br />बाप्पाहो, तुमी तं खाली माह्यी बातच सुनून राहिले. काई विचारून तं नैच राह्यले. का आता मी कोन अन् थे भोट्या कोन. थे भोट्या? याने मतलब? दुबईत याहीने काय झमझमा केला थे सांगून नै राह्यला का तुम्हाले? <br /><br />दुबई?<br /><br />काय सांगावं राजेहो, तुम्हाले! पोट्टा कोठे गेला तं दुबईत गेला, असंच सांगावं लागते इंडियातले मान्सान्ले.<br />थे बहरीन गिहरीन, सौदी गैदी, कांही समजतं का आपल्या मानसान्ले? एक पोट्टा ’रास-अल्-खयमा’ ले गेला. तं त्याहिची माय पडोशान्ले सांगे, का, माहा पोट्टा ’रस्सा खीमा’ गेला. काय समजतीन पडोसी बापडे? थे समजले कां पोट्टा हररोज खीमा रस्सा खाऊन ऐश करून राह्यला. आन् मायले तं खायाले आलूची तरकारी मुश्किल झाली.<br /><br /><br />माले एक सांगा बाप्पाहो तुम्ही, तुमचा पोट्टा का पोट्टी अमेरिकेत गेली, तं काय सांगता तुम्ही ? अमेरिकेला गेली अशेच ना? नेमका कोठे गेला हे सांगता का ? थो सदाशिवपेठ्या पेशवा सांगे का त्याहिची चुलती स्टेट्स मधे राह्यते. आता ही माय इश्टेट्मधे राह्यते का मकानीत राह्यते, मालूम करून काय करू मी! अरे, पन थी राह्यते कोण्या देशात? बरं याले तसं इचारलो तं माह्याकडे असा पाहे कां गयात कवड्याची माळ आन् डोक्याले पिसांची टोपी पहेनून राह्यलो मी!<br /><br />तं काय बोलून राह्यलो मी तुम्हाले?<br /><br />हां, तं या भोट्याले परवा फोन केला तं सांगे का, तुम्हाले दुबईतला झमझमा सांगून राह्यला. नाही कां ? <br />लेकिन सच बोले तो, या भोट्याले रायटिंगचा भल्ला कंटाळा. याले शायेत मास्तरनं ’मी पाहिलेली मुंबई’ असा निबंध ल्येहे म्हून सांगितलं तं या गैब्य्यानं भुसावळ पासून बोरीबंदर पोत्तो स्सग्ळ्या ठेसनांची सिरिफ नांवं लिहून काढली आन् मास्तरांची कानाखाली खाल्ली. आन् हा भोट्या, हकीकती लिहून राहिला ? हां आता आदमी बुढाप्यात काई पागलपना करते खरा. पण रायटिंग स्टोरीज ? या भोट्याले हिफाज़तीनं घ्या बाप्पाहो.<br /><br />पण या भोट्याले फोका मारायची भल्ली आदत. आदमी एकदम सोला आना! पण त्याहिच्या जबानीचा लगाम जरा ढिल्ला राहून गेला. साला राईसपलेट खाऊन येईन. लेकिन तरफदारी अश्शी पेश करीन का जसा कांही हा ताजले नही तो शेरेटनले ब्यांकेट खाऊन आला. या भोट्याले मी भोट्या का म्हन्तं मालूम? स्सांगतो. ऐका.<br /><br />बचपनीत या भोट्याले याच्या मायनं एक रोज़ बझारमधून पावशेर घी आणायला सांगलं. आता हा कां शिद्धा घी आणीन ? याले पंचाईतीच फार. सुटला याले त्याले पुसत, बेहतरीन घी कोठे भेटेल म्हणून. आन् कोणीतरी याचा केला मामा. याले खबर देल्ली का नंदू हलवाया कडे भेटेन बेहतरीन घी. आता नंदू हलवाई होता दोन कोस दूर. भोट्यानं केला टांगा. झेऊन आला बेहतरीन घी. सहा रुपैयाचा घी, आन् नऊ रुपैये देल्ले टांगेवाल्याले! आता याले भोटमामा म्हणावं नै तं काय अकबर बाश्शा म्हणावं. आन् ही ष्टोरी भोट्यानं मला तं सांगितलीच पण त्याच्या पोट्या पाट्ट्याले बी मालूम पडली. बेशरमीकी हद हो गयी और जनाब उसके झंडे लेहरा रहे है.<br /><br />आता तुम्हीच सांगा जनाबे अलि, थ्या पठानाने काय तर्कीब गिर्कीब सुचवली आन् फत्ते भी केली. तं काय तुम्ही जेबातल्या नोटा गिटा उधळान् कां. पण भोट्याले हे सांगावं कोणी ? तुम्ही तरी सांगा त्याले बाप्पाहो. थ्या टायमाले जवानीत काय दिल्लगी केली ती केली, आता बुढाप्यात भी अशी दिल्लगी हा करीन तं पोट्ट्यांचे पोट्टे पाट्टे मजाक करतीन याचा. <br /><br />बाप्पाहो, भोट्या आदमी सोला आने है. तुम्ही छू म्हट्ले कां छाती फोडून धावन् असा ईमानी आहे. बेट्यानं बहोत पापड बेले जिंदगीभर. आता थे भुनून खाऊ घालून राह्यला तुम्हाले. काय गलती गिलती केली तं माफ राजे. थ्या वक्ती भोट्या नसता भेटला तर हा डोंगऱ्या (नाचीज़की डोंगऱ्या नामसे भी पेहचान है) तुम्हाला भेटला नसता. या एकदा नागपूरले. संत्री गिंत्री खाऊ. कन्हानचे पाणी पिऊ. <br /><br />राम राम !<br />आखाती मुशाफिरी (१२)<br />अरुण वडुलेकर मंगळ, ०६/०३/२००७ - १५:३७. » कथा | अनुभव <br />मी खिशातून माझा बटवा काढून त्यांत होत्या नव्हत्या तितक्या नोटा काढून महंमदखानाकडे भिरकावल्या.<br />___________________________________________________________<br />वीजवाहिनी टाकण्याचे काम जसे अखेरच्या टप्प्यांत आले तशी पठाणांची कामाची लगलबग वाढूं लागली. काहीं पठाण उरलेले काम संपवण्याच्या मागे लागले तर कांहीनी आवरासावरीला सुरुवात केली. मी या कामावर तसा बराच उशीरा दाखल झालो असलो तरी पठाण या कामाच्या सुरुवातीपासून होते. त्यामुळे आवरासावर कशी करावयाची हें माझ्यापेक्षा त्यांना अधिक चांगले ठाउक होते. खरं म्हणजे या कामावरची माझी नेमणूक अगदी अंशकालीन असावयाला हवी होती. पण माझ्या देखरेखी खाली काम जरा सुरळीत चालली आहे म्हणतांच त्यात बदल झाला नाही आणि मीही असा कांही रमत गेलो की मलाही बदल व्हावासा वाटला नाही. <br /><br />कामाची मोहीम ज्या गांवासाठी सुरू होती तें जसजसे जवळ येत चालले तसतशी कांही गांवकऱ्यांची तुरळक वर्दळही सुरू झाली. एकतर येथील स्थानिक लोकांना काम नसायचे. फार पूर्वी हे अरब बहुतेक भटके असायचे. कांही फिरस्तीचा व्यापार उदीम करायचे तर कांहीची गुजराण चांचेगिरीवर चालायची. सोळाव्या शतकाच्या आरंभास औद्योगिक क्रांती झाली आणि उद्योगासाठी, दळणवळणाच्या साधनांसाठी इंधनाची गरज निर्माण झाली. ते भूगर्भात तेलाच्या स्वरूपात मिळू शकते हे समजल्यावर तशा भूगर्भीय भूखंडांचा शोध घेतला गेला. सुरुवातीस तसें भूखंड दक्षिण अमेरिकेत सांपडले. पण त्यातून निघणार तेल, ते काढण्यासाठीं झालेल्या खर्चाच्या मानाने परवडण्यासारखें नव्हते. मग तेलाचा शोध सुरू झाला आणि वालुकामय तसेंच आखाती देश हे सोन्याची लंका ठरले. सर्वप्रथम ब्रिटिश, त्यांच्या पाठोपाठ फ्रेंच, त्यानंतर अमेरिकन असा तेलासाठी ओघ सुरूं झाला. त्यांनी तेलाच्या विहिरी जमिनीत खोदल्या तशा त्याहीपेक्षा फार मोठ्या प्रमाणांत किनाऱ्यालगतच्या सागरी पट्ट्यात खोदल्या. स्वत: मलई खाल्ली आणि ताकाची फुळकावणी या अशिक्षित मागास स्वकीयाच्या पदरांत पडली. पण ती फुळकावणीही या बुभुक्षितांना इतकी सकस आणि चविष्ट वाटू लागली की यांना उपजीविकेसाठीही श्रम करण्याची गरज उरली नाही. कालांतराने हे देश स्वायत्त झालें तें केवळ राजकीय नकाशावर. भौगोलिक आणि सामाजिक रेषा जराही इकडच्या तिकडे झाल्या नाही. सगळा देशच प्रकल्पग्रस्त आणि सारे स्वकीय समाज शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्यावर पोसलेला. देशांवर सत्ता तशी तेथील शेखांची. पण ती नामधारी.<br />हिन्दुस्थानांत इंग्रजांनी व्यापाराच्या मिषाने प्रवेश केला आणि देशांतील राजसत्ता हळूहळू बळकावण्याचा प्रयत्न केला. पण आखाती देशांत त्यांनाच काय पण अन्यही गोऱ्यांना,प्रत्यक्ष राजसत्ता स्थापन करण्यात फारसे स्वारस्य नव्हते. अरबांना ऐशोआरामांत चैनीत आकंठ बुडवून ठेवले की मग ही मंडळी स्वत:च्या तुंबड्या भरायला मोकळी होती. या गांवातील परिस्थिती यापेक्षा कांही वेगळी नव्हती. गांवात, लाक्षणिक अर्थाने म्हणावेत असें बारा बलुतेदार होते पण ते अरबी नव्हेत. इतर देशातील. तेथील राजवट नस्लखोर (जातिवंत) अरबांना उदर निर्वाहासाठी तर तनखे पुरवीत होतीच इतरही सण समारंभांना भरघोस धन पुरवीत असे. अरबांने शादी केली, द्या दोन लाख डॉलर्स. त्याला मुलगा झाला, द्या पांच लाख डॉलर्स. राजाच्या-शेखच्या नातवाचा विवाह झाला, द्या माणशी हजार डॉलर्स. असली खैरात झाल्यावर काम कोण हरीचा लाल करील! आणि मग असें रिकामटेकडे संधी मिळेल तसें आमच्या कामाबद्धल कुतुहल दाखवीत कांही बाही प्रश्न विचारून भंडाऊन सोडीत. त्यांना तोंड देणे म्हणजे एक कठिण काम असे. त्यातले बहुतेक वात्रट असत मात्र कांही सज्जनही असत. <br /><br /><br />पठाणांनी दिलेल्या दावतीची खबर जेंव्हा मुख्यालयाला लागली होती त्यावेळी या पठाणाच्या घोळक्यात मुख्यालयाने एखादा हेर किंवा खबरी पेरून ठेवला असावा मला एक संशय आला होता. पण, माझा स्वभाव मुळातच थोडा भित्रा. अर्थात् अशा शंका मला नेहमीच येत आणि सहसा त्याची जाहीर टवाळी होत असें. त्यामुळे अशी शंका आली की लगेच ती अंगावर पडलेल्या पालीसारखी झटकून टाकायची मी स्वत:ला संवय लावून घेतली. पण हातातील काम संपवून त्या पुढील काम दुसऱ्या विभागाला सोंपविण्याची कार्यवाही सुरु असतांना मला अचानक मुख्यालयातून बोलावणे आले. तेंव्हा मात्र मनातली संशयाची सांवली गडद झाली. कारण मुखालायाकडून भेटीच्या कारणाचा स्पष्ट निर्देश मिळालेला होता आणि तो म्हणजे कालचा बुलडोजरचा अपघात. वास्तविक मी माहिती देई पर्यंत घडला प्रकार मुख्यालयापर्यंत पोहोचण्याची सर्वसामान्य शक्यता नव्हती. पण ती पोहोचली होतीच.<br /><br />काल साय़ंकाळी परममित्र वसंत गडकरी आणि माधव महाबळ सहजच म्हणून माझ्या निवासावर आले होते आणि गप्पांच्या ओघात साईटवर झालेला महंमद खानाचा पराक्रम मी फुशारकीने सांगितला होता. अपेक्षेप्रमाणे वसंतराव भडकले होते आणि माधवरावांनी त्यांचे ’ गोष्टी सांगेन युक्तिच्या चार ’ हे ब्रीद सांभाळीत आमचे कान उपटले होतेच.<br /><br />" भोट्या, हे फजूलचे झमेले कायले गयात घेतं बे? मरेना जाईना थो बुल्डोजर. थे म्हमद्या का कोन काय, थे तुले काय बी सांगतं, आन् तू बेट्या बैलावाणी गयातली घंटी वाजवीत राह्यतं. तू कोन बे, त्याहिले ऐसी हिकमत कराले देनेवाला?आन् मोठा बाश्शा झाला बे तू. पैशांची खैरात करून राह्यला. पैशे का तुह्या बापाचेहे रे? थे वैह्नीले आन् पोट्ट्यान्ले काय जबाब देशीन बे?" .......अशी वश्याने तासली.<br /><br />आणि नंतर माधवरावांची मियॉंकी तोडी, " चिरंजीव, याला म्हणतांत अव्यापारेषेषु व्यापार. त्या पठाणांच्या बाबतीत आपण नेमस्त रहावें हें उत्तम. आपला मैत्रभाव, माणुसकी हें ठीक आहे. पण अतिपरिचयात् अवज्ञा होतें." आता या तीन वाक्यांत उच्चारित, अनुच्चारित, अध्याहृत असे सगळ्याप्रकारचे अनुस्वार घालून तें वाक्य पुन्हा मोठ्ठ्याने म्हणून पाहावे म्हणजे माधवरावांचे व्यक्तिमत्व (प्रोफाईल) <br /><br />तर झाल्या प्रकाराचे पडसाद काय नि कसें उमटतील अशा विचारातच मी मुख्यालयात पोहोचलो. माझ्यावरील अभियान मुदीर साहेबांच्या कक्षांत सुरू झाले. बर्नार्ड साहेबांनी माझ्यावरील आरोप पत्र वाचून दाखवले. त्याला त्यांनी जवळ जवळ एक तास घेतला. त्या साठ मिनिटांच्या भाषणातून मला फक्त साठ सेकंदाचे भाष्य समजले. बर्नार्ड साहेबांचे आरोपपत्र वाचन चालू असतां मुदीरसाहेब त्यांना एकटक निरखीत होते. त्यांच्या चर्येवरून त्यांना हा फार्स फारसा आवडलेला नाही हे दिसत होते. पण ज्या शासनप्रणित कंपनीकडून ही कामाची कंत्राटे मिळाली होती, त्या कंपनीचा मुख्य साहेब एक ब्रिटिश होता आणि या बर्नार्ड साहेबांचा तिथे चांगला प्रभाव होता. त्यामुळेच तर ही कंत्राटे मिळालेली होती. तेंव्हा त्यांचे ऐकून घेणे मलाच काय पण मुदीरलाही भाग होते. ज्या खटल्याचा निकाल, खटला उभा राहण्याच्या आधीच लागलेला होता, तो लागला. उद्या मला तुरुंगात पाठवले जाणार होते. <br /> <br /> क्रमशः<br />उद्या मला तुरुंगात पाठवले जाणार होते. <br />--------------------------------------<br /><br /> मार्स्टर्न साहेबांनी चौकशीचा जो कांही फार्स केला त्याचे मला कांही नवल वाटले नाही. तो माणूस तसा कोणालाच आवडत नसे. दिवसभर वातानुकूलित कक्षांत खुर्ची उबवत बसणे आणि कोणत्याही कामांत विनाकारण लक्ष घालून चमत्कारिक निर्णय देऊन चालत्या गाडीला खीळ घालणे हे त्याचे उपद्व्याप. खरं पाहता मुदीर म्हणजे सर्वेसर्वा असतो. कंपनीचा मालक-शेख कधीही कामकाजांत अथवा निर्णय प्रक्रियेत लक्ष घालीत नसें. एकतर तो आणि त्याचा ज़नानखाना कांही सणावारापुरतेंच कतारमध्यें वास्तव्याला असत. एरवी इंग्लंड फ्रान्स अशा देशांत मौजमजा करीत कालक्रमणा करीत असें. सर्व प्रकारची मुखत्यारी (power of attorney) मुदीरला दिलेली असें. मुदीर जर मनांत आणतां तर या मार्स्टर्न साहेबालाही इंग्लंडला परत पाठवू शकला असता. पण तसें करणे तर दूरच, मुदीर मार्स्टर्न साहेबाला, त्याच्या मनमानीला किंचितसाही विरोध करू शकत नव्ह्ता. कारण मार्स्टर्न शेखच्या खास मर्जीतला माणूस होता. आणि ती मर्जीही अशा करतां कीं मार्स्टर्नची बायको इंग्लंडला एक यशस्वी पर्यटन व्यवस्थापक (travel task master) म्हणून व्यवसाय करीत होती आणि शेखच्या सर्व पर्यटनांची व्यवस्था ती बघत असे. पण तें कांहीं कां असेना, मुदीरचे तटस्थ वागणे मला आवडले नाही. कदाचित् हा मामला त्याच्या दृष्टीने फार किरकोळ असेल. म्हणून तो कांही बोलला नसावा अशी मी मनाची समजूत करून घेतली. शेवटी ’याला आता तुरुंगात जाऊ देत’ असें मुदीर म्हणाला तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक मिस्कील स्मित मात्र नक्की होते. <br /><br /> उद्यापासून मला स्थानिक करागृहावर जावे लागणार होते. ज्या पद्धतीने ही बदली झाली होती ती उद्वेगजनक होती. गेले तेरा चौदा दिवस त्या पठाणाच्या सहवासांत काढलेले होते. आत्ता कुठें त्यांच्याशी मैत्री होऊ लागली होती. मी सदा माणसांच्या काळपात रमणारा माणूस होतो. पठाणांच्या सहवासात मी रमलो होतो. शिवाय त्या कार्यस्थळावर मी एकटा राजा होतो. एक मुदीरचा अपवाद सोडला तर बाकी कुणीही तिथे येऊन कामांत ढवळाढवळ केली नव्हती. नाही तर एरवी शहरालगत काम असले कीं कोणी ना कोणी येऊन फालतू चौकशी करणारच. आम्हा भारतीयांची संभावना, मग तो इंजीनियर कां असेना, चतुर्थ श्रेणी कामगारासारखी केली जायची. त्यामुळे मुख्यालयातून आलेला प्रत्येकजण जमेल तितकी टर्रेबाजी करण्याची संधी सोडीत नसें आणि आम्हाला मात्र नम्रपणे उत्तरे द्यावी लागत. ’ समर्थाचिये घरचे श्वान, त्यास सर्वही देती मान’ ही उक्ती मनांत ठेवावी लागे.<br /><br /> हे नव्याने जें काम मला दिले जाणार होते त्यात अशा आगंतुकांचाच काय पण कोणाचाच त्रास होणार नव्हता. कारण तेथील स्थानिक कारागृहांतील सध्याची वातानुकूल करणारी यंत्रणा काढून टाकून नवी यंत्रणा बसविण्याचे काम करावयाचे होते. हे काम आम्हाला (कंपनीला) मिळावे म्हणून मुदीर हरतऱ्हेने प्रयत्न करीत होता हे मला माहिती होते. या कामासाठी कॅरियर, मित्सुबिशी अशां सारख्या मातब्बर कंपन्यांनी निविदा दिलेल्या होत्या. पण तें काम आम्हालाच मिळाले होते याचा मलाही आनंद वाटत होता. कारागृहाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काम करतांना अनेक बंधनात राहून काम करावे लागणार होते. तसें हें काम बऱ्यापैकी मोठे होते त्यामुळे निदान चार आठवडे तरी हा कारावास मला भोगावा लागणार होता. कारावासांत फारसे कैदी नसणार हे मी ऐकले होते पण कारागृहातील अधिक्षक, कर्मचारी यांच्या कथा मी ऐकून होतो. आरक्षी (पोलीस), जेलर, सैनिक वगैरे पदांसाठी सहसा येमेन, सूदान, इथिओपिया अशा देशातून आयात केलेल्या कृष्ण्वर्णीयांची भरती केलेली असें. या लोकांचे एकूणच रंग, रूप, देहयष्टी दहशत वाटावी अशी असें. त्यांच्या तावडीत जो सांपडला तो त्यांच्या लहरीपणाची आणि क्रौर्याची शिकार झालाच म्हणून समजा. अर्थात मला त्याचा त्रास होण्याची शक्यता नव्हती कारण आमच्या कंपनीचा शेख राजघराण्याशी संबंधित होता. त्यामुळे आम्हाला सार्वत्रिक वागणुक जरा आदरयुक्त मिळे. आम्हा सर्वांच्या मोटारीवर कंपनीचे नांव ठळकपणे रंगवलेले असें. त्यामुळे वाहतुक शाखेचे आरक्षी देखील आम्हाला विनाकारण अडवीत नसत. पण तरीही या नव्या राक्षसांसमवेत उद्यापासून काम करावयाचे होते. याचे थोडे दडपण मनावर आले होते. हे असें विचार घोळवीत माझी मोटार निवासापर्यंत कशी आली मला कळलेही नाही.<br /><br /> घरी येऊन जरा विसावतो न विसावतो तोच दूरध्वनी घणघणला. खरं म्हणजे मी आता इतका थकून गेलो होतो की आता अंघोळ आणि जेवण करून मी झोपी जाणार होतो. अगदी अनिच्छेने मी रिसीव्हर उचलला. क्षणभर माझ्याच कानावर माझा विश्वास बसेना. फोनवरचा आवाज मुदीरचा होता. माझी नजर सहजच घड्याळाकडें गेली. संध्याकाळचे आठ वाजत होते. इतक्या उशीरा नेहमीचा शिरस्ता मोडून मुदीर सारख्या आसामीने मला फोन करावा हे आक्रीत होते. <br /><br /> मुदीरने उद्या सकाळी सहा वाजतां मुखालयांत बैठक आयोजीत केली होती आणि तो मला प्रत्यक्ष बैठकी पूर्वी मी त्याला त्याच्या दालनांत भेटणार होतो. शेखच्या आणि मुदीरच्या दालनांची ख्याती आम्ही किंवदंतीच्या स्वरूपात अनेकांच्या तोंडून ऐकली होती. त्या दालनांचे स्थापत्य विशारदांनी चितारालेली आरेखनांच्या प्रती (architectural drawings) मी वतानुकूल अघियंता या नात्याने मी पहिलेली होती त्यामुळे मला दालनांच्या भूमितीची थोडी माहिती होती. एकट्या मुदीरचे दालन सुमारें सोळा हजार चौरस फुटांचे होते. दोन अभ्यागत कक्ष, दोन मजलिस (conference room) एक त्याचे स्वत:चे शिवाय त्याच्या सचीवांसाठी एक वेगळे कार्यालय. असें प्रशस्त आणि अत्यंत सुसज्ज असा मुदीरचा महाल होता. अशा काऱ्यालात मला उद्या जायला मिळणार ही कल्पनाच इतकी सुखद होती की कांही वेळेपूर्वीची उद्विग्नता कुठच्या कुठे पळून गेली. प्रत्यक्ष मुदीरची भेंट आणि तीही त्याच्या दालनांत! या अलभ्य लाभाच्या योगायोगाचे मला नवल वाटले.<br /><br /> आता हें सारं आक्रित माझ्या वीतभर पोटांत मावणे शक्य नव्हते. हे आता सडेफटिंग युनियनच्या कानावर न घालणे दंडनीय अपराध झाला असता. आणि दंड म्हणजे या महाभागांना एखाद्या मोठ्या उपाहारगृहात नेऊन जेवण द्यावे लागले असते. निवासी फोन केवळ पेशव्यांकडे होता. त्यांना फोन लावला तर समजलें की स.फ.यू. माझ्याच फोनची वाट होती. किशाच्या कंपनीतला कोणीतरी सुटीवर भारतांत जाऊन परत आला होता आणि सोलापूरहून किशाच्या घरून बेसनाचे लाडू, शंकरपाळे आणि चिवडा घेज़ुन आला होता. अशा गावाकडून येणाऱ्या खाऊच्या गाठोड्या जो आनंद देत असत तो अवर्णनीय असें. हा अनुभव घ्यायला परदेशीच जायला हवें. सगळा अनुत्साह मी कोपऱ्यात भिरकावून बेसनाचे लाडू खायला निघालो. तुकाराम महाराजांच्या ’शेवटचा दीस गोड व्हावा’ या अभंगात थोडा बदल करून मी म्हणत होतो ’दिसाचा शेवट तरी गोड व्हावा’. <br /><br />क्रमश:<br />उद्या मला तुरुंगात पाठवले जाणार होते. <br />---------------------------------- <br /><br /> रात्री किशाकडे लाडूचिवड्याचा फराळ तर झालाच पण मग जेवण्याचा आग्रहही झालाच. मग गप्पा आणि रमत गमत चाललेले जेवण यांत रात्रीचे दोन कधी वाजले तें समजलंच नाही. आता घरी कशाला जातोस, झोप इथेच असा आग्रह झाला नसता तरच नवल होते. पण माझ्या डोळ्यासमोर मुदीरचा मिस्किल चेहरा आला. उद्या सकाळी सहा वाजता त्याला भेटायचे होते. सहा म्हणजे अगदी सहा. इथे, मला एक अनुभव आला. व्यापार-उदीमावर आणि शासनावरही अद्याप ब्रिटीशांचा जबरदस्त प्रभाव असल्यामुळें वक्तशीरपणावर कटाक्ष असायचा. अगदी सुरुवातीच्या काळांत मला एकदां डेनिस हर्ले नांवाच्या ब्रिटीश अधिकाऱ्याची सकाळी नऊ वाजतां भेंट घ्यावयाची होती आणि मी जरा उशीराने, म्हणजे साडेनऊ वाजतां पोहचलो तर स्वारी दुसरीकडे निघून गेलेली होती. तेंव्हापासून मी वक्तशीर पणा कसोशीने पाळू लागलो. मला घरी जाऊन थोडी विश्रांती घ्यायला हवी होती. तरच उद्या सकाळी मी मुदीरच्या भेटीसाठी ताजा तवाना असणार होतो. मी निवासावर आलो आणि तात्काळ झोपी गेलो.<br /><br /> सकाळी सहाच्या आधी ठीक दहा मिनिटे आधी मी मुदीरच्या कक्षापाशी पोहोचलो. नेहमीचे कार्यालयीन कामकाज सात वाजतां सुरु होत असे. मी एक तास आधी आलो असल्याने मुदीरची स्वीय सहायिका तिच्या जागेवर भेटणार नव्हतीच. काय करावें, सरळ मुदीरच्या कक्षात जावें की न जावें या विचारात असतांनाच पाठीवर एक दणदणीत थाप पडली.दचकून वळून पाहातों तो मुदीर! मला या माणसाची मोठी मजा वाटली. आतिशय कर्तव्यकठोर, कडक, रुक्ष अशी याची प्रतिमा रंगवली गेलेली होती. आणि इथे हा कांही निराळाच दिसत होता. आम्ही दोघे त्याच्या स्वीय कक्षांत जातांच सर्वप्रथम या माणसाने कार्यालयाच्या कोपऱ्यातील छोटेखानी अन्नपूर्णा (cafeteria) मधील कॉफी यंत्र सुरु करून दोन प्याले कॉफी करून आणली आणि मग कॉफीचे घुटके घेत घेत संभाषणाला सुरुवात झाली. आधी तो त्याच्या स्वत: बद्धल आणि मग कारागृहाच्या कामाबद्ध्ल बोलला.<br /><br /> तो आर्मेनियन होता. पण बरीच वर्षे इंग्लंडमधे होता. तेथूनच त्याने व्यवसाय-व्यवस्थापनाची पदवी मिळवली होती. अरेबिक, पर्शियन आणि आङ्ग्ल वाङ्ग्मयाचा व्यासंगी वाचक होता. भारताबद्धल, भारतीय संस्कृती बद्धल कुतुहल होते. त्यामुळेच तो माझ्याशी ममत्वाने वागत होता. त्यांच्या प्रमाणे मी रोज नमाज़ (प्रार्थना) पढतो की नाही आणि पढत असेन तर कसा याबद्धल त्याला जिज्ञासा होती. त्याच्या निवासावर तो एकदा मला नेणार होता आणि मी त्याला हिन्दी (हिन्दू) नमाज़ पढून दाखवणार होतो. <br /><br /> कारावासातील वातशीतक यंत्रांचे काम वस्तुत: एका जपानी उद्योग समूहाकडे जाणार होते. मुदीरने मोठ्या युक्तीने मिळविले होते. त्यामुळें ते व्यवस्थितपणे पार पडणे हा त्याचा प्रतिष्ठेचा मुद्दा होता. वीजवाहिनी टाकण्याच्या कामांतील माझा सहभाग आणि माझी कामाची पद्धत त्याला आवडलेली होती. मी कार्य-व्यवस्थापनाचे (works management) विधिवत् शिक्षण घेतले असावे असा त्याचा समज होता. म्हणूनच ही नवी जबाबदारी मी नीट पार पाडेन असा त्याला विश्वास वाटत होता. पण तसें कांहीही नव्हते उलट मी भोळा, भित्रा (timid) आहे अशी माझी ख्याती होती. डोंगऱ्याने तर मला ’भोटमामा’ अशी उपाधी दिलेली होती. त्या कृष्णवर्णीय कारागृह अधिक्षकांचे सहकार्य मिळवून तें काम पार पाडणे अवघड होते. पण मी जर पठाणांना कामासाठी हवे तसें वळवू शकलो तसा या अर्ध-यवनांनांकडून (half mohomadian) देखील सहकार्य मिळवू शकेन असें त्याला वाटत होते. मुदीर मला शक्य ते सहकार्य़ करणार होता. पण ते काळे होते आणि हा त्यांच्या दृष्टीने गोरा होता. म्हणजे त्या वर्णद्वेषाला तोंड देत देत मी काम करणार होतो. मीच तें काम यशस्वीपणे हाताळू शकेन असें त्याला ठामपणे वाटत होते. मी ते काम तडीस नेले तर मला एक रोख रकमेची खास बक्षीसी मिळणार होती. मुदीर माझी जी स्तुती करीत होता ती मनापासून होती की स्वार्थापोटी होती कुणास ठाऊक. मला मात्र त्या भल्या रामप्रहरांत घाम फुटायला लागला होता. मी मुदीरच्या मोटारीत बसून कारागृहाकडे निघालो तेंव्हा बळी जाणाऱ्या बोकडाला जसें खाऊपिऊ घालून वर सजवतात तसा मी एक बोकड आहे असें मला वाटायला लागले. <br /><br /> कारागृहापर्यंत पोहोचेपर्यंत भांबावलेल्या मन:स्थितीतच होतो. राहून राहून एकच विचार मेंदू पिंजून काढीत होता तो म्हणजे ही असली ससेहोलपट माझ्याच वाट्याला कां यावी. माझे बाकी मित्र त्यामानाने बऱ्यापैकी स्वस्थतेची नौकरी करीत होते. बाकीचे इथें आले तसें छोट्या नाजुक मोटारी चालवीत होते. माझ्या वाट्याला पहिले वाहन आले होते, ते म्हणजे लॅन्डरोव्हर नांवाची युद्धांत वापरली जाते तशी मोटार. ती मी पहिल्यांदा पाहिली तेंव्हा मला माझ्या लहानपणी हनुमान जयंतीला गांवाबाहेरच्या एका मोठ्ठ्या पटांगणांत रेड्यांच्या टक्करी होत, त्या आठवल्या. त्यातला धष्ट पुष्ट माजवलेला आणि मद्य पाजून टक्करीसाठीं चेव आणवलेला, नाक आकाशाकडे करून फुरफुरणारा रेडा आणि ही लॅन्डरोव्हर ही दोन्हीही ब्रह्मदेवाने एकाच मुशीतून काढल्या असाव्यात. ती लॅन्डरोव्हर काय आणि आता हे कारागृहाचे काम काय, माणसांना भेदरवून टाकणाऱ्या यच्चयावत् गोष्टी माझ्यासाठींच जन्माला आलेल्या असाव्यात. <br /><br /> ’भित्यापाठीं ब्रह्म राक्षस’ ही म्हण सार्थ व्हावी अशी घटना कारागृहाच्या तोंडाशीच घडली. आम्ही दोघी एका महाकाय बंद दरवाजापाशी पुरतें पोहोचण्यापूर्वीच, <br /><br /> " हेय् ! व्हाऽट्ड्या ठिंक यूऽआऽऽ डूऽईंऽग हिय्आऽऽऽऽऽ?" <br /><br /> असा एक ध्वनिस्फोट कानावर येऊन आदळला. आवाजाचा उगम, एक सुमारें सव्वासहा फुटी, गडद काळपट निळ्या गणवेशांत अगदी फिट्ट बसवलेली काळी कभिन्न देहाकृती होती. तो तेथील सर्वप्रमुख अधिक्षक होता आणि आम्हाला पाचारण करण्यासाठीं स्वत: जातीने बाहेर आला होता. या माणसाचे नांव ’इदी जमील थुंबाना’ होते. खरं म्हणजे, जमील या शब्दाचा अर्थ ’सुंदर, सौंदर्य’ असा होतो पण इथें याच्या शेजारी उभा केला असता तर आपला धर्मेंन्द्र अगदी मदनाचा पुतळा दिसला असतां. त्याचे डोळे, नाक, गाल, ओठ जितके जाड होते तसा त्याचा आवाज आणि स्वरही तितकाच जाड होता. मुदीरची आणि त्याची थोडावेळ अरबी भाषेंत बातचीत झाली. मग त्याची नि माझी रीतसर ओळख झाली. मग त्याच्या कार्यालयांतील इतर लोकांची ओळखदेख झाली. मी, तसेंच उद्यापासून माझ्या देखरेखीखाली काम करण्यासाठीं मला देण्यात येणारे चार कर्मचारी यांच्यासाठीं आवश्यक ती कागदपत्रें, ओळख पत्र इत्यादि देण्यात आले. एव्हाना सकाळचे नऊ वाजत आले होते. आमच्या परतीच्या प्रवासांत मी सहज म्हणून तो कागद पत्रांचा लिफाफा उघडून, उद्यापासून मला सहाय्य करणाऱ्या चारही कर्मचाऱ्यांची नांवे वाचू लागलो तर आश्चर्याचा सुखद धक्का बसला.<br /> ती चारही नांवे मराठी होती. सावंत, सुर्वे, कांबळी आणि महाडिक. म्हणजे चक्क कोकणी ’गांवकर’! मी हळूंच मुदीरकडें पाहिले. मुदीरच्या चेहऱ्यावर तेंच मिश्किल हसूं होतें. या माणसाच्या व्यवस्थापन कौशल्याला मी मनोमन सलाम ठोकला.<br /><br /> मुख्यालयांत येईपर्यंत जेवणाची सुटी होत आली होती. आतां दुपारच्या वेळांत उद्याच्या कामाची आंखणी करावी. साधने, सामुग्री यांची पहाणी करवी असा विचार करीत असतांनाच मुदीर म्हणाला " जा आतां घरी जाऊन मस्त झोप. विश्रांती घे. उद्यापासून तूं गजाआड असणार आहेस." असं म्हणून तो गडगडूम हसला. आता मात्र मला या माणसाच्या स्वभावाची बऱ्यापैकी कल्पना आली. <br /><br /> <br /><br /> ती चारही नांवे मराठी होती.<br />----------------------------------------<br /> मुदीर जरी मला घरी जाऊन आराम कर म्हणाला होता तरी मी कारागृहाच्या कामाचे आरेखन, नकाशे, त्या कामासाठीं निवडली गेलेली संयंत्रे, त्यांच्या माहिती-पुस्तिका पाहावीत या उद्देशाने कार्यालयातच कांही वेळ बसणे पसंत केले. सध्या कारागृहात कॅरियर कंपनीची संयंत्रे बसविलेली होती. ती कारागृहाच्या मध्यवर्ती कार्यालयाला थंड हवा पुरवीत होती. कालांतराने आणखी कांही कक्ष विस्तारित केले गेले होते. त्यातील खोल्यांना गवाक्ष-वातशीतक (window airconditioners) बसवले गेले होते. त्यांची संख्या सुमारे चाळीस होती. त्यातील कांही नादुरुस्त होते. त्यांची दुरुस्ती करण्यापेक्षा तो विस्तारित प्रभाग मध्यवर्ती वातशीतक घटांना (central airconditioning plant) जोडून द्यावयाचा होता. अर्थात्च नवीन वात-वाहिकांची ( air circulating ducts) उभारणी करावयाची होती आणि सध्याची संयंत्रे काढून त्या ऐवजी मोठी अधिक क्षमतेची संयंत्रे बसवावयाची होती. या साऱ्या योजनेची आरेखने मी नीट पाहून घेतली. ही योजना ज्याने आंखली होती त्या विल्यम्स क्लार्क या अभियंत्याला मी भेटलो. जी चार माणसें माझ्या बरोबर हे काम करणार होती त्यांनाही मी मुख्यालयांत बोलावून घेतले.<br /><br /> गजानन सावंत, केशव सुर्वे, महादू कांबळी आणि वामन महाडिक अशी ती मंडळी होती. गजानन सावंत, केशव सुर्वे हे दोघे चांगले अनुभवी होते. मुंबईला त्यांनी व्होल्टास मधे काम केलेले होते. महादू कांबळी आणि वामन महाडिक हे दोघे मात्र नवीन होते. त्यांना अनुभव फारसा नव्हता. त्यांनी नौकरी मिळवितांना, कामाच्या प्रत्यक्ष अनुभवाची जी प्रमाणपत्रें सादर केली त्यावरील व्यावसायिकाचे नांव माझ्या परिचयाचे नव्हते. पण मुंबईतील सर्वच तत्सम व्यावसायिक मला माहिती असण्याची शक्यता नव्हती म्हणून मी त्याचा फारसा विचार केला नाही. त्या सर्वांना मी सकाळी दुसऱ्या दिवशी साडेसहा वाजता तयार राहावयास सांगितले. त्यांना त्यांच्या कामगार तळावरून (labour camp) मी कामाच्या ठिकाणी घेउन जाणार होतो. त्यासाठीं मला एक छोटी मालवाहू मोटार (pickup van) देण्यात आली.<br /><br /> दुसरें दिवशी सकाळी मी कामगार तळावरून ही फौज घेउन कारागृहाकडें कूच केले. मुदीर परस्पर तेथें आला होता. तो आज आमची सर्वांची तेथें व्यवस्था लावून देणार होता. ओळखपत्रें, कार्य-अनुज्ञा (work permit) तेथील मुख अधिक्षकाकडें सुपुर्त करणे इत्यादि सोपस्कार पार पडे पर्य़ंत हे चार जण कांवऱ्या बावऱ्या नजरेने तो परिसर न्याहाळीत होती. त्यांना विधिवत् आंत दाखल करण्यापूर्वी नियमाप्रमाणें त्यांनी आपली झडती देणे गरजेचे होते. या कामासाठीं तेथील दोन आरक्षी त्यांना आंत घेऊन गेले, मी व मुदीर इदी जमीलशी बोलत बसलो. इदी जमीलला इथें सगळे केवळ इदी नांवाने संबोधित होते.<br /><br /> इथें हा इदीच केवळ इंग्रजी बोलू शकत होता. बाकी सारे अरेबिक भाषिक. या कामगारांना तपासणी कक्षांत जाउन कांहीं मिनिटेंच झाली असतील नसतील इतक्यात आंतून मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज येऊ लागला. आधी इदी तिकडें धावला आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही दोघें. ही कोकणी जनता आणि तें कृष्णवर्णीय आरक्षी यांच्यामधें तुंबळ भांडण सुरू झाले होते. आम्ही आंत गेल्यावर आधी सगळ्यांना शांत व्हायला सांगितले. मी त्या चारही जणांना जरा बाजूला घेतले आणि काय झालें तें विचारू लागलो. <br /><br /> महादू आणि वामन फारच प्रक्षुब्ध झालेले होते आणि संतापाने थरथरत होते. मी विचारले, "काय झाले?" महादू पुढें झाला. सांगू लागला,<br /><br /> " हा काम माका नाही जमायचा. मेले कपडे काढा म्हणालें.मिया सांगान ठेंवतंय. मेल्यांची नजर कांही ठीक नाहीं असां. हांऽ! "<br /><br /> " गप्प रहा " मी ओरडलो आणि कपाळावर हात मारून घेतला. काय सांगावं आता यांना. अरे बाबांनो हा तुरुंग आहे आणि सुरक्षिततेच्या नियमाप्रमाणे आंत जातांना झडती द्यावीच लागते. हे मी त्यांना सांगत होतो इतक्यात इदी आमच्या जवळ आला आणि कडाडला, <br /><br /> " चालते व्हा तुम्ही सगळे इथून. या मूर्ख माणसाच्या खिशात कांही तरी आहे. कदाचित् बॉम्ब! नाही, मी तुम्हाला काम करायची परवानगी देऊ शकत नाही."<br /><br /> एव्हाना बाकी आरक्षी आणि मुदीर यांच्यात अरेबिकमधें चर्चा चालू होती. नंतर मुदीर माझ्या पाशी येऊन ओरडू लागला. त्याच्या चेहऱ्यावरच्या मिश्किल भावाने आता क्रुद्ध स्वरूप धारण केले होते. तो गरजला,<br /><br /> " काय तमाशा आहे हा? हा माणूस झडती कां घेऊन देत नाही? काय आहे याच्या खिशात? आणि ते मला कांही माहीत नाही. या कामाची सुरुवात अशी झालेली मला खपणार नाही. ही माणसें बऱ्या बोलाने काम करत असतील तर ठीक आहे. नाही तर मी या माणसांना इथल्या इथें याच तुरुंगात डांबण्याची व्यवस्था करतो.<br />आणि, अरे देवा, मी कां ही डोकेफोड करतो आहे. तें मला कांही माहिती नाही. काम झाले पाहिजे म्हणजे झालेंच पाहिजे. काय करायचे तें तुझं तू ठरव. मी चाललो."<br /><br /> असं म्हणून मुदीर निघून गेला आणि आता काय करावें या विचारात पडलो. विचार केला, प्रश्न झडतीचा आहे. काढूं काहिंतरी मार्ग. मी इदीला म्हणलो,<br /><br /> " घ्या तुम्ही झडती. माझ्या देखत घ्या. यांच्या खिशात बॉम्ब सांपडला तर तुम्ही याला गोळ्या घाला. मी कांहीही म्हणणार नाहीं. मग तर ठीक आहे ना?"<br /><br /> इदीने माझ्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि झडती सत्र सुरूं झाले. महादू कांबळीला मी मुद्दाम मागे ठेवले आणि बाकी तिघांची तपासणी सुरु झाली. धातूशोधक यंत्राच्या (metal detector) तपासणीतून ते तिघे निरपवाद पार पडले मग अंगझडतीही वरवर झाली. आता पाळी आली महादू कांबळीची. तो धातुशोधकापाशी जातांक्षणी ते यंत्र धोक्याचा इशारा देउ लागले. महादूचा चेहरा आक्रसला. तो आरक्षींना अंगाला हात लावू देणार नाही हे माझ्या लक्षांत येताच मीच पुढें होऊन महादूच्या खिशाला हात घातला आणि तो ’बॉम्ब’ बाहेर काढून टेबलावर ठेवला. तंबाखूची डबी होती ती.<br /><br />क्रमश:<br />निवेदन: मध्यंतरी प्रकृतिअस्वास्थ्यामुळे आखाती मुशाफिरीचे क्रमश: सादरीकरण खंडित झाले होते. ती मालिका पुन्हा सुरूं करीत आहे.<br />---<br />सिंहावलोकन: मी दोहा-कतारच्या कारागृहांत वातानुकूलिक यंत्रे बसविण्यासाठीं चार कामगार घेउन गेलो. महादू नांवाच्या एका कामगाराने अंगझडती घेणार्या अधिकार्याशी तंटा केला. महादू आरक्षींना अंगाला हात लावू देणार नाही हे माझ्या लक्षांत येताच मीच पुढें होऊन महादूच्या खिशाला हात घातला आणि तो ’बॉम्ब’ <br />(संशयास्पद वस्तू) बाहेर काढून टेबलावर ठेवला. तंबाखूची डबी होती ती!<br />---<br /> या नवीन कामाची सुरुवातच अशी झालेली पाहून मी तर धास्तावून गेलो. सावंत, सुर्वे, कांबळी, महाडिक ही सगळी माणसें मराठी, मीही मराठीच; एक चांगला संघ (team) तयार होईल, काम सुरळीत होईल असा माझा समज होता. पण ते चुकीचा ठरतो की काय अशी शंका वाटायला लागली. पण एवढ्या लहानशा प्रसंगाने डगमगून जायचे नाही असे मी मनाला बजावले आणि पुढे सरकलो. त्याचवेळी मी माझ्या वागणुकीचे धोरण बदलण्याचे ठरवले. मराठी माणूस तसा गप्पिष्ट असतोच आणि इथे तर मंडळी कोकणातली. मग तर विचारायलाच नको. पठाण निदान मी सांगेल ते निमुटपणे ऐकत तरी होते. कारण त्यांच्यात चिकित्सक वृत्ती नसावी आणि असली तरी तिच्यापेक्षा आज्ञाधारक वृत्ती अधिक होती. मराठी माणसे कामापेक्षा गप्पांत अधिक रमतात. यांत कांही शंका असण्याचे कारण नव्हते. <br /><br />कामाची सुरुवात कशी करावी याचा मी मनात थोडा विचार केला आणि सध्याच्या कामाचे स्वरूप तसेंच नव्याने करावयाच्या कामाची रूपरेषा समजाऊन सांगण्यासाठी या चारही सहकाऱ्याना मी सर्व्हिस शाफ्ट कडे घेऊन गेलो. साधारणत: रुग्णालये, न्यायालये,कारागृह, अशा इमारतींना, जेथे अनाहूत-अभ्यागतांना (stray-visitors) प्रवेश निषिद्ध असतो त्या ठिकाणी मूळ इमारती बाहेरून एक विस्तारित मार्गिका (service gallery extension) काढलेली असते. या मार्गिकेतून नळ-पाणी, वीज वाहिनी, वात वाहिका यांची योजना केलेली असते. म्हणजे जर विजेचा दिवा अथवा विजेवर चालणारे एखादे उपकरण कार्मिक कक्षात असेल तर त्याची कळ (switch) या बाहेरील मार्गिकेत असतो. त्यायोगे मूळ कक्षातील माणसांच्या संपर्काशिवाय त्यांना दिलेल्या सुविधांची देखभाल करता येते. त्यामुळे कारागृहातील कैदी अथवा अन्य कोणी आम्हाला दिसणे शक्य नव्हते. <br /><br />मी त्या मार्गिकेतून ही चार डोकी घेऊन जात होतो आणि जाता जाता कामाचे स्वरूप समजाऊन सांगत होतो. प्रत्यक्ष जागा मीही प्रथमच पाहात होतो. त्या आधी मी केवळ आरेखनेच पाहिली होती. सावंत आणि सुर्वे नीट लक्ष देऊन ऐकत होते. कारण कारागृहाचे काम जरी ते प्रथमच पहात होते तरी भारतात अनेक मोठ्या इमारतीमधील वातानुकूलित कामाचा त्यांना अनुभव होता. महाडिक आणि कांबळी यांना कामाचा अनुभव आहे असे कगदोपत्री जरी दाखवले गेले होते तरी त्यांच्या वयावरून आणि त्यांच्या हालचालीवरून ते कांहींसे नवखेच दिसत होते. <br /><br />जिथे वात वाहिका (air ducts) आणि इतर उपकरणे बसवावयाची होती तो परिसर पाहून झाला तसे आम्ही वात-शीतक घटाकडे(ACU= air-cooling units) वळालो. तिथे सध्या एक कॅरियर कंपनीचे 100 TR क्षमतेचा एक वात-शीतक घट बसविलेला होता. तिथे आम्ही पोहोचलो मात्र महादू आणि वामन हे आमचे आघाडीचे बिनीचे शिलेदार पुढे सरसावले. महादूच्या चेहऱ्यावर एक खास कोकणी कुतुहल आणि वामन अजूनही जत्रेत हारवल्यासारखा. तेथील एका लहाम मालमोटातीच्या आकाराच्या संयंत्राला एक प्रदक्षिणा घालून झाल्यावर वामनने सर्वात आधी तोंड उघडले,<br /><br />" हे काय आहे हो साहेब?"<br /><br />हे एक हवा थंड करणारे मशीन आहे. यात थंड झालेली हवा याला जोडलेल्या डक्टमधून आतल्या विभागात नेली जाते आणि तेथील निरनिराळ्या खोल्यांत पसरविली जाते, अशी माहिती मी देऊ लागलो इतक्यात महादूने एक बॉम्ब टाकला,<br /><br />" पण मग याचा काऽय कराचा? आणि हवा कुठूनशी येणार याऽत? "<br /><br />यावर आ वासून पाहाण्यापलिकडे आणखी कांही करणे मला सुचले नाही. महादू-वामन या दोघांनी कामाच्या अनुभवाची जी प्रशस्तिपत्रके सादर केली होती त्यात, त्यांनी अशी वातानुकूलित सेवा पुरविणार्या ’हाजी-मुसा पत्रावाला’ नावांच्या सुप्रसिद्ध समूहात कुशल कारागीर म्हणून काम केल्याचा उल्लेख होता. अर्थात् ती प्रशस्तिपत्रके नकली होती यात आता शंका राहिली नाही. या दोघांना जर या कामाची कांहीच माहिती नसेल तर मला गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार होते. इतका वेळ कांहींच न बोललेल्या सावंत आणि सुर्वे या दुकलीकडे मी प्रश्नार्थक नजरेने पाहू लागलो. सुर्वे पुढे झाला. खरा प्रकार काय आहे ते सांगू लागला.<br /><br />आखातात नौकरी मिळवून देण्याचा धंदा करणार्या एका एजंटामार्फत ही चौकडी आलेली होती. पासपोर्ट, व्हिसा, इत्यादि आवश्यक कागदपत्रांची व्यवस्था तर त्याने केलेली होतीच पण शिवाय अनुभवाचे दाखलेही त्यानेच उपलब्ध करून दिलेले होते. अर्थात्च ते नकली होते. अजून कामाला सुरुवातही झालेली नव्हती आणि त्यात ही समस्या. पण काहीही करून हे काम वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपणे महत्वाचे होते. कारण निर्धारित कालावधीत हे काम पूर्ण झाले नाही तर पुढे दंड (penalty) सुरु होणार होती आणि तो दिवसागणिक वाढणार होता. मी वरकरणी शांत रहात संपूर्णत: बंद असलेली गवाक्ष वात शीतके काढून घेण्याच्या कामाला सगळ्यांना लावले. सावंत आणि सुर्वे यांना या कामाचा अनुभव होता म्हणून त्यांनी कामाचा पुढाकार घ्यावा आणि कांबळी, महाडिक यांनी त्याना मदत करावी अशी योजना केली आणि झाल्या प्रकारची मुदीरला कल्पना द्यावी म्हणून फोन करण्यासाठी इदीच्या कक्षाकडे वळालो.<br /><br />इदी आणि आणखी एक कृष्णवर्णीय आरक्षी टेबलावर बुद्धीबळाचा पट मांडून बसले होते. आता इथून फोन करावा तर मुदीरशी इंग्रजीत बोलावे लागणार आणि इदीचे इंग्रजी तसे चांगले असल्याने इदीला माझी समस्या समजणार ही एक नवी समस्या निर्माण झाली. इतक्यात फोनची घंटी वाजली. इदीने समोरच्या पटावरील नजर जराही न ढळवता फोन घेतला आणि कांही न बोलता फोनचा रिसीव्हर माझ्यासमोर धरला. फोन मुदीरचा होता. या योगायोगाचे मनात आश्चर्य करीत मी फोन घेतला. मुदीर कामाची प्रगती विचारीत होता. काय सांगणार होतो मी! जमेल तितक्या सावधानतेने मी बोलत होतो. पण मुदीरला त्यातून कांही वास लागला असावा. तो स्वत:च इकडे येतो म्हणाला.<br /><br />मुदीर कांही वेळात आलाच. मी झाला प्रकर सांगितला आणि मला दुसरे कामगार द्यावेत अशी विनंती केली. पण ते शक्य नव्हते. कारण नवीन कामगारांसाठी थेट मंत्रालयातून नव्याने परवानगी मिळणे दुरापास्त होते. अखेर याच कामगारांकडून काम करून घ्यावे लागणार होते. मात्र मला एक गोरा मदतनीस देण्याचे कबूल करून मुदीर परत गेला.<br /><br />मी परत कामाच्या ठिकाणी गेलो तर तिथे आता आणखी नवाच प्रकार घडलेला. करगृहाचे दोन आरक्षी आणि आमचे कामगार यात पुन्हा एक भांडण लागलेले. जुनी यंत्रे काढण्यापूर्वी नवी यंत्रे दाखवा अणि मगच जुन्या यंत्रांना हात लावा असा कांहीसा वेडगळ हट्ट घेउन ते आरक्षी पुन्हा महादूशी भांडत होते. त्यात त्यापैकी एकाने फुरफुरणार्या महादूला जरा मागे हटावण्याचा प्रयत्न केला काय अन् महादू जो चवताळून उठला तो एकदम त्या धिप्पाड, काळ्याकभिन्न नरपुंगवाशी झोंबाझोंबीच खेळू लागला. मी ती कशी बशी सोडविली आणि त्या दोघां आरक्षींना तेथून जाण्याची विनंती केली. <br />ते जाताच मी महादूला फैलावर घ्यायला सुरुवात केली. मी म्हणालो,<br /><br />’ हे पहा कांबळी, तुम्ही इथे फक्त काम करण्यासाठी आलेले आहात. तुम्ही अजून नवीन आहात म्हणून तुम्हाला कांही माहिती नाही. एक लक्षांत ठेवा. तुम्ही इथल्या विमानतळावर उतरल्या उतरल्या तुमचा पासपोर्ट कंपनीकडे जमा झालेला आहे. तो तुमचा किमान दोन वर्षाच करार संपेपर्यंत तुम्हाला परत मिळणार नाही. आणि त्याच्याशिवाय तुम्ही परत भारतात जाऊही शकणार नाही. एकतर बर्या बोलाने मुकाट जे जमेल ते काम करा नाही तर दोन वर्षे पूर्ण होईतो याच जेलमधे सडत पडा. काय करायचे ते तुमचे तुम्ही ठरवा. आजचा सगळा दिवस तुम्ही खराब केला आहे. उद्यापासून हा असला तमाशा मला चालणार नाही."<br /><br />हे ऐकताच महादू हमसा हमशी रडूंच लागला आणि बडबडू लागला, " कपालच फुटला माजा सायबा. मला परत घरी जांव द्या. हा काम काय मला जमाचा नाय. तो एजंट बोलला का तुला डावरची नौकरी देतो. ऐश करशीन. कसचा डायवर आन् कसची ऐश. तुमी तर आता मला जेलात घालायला निघाले."<br /><br />" अरे, मी तुला काम कर म्हणालो. काम करशील तर काम शिकशील ना. आणि काही तरी शिकून काम करशील तर कोण तुला जेलात घालील. बघ बाबा. तु मराठी म्हणून मी जमेल तेवढी मदत करीन. बाकी मग तू जाणे अन् तुझं नशीब जाणे." मीही जरा वैतागूनच बोललो. <br /><br />केशव सुर्वे पुढे झाला. म्हणाला, " जाऊ द्या साहेब. माणूस नवीन नवीन असाच बावचळतो. उद्या पासून नीट काम करील तो. मी काळजी घेईन त्याची."<br /><br />केशवने महादूलाच काय पण मलाही धीर दिला असेच मला वाटले. आता उद्या पासून एक गोराही आमच्यात सामील होणार होता. आता पर्यंत तरी ही झाकली मूठ सव्वा लाखाची होते असें म्हणावे अशी परिस्थिती होती. उद्यापासून मला तीन निरनिराळ्या रंगाची माकडे संभाळायची होती. तीन काळी. चार लाल मातीतली आणि एक थेम्सच्या कांठावरचा गोरा हुप्प्या.<br /><br />क्रमश: <br />उद्यापासून मला तीन निरनिराळ्या रंगाची माकडे संभाळायची होती. <br />तीन काळी. चार लाल मातीतली आणि एक थेम्सच्या कांठावरचा गोरा हुप्प्या.<br />----------------------------------------------------------------<br /><br /> नव्याने येणार्या गोर्या माणसाबद्धल मी गोरा हुप्प्या असे म्हणालो होतो ते विनोदाने म्हणालो होतो हे जरी खरे असले तरी त्या मागे अनुभवाची एक कटुताही होतीच. या देशाला ब्रिटिशांनी जरी स्वायत्तता बहाल केली असली तरी नवनिर्माणाच्या प्रक्रियेत आपले वर्चस्व ठेऊनच. बहुतेक सर्वच क्षेत्रात गोर्यांचा वरचष्मा जोपासलेला होताच. स्वदेशात एका तेलाखेरीज अन्य कांही उत्पादन होणे अशक्यप्राय होते आणि त्या मुळे बर्याचशा बाबतीत आखाती देश गोर्यांवर अवलंबून होते आणि ज्या गोष्टी स्वदेशांत उत्पन्न होत नव्हत्या त्या गोर पुरवीत होते. नव्हे, घ्यायला अरबांना भाग पाडीत होते. वरच्या श्रेणीचे तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ गोरेच पुरवीत होते आणि तेही अगदी दादागिरीने. बरे हे गोरे तंत्रज्ञही फार कांही वकूबाचे असत असे नाही. अगदी सुमार दर्जाची गोरी माणसे तिकडून इकडे पाठवली जात आणि केवळ गोरे आहेत म्हणून दादागिरीने वागत. आशियाई लोकांना तर ते अगदी कस्पटासमान वागणुक देत. <br /><br /> स्टुअर्ट मार्शल नावाचा हा नवीन गोरा मला मदतनीस म्हणून पाठवला गेला होता तरी तो माझा वरिष्ठ असल्यासारखाच वागणार हा माझा अंदाज खोटा ठरणार नव्हता. आल्या आल्याच त्याने त्याच्यासाठी वेगळ्या कक्षाची (cabin) मागणी केली. कारागृहातील काळ्या अधिकार्यांनीही तत्परतेने तशी सोय करण्याची, त्याच्या तुष्टिकरणाची लगबग चालू केली. स्टुअर्टने सर्वप्रथम माझ्याकडून प्रकल्पाचे कागदपत्र, नकाशे मागून घेतले आणि ते सारे घेऊन त्याला दिलेल्या कक्षात जाऊन बसला. वर म्हणाला, ’मी हे सर्व कागद पत्र पाहून मगच कामाबाबत सूचना देईन. तो पर्यंत तुम्ही कांही करू नका, स्वस्थ बसा.’<br /><br /> खरं म्हणजे या गृहस्थाची माझ्याशी अजून औपचारिक ओळखही झालेली नाही आणि हा असा इतका उद्धटपणे बोलतो आहे याचा मला राग आला होता. पण मला त्याच्याशी वाद घालायचा नव्हता. त्यापेक्षा कामाचे बोलावे म्हणून मी म्हणालो, <br /><br /> " असें कसें करता येईल? आधीच खूपसा वेळ वाया गेलेला आहे. कामाची सगळी योजना मी अभ्यासली आहे आणि काम सुरूही झालेले आहे. माझ्याकडे मनुष्यबळ थोडे कमी आहे. म्हणून तुला पाचारण करण्यात आले आहे. कागदपत्र नंतर पाहता येती. किंबहुना ती पाहण्याची गरजही नाही. तू सरळ कामाच्या ठिकाणी आलास तर ते जास्त चांगले होईल. तू वातवाहिकेच्या (ducts) कामात तरबेज आहेस असे मला सांगण्यात आले आहे. तेंव्हा तू तुझे काम सुरु केलेस तर ते अधिक बरें होईल. त्यासाठी मी तुला दोन माणसे देतो."<br /><br /> त्यावर साहेब मजकुरांचा चेहरा लालीलाल तर झालाच पण वर ते कडाडले, " तू कोणा समोर हा बकवास करतो आहेस याची तुला जाणीव आहे का? मी सांगेन तेंच आणि तेवढेच तुला करावे लागेल नाही तर चालता हो येथून."<br /><br /> हे असें कांही होणार याचा मुदीरला अंदाज असावा. कारण स्टुअर्टची ही बडबड चालू असतांनाच मुदीर कधी येऊन ठेपला हे कळलेच नाही. आमच्या त्या संभाषणाकडे त्याचे लक्षही नाही असें दाखवत मुदीर म्हणाला,<br /><br /> " तुला आता एक चांगला मदतनीस मिळाला. चला आता काम सुरळीत पडेल अशी मी आशा कारायला हरकत नाही. हो ना हरून ?"<br /><br /> " हा माझा मदतनीस आहे? अरे देवा, मला तर हा सर्वात मोठा, अगदी तुमच्यापेक्षाही फार मोठा अधिकारी आहे असें वाटते आहे. निदान त्याच्या वागण्यावरून तरी तसेच दिसते. " मी जरा छद्मीपणानेच म्हणालो.<br /><br /> " जे झाले ते विसरून जा माझ्या मित्रा. खरं म्हणजे चूक माझीच आहे. मीच आधी ओळख करून द्यायला हवी होती. पण मला जरा उशीर झाला. जाऊ दे आता. हा स्टुअर्ट मार्शल. हा वातवाहिकेचे काम चांगल्याप्रकारें जाणतो. मध्यवर्ती वातानुकूलनाच्या (central air conditioning) कामात तुला हा मदत करील. आणि स्टुअर्ट, हा हरून. या कार्यभागचा प्राधिकारी (site in-charge)" <br /><br /> मुदीरने बाजू सांवरत औपचारिक ओळख करून दिली. त्याने शेवटच्या शब्दावर विशेष जोर दिला होता, हे माझ्या लक्षांत आले. यावर स्टुअर्टने त्याच्या उद्धटपणाबद्धल माझी माफी मागावी असे म्हणावे असे मला वाटले. पण तेवढ्यात स्टुअर्टने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. एवढेच नव्हे तर त्याने माझी माफीही मागीतली.<br />मग तो विषय तेथेच संपला.<br /><br /> मी गजानन सावंत आणि वामन महाडीक या जोडीला स्टुअर्टकडे दिले. गजानन अनुभवी होताच शिवाय त्याला इंग्रजी बोलले थोडे समजत होते. वामनला अनुभव नव्हता पण तो थोडा शांत स्वभावाचा होता. खरं म्हणजे वामन आणि गजानन चे जोडी छान जमली होती. पण ती जोडी तोडायची नाही तर मग महादूला स्टुअर्टकडे द्यावे लागले असते, आणि महादूने स्टुअर्ट बरोबर कोकणातले दशावतारी खेळ्ये केले असते. म्हणून सुर्वे-महादू ही जोडी घेऊन मी गवाक्ष-वातशीतक (window air-conditioners) बदलण्याचे काम सुरू केले. अर्थात्च स्टुअर्टने वातवाहिकेचे काम स्वतंत्रपणे सांभाळावे ही अपेक्षा होती. <br /><br /> सुर्वे-महादू या जोडीला नीट कामाला लाऊन मी स्टुअर्टच्या कामाकडे गेलो. कामाच्या जागेवर स्टुअर्टचा पत्ताच नाही आणि सावंत- वामन छान गप्पा छाटत उभे. मी स्टुअर्टकडे गेलो आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहात राहिलो. मेजावार वातवाहिकेचे नकाशे पसरलेले आणि स्टुअर्ट साहेब, शिकावू ज्योतिषाने आयुष्यात प्रथमच कुंडली पहावी अशा मुद्रेत. माझ्याकडे लक्ष जाताच तो म्हणाला,<br /><br /> " कोणत्या मूर्खाने ही आराखने केली आहेत? मला तर कांहीही कळत नाही. यावरून काम करायचे म्हणजे कठीणच आहे. आपण ही आरेखने फेकून देऊ आणि मी माझ्या पद्धतीने वातवाहिका लावतो. ते अधिक चांगले ठरेल. काय वाटतं तुला, हरून!"<br /><br /> मला आता आणखी एक महादू सांभाळावा लागणार या विचाराने हसूं आले. फरक इतकाच तो महादू काळा आणि हा गोरा. मी हसूं ओठातच ठेवत म्हणालो,<br /><br /> " कल्पना छान आहे. पण ती अंमलात आणणे आता जरा अवघड आहे. कारण या कामाची आरेखने आणी योजना तुझ्याच ब्रिटनमधील एका मान्यवर संस्थेने केलेली आहे. ती स्थानिक मंत्रालयाने मंजूर केलेली आहे. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे कांही बदल करायचा तर या सार्या गोष्टींचे पुनर्विलोकन करावे लागेल आणि त्याला किमान एखादे वर्ष लागेलच. तो पर्यंत मी भारतात गेलेला असेन आणि तू परत इंग्लंडला."<br /><br /> मी तिरकसपणे बोलतो आहे हे न समजण्याइतका तो दुधखुळा नव्हता. <br />पण अखेर त्याने मेजावरचे सगळे नकाशे, कागद आवरून ठेवले आणि म्हणाला, "ठीक आहे. नवीन डक्ट्स आल्या असतील तर त्या लावायला घेऊ. चल दाखव मला त्या कुठे आहेत त्या. " <br /><br /> मला मोठी गंमत वाटायला लागली या माणसाची. याला खरोखरच कामाचा अनुभव आहे की नाही याचीच शंका यायला लागली. खरं म्हणजे जुन्या डक्ट्स आधी काढून घेतल्याशिवाय नवीन डक्ट्स लावता येणार नव्हत्या. नवीन डक्ट्सचे नकाशे जुनी डक्ट् काढल्यावरच नक्की करावे लागणार होते. डक्ट्सचा पसारा तसा बराच मोठा होणार होता. त्यामुळे जुन्या डक्ट्स काढून बाहेर पाठविल्यानंतरच नवीन डक्ट्स आत आणता येणार होत्या. हे सारे काम आता त्यालाच करायचे होते. अर्थात् त्या साठी मी त्याला गजानन सांवंत आणि वामन महाडीक ही दोन माणसे दिलेली होती. ही सारी योजना मी त्याला समजावून सांगितल्यावर त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.<br /><br /> एव्हाना आम्ही बोलत बोलत कामाच्या जागेपर्यंत आलो होतो. गजानन आणि वामन तिथे उभे होतेच. स्टुअर्टशी त्यांची ओळख मी करून दिली आणि त्यांना स्टुअर्टच्या स्वधीन करून मी सुर्वे-महादूकडे वळालो. सुर्वे खरोखरच कामात तरबेज होता. त्याला ज्या कामाचा अनुभव नव्हता अशीही कामे तो तारतम्याने करीत असे. जुने गवाक्ष-वातशीतक आता जवळ जवळ सगळे काढून झाले होते. मी ही कामाची प्रगती मुदीरला सांगावी म्हणून इदीच्या कार्यालयाकडे जाऊ लागलो तर वामन माझ्याच दिशेने पळत येतांना दिसला. मला पाहतच तो धापा टाकीत थांबला. <br /><br /> " काय झाले रे ?" मी विचारले.<br /> " साहेब, तो गोरा पडला."<br /> " ते कसं काय?"<br /> " साहेब मी महादूला घेऊन स्लिपा (डक्ट्सच्या जोडण्या) काढीत होतो तर गोरा आमच्या पाठोपाठ लॅडरवर (शिडी) चढला आणि वाकून कांही तरी पहायला गेला तर झोक जाऊन पडला."<br /><br /> मी देखील धावत तिथे पोहोचलो तर स्टुअर्ट साहेब जमीनदोस्त झाले होते.<br /><br />क्रमश:<br /> <br /> मी देखील धावत तिथे पोहोचलो तर स्टुअर्ट साहेब जमीनदोस्त झाले होते.<br />------------------------------------------------------------------------<br /> स्टुअर्ट साहेब धडपडले खरे पण थोडक्यात बचावले. खांद्याला आणि डाव्या हाताच्या कोपराला मुका मार बसला एवढेच. पण या अपघाताचा बाकी इतर वाढाचार झाला तो मात्र तापदायक ठरला. इदी आणि त्याच्या अन्य सहकार्यांनी आमचे काम तात्काळ बंद केले. आता सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला. असा अपघात होऊ शकतो असे आम्ही (कंपनीने) गृहित धरले होते किंवा नाही? तसे घडण्याची शक्यता गृहित धरली असेल तर खबरदारीचे काय उपाय योजले होते? जी माणसे काम करीत होती त्यांना विमा उतरवला होता की नाही..? एक ना दोन अनेक प्रश्नांना वाचा फुटली. मुदीर नुकताच मुख्यालयात पोहोचला होता त्याला तातडीने पुन्हा परत कारागृहाकडे धांव घ्यावी लागली त्यामुळे तो संतापला. कारागृहाच्या आरक्षींनी तर वेगळीच शंका उपस्थित केली ती म्हणजे हा अपघात होता की घातपात? त्यांनी त्यांच्या पद्धतीने निराळी चौकशी सुरू केली. चौकशीला सगळेच कामगार एका वेगळ्या खोलीत नेले गेले. तिथे काय चालले आहे ते पहावे म्हणून मी तिकडे गेलो तर महादूच्या अंगात संचार झालेला. पोलीसच ते. पोलीस भारतातला काय आणि आखातातला काय. सगळे पोलीस सारखेच. त्यांना दंडुका परजायची फक्त संधी मिळायला हवी. आणि त्यातल्या एका काळुबाचा महादूवर दात होताच. दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती. पण समजत नव्हती ती शब्दांची भाषा. बाकी दोघांचाही आवेश इतका जबरदस्त की, ’ शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ या मराठी गीताचा अर्थ नव्याने समजावा. मला पाहतांच महादू कडाडला,<br /><br /> " इच्या मारी. हा मेला आमच्यावर डाउट खातो का वामन्यान् त्या गोर्याला पारला. याला सांगा, कोकण्याच्या नादाला लागू नुको. कोकण्यान् धरला ना! तर पार कोंबडा करून टाकीन याचा. "<br /><br /> पण तेवढ्यात इदी स्टुअर्टला घेऊन तिथे आला. स्टुअर्टने, तो त्याच्या स्वत:च्या चुकीमुळे पडला, त्यात कोणाचाही दोष नाही अशी जबानी दिली आणि एक काळा कोंबडा पाहण्याची आमची संधी गेली. <br /><br /> स्टुअर्टला दवाखान्यात पाठवण्याची सूचना त्याने स्वत:च फेटाळली आणि काम पूर्ववत् चालू ठेवायला तयार झाला. इतका तो खजील झाला होता. मुदीरनेही इदी आणि इतरांची समजूत काढली आणि काम पुन्हा सुरु होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. मी मात्र कामाचे किती तास वाया गेले याचा हिशोब करीत बसलो.<br /><br /> कामाला पुन्हा सुरुवात करण्यापुर्वी सुर्वेने एक सुचवले ते असे की गवाक्ष-शीतक काढण्याचे काम जवळ जवळ संपत आले आहे. तेंव्हा सगळेच डक्ट काढण्याचे काम करतील. मी गोर्याला घेऊन नवीन संयंत्रे बसविण्याच्या कामाची आंखणी करावी कारण नवीन संयंत्रे संध्याकाळपर्यंत येउन ठेपणार होती. मी सुर्वेकडे पहातच राहिलो. हा माणूस मितभाषी होता. फारसा बोलत नसे. पण याची नजर चौफेर होती आणि हा एकटाच माणूस असा होता की ज्याला तेथील कामाचे स्वरूप बर्यापैकी लक्षांत आलेले होते. संयंत्रे कधी येतील हे त्याला माहिती होतेच पण माझ्या नकळत त्याने त्याच्या परीने कामाची योजनाही आंखली होती. मला एकदम हायसे वाटले. त्याच बरोबर मी त्या क्षणी किती थकलेलो आहे आणि मला अशाच आधाराची गरज आहे याची जाणीव झाली. मी पुढे होऊन त्याच्या खांद्यांवर माझी दोन्ही हात ठेवले आणि क्षणभर त्याच्याकडे टक लाऊन पाहिले. त्याच्या योजनेला शब्दांनी संमती देण्याची गरज नव्हती. माग सुर्वेनेच बाकी तिघांचा ताबा घेतला आणि मी स्टुअर्टला घेऊन इदीच्या कक्षाकडे वळालो.<br /><br /> मी, स्टुअर्ट आणि इदी असे तिघे कांही वेळ बोलत बसलो. मध्येच इदी उठला आणि बाजूच्या कपाटाच्या खालच्या कप्प्यातून एक बाटली काढून घेऊन आला. ती बाटली कशाची होती हे एखादे शेंबडे पोरही सांगू शकले असते. मी जरा चक्रावलोच. येथील धर्मसंस्थेच्या नियमांप्रमाणे मद्यपान निषिद्ध होते. अरबांना मद्यपान करण्याची मुभा नव्हतीच. ब्रिटिशांना तसेंच अन्य परदेशियांना कांही सवलतीचे परवाने दिले जात पण ते वैयक्तिक आणि घरगुती वापरासाठी. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा तर गंभीर गुन्हा होता. माझ्या उडालेल्या गोंधळाकडे बुद्ध्याच दुर्लक्ष करीत इदी बोलू लागला, जणू तो स्वत:शीच बोलत होता,<br /><br /> " मला वाटतं आता या अशा प्रसंगी याची खरी जरुरी आहे. नाही कां मित्रांनो? बिचार्या स्टुअर्टला तर नक्कीच याची गरज असणार. आणि हो, हरून, तू आता माझ्याकडे असें भुतासारखे बघणे बंद कर. अरे, एरवी इथें आम्ही भुतासारखे जगतो. इथे फारसे कैदीही नाहीत, की ज्याने आम्हाला थोडातरी विरंगुळा मिळावा. तूच सांग कसा वेळ घालवणार मी." <br /><br /> मी कांही म्हणेपर्यंत त्याने कपाटातून तीन ग्लास काढले आणि त्यात त्या बाटलीतले द्रव ओतलेसुद्धा. सुर्वेने माझी मन:स्थिती जरा ठिकाणावर आणली होती तिला इदीने हरताळ फासला. ती दोघे काय करतील ते करूं दे. आपल्याला काय त्याचे. असा विचार करून मी तेथून काढता पाय घ्यावा म्हणून निघालो तो पुन्हा इदी समोर आला. खुणेनेच मी त्यांच्यात सामील व्हावे म्हणून सांगू लागला. पण माझा स्पष्ट शब्दातला नकार ऐकून म्हणाला, ’ ठीक आहे. जशी तुझी मर्जी."<br /><br /> आमचे संभाषण कान देऊन ऐकणारा स्टुअर्ट मात्र ताडकन् तिथुन उठला आणि माझ्या मागोमाग येऊ लागला. मी त्याला म्हणालो,<br /><br /> " तुला काय करायचे असेल ते तू करू शकतोस. नाहीतरी तुला मार लागलेला आहे. तु आराम केलास तरी चालेल. " मी स्टुअर्टला म्हणालो. <br /> पण त्याने माझ्या मागोमाग येण्याचे पसंत केले. त्यालाही इदीची ती कल्पना आवडणे शक्य नव्हतेच. कारण गोरे कसेही असले तरी त्यांच्या मनात वर्णभेद जन्मजात रुजलेला असतो हे एक कारण आणि जनमानसातल्या आपल्या प्रतिमेला ते फार जपतात. तो इतका वेळ कांही न बोलता इदीची गंमत तर पहात होताच पण त्याही पेक्षा तो माझी प्रतिक्रिया पहात होता. तसें त्याने नंतर एकदा बोलण्याच्या ओघात कबूलही केले.<br /> आम्ही दोघे बोलत बोलत कामाच्या ठिकाणी जात होतो इतक्यात इदीचा एक माणूस मागून धावत आला. माझ्यासाठीं मुदीरचा फोन आला होता. आम्ही दोघांनी आमचा मोर्चा पुन्हा इदीच्या केबीनकडे वळवला. नवीन संयंत्रे घेऊन येणारे कंटेनर निघाले आहेत आणि ते थोड्याच वेळात कारागृहावर पोहोचतील असा त्याने निरोप दिला. <br />या कामाची जी योजना (schedule) तयार केली गेलेली होती त्यानुसार ती संयंत्रे फार लवकर येत होती आणि अर्थात्च ती उतरवून घेण्याची व्यवस्था केली गेलेली नव्हती. बरें मुदीरला ही अडचण सांगता येणार नव्हती. सांगून तो तरी काय करणार होता. मी काळजीत पडलेला पाहून स्टुअर्टने कारण विचारलेच. फोनवर काय बोलणे झाले याची मी त्याला कल्पना दिली. तो कुत्सितपणे हसला. म्हणाला,<br /><br /> " सारा मूर्खपणा आहे हा. आम्हाला (ब्रिटीश) तुम्ही सगळे नांवे ठेवता. पण आमच्याकडून आमची शिस्त तुम्ही कणभरही घेतली नाही. चला. पाहु आता काय होईल तें. "<br /><br /> आम्ही, ज्या ठिकाणी संयंत्रे बसवावयाची होती त्या ठिकाणाकडे वळलो. कंपनीच्या बांधकाम विभागाने संयंत्रासाठी जोते (plinth) बांधून ठेवलेले होते. त्यावर संयंत्र उतरऊन घेता येणार होते. आम्ही पुढील कामाची चर्चा करीत होतो तों ती माल वाहू मोटार येऊन ठेपली देखील. अमेरिकन क्लायमेट कंपनी कडून आलेल्या यंत्राला कसे उतरवून हे एक संकट आता पुढे उभे राहिले होते. कारण ते इतके अवजड होते की त्या साठी क्रेन आणावी लागली असती आणि सगळ्यात मोठे संकट म्हणजे कारागृहाच्या आवारातून मशीन हाऊस पर्यंत क्रेन येऊ शकत नव्हती. मी माझा उद्वेग लपवू शकलो नाही. पण स्टुअर्टने एकदा यंत्राची चारी बाजूने पाहणी केली आणि म्हणाला,<br /><br /> " कांही काळजी करू नकोस. आता नाही तरी संध्याकाळ होत आलेली आहे. या कंटेनर बाळाला आजची रात्र इथेंच झोपू दे. मी उद्या जादू करीन आणि हे यंत्र आपोआप जोत्याववर जाऊन बसेल."<br /><br /> काळी जादू (black magic) असा एक जादूचा प्रकार असतो हे मी ऐकून होतो. आता स्टुअर्ट कोणती ’गोरी जादू’ करतो तें पहायचे होते.<br /><br />क्रमश:<br /><br /> <br />काळी जादू (black magic) असा एक जादूचा प्रकार असतो हे मी ऐकून होतो. आता स्टुअर्ट कोणती ’गोरी जादू’ करतो तें पहायचे होते.<br /><br />क्रमश:<br />--------------------------------------------------------------------<br /><br /> स्टुअर्ट आज काय शक्कल वापरून संयंत्र करागृहाच्या आवारात आणतो हे पहायची उत्कंठा जशी सगळ्यांना होते तशी ती मलाही होती. पण ’प्रतिकूल तेंच घडेल’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाक्याचा अनुभव मला अनेकवेळा आलेला होता. मी नेहमी नकारात्मक विचार करणारा, निराशावादी (specimistic) आहे अशी माझ्यावर अनेकदा टीकाही होत आली. त्यामुळे या माझ्या स्वभावाप्रमाणे स्टुअर्टची तथाकथित जादू चाललीच नाही तर काय करायचे हा विचार मनात घोळवीत मी बाकी चौकडीला कामाला लावले आणि कंटेनरजवळ जाऊन उभा राहिलो. कंटेनरचा चालक तिकडे इदी आणि कंपनीशी निवांत गप्पा मारीत बसला होता. जरा वेळाने इदी माझ्या दिशेने येतांना दिसला. स्वारी बसक्या आवाजांत कांही तरी, बहुदा स्वाहिली भाषेत, गात होती आणि हातवारेंही करीत होती. जवळ येतांच त्याने संभाषण सुरू केले,<br /> "हेय् हरून, शुभप्रभात!"<br /> " शुभप्रभात इदी! कसा आहेस तू?"<br /> " मी छान आहे. तू कसा आहेस? पण जरा थांब. खूप छान आहेस असं म्हणू नकोस. तुझासाठी माझ्याकडें दोन बातम्या आहेत. एक चांगली आणि एक वाईट. कोणती आधी सांगू?"<br /> " तू मला कांहीही सांगू शकतोस. ठीक आहे. आधी वाईट सांग."<br /> " तुझा स्टुअर्ट पळाला"<br /> " म्हणजे?" यावर इदी खांदे उडवत हसूं लागला.<br /> " पळाला म्हणजे इंग्लंडला गेला"<br /> " अरे, असा कसा पळू शकतो तो? काल तर तो इथे आपल्या बरोबर होता."<br /> " काय अशक्य आहे या गोर्यांना. यांना जायला-यायला आपल्या सारखा परतीचा परवाना (exit visa) थोडाच लागतो. विमानात बसले की चालले मायदेशाला"<br /> " बरं ते मरो. आता चांगली बातमी सांग."<br /> " चांगली बातमी म्हणजे, तू एक मठ्ठ माणूस आहेस."<br /> " हां, ही चांगली बातमी आहे खरी. पण त्याने काय फरक पडणार आहे?"<br /> " तूं मठ्ठ अशाकरिता आहेस की कंटेनरमधे काय आहे हे तू नीट पाहिले नाहीस, त्या मूर्ख स्टुअर्टने नीट पाहिले नाही आणि सगळ्यात मोठा मूर्ख म्हणजे तो कंटेनरचा चालक, त्याने आणलेले ते यंत्र या कारागृहासठी नाहीच. तें दुसर्याच कोणासाठी आलेले आहे. मी त्याच्या जवळील चलान पाहिले तेंव्हा मला कळले."<br /><br /> आता हंसावे का रडावे हा प्रश्नही इदीने उरूं दिला नव्हता. तो मोठमोठ्याने हसत आणि गात होता. मी खजील झालो. मला त्या यंत्राच्या आकारावरून तरी समजायला हवे होते की एवढे मोठे यंत्र या कामासाठी कसें असेल. माझ्या बाबळटपणाची कमालच झाली होती.<br /><br /> स्टुअर्टने मात्र जादूच केली होती. रंगमंचावरून जादुगार जसा सगळ्यांदेखत गायब होतो तसा तो गायब झाला होता. हे गोरे ब्रिटिश आणि आम्ही भारतीय किंवा अन्य आशियाई लोक यांच्यात किती भेदभाव केला जात होता. यावरून कांही महिन्यांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. सुभाष यादव नावाच्या एका भारतीय मजूराची आई त्याच्या गांवी अचानक मृत्यू पावली, तर त्याने रडून, भेकून, गयावया करून सुद्धा त्याला स्वदेशी जाण्याची परवानगी दिली गेली नव्हती. भारतांत परत जाऊ द्यावे म्हणून तो येथील भारतीय वकिलातीच्याही पायी पडला. पण तेथेंही त्याला वाटाण्याच्या आक्षताच लावल्या गेल्या. ’तूं आता परत गेल्याने तुझी आई परत येणार आहे कां?’ असले निर्दयी प्रश्न विचारले गेले होते. शेवटी नाईलाजाने तो त्याच्या नौकरीच्या कराराची मुदत संपेपर्य़ंत विषण्ण मनाने येथेच राहिला. स्टुअर्ट मात्र दुखण्याचा बहाणा करून मायदेशी आरामात जाऊ शकला होता. ती घटना आज पुन्हा आठवून मी बेचैन झालो. <br /><br /> स्टुअर्ट मला काडीइतकीही मदत न करता परत गेला होता. मी खिन्न मनाने कामाच्या ठिकाणी आलो. सुर्वे खरोखर कामाचा माणूस होता. त्याने बाकी इतर तीन जणांच्या मदतीने खूपच चांगला संघ (team) बांधला होता. जुन्या डक्ट्स काढण्याचे काम त्याने चांगल्या प्रकारे मार्गी लावले होते. ते पाहून मला जर हायसे वाटले. मी झालेल्या कामाची पहाणी करीत होतो आणि पुढील कामाची मनांत आंखणी करीत होतो, इतक्यात महादू डोळे बारीक करून माझ्याकडे पहात आहे असें मला जाणवले. बहुदा त्याला कांही तरी बोलायचे असेल असें वाटून मी त्याला हातानेच ’काय’ म्हणून विचारले. चेहर्यावर एक प्रसन्न हसूं पसरवीत तो म्हणाला. म्हणाला कसला, त्याने विचारलेच,<br /><br /> " साहेब, तो गोरा कोठे गेला? आज आला नाय्!" मला हसूं आले. मी म्हणालो,<br /> ’ मला काय माहित. तूंच सांग ना. काय केलेस तू त्याचे?"<br /><br /> महादू चक्रावला. माझा प्रश्न त्याच्या डोक्यावरून गेला हे त्याच्या बावचळलेल्या चेहर्यावरून दिसत होतेच. बाकी तिघेंही आ वसून माझ्याकडे पहात होते. मी हसूं दाबण्याचा प्रयत्न करीत म्हणालो,<br /><br /> " तू त्याचा कोंबडा केलास ना! कुठे आहे तो कोंबडा?" महादू लाजून हसांयला लागला. <br /><br /> " काय सायेब. मजाक करता काय गरीबाची. सांगा ना. कुठे गेला गोरा."<br /><br /> " अरे, कुठे गेला ते मलाही माहिती नाही, आणि गेला तर गेला. तू आहेस ना? तू काय गोर्यापेक्षा कमी आहेस काय? काम नीट कर. "<br /> " पण काय हो सायेब. एक विचारूं कां?" ही नांदी कशाची आहे हे माझ्या लक्षांत यायला वेळ लागला नाही. मी जर त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर महादू सारा दिवस माझ्याशी गजाली करीत बसला असता. मी म्हणालो,<br /><br /> " कांबळी, तें गोर्याचा जांव द्या आता. कामाचा बगा आता. नाय तर तो काळा (इदी) माजा कोंबडा करील." आणि महादेवराव कांबळी कामाला लागले.<br /><br /> काम सुरळीत चाललेले पाहून मी इदीच्या कक्षाकडे गेलो. इदी रेडिओ लाऊन कसली तरी अगम्य गाणी ऐकत बसला होता. मला जरा गंमत सुचली. म्हणालो,<br /><br /> " इदी, माझ्या प्रिय मित्रा. तुझा देश फार अगत्यशील आहे असें मी ऐकले होते. पाहुण्यांना कांही कॉफी वगैरे विचारण्याची पद्धत आहे की नाही?"<br /> " कॉफी काय मागतोस मित्रा. मी तर तुला काल त्याहीपेक्षा छान कांही देत होतो तर तूच चेहरा वांकडा केलास."<br /> " मग आजही क्षमाकर मला. तूं पुन्हा तसाच पाहुणचार करणार असशील तर मी चाललो माझा कामाला."<br /><br /> पुढे होत इदीने माझा हात हातात घेतला मला एक हलकेसे आलिंगन दिले आणि कॉफी मशीन कडे वळाला. <br /><br />क्रमश:<br /><br />पुढे होत इदीने माझा हात हातात घेतला मला एक हलकेसे आलिंगन दिले आणि कॉफी मशीन कडे वळाला. <br />----------------------------------------------------------------------- <br /> इदीने कॉफी अंमळ कडकच केली होती. पण मला ती आवडली. इकडे आखातात येण्यापूर्वी भारतांत ज्या प्रकारची कॉफी, म्हणजे दूध-साखर घातलेली, प्यायलो होतो तशी ते इथे कधी मिळाली नाही. इकडची कॉफी म्हटली की दूध-साखर नसलेली गडद तपकिरी रंगाची आणि कडक कॉफी असायची. दूध तर इथे मिळतच नसे. त्याऐवजी दुधाच्या भुकटी सारखी पांढरी भुकटी कॉफीसाठी वपरायची. तिला कॉफी-क्रीम म्हणायचे.साखर मात्र ऐच्छिक. सुरुवातीला मला अशी काळी कॉफी अजिबात आवडत नसें पण कालांतराच्ने तिची चांगलीच संवय झाली.<br /><br /> कॉफीचे घुटके घेत घेत आम्ही बोलत बसलो. इदीच जास्त बोलत होता. भारत देश, ताजमहल, भारतातील लोक, त्याचं समाजजीवन, आपल्याकडील विवाह विधी, अशा अनेक बाबतीत त्याला उत्कंठा होती. त्याने प्रश्न विचारावा आणि मी जेवढ्यास तेवढे उत्तर द्यावे असें कांही वेळ चालले. इतक्यात फोनची घंटी घणघणली. फोन इदीने घेतला. कोणाशी तरी तो अरेबिक भाषेंत सुमारे दहा मिनिटें बोलून त्याने फोन ठेवला आणि माझ्या कडे पाहात म्हणाला,<br /><br />" अभिनंदन मित्रा! एक चांगली खबर आहे तुझ्यासाठी."<br />" काय आहे ती?"<br />" स्टुअर्टच्या बदल्यात तुला एक नवा मदतनीस मिळतो आहे."<br />" कोण आहे तो?"<br />" कुणी बारट्रम नावांचा गोरा येतो आहे."<br /><br /> आता आणखी एक गोरा! ऐकून माझ्या पोटात गोळा उठला. स्टुअर्टचा अनुभव जमेस धरतां मी या नव्या गोर्या बाबत साशंक झालो नसतो तरच नवल. खरं म्हणजे केशव सुर्वेने कामाचा जम चांगला बसवला होता. त्याच्या अनुभवाचा तो पुरेपूर वापर करीत होता आणि काम चांगले चालले होते. डक्ट्स काढण्याचे काम एक दोन दिवसात पूर्ण येणार होते. तो पर्यंत संयंत्र (Packaged AC unit) येणार होते. त्याची योग्य अशी उभारणी झाली की त्याच्या तोंडापासून नव्या डक्ट्स बसवायला घ्यायच्या अशी माझी योजना होती. आता हा नवा गोरा आणखी काय दिवे पाजळतो तें पहायचे. या गोर्यांबद्धल माझ्या मनांतला आकस अनाठायी नव्हता. आज पर्यंत जितके गोरे मला या आखातातल्या नौकरीत भेटले होते त्यांनी मला या ना त्या प्रकारे कांहीना कांही अडचणीतच आणले होते. <br /><br /> तासाभरांतच माझा नवा मदतनीस हजर झाला असल्याची खबर लागताच मी आणि इदी नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सामोरे झालो. कारागृहाच्या प्रवेशाचे सारे सोपस्कार पार पाडून समोर ठाकलेल्या त्या गोर्या माणसाला पाहून मला तर हंसायलाच आलं. मनावर शिष्ठाचाराचे संस्कार झालेले असल्याने मी उघडपणे हंसू शकलो नाही. इदीला मात्र हंसू आवरणे शक्य झाले नाही. तसा तो लगबगीने आंतल्या खोलीकडे वळाला. याला कारणच तसें होते. हा नव्याने आलेला आङ्ग्ल नरपुंगव इतका महाकाय होता की जाड्या-रड्याच्या चित्रपटातील जाड्या याच्यापुढे काटकुळा वाटावा. मी माझी ओळखकरून देण्यासाठी पुढे झालो. <br /><br />" मी हरून. भारतातून आलो. सध्या या कामाचा प्रधिकारी म्हणून काम पाहतोय."<br /><br />" मी सॅम्युएल बार्ट्रम. तसा मी ब्रिटिश आहे. पण या कामासाठी लागणारी संयंत्रे ज्या ’अमेरिकन क्लायमेट कंट्रोल कंपनी’ कडून मागवली गेली आहेत, त्या कंपनीतून मी आलो आहे. पण क्षणभर थांब हं. त्या कंपनीतून मी आलो आहे असं मी म्हणालो त्यानं तुझा गैरसमज होण्याची शक्यता आहे. मी त्या कंपनीतून मी आलो आहे म्हणजे मी ती कंपनी सॊडून आलो आहे. नौकरीला होतो मी त्या कंपनीत. ती कंपनी संयंत्रे खूप चांगली बनवते. पण खरं सांगू. चोर आहेत ते हलकट. जपानी संयंत्रांची नक्कल करतात. विश्वास ठेव माझ्यावर. चोर आहेत ते हलकट. स्वत: म्हणुन कांही करण्य़ाची लायकीच नाही त्या मठ्ठांची. पण तू काळजी करूं नकोस. मला त्या संयंत्रांची नस न् नस माहिती आहे. एखादी सायकल (bicycle) चालवावी अशी ती यंत्रे मी चालवू शकतो. तुला आता काळजी करण्याचे कारणच नाही. चल दाखव मला तू काय केले आहेस ते."<br /><br />बॅटीसाहेबांची ही परिचयाची नांदी ऐकून मी सर्दच झालो. (कांही वर्षांनी भारतांत आल्यावर शोले नांवाचा हिन्दी चित्रपट पाहिला. त्यातील बसंती टांगेवालीचे संवाद ऐकतांना मला या बॅटीचीच आठवण झाली होती). बॅटीसाहेबांनाही स्टुअर्टप्रमाणे स्वतंत्र केबीन वगैरे पाहिजे असेल म्हणूण मी त्यांना स्टुअर्टच्या रिकाम्या केबीनकडे घेऊन गेलो आणि त्यांनी ती घ्यावी. तसेंच आणखी कांही लागणार असेल तर तसें सांगावे असें म्हणालो तर स्वारी म्हणाली,<br /><br />" छे, छे! अरे, केबीन कशासाठी? मी काय इथे केबीनमध्ये बसून आराम करायला आलो असं वाटलं की काय तुला? नाही, नाही माझ्या मित्रा, काम! मी इथे काम करायला आलो आहे. आणि बसण्याची तर गोष्टच काढू नकोस. मला सामावून घेणारी खुर्ची तरी तुझ्याकडे आहे कां? हाऽ हाऽ हाऽ..."<br /><br />असे म्हणत बॅटी गडगडाटी हसला. हसतांना स्प्रिंग लावलेला बाहुला हलत रहावा तसे त्याचे शरीर हलत होते. मी त्याला कामाच्या ठिकाणाकडे घेऊन जाऊ लागलो तेंव्हा आणखी एक विलक्षण गोष्ट माझ्या ध्यानांत आली. बॅटी जरी महाकाय असला तरी त्याच्या हालचाली कमालीच्या गतिमान होत्या. तो इतका भरभर चालत होता की, त्याच्या बरोबरीने राहण्यासाठी मला जवळ जवळ पळावे लागत होते. चालता चालता मी त्याला कामाचे स्वरूप, आत्तापर्यंत झालेले काम इत्यादि समजाऊन सांगत होतो. डक्ट्स काढण्याचे काम जिथे चालू होते तिथपर्यंत आम्ही येउन पोहोचलो. सुर्वे आणि सावंत एक भला मोठा डक्ट्चा भाग (transition piece) सोडवून काढण्याच्या प्रयत्नात होते. सुमारे दहा फूट लांबीचा तो भाग एका बाजूने मोकळा झालेला होता. ते टोक महादू आणि वामनने धरून ठेवले होते आणि सुर्वे-सावंत ही जोडी दुसर्या टोकाचा जोड सोडवीत होते. मध्यभागी घडीची शिडी (ladder) उभी करून ठेवली होती. जेणे करून पुढील जोड सुटा झाला की डक्ट् शिडीवर टेकवता आला असता. तेथून तो नंतर सावकाश खाली उतरवता आला असता. बॅटी कमरेवर दोन्ही हात ठेवून शांतपणे हे सारे पाहू लागला. यावेळी मात्र त्याच्या तोंडाची टकळी बंद होती. पुढचा जोड सुटा होताच डक्ट् खाली सरकून शिडीवर आदळणार इतक्यात बॅटी खारीच्या चपळाईने शिडीवर चढला आणि खाली सरकणार्या डक्टला खाली मान घालून त्याच्या मानेचा आणि पाठीचा आधार देता झाला. पुढच्याच क्षणी त्याने डाव्या हाताचा आधार डक्टला दिला आणि उजव्या हाताने शिडीची कड पकडत तो खाली उतरु लागला. तो पर्यंत माझी चारही माणसे आपापल्या शिड्यांवरून झर्रकन् खाली आली आणि बॅटीच्या मदतीला धावली. सगळ्यांनी मिळून तो डक्टचा भाग नीट जमीनीवर ठेवला. हा सगळा अचंभित करणारा प्रकार इतक्या झर्रकन् घडला की एक बॅटी वगळता बाकी आम्हा पांचही जणांना भानावर यायला कांही सेकंद जावे लागले. आम्ही भानावर आलो तेंव्हा बॅटी आमच्याकडे मिस्किल नजरेने पहात होता आणि हंसत होता. आमच्या चौकडीला तर हा बजरंगबली कुठून आणि कसा अवतरला याचेच कोडें पडले होते. <br /><br />त्या नंतर बॅटी मला माझ्या आणि माझ्या माणसाच्या कामाच्या पद्धतीबद्धल विचारीत गेला आणि मधून मधून आमच्या कामाच्या पद्धतीतील त्रुटी दाखवत गेला. इतक्या उंचीवर काम करणार्या कामगारांच्या सुरक्षिततेचा आम्ही नीटसा विचार केलेला नव्हता. त्याना आवश्यक अशी शिरस्त्राणे (helmets), सुरक्षा पट्टे (safety belsts), जड वस्तू उतरवण्यासाठी लागणारे दोर (slings) उपलब्ध करून दिलेली नव्हती. आमचा सारा भर मानवी ताकद आणि मानवी कौशल्य यावरच होता. अशा आणखीही कांही त्रुटी बॅटीने दाखवून दिल्या. कांही वेळापूर्वी या माणसाला मी मनांतल्या मनांत हंसत होतो. पण आता हा माणूस मला खरोखर उपयोगी पडू शकेल असे वाटायला लागले. मी पुढें होत बॅटीचा हात हातात घेत त्याचे आभार मानले. उत्तरादाखल तो माझ्या दंडावर थोपटत म्हणाला,<br /><br />" आभार कसले मानतोस माझे. आणि आभार मानायचेच असतील तर ’त्याचे’ मान, की ’त्याने’ तुझ्यासाठी माझ्यासारख्या एका लहान माणसाला बनवले. " इथे बॅटी, ’त्याने’, ’त्याचे’ म्हणतांना हाताच्या अंगठ्याने आकाशाकडे निर्देश करीत होता. <br /><br /> या ’लहान’ माणसाने मला पहिल्याच भेटीत जिंकलं होतं. गोर्यांबद्धलचा माझा पूर्वग्रह आता मला तपासून पहावा लागणार होता.<br /><br />क्रमश:आखाती मुशाफिरी (२१)<br /> या ’लहान’ माणसाने मला पहिल्याच भेटीतच जिंकलं होतं. <br /> गोर्यांबद्धलचा माझा पूर्वग्रह आता मला तपासून पहावा लागणार होता.<br />--------------------------------------------------------------------<br /><br /> त्यादिवशी दुपारी चार वाजेपर्यंत बॅटी कामाच्या जागेवरून जराही इकडे तिकडे हलला नाही. एरवी सतत बडबड करणारा हा माणूस कमीत कमी पण मोजक्या शब्दांत कामाच्या सूचना देऊन काम करवून घेत होता. सावंत आणि सुर्वे या दोघांनाही बॅटीची कामाची पद्धत अत्मसात कारायला वेळ लागला नाही. कांबळी आणि महाडिक भारावल्यागत मदनिसाचे काम करत होते. संध्याकाळ व्हायला आली तसा बॅटीला पाहून गायब झालेला इदीही आता तिथे हजर झाला होता. स्वत: शिडीवर चढून झपाट्याने कामात मदत करणारा बॅटी पाहून इदी हरखून गेला. माझ्या कानाशी इदी हळूच कुजबुजला. <br /><br />" हे माकड (चिंपांझी) या पूर्वीच आलं असतं तर किती बरं झालं असतं नाही?"<br /><br /> खरं म्हणजी इदी हे इतकं हळू बोलला होता की बॅटीच्या कानावर ते जाऊ नये.पण बॅटीचे कान भलतेच तिखट असावेत. तो झर्रकन खाली उतरला आणि आमच्या समोर येऊन उभा राहिला. आता हा काय बोलतो या भीतिने मी जरा भांबावलोच. पण सांवरून मी बॅटीची इदीशी ओळख करून दिली. इदीशी बॅटी हस्तांदोलन करीत म्हणाला,<br /><br />" हो, माझ्या मित्रा, मला जरा उशीर झाला खरा. मी या आधीच यायला हवं होतं खरं. पण कांही हरकत नाही. अगदीच नसल्यापेक्षा उशीर चांगला. नाही कां मित्रा! पण मला एक सांग मित्रा. तू इथे काय करतोस?"<br /><br />" खरं सांगायचं तर कांहीच नाही. इथे फारसे कैदीही नाहीत त्यामुळे मलाच काय पण माझ्या इतर सहकार्यांनाही म्हणावं तसं काम नाहीए. पण नौकरी म्हटली की नौकरी! काम असो वा नसो वेळ तर घालवावाच लागतो ना!"<br /><br />" बरं मग, मी तुला कांही काम संगितलं तर तू करशील? क्षमा कर मला. तुला काम सांगण्य़ाचा मला कांही अधिकार नाही पण एक विनंती मात्र करावीशी वाटते. चालेल कां?"<br /><br />" कां नाही? अवश्य. बोल."<br /><br />" मला एक दोन मोठाले दोर हवे आहेत. देऊ शकशील तूं?"<br /><br />" दोर? आणि तेंही कारागृहांत?" म्हणत इदी हंसायला लागला.<br />" क्षमा कर मित्रा. इथे दोरच काय पण पायजम्याची नाडीही मिळणार नाही. कारण माहितीए? असलं कांही इथे कोणाला सांपडलं तर गळफास घेऊन जीव नाही देणार तो?"<br /><br /> दोर मिळू शकणार नाही इतके समजताच बॅटी पुन्हा शिडीवर चढण्याच्या बेतात होता पण पुन्हा मागे वळाला. मला म्हणाला,<br /><br />" इथली सुटीची वेळ, मला म्हणायचं आहे, कामाची वेळ काय आहे?"<br /><br />" तशी सकाळी आठ ते दुपारी चार अशी आहे पण आम्ही त्यानंतरही एखादा तास थांबतो. निदान अंधार होईतो तरी थांबतोच."<br /><br />"कां? त्याची काय गरज आहे?" मला त्याच्या या प्रश्नाचा थोडा रागच आला. मी म्हणालो,<br /><br />" कां म्हणजे काय? काम दिलेल्या मुदतीत संपायला नको? उशीर झाला तर विलंब शुल्क (penalty) भरावे लागेल. माहितीए!"<br /><br />" अरे माझ्या मित्रा, तूं म्हणतोस तें बरोबर असेलही. काम तर वेळेत झालंच पाहिजे पण त्या साठी जादा वेळ खर्चून काम केले पाहिजे हें कांही मला पटत नाही. आणि मला एक सांग, या कामगारांना आपण जादा कामाचे पैसे देत आहोत कां? किंवा देणार आहोत कां? आपण कामाचे नियोजन नीट केले तर जादा वेळ न थांबताही काम वेळेत व्हायला कांही अडचण नसावी."<br /><br /> आता मात्र माझा पारा चढायला लागला. शेवटी हा गोराही त्याच्या मूळ वळणावरच गेला म्हणायचा. हे काम गेले पंधरा दिवस मी सांभाळतो आहे तो काय वेडा म्हणून. हेंच काय पण या आधीही मी अशी अनेक कामे माझ्या पद्धतीने केली आहेत आणि ती व्यवस्थित पारही पडली आहेत. आणि आता आला हा मला अक्कल शिकवायला. असें विचार माझ्या मनांत यायला लागले. मी शक्य तितके संयत रहात म्हणालो,<br /><br />" तूं म्हणतोस ते बरोबर असेलही. पण आजपर्यंत मी या पद्धतीने काम करत आलो आहे आणि अजून तरी मला कांही अडचण आलेली नाही. हां, आता तुला माझी पद्धत चुकीची वाटत असेल तर तूं ती बदलू शकतोस. माझी कांही हरकत नाही." माझा स्वर कडवट झालेला आहे हे माझ्या लक्षांत आले. पण माझा नाईलाज होता. <br /> <br />" हेय् हरून! तुझा कांहीतरी गैरसमज होतो आहे. मला वाटतं रागावलास तूं. विश्वास ठेव माझ्यावर, मी तुला कांही शिकवायला किंवा त्रास द्यायला आलो नाही. मी अशा कामाचा योजक (task master) म्हणून खूप काम केले आहे आणि अशा अनेक अडचणीतूनच शिकत आलो आहे. मी जे शिकलो त्याचा लाभ इथेही आणि तुला आवडेल तर, तुलाही मिळावा असे मला वाटते. इथे येण्यापूर्वी माझे अब्राहमशी (मुदीरशी) बोलणे झालेले आहे. खरें पाहू जातां तूं एक वातानुकूलित यंत्रांचा कुशल तंत्रज्ञ-अभियंता आहेस आणि केवळ नाईलाजाने तुला हे डक्ट उभारणीचे काम करावे लागत आहे की ज्याचा तुला फारसा अनुभव असण्याची शक्यता नाही, पण तरीही तू दिली गेलेली जबाबदारी खूपच चांगल्या तर्हेने पार पाडत आहेस, याची मला कल्पना मला अब्राहमने दिलेली आहे. उद्याच कदाचित या कामासाठी मागवलेले संयंत्र येऊन ठेपेल. ते तुलाच उभे करायचे आहे. तू त्यातला तज्ञ (expert) आहेस. त्या कामात मी दखल देणार नाही. हे आंतले काम मी बघेन, तूं संयंत्राचे काम बघ. काय? चालेल की नाहीं? "<br /><br /> मला राग आलेला आहे हे बॅटीच्या लक्षांत आलेले होते आणि तो माझी समजूत काढीत होता. तो जें म्हणत होता तें अगदी बरोबर होते आणि मला ते पटतही होते. पण कां कुणास ठाऊक मी अस्वस्थ झालो होतो. बहुदा माझा अहंकार दुखावला गेला होता. कारण बॅटीला इथे पाठवण्यापूर्वी, त्याला माझ्याविषयी, कामाविषयी सांगण्यापूर्वी मुदीरने माझ्याशी बोलायला हवे होते. मी या कामाचा खरोखर प्रधिकारी (incharge) होतो कां? तसेंच मी मनातून खजीलही झालो होतो. बॅटी जें कांही बोलला होता तें चुकीचे नव्हतेंच. शिरस्त्राणे आणि दोर इत्यादि तर मूलभूत गोष्टी होत्या. त्या कां मला सुचूं शकल्या नाहीत? <br /><br /> कामाची सुटी करून मी खिन्न मनाने माझ्या निवासाकडें परतलो. जाऊन पोहोचलो तर वश्या डोंगर्या माझी वाट पहात फाटकापाशीच उभा होता. त्याला पाहतांच मला फार बरें वाटले. आज खरोखर मला त्याचीच गरज होती. नाही तरी तो फार दिवसांनी भेटत होता. मी चेहरा शक्य तितका सरळ ठेवत विचारले,<br /><br />" काय गुरु, आज काय गुरुपौर्णिमा आहे की काय? गुरुमाऊली आज स्वत: दर्शन द्यायला आली?"<br /><br />" कायले चापलुशी करतं बे? दोन हप्ते झाले. कोठे मरून पडला होता तूं? साला, तूं आमची बी कोणाची वास्तपुस्त करून नै राह्यला. तुला काय वाटते, असा सोडून देऊ आमी तुले! मरशीन तं राखेतून वडून काडू आमी तुले. आणि काय बे, तुझा चेहरा कां असा दिसून राह्यला मैताला गेल्या सारखा ?"<br /><br />" सांगतो माऊली. सगळं सांगतो. आधी आंत तर चला " असं म्हणत मी दार उघडलं आणि वश्याला घरांत घेऊन गेलो.<br />आखाती मुशाफिरी (२२)<br />अरुण वडुलेकर सोम, २३/०४/२००७ - ०६:५९. » कथा | अनुभव <br /><br /> " सांगतो माऊली. सगळं सांगतो. आधी आंत तर चला " असं म्हणत मी दार उघडलं आणि वश्याला घरांत घेऊन गेलो.<br /><br />-----------------------------------------------------------------------------------------------<br /><br /><br />"हां बोल आता." <br />घरांत गेल्या गेल्या वश्या म्हणाला. मी वश्याला थोडक्यात सध्याच्या माझ्या कामाची माहिती दिली आणि बॅटी दिवसाच्या शेवटी काय बोलला तें सांगितलं. अर्थात्, मात्र मी त्यामुळेच नाराज आहे हे त्याला निराळं सांगावं लागलं नाही. <br /><br />वश्या माझं सांत्वन आणि प्रबोधन करूं लागला. एरवी एक अरभाट वल्ली अशीच वश्याची ओळख होती. पण वश्या एक तत्वज्ञ आणि भगवद्गीतेचा गाढा अभ्यासक होता. हे फार कमी लोकांना माहिती होतं. तसा तो फार कांही शिकलेला नव्हता. जेमतेम बारावी पास झालेला हा मुलगा केवळ बांधकाम मजूर म्हणून आखातात आला होता अतिशय चौकस बुद्धी आणि कोणतेही काम प्रामाणिकपणे करण्याची वृती यामुळे गेली आठ वर्षे या देशात निरनिराळ्या नौकर्या करत टिकून राहिला होता. या वाटाचालीत अनेक चित्र विचित्र अनुभवातून गेलेला होता. त्यात बर्याचदां होरपळलेलाही होता. मात्र हाताला लागेल त्या तत्वज्ञान विषयक पुस्तकाचे वाचन आणि भगवद्गीतेचा अभ्यास, चिंतन हा त्याचा प्रत्येक समस्येवरचा तरणोपाय होता. <br /><br /> यद्यदाचरति शेष्ठस्तत्तदेवेतरो जन: ।<br /> स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥<br /><br /> वश्यानं हा श्लोक ऐकवला आणि विचारले,<br />" काय समजले कां भगवान काय म्हणाले तें?"<br />" भगवान कोण?" मी बावळटासारखा प्रश्न केला.<br />" तुझा आज्जा!"<br />" असं काय करतोस रे. नीट सांग ना. एक तर त्या बॅटीने माझा मूड खराब केला आहे आणि तुला इथे कीर्तन सुचतंय."<br />" भोटमामा, भगवान म्हणजे श्रीकृष्ण आणि हा श्लोक गीतेतला आहे"<br />" श्लोक गीतेतला आहे तेवढं कळलं मला. आणि तू गीतेशिवाय बोलणार तरी काय. ते मरूं दे श्लोकाचा अर्थ सांग."<br />" सांगतो. ऐक. या श्लोकाचा अर्थ असा आहे की, श्रेष्ट पुरुष जे जे आचरण करतात, ते प्रमाण मानून सामान्य जन अनुसरतात. नव्हे ते तसें सामान्य जनांनी अनुसरावे."<br />" म्हणजे तुला काय म्हणायचंय, तो बॅटी श्रेष्ठ आणि मी सामान्य!"<br />" बघ चिडलास तूं. तुझा प्रॉब्लेम काय आहे माहितीए? हे तुझे चिडणे. प्रश्न, तो श्रेष्ठ की तू सामान्य हा नाही. तो बॅटी काय सांगतोय तें तुला समजलेले नाही. सब घोडे बारा टक्के या न्यायाने तूं चालतो आहेस. तुझ्या मनांत गोर्यांबद्धल आकस आहे तो तू काढून टाक. तुला या आधी भेटलेले गोरे बेमुरव्वत, बद्मिजाज असतील म्हणून काय सगळेच तसे असतील असं तुला वाटतंय. चुकीचं आहे तें. आणि काय रे, तूं या बॅटीशी कितीवेळ बोललास रे? तासा दोन तासात एकाद्या माणसाची पुरती पहेचान (ओळख) होते तरी कां."<br />" अरे पण वश्या, मला एक सांग. मी माझे काम नीट करतो आहे ना? मग हे असे उपटसुंभ माझ्या डोक्यावर कां लादले जाताहेत? आणि तेही मला आधी न सांगता!"<br />" अच्छा, म्हणजे तुझी ’मी’ ही समस्या आहे तर! कोण समजतोस तू स्वत:ला. खरं म्हणजे तू आहेस एक एसी मेकॅनिक. बरोबर आहे? ते काम तुला नेहमी मिळेलच असें नाही. म्हणून तुला एक दोन वेळा वेगळी कामे दिली. ती तू तुझा भेज्या वापरून चांगली केलीस म्हणून तुला कंपनीने हे काम दिले. पण लक्षांत असूं दे, इथे तू बदली कामगार आहेस. या कामाचा खरा कामगार आला तर तुला त्याची जागा खाली करून द्यावी लागेल की नाही? आणि समजा हा बॅटी तो खरा कामगार असेल तर? " मला निरुत्तर होण्यापलिकडे पर्याय नव्हता. मग वश्याच पुढे बोलू लागला.<br /><br />"भोटू, तुझा खरा प्रॉब्लेम वेगळाच आहे. कदाचित् तुला स्वत:लाही समजला नसेल."<br />" तो कसा?"<br />" सांगतो. तू खरं म्हणजे कंटाळला आहेस."<br />" म्हणजे?"<br />" म्हणजे असं की, तूं सध्या जे काम करतो आहेस त्याला तू कंटाळला आहेस. तूं एसी का काय म्हणतात त्या मशीनचा कारागीर आहेस. तुझ्या आवडीचे ते काम तुला सध्या मिळत नाही. त्यामुळे तू वैतागला आहेस. बरोबर? "<br />" तू म्हणतोस ते खरं आहे. पण या सध्याच्या कामाबरोबरच तेही काम करायला मिळणार आहे. नवीन पॅकेज युनिट अजून आलेले नाही, पण येणार आहे."<br />" मग झालं तर. तो पर्यंत वाट पहा. सध्या आहे ते काम करीत रहा. नाही तर, तो बॅटी ते काम करणार असेल तर त्याला करू देत. तू नसत्या मानपमानाच्या गुंताव्यात कां स्वत:ला अडकवून घेतो आहेस? तूं इथे हजारो मैल कशासाठी आला आहेस? पैसे कमावण्यासाठीच ना? की उत्कृष्ठ कामासाठी पदकं, शील्ड्स मिळवण्यासाठी? तुला जी काम दिलं जातं आहे ते इमाने इतबारे कर आणि गप्प रहा. भगवान् श्रीकृष्णांचा गीतेतील एक संदेश सांगतो..."<br /><br />" कर्मण्येवाधिकारस्ते....! माहिती आहे मला." मी उगाचच मध्ये बोललो. <br /><br />" नाही. तो नाही. तो वापरून वापरून फार गुळगुळीत झाला आहे. मी सांगतो आहे तो निराळा आहे." <br /><br /> तस्मादसक्त: सततं कार्यं कर समाचर।<br /> असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुष: ॥<br /><br />" म्हणजे काय? अर्थ सांग."<br />" सांगतो. सांगावाच लागेल. ऐक - तू आसक्तिरहित हो आणि सतत कर्तव्यकर्म करीत राहा. आसक्ति म्हणजे हा जो कांही ’मी’ पणा तुला सतावतो आहे तो. तो सोड. कारण आसक्तिरहित काम करणारा मनुष्य परमपदाला प्राप्त होत असतो." <br /><br /> वश्या नुसताच तत्वज्ञ नव्हता तर मानसशास्त्रज्ञही असावा असें वाटून गेले. माझ्या मनातल्या उद्विग्नतेचे कारण त्याला बरोबर समजले होते. आखातात येऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला होता. हल्ली घरची आठवण सारखी येत होती. सुरुवातीला मनाजोगी कामे मिळाली होती. त्यात मन रमले होते. आता ही असली हडेलहप्पीची कामे करावी लागत होती. कारागृहाच्या कामापैकी, त्यासाठी लागणारी संयंत्रे एकदा आली, ती व्यवस्थित लावून झाली की रजा मागावी आणि निदान कांही काळासाठी तरी भारतात परत यावे असं वाटायला लागलं होतं. <br /><br />दुसर्या दिवशी साईटवर पोहोचलो तर बॅटी अद्याप आलेला नव्हता. आता हा कां आला नाही असा विचार करीत होतो तो इदी समोर येऊन उभा राहिला. मला सकाळच्या शुभेच्छा देउन म्हणाला,<br /><br />" तुझा दोस्त बॅटी तुझ्या आधीच येऊन गेला."<br />" म्हणजे, आला आणि गेलाही. हा काय प्रकार आहे तें तूं मला सांगशील काय?"<br />" तो मुख्यालयात जातो म्हणाला. कांही साहित्त्य आणायचे आहे असें कांहीतरी म्हणत होता."<br /><br />हा माणूस मला न भेटता कां गेला? कोणत्या अधिकारात गेला? मी येईपर्यंत कां थांबला नाही? असें विचार मनात येऊ लागले पण काल वश्याने दिलेले प्रवचन आठवले. त्याला काय करायचे ते करू देत, आपण आपले काम करावे असा विचार करून मी कामाच्या ठिकाणाकडे निघालो. आमची चौकडी येऊन ठेपलेली होती आणि कामाची सुरुवात होत होती. तेवढ्यात बाहेर नवीन संयंत्र आलेले आहे अशी बातमी इदीने दिली. मी सुर्वेला बरोबर घेऊन नवीन संयंत्र बघण्यासाठी बाहेर निघालो. बरोबर इदीही होताच. हे आलेले संयंत्र या आधी अलेल्या संयंत्रापेक्षा किंचित् लहान होते. पण त्याला आत आणून कामाच्या जागी नेऊन कसे बसवावयाचे ही समस्या होतीच. कारागृहाच्या मोठ्या दरवाजातून ते आंत येऊ शकणार होते. पण दरवाजाचा आकार ते संयंत्र जेमतेम आंत ढकलता येईल इतकाच होता. क्रेनचा उपयोग करता येणार नव्हता. मी मनाशी एक योजना आखूं लागलो. फॉर्कलिफ्टचा वापर करून संयंत्र खाली जमीनीवर उतरवून घ्यावे. फॉर्कलिफ्टचाच वापरकरून ते दरवजापर्य़ंत नेऊन ठेवावे आणि फॉर्कलिफ्ट आधी दरवाजातून आंत नेऊन त्याच्याच मदतीने संयंत्र आंत ओढून घ्यावे असा विचार केला. कारण फॉर्कलिफ्टने उचललेल्या अवस्थेत संयंत्र आंत नेणे दरवाजाच्या अपुर्या उंचीमुळे शक्य होणार नव्हते. फॉर्कलिफ्ट आणि संयंत्र हलवण्य़ासाठी कांही लाकडाचे ठोकळे, पहारी इत्यादि मुख्यालयला फोन करून मागवून घ्यावे म्हणून फोन करण्यासाठी इदीच्या कार्यालयाकडे मी वळलो इतक्यात एक छोटी मालवाहू मोटार (pick-up van) घेऊन बॅटी हजर झाला. त्याने कांही सेफ्टीबेल्ट्स, दोर्या इत्यादि सामान आणलेले होते. आता तोही मला सामील झाला. मी त्याला माझी योजना सांगितली. मला काय काय लागणार होते ते त्याने नीट समजाऊन घेतले आणि मुख्यालयाला फोन झाल्यानंतर स्वत:च जाऊन सारे साहित्त्य आणण्याची तयारी दर्शविली. त्याचे म्हणणे बरोबर होते. साहित्त्य कंपनीच्या भांडारातून आणावे लागणार होते, जे कारागृहाच्या जागेपासून किमान दहा किलोमीटर दूर होते. मी बॅटीला भांडाराकडे पिटाळले आणि मुख्यालयाला फोन करून कामाची आणि लागणार्या साहित्त्याची कल्पना दिली. <br /><br />क्रमश:आखाती मुशाफिरी (२३)<br />अरुण वडुलेकर बुध, २५/०४/२००७ - ०१:३६. » कथा | अनुभव <br /> <br />मी बॅटीला भांडाराकडे पिटाळले आणि मुख्यालयाला फोन करून कामाची आणि लागणार्या साहित्त्याची कल्पना दिली. <br />-------------------------------------------------------------------------------------------------<br />बॅटी गेल्यानंतर मी जुन्या डक्ट्स काढण्याच्या कामाचा आढावा घेतला. काम पूर्णपणे आटोक्यात होते. उरलेल्या डक्ट्स काढण्याचे काम आज साय़ंकाळपर्यंत पूर्ण होतील आणि नवीन डक्ट्सचा संच लावण्याचे काम उद्या सकाळी सुरू करता येईल असा मी विचार करीत होतो. या कामाच्या पूर्वनियोजने प्रमाणे कंपनीच्या कारखान्यात नवीन डक्ट्स तयार झालेल्या आहेत असा निरोपही आलेला होता. माझ्या कामाच्या अंदाजाबाबत सुर्वेचे काय म्हणणे आहे ते जाणून घेण्यासाठी मी त्याला बोलावले,<br /><br />" काय सुर्वे, कसं काय चाललंय काम? कधी संपतंय हे डक्ट्स काढण्याचं काम?" <br />" साहेब, काम तसं बरं चाललं आहे. काम संपायला अजून तीन चार दिवस लागतील."<br />" तीऽन चाऽर दिवस? सुर्वे हे काम आज संपायला हवं. नवीन डक्ट्स तयार झाल्या. त्या उद्या किंवा परवा येऊन पडतील. ए-एच-यू (संयंत्र) पण आला आहे. कसं काय करायचं?"<br />" साहेब, काय करणार? म्हणायला आपली चार माणसं आहेत पण मी आणि गजाभाऊ (सावंत) दोघेच काम खेचतो आहे. वामन (महाडिक) जरा बरा, निदान सांगेल तेवढा करतो तरी, पण कांबळी (महादू) काय कामाचा नाही साहेब. काय सांगायला जावे तर काय ते उरफाटेंच करून ठेवतो. एक तर जाग्यावर कधी थांबत नाही. कधी तंबाखू खायालाच जाईल तर कधी पाणी पियाला. आन् गेला की तिकडेच टाइम पास करीत राहातो."<br />" अरे, पण हें तुम्ही मला कधी बोलला नाहीत"<br />" काय बोलाचा साहेब. आपलेच दात आणि आपलेच ओठ. माझा गांववाला लागतो तो. सांभालून घ्यावा लागतो."<br />" सांभाळून घ्यावा लागतो म्हणजे काय? कामाची खोटी नाही होत? "<br />" कामाची खोटी होऊन देणार नाही साहेब. आज तुम्हाला सांगितलां. कां? तर तुम्ही जरा त्याला बोला. माझा काय नाय. मी खेचून घेईन काम. पण तो नवीन साहेब (बॅटी) आला आहे. फार डेंजर माणूस आहे साहेब. सगला काम येतो त्याला. त्याने याचा कोठे रिपोर्ट केला तर नांव तुमचे खराब होईल. साहेब."<br />" सुर्वे, आलं लक्षांत. मी असं करतो, महादूला माझ्याकडे घेतो. नाही तरी मशीन आलेलं आहेच. आता माझं काम चालू होईलच. त्यात त्याला घेतो. पण तुम्हाला चालेल ना?"<br />" चालेल साहेब. पण जरा दमानं घ्या साहेब. मीच त्याला इकडे आणला आहे. येत नव्हता. पण म्हटले लायनीला लागेल हा. लागला तर बरंच आहे. हाताखाली घ्याच तुमच्या. काय शिकेल तरी. उपकार होतील साहेब तुमचे. "<br />" सुर्वे, कमाल आहे तुमची. महादूची तुम्ही तक्रारही करताय आणि तरफदारीही. नवल आहे."<br />" काय करणार साहेब. साला लागतो माझा !" सुर्वे खाली मान घालून पुटपुटला.<br /><br /> तो काय म्हणाला हे क्षणभर माझ्या ध्यानांत आलेच नाही आणि ध्यानांत आले तेंव्हा मी उडालोच. साला म्हणजे बायकोचा भाऊ! कांही न बोलता सुर्वेला कोपरापासून नमस्कार करावा असं वाटलं, पण पदाच्या जाणिवेने मी तसं करू शकलो नाही. मात्र विषय बदलण्याच्या उद्देशाने मी विचारले,<br /><br />" सुर्वे,तें जाऊ द्या. तें बघू नंतर. पण हे काम संपायला आणखी तीन चार दिवस लागतील म्हणालात. तें कसं काय? महादूमुळे तर नक्कीच नाही. काय कारण आहे?"<br />" साहेब, आता एंड पीसेस् (शेवटचे भाग) राहिले आहेत. एक तर साईझला मोठे आहेत आणि एंट्री, त्यामुळे स्लिपा गंजलेल्या आहेत. लवकर निघत नाहीत. वेळ लागतो. एकेक स्लिप अर्धा अर्धा तास खाते."<br /><br />सुर्वेने सांगितलेली अडचण बरोबर होती. एंट्री म्हणजे मुख्य वातवाहिकेचा (मेन-डक्ट्चा) सुरुवातीचा भाग. या भागावरील तापमान-विरोधक-आवरणाला (thermal insulaation) एकतर तडे जातात किंवा ते नीट झालेले नसते त्यामुळे थंड झालेली हवा संयत्रातून बाहेर पडून या भागातून पुढे जाते त्यावेळी वातावरणातील आर्द्रतेचे धातूच्या डक्ट्च्या बाहेरील पृष्ठ्भागावर सांद्रिभवनामुळे (condensation) पाण्याच्या थरात रुपांतर होते आणि डक्ट बाहेरील बाजूने गंजते. सहाजिकच डक्ट्सचे जोड (slip joints) गंजतात. <br /><br />एवढ्यात बॅटी तिथे येऊन दाखल झाला. मला शुभप्रभात म्हणत आणि हस्तांदोलन करीत त्याने संयंत्र हलविण्यासाठी लागणार्या सामग्रीची जुळवाजुळव झालेली आहे आणि फॉर्कलिफ्ट तासाभरांत हजर होईल अशी खबर दिली. सुर्वेने सांगितलेली अडचण मी बॅटीला सांगितली. बॅटीने डोळे अगदी बारीक करीत मिस्किल चेहर्याने एकदा माझ्याकडे पाहिले आणि एकदा सुर्वेकडे पाहिले. तो तसाच कांही काळ आळीपाळीने आम्हा दोघांकडे पहात राहिला. आणि मग एकदम ओरडला,<br /><br />" सोपं आहे. कापून टाका."<br /><br />माझ्या आणि सुर्वेच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. गंजलेले जोड काढायचे तरी कशाला? सरळ कापून काढायचे. अर्थात् त्यासाठी कापण्याची साधने उपलब्ध करून द्यावी लागणार होती. पण त्या कामाची आता मी काळजी करणार नव्हतो. तें मी बॅटीवरच सोपवणार होतो. बॅटीनेही तें आनंदाने मान्य केले. <br /> <br />फॉर्कलिफ्ट येईपर्यंत बॅटीने व्यवस्था केलेल्या वस्तू पाहाव्यात आणि संयंत्र हलविण्याची रूपरेषा जुळवावी या हेतूने मी बॅटीची परवानगी घेउन बाहेर निघालो.<br /><br />" तूं संयंत्र कसें हलवणार आहेस तें मलाही बघायचे आहे, बरं कां!. मिरवणूक निघाली की मला बोलवायला विसरू नकोस माझ्या प्रिय मित्रा. " बॅटी मागून ओरडला. <br />" हो, हो, नक्कीच. नक्की बोलावीन मी तुला." मी देखील ओरडूनच प्रत्युत्तर दिले.<br />५८<br />बॅटीने उपलब्ध केलेले सामान मी तपासू लागलो. बाहेर ऊन चांगलेच तपलेले होते पन आज मला उन्हातच काम करायचे आहे याची कल्पना होती म्हणून घरून येतांनाच मी माझी उन्हांत घालायची टोपी आणलेली होती. माझ्या पाठोपाठ हातांत दोन शीतपेयाचे डबे (can) घेउन इदीही मला सामील झाला. इदीचे हें एक बरें होतें. कांहींना कांहीं पाहुणचार त्याचा सतत चालूच असायचा. मी साहित्त्याची पाहाणी करीत होतो त्यावेळी माझी एक चूक माझ्या लक्षात आली. मी वस्तू आणि अवजारे मागवली होती पण काम करण्यासाठी अतिरिक्त माणसें? त्याचा मी विचार केलेलाच नव्हता. मी सुर्वे आणि कंपनीच विचरांत घेतलेली होती. पण त्या माणसांना या कामाचा अनुभव असण्याची शक्यता कमीच होती. इतक्यात मुदीर तेथे येऊन पोहोचला. मी मुदीरची क्षमा मागून माझी अडचण सांगितली. मुदीरच्या चेहर्यावर नेहमीचे मिश्किल हसूं विलसले. <br /><br />" मला याची कल्पना होतीच. तुझे कांहीं मित्र तुला या कामात मदत करण्यासाठीं येणार आहेत. काळजी करू नकोस"<br /><br />असें म्हणुन मुदीर नवे संयंत्र न्याहाळण्य़ासाठी निघाला आणि इदी मुदीरसाठी शीतपेयाचा डबा आणण्यासाठीं पळाला. एवढ्यात दोन फॉर्कलिफ्ट येतांना दिसले. ते जवळ येतांच त्यावरील माणसे पाहून मी हर्षातिरेकाने ओरडलोच,<br /><br />" वाह् झक्कास! काय आश्चर्य आहे!’<br /><br />एका फॉर्कलिफ्टवर नुरूलखान होता आणि दुस्रर्यावर कादरखान. कादरखानने फॉर्कलिफ्ट थांबवून बंद करत खाली उडी घेतली आणि माझ्याशी हस्तांदोलन करीत ओरडला,<br /><br />" मरहब्बा या हबीबी! कैफ हालूक?" ( किती आनंद आहे मित्रा. कसा आहेस तू?)<br /><br />कादरखान जरी एक कामगार असला तरी आज इथे तो जणूं माझा मित्र बनून आला होता. त्यामुळे त्याने दाखवलेली जवळीक मला खटकली नाही. त्याच्या बरोबर आलेल्या आणखी दोन पठाणंची त्याने ओळख करून दिली. त्यातला एक मुदस्सरखान होता आणि दुसरा इम्तियाजखान. मी कादरखानला माझी योजना समजावून सांगत होतो तेवढ्यात मुदीर आमच्या रोखाने येत असलेला दिसला. सगळे पठाण आदबीने दोन पावले मागे सरकले आणि त्यांनी मुदीरला अभिवादन दिले. मुदीरने हात उंचावुन त्याचा स्वीकार केला आणि गाडीत बसून निघून गेला. मी कादरखानला नवीन संयंत्र दाखवले तर तो गमतीने म्हणाला,<br /><br />" वय् ये तो बच्चा है । इसको तो पठान जेबमें लेके घूम सकता." <br /> मला हसूं आले. तें पठाणाच्या विनोदालाही होते आणि समाधानाचेही होते. <br /><br />आमच्या कार्यवाहीला सुरुवात झाली. ती पाहाण्यासाठी मी बॅटीला बोलावून घेतले. एक फॉर्कलिफ्ट कारागृहाच्या दरवाजातून आंत येऊन धांबली आणि दुसर्या फॉर्कलिफ्टने संयत्र मालमोटारीतून उतरवून दरवाज्यालगत आणून ठेवले आणि ते मागे सरकून उभे राहिले. संयंत्र सरळ जमीनीवर न उतरवता दोन मोठ्या आणि लांब पाईपावर उतरवून घेतले गेले होते. आंत आलेली फॉर्कलिफ्ट आणि ज्यांत संयंत्र बंदिस्त केले गेले होते त्या खोक्याला मिळून पोलादी दोर (slings) बंधल्या गेले. दोर बांधून होताच नुरुलखानने फॉर्कलिफ्ट चालू करून ते खोके आंत ओढून घेतले. खोके पुरेसे आंत आल्यानंतर बांधलेले दोर सोडवून घेतले आणि फॉर्कलिफ्ट बाजूला नेऊन उभी केली गेली. त्यानंतर ते खोके पाईपावरून पहारींचा उपयोग तरफेसारखा करीत, कटवत कटवत संयंत्रासाठी बांधलेल्या जोत्यापर्यंत नेले गेले. आता सुमारे गुडघाभर उंचीच्या त्या जोत्यावर संयंत्राचे खोके चढवावयाचे होते. जोत्यापासून खोक्यालगत जमीनीवर दोन तगडे पाइप तिरपे ठेवले गेले आणि त्यांना खालून आधारासाठी लाकडी ठोकळे लावले. जोत्याच्या पलिकडल्या बाजूला जमीनीत एक पहार खोचून तिला एक दोर-कप्पी (rope hoist) बांधली आणि तिचा दोर संयंत्राच्या खोक्याला बांधून कप्पीच्या सहाय्याने खोके हळूहळू जोत्यावर ओढून घेतले गेले. या सगळ्या कार्यक्रमाला सुमारे तीन तास लागले. संयंत्र सुखरुप जोत्यावर स्थानापन्न झाले. फॉर्कलिफ्ट, साहित्त्य आणि पठाण परत गेले.<br /><br />ही सगळी मोहीम पाहून बॅटी विस्मय-चकित झाला. त्याने अवजड वस्तू हलविण्याचा हा असा प्रकार प्रथमच पाहिला होता. पण ही पद्धत कांही नवीन नव्हती. क्रेन नांवाचे यंत्र जन्माला येण्यापूर्वी इजिप्तमधील पिरॅमिडचे अवजड दगड आशाच प्रकारें हलवले गेले होते हा इतिहास मी वाचला होता. तीच युक्ति वापरुन मी या आधीही अशी हलवाहलव केली होती आणि आजही तीच युक्ति कामाला आली.<br /><br />आता उद्यापासून संयंत्र कार्यान्वित करण्याचे (commissioning) आणि नवीन डक्ट्सचे उभारणीचे काम सुरु होणार होते. संयंत्र कार्यान्वित करण्याच्या कामी मला एक नवीन मदतनीस मिळणार होता. <br /><br />क्रमश:आखाती मुशाफिरी (२४)<br />अरुण वडुलेकर गुरु, २६/०४/२००७ - २३:५५. » कथा | अनुभव <br /><br />आता उद्यापासून संयंत्र कार्यान्वित करण्याचे (commissioning) आणि नवीन डक्ट्सचे उभारणीचे काम सुरु होणार होते. संयंत्र कार्यान्वित करण्याच्या कामी मला एक नवीन मदतनीस मिळणार होता. <br />---------------------------------------------------------------------<br />काल संयंत्र हलविण्याच्या कामात माझी जी धावपळ झाली होती त्याचे परिणाम त्यावेळी आज सकाळी जाणवत होते. खांदे,मान, पाठ, आपले निराळे अस्तित्व दाखवीत होते. सकाळी बिछान्यातून अगदी उठवत नव्हते. एकदा वाटले, कार्यालयाला फोन करून आजची सुटी घ्यावी. पण धीर होत नव्हता. लहानपणी माझी आजी म्हणायची, राजाला आणि मोतद्दाराला कधी सुटी घेता येत नाही. राजा तर मी नव्हतो. मोतद्दार मात्र असेन कदाचित्. कसाबसा उठलो, सकाळची आन्हिके उरकली आणि तयार झालो. घड्याळाचे कांटे आज फार भर भर चालत होते. उशीर झालाच होता. रोजच्या प्रमाणे जेवणच काय पण न्याहारी करायलाही सवड नव्हती. शीतकपाटात डोकावले. एक केकचा तुकडा शिल्लक होता आणि खोक्यात थोडे दूध. अडीअडचणीला उपयोगी पडावे म्हणून मी एखादा दुधाचा खोका आणून ठेवीत असें. दूध गारच प्यायलो, केकचा तुकडा घशांत कोंबला आणि वर एक वेदनाशामक गोळी ढकलली. घरातुन बाहेर पडतांना टेबलावरचे घड्याळ माझ्याकडॆ डोळे वटारुन पाहात होते.arun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-56655166402423679222007-03-22T03:25:00.000-07:002007-03-22T03:44:57.317-07:00कळावे लोभ असावा..अगदी भक्त पुंडलिकापर्यंत,<br />जाण्याची गरज नाही<br />खूप अलिकडच्य काळांतही<br />वडिलांची बूज राखली जाई<br /> कोट टोपी अन् बार काड्यांची छत्री<br /> यांचाही आदर वाटत होता<br /> गावाकडचा 'म्हातारा', शहरातले 'बाबा'<br /> वेदवाक्यासमान त्यांचा शब्द वाटत होता<br />श्रीकाराखालील निमंत्रण पत्रिकेत<br />'कुलस्वामिनी कृपेंकरून' इत्यादि नंतर<br />'वडिलांचे विनंतीस मान देऊन.......'<br />बाकी नांवे छापण्याची कुलीनता होती<br /> पुढें निमंत्रणे मोअर प्रॅक्टिकल झाली<br /> 'मिस्टर अँड मिसेस इन्व्हाईट कॉर्डियली'<br /> आटोअशीरपणाने जिव्हाळा बेतला<br /> नीड टु नो पॉलिसीचा बोलबाला झाला<br />आता तोही एक इतिहास झाला.<br />'नितु वेडस् चिंपू' ; एस्सेमेस आला<br />कुठे ? .......... कधी ?.........<br />कॉलबॅक तुम्ही करायचं आहे,<br />त्यांच्या मोबाईलला इनकमिंग फ्री आहे<br /> कुठून कुठे आलो; पहायचीही सवड नाही<br /> मात्र......<br /> कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत तरीही <br /><br /> ---अरुण वडुलेकरarun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-32488418822743101542007-03-22T03:17:00.000-07:002007-03-22T03:19:51.581-07:00कसं सांगू .....!कसं सांगू .....!<br />तुला पटणारही नाही.<br />साक्ष तुझ्या-माझ्या गुपिताची,<br />तो निशिगंध....<br />अबोल झालाय !<br /><br /> तुला आठवतं.........?<br /> त्या अनुरागी क्षणांवरती<br /> त्याच्याही गंधाची <br /> पखरण होतीच,<br /> त्या कैफाचा स्पर्षवारा,<br /> त्यालाही हवासा वाटला.<br /><br />ताटातुटीच्या क्षणी........!<br />'पुन्हा येते' म्हणालीस,<br />आली नाहीस.<br /><br /> तुझ्या प्रतीक्षेत तो मात्र,<br /> कोमेजून गेलाय......!<br /><br />माझं कांही नाही.....!<br />पण निदान त्याच्यासाठीं तरी,<br />तुला पुन्हा यायलाच हवं......!!arun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-35342115467299768532007-03-21T00:54:00.000-07:002007-03-22T10:21:42.817-07:00पाथेय (दख्खनराणी प्रति)शोषणाच्या वेदनेची ओल ज्यांनी जाणिली अन् तिमिर डोही एक पणती लाविली, त्यांना सलाम !<br />तो वसा जाणुनी ज्यांनी राउळे मांडिली, अन् मार्गदर्शी दीप स्तंभी मांडिले, त्यांना सलाम !<br />त्या चिऱ्यांवर नांव अपुले कोरिले, अन् बावटे अपुलेचि मिरवुन नाचले, त्यांना सलाम<br />मूलमंत्रांच्या ऋचा कर्मकाण्डी गाडिल्या, अन् वल्गनांचे घोष ज्यांनी कंठाळले, त्यांना सलाम !<br />शोषितांच्या प्रेषितांचे ढोंग ज्यांनी वठविले, अन् तृप्त उदरी तोषुनी सुस्तावले, त्यांना सलाम !<br />खोगिरांची भरती जी, मातली मस्तावली, अन् तुडविले देवटांके बुद्ध्याचि, त्यांनाही सलाम !<br />तें तिथें घडले, कां न ठावे, ना जणिले परि, अन् लाविली चूड अपुल्याचि सदना, त्यांना तर सलामच सलाम !<br />ठिणगीने त्या जळली राणी दख्खनची अन् मख्ख बसले सह्यकडे धास्तावलेले, त्यांनाही सलाम !<br /><br />कवि- अरुण वडुलेकरarun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-38149862585092200272007-03-20T04:22:00.000-07:002007-03-20T10:12:06.694-07:00आस<div align="center">एकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा</div><div align="center">आर्त झालेल्या जिवाच्या संपल्या साऱ्या कथा </div><div align="center"> </div><div align="center">जाणिवा ज्या मूर्त होत्या </div><div align="center">स्पंदने जी छंद होती</div><div align="center">आज त्या संवेदनांच्या दग्ध झाल्या पाकळ्या</div><div align="center">एकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा... ॥ १ ॥ </div><div align="center"> </div><div align="center">मृदु स्वरांनी गायिलेले </div><div align="center">गीत अनुरागी क्षणांचे</div><div align="center">त्या स्वराच्या छिन्न झाल्या तरलशा साऱ्या तऱ्हा</div><div align="center">एकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा... ॥ २ ॥ </div><div align="center"> </div><div align="center">जीवनाची आस सरली </div><div align="center">ज्योतही ती क्षीण झाली</div><div align="center">स्नेह ना मी मागतो परि, फुंकुनी जा हा दिवा </div><div align="center">एकदा येऊन जा, घेऊन जा साऱ्या व्यथा... ॥ ३ ॥<br /></div><br /> -- अरुण वडुलेकरarun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-7498393533056669698.post-89029882299552109462007-03-06T02:44:00.000-08:002007-03-06T02:48:15.001-08:00ज्योतिषशास्त्र - कांही उत्तर्रंज्योतिष हे अनुभवसिद्ध शास्त्र असले तरी तो एक वादाच्या विषय असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवणारे, त्याचे अभ्यासक तथा व्यासंगी त्यावर जाहीर चर्चा करण्याच्या भरीस पडत नाहीत. या शास्त्रावर विश्वास ठेवणारे व त्याचा समाधानकारक अनुभव घेणारे अनुभव घेणारे केवळ भारतांतच नव्हे तर संपूर्ण जगांत फार मोठ्या संख्येने आहेतच. मनोगतवरील एक जिज्ञासू के. सौरभ यांनी त्यांच्या ’ ज्योतिषशास्त्र - कांही प्रश्न’ या लेखांत कांही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांना यथाशक्ति उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहे.<br /> त्या आधी एक सांगावेसे वाटतें कीं, ज्योतिषशास्त्र केवळ पुस्तकावरून अभ्यासण्यापेक्षा या विषयाचे शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या माध्यमांतून सूत्रबद्ध अध्ययन करणें अधिक हितावह ठरेल. पुस्तकांतून ग्रहांबद्धल माहिती, त्यांचे शुभाशुभत्व, परस्पर शत्रु-मित्रत्व आणि निरनिराळ्या भावांतील कारकत्व इत्यादि माहिती मिळू शकते पण समग्र फलिताच्या दृष्टीने ती अपुरी पडतें. किंबहुना कांहीवेळा संदेह निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या शास्त्राचे पायाभूत असें सिद्धांत, संहिता व होरा या तीनही स्कंधांचे व्यासंगपूर्ण अध्ययन केले तर शास्त्राबद्धल शंका उरणार नाही.<br /> आता उपस्थित केल्या गेलेल्या शंका व त्यावरील माझी यथाशक्ति उत्तरे. :<br />प्र. १) नवमांश, भावचलित व निरयन भावचलित कुंडली म्हण्जे काय ?<br />उत्तर : सहसा जन्मलग्न कुंडली व राशीकुंडली वरून भूत-भविष्याचा वेध घेतला जातो. यासाठीं शास्त्राचे प्राथमिक ज्ञान पुरेसें आहे पण घेतलेला वेध अगदी ढोबळमानाने असतो. त्या नंतर अधिक अचुकता येण्यासाठीं लग्नकुंडलीतील ग्रहांशांची विशिष्ट प्रकारें विभागणी करून सूक्ष्म भावपरीक्षण करतां येते. त्यायोगें विविध वर्गकुंडली सिद्ध होतात. एक प्रकारें मूळ लग्न कुंडली हें एकप्रकारचें पृथक्करण केले जाते. लग्नअंश तसेंच ग्रहांशाचे किमान निरनिराळे सहा विभाग करून सहा निरनिराळ्या कुंड्ल्या केल्या जातात त्याला षड्वर्गसाधन असें म्हणतात. त्यापैकी नवमांश कुंडली हा एक वर्ग आहे. यांत लग्नांश व ग्रहांशाचे नऊ समान भाग करून त्यातील एक नवमांश भाग विचारांत घेतला जातो.<br /> उदाहरणार्थ, जसें वैद्यकीय चिकित्सांर्गत रक्त तपासणीत रक्तातील अनेक घटकांचे परिक्षण करता येते. मात्र जशी व्याधी झाली असेल त्या व्याधीला कारणीभूत असणा़ऱ्या नेमक्या घटकाचे अधिक सूक्ष्म पृथक्करण करून नेमक्या निर्णयाप्रत जाता येते.<br /> नवमांश कुंडली अशाच प्राकारें ’ कलत्र’ म्हणजे वैवाहिक सहचर/साहचर्य यासंबंधी अधिक विस्तृत बोध देते.<br /> भावचलित कुंडली : लग्न कुंडली जशी अचुक जन्मवेळेवर अवलंबून असते तशी भावचलित कुंडली जन्मवेळेपूर्वी जन्मवेळेनंतरच्या अचुक माध्यान्ह वेळेवर अवलंबून असते. माध्यान्ही सूर्य ख-मध्यावर असतो आणि त्याअनुरोधाने कुंडलीतील दशमभावाचे अचुक अंश मिळतात त्यावरून सर्वच भावांचे मध्य व आरंभ निश्चित होतात. त्या अनुरोधाने ज्या कुंडलीत ग्रह आपापल्या अंशाप्रमाणे स्थित होतात त्या कुंडलीला भावचलित कुंडली म्हणतात. या प्रक्रियेत कांही वेळा एखादा ग्रह लग्नकुंडलीत ज्या भावांत असतो, भावकुंडलीत तो मूळ भावाच्या मागील अथवा पुढील भावांत जाऊ शकतो. म्हणजे एखादा ग्रह लगन कुंडलीत जर प्रथम भावांत असेल तर भावचलितात तो द्वितीय अथवा द्वादश भावांत जाऊ शकतो आणि मूळ भावाबरोबरच बदललेल्या भावाचाही फलिताच्या दृष्टीने विचार करता येतो. अर्थातच, फलिताची अचुकता वाढू शकते.<br /> सायन व निरयन भावचलित : ज्योतिष शास्त्रात सायन - अयनांशा सह व निरयन - अयनांश वगळून अशा ज्योतिष करण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यानुसार केलेल्या भावचलिताला त्या त्या पद्धतीचे नाव दिले जाते. सायन पद्धती तांत्रिकदृष्ट्या अचुक आहे, परंतु निरयन पद्धती फलितासाठी अधिक उपयुक्त ठरते.<br />२) शंखचूड कालसर्पयोग म्हणजे काय ?<br />उत्तर : कालसर्पयोग हाही एक विवादास्पद वि्षय आहे. यासाठीं राहू-केतूच्या अक्षात येणाऱ्या ग्रहांचा विचार केला जातो. परंतु हे दोन्ही ग्रह नसून क्रांतिमार्गावरचे पातबिंदू असल्याने त्याचा फलितासाठीं करूं नये असा एक प्रवाह आहे. तथापि नवम् स्थानांत राहू व तृतीय स्थानांत केतू असल्यास शंखचूड कालसर्प योग मानण्याचा प्रघात आहे. ज्याच्या परिणामी धर्माचिरुद्ध आचरण, कठोर वर्तन, सदैव चिंता, उच्च रक्तदाब, संदेकास्पद वर्तन असें दोष मानले जातात.<br />३) गुरु हा शुभग्रह आहे असे म्हणतात. जर पत्रिकेत गुरु निर्बली वा अशुभ ग्रह संबंधित व सध्या गुरुची महादशा चालू असेल तर जातकाला गुरुच्या संदर्भात शुभ फले मिळतील की अशुभ ?<br />उत्तर : गुरु शुभग्रह आहे. तो कधीही अशुभ फले देत नाही. मात्र अशुभ संबंधात असेल तर भावगत फलात, मग ती शुभ असोत की अशुभ, गौणत्व आणतो. महादशा संदर्भातहाच नियम लागू होतो. कोणतीही महादशा संपूर्णपणे चांगली अथवा वाईट असत नाही. तिचा बरे वाईटपणा महादशेतील आंतरदशेवरही अवलंबून असतो.arun vadulekarhttp://www.blogger.com/profile/06168053133936405835noreply@blogger.com0